🍁🍁यशायाह (Isaiah)🍁🍁
राजा "हजकिया" (Hezekiah) (700BC) (साधारणतः 2700वर्षांपूर्वी) जेरुसलेम (जूदा) या राज्यावर राज्य करीत होता. अल्लाहचा चांगला सेवक आणि राजा होता. त्यावेळी 'यशायाह ' हे अल्लाहचे संदेश कर्ता होते. राजा हजकीया, राज्याच्या चांगल्यासाठी, यशायाह,जे काही करण्याचा सल्ला देत होते आणि ज्यावर प्रतिबंध लावत होते, राजा ऐकत होता आणि त्यांचा आज्ञाकारी होता आणि त्यांना सल्ला मागत होता. इस्रायली लोकांमध्ये घडामोडी होत गेल्या आणि प्रकरणांना वेग आला. राज्य एका योग्य राजाच्या हातात होते आणि राज्याची प्रजा त्यांना पसंत करत होती. एक दिवस राजाला एक आजार झाला. त्याचा पायाला संसर्गित जखम झाली. याच काळात त्यांनी एक भयानक बातमी ऐकली. त्यांचा एक सेवक राजवाड्यात पळत आला आणि त्याने ओरडून सांगितले, " ' बेबिलोन ' चा राजा 'सनहेरीब ' (sennacherib) आपल्यावर आक्रमण करण्यास येत आहेत." आणि हे खरे होते. क्रूर आश्शुरी राजा साठ हजार सैन्यासह इस्राइल (जेरुसलेम) कडे येत होता.
बेबिलोन (बाबिली) हे मेसोपोटेमिया मधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते. या शहराची स्थापना 1894 BC मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली होती.(हल्लीच्या इराक, इराण, तुर्कस्तान व सीरिया या देशांचा काही भूभाग प्राचीन काळी ' मेसोपोटेमिया' भूप्रदेश नावाने ओळखला जायचा.)
{बेबिलोन चे अवशेष इराकच्या बेबीलोन प्रांतातील अल हिल्लाह या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात.}
लोक खूप भयभीत झाले.बातमी ऐकून राजा चिंताग्रस्त झाला आणि त्याने यशायाह ला विचारले, "अल्लाह ने सेनेरब आणि त्याच्या सैन्याविषयी तुमच्यावर काय प्रकट केले (सांगितले) आहे".
"अल्लाहने आतापर्यंत मला काहीही नाही सांगितले", त्यांनी उत्तर दिले.
राजा दुःखी होता. कारण तो त्याच्या पायाच्या आजारमुळे लढाई करू शकत नव्हता.
यशायाह प्रार्थना करत होते, तेव्हा अल्लाहने त्यांना एक गुप्त गोष्ट सांगितली. (प्रकट केली)
दुसऱ्या दिवशी यशायाह संदेश घेऊन राजाला भेटावयास आले.
"तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या उत्तराधिकारीची नेमणूक करा .कारण तुमची शेवटची वेळ आलेली आहे."
जेव्हा यशायाहने हे सांगितले, राजा प्रार्थना स्थळाकडे तोंड करून प्रार्थना करू लागला. त्याने गौरवशाली अल्लाहला प्रार्थना केली आणि विनंती केली, रडला.
प्रामाणिक मन, विश्वास आणि संयम ठेवून, सर्वशक्तीशाली आणि उदात्त अल्लाहला रडत आणि विनंती करत, तो म्हणाला" हे प्रभू, माझ्या कर्मांची आठवण ठेव, इस्राइलच्या लोकांसाठी असलेला निर्णय, सगळे तुझ्याकडूनच होते. मी जे करतो, ते तू चांगले जाणतो. माझे सर्व काम आणि माझे खुले आणि गुप्त कार्य तुझ्या समोर आहेत."
जेव्हा अल्लाहने हिजकियाची मनापासून केलेला प्रार्थना ऐकली, तेव्हा अल्लाहला त्याच्यावर दया आली.
त्या रात्री जेव्हा यशायाह प्रार्थना करत होते, अल्लाहने त्यांना राजाला आनंददायक बातमी देण्यास सांगितले की, त्याच्यावर दया झाली आहे. अल्लाह आणखी पंधरा वर्षांसाठी हिजकीयाचे वय वाढवणार आहे. आणि त्यांचा आजार बरा होणार आहे. आणि शत्रू सनहेरीब पासून वाचवनार आहे.
लगेच दुसऱ्या दिवशी यशायह ने राजाला ही चांगली बातमी दिली. जेव्हा राजाने हे ऐकले, तो आनंदी झाला.
दुःख आणि वाईट विचार दूर झाले. त्याने वाकून प्रणाम करून प्रार्थना केली, " हे प्रभू, तू ज्याला इच्छितो त्याला राजा बनवतो आणि ज्याला इच्छितो त्याला सत्तेवरून काढून टाकतो.ज्याला इच्छितो त्याला उन्नत करतो आणि ज्याला इच्छितो त्याची अधोगती करतो. अदृश्य जाणणारा आणि स्पष्ट असणारा. सगळ्यात पहिला आणि शेवटचा. अभिव्यक्त आणि ज्ञात असणारा. तू दया दाखविली आणि अस्वस्थ लोकांच्या प्रार्थनांना उत्तर दिले."
जेव्हा राजाने त्याचे डोके वर केले, अल्लाहने यशायाह ला राजाला आदेश देण्यास सांगितला की, अंजिराचे पाणी काढून त्याच्या जखमेवर लावावे आणि तो बरे होईल.
राजाने अल्लाहच्या आदेशा प्रमाणे पाणी लावले. हा एक चमत्कार होता. त्याचे जखम लगेच भरले. राजा आनंदी होता. त्याने म्हंटले की, ' अल्लाह दया करतो आणि दुःखी लोकांच्या वेदना कमी करतो.
अल्लाहने सनहेरीब च्या सैन्याकडे मृत्यु च्या स्वर्गदुताला पाठविले. सकाळी राजा सनहेरीब ने त्याच्या सैन्याला मृत झालेले पाहिले.अल्लाहने जे वचन दिले होते ते पूर्ण केले. राजा आणि त्याचे पाच सहकारी सोडून कोणीच जिवंत नव्हते.या पाच सहकाऱ्यांमध्ये नबूकदनेस्सर (बूख्त नसर) ही होता.
राजा हजकिया ने त्यांना बेड्या घातल्या आणि त्यांच्या राज्यात वापस नेले. त्यांनी सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, सर्वांना दिसण्यासाठी, दरबाराच्या शिक्षा देण्याच्या जागी ठेवले आणि सत्तर दिवसापर्यंत, द्वेष आणि अपमानित करण्यासाठी कैदेत ठेवले. रोज प्रत्येकाला खाण्यासाठी बारले ची भाकरी देण्यात यायची. सत्तर दिवसानंतर त्यांना राजाने तुरुंगात टाकले.
सत्तर दिवसानंतर अल्लाहने यशायाह ला सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांच्या राज्यात वापस पाठवण्यास सांगितले. जेणेकरून ते त्यांच्या लोकांना सावध करतील, की त्यांच्यासोबत काय घडले. जेव्हा यशायाह ने राजा हजकिया ला या बाबतीत संदेश दिला, तेव्हा राजाने तुरंत त्यांना मुक्त केले.
जेव्हा सनहेरीब त्याच्या लोकांत वापस गेला, त्याने त्याच्या वाजिरांना आणि सल्लागारांना जमा केले आणि सांगितले, की त्यांच्या सैन्याला कसे मारण्यात आले आणि सत्तर दिवस त्यांना त्रास दिला.
तेव्हा धार्मिक लोक आणि जादूगार लोक पुढे आले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला अल्लाह आणि त्यांच्या संदेशकर्त्या विषयी सूचना दिली होती.पण तुम्ही ऐकले नाही. दुसऱ्याने असे म्हंटले, तो एक असा देश आहे ज्याला कोणी मिटवू शकत नाही. त्या देशाला कोणी जिंकू शकत नाही. सनहेरीब आता अल्लाह ला घाबरला होता. त्याने पुन्हा कधी इस्राएलवर आक्रमण करण्याचा विचार केला नाही. त्यानंतर सात वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला.
कुराण मध्ये यशायाह चे नाव आहे.
यहुदी( ज्यू,हिब्रू) लोक अल्लाह ला याहोदा म्हणतात.आणि ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात.तिन्ही ग्रंथात कुराण,बायबल आणि तोराह( तोरेत) मध्ये जवळजवळ सारख्याच कथा आहेत. संदेशकर्ता ही सारखेच आहेत.पण कुराण च्या आधीचे ग्रंथ काही धार्मिक लोकांकडून बदलण्यात आले.त्यामुळे ते मूळ ग्रंथ नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा