काबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ जून, २०२०

05.इब्राहीम अ.


ही साधारणतः 4000 वर्षांपूर्वीची म्हणजेच 2000 BC ची सत्यकथा आहे..
खूप खूप वर्षांपूर्वी इराकमध्ये, एका माणसाला ज्याचे नाव अझर होते, जो लाकडाच्या प्रतिमा कोरून बनवत होता त्याला एक मुलगा झाला…इब्राहीम अ.…

त्या दिवसात अरबचे लोक, लाकडाच्या आणि दगडांच्या प्रतिमांची आराधना करत होते…ते असाही विश्वास ठेवत होते की, तारे मनुष्याच्या भाग्यावर नियंत्रण ठेवतात…

जस जसे इब्राहीम अ. मोठे होऊ लागले, त्यांना जाणीव होऊ लागली की, मनुष्याने बनविलेल्या प्रतिमा कुणालाच मदत करत नाहीत…त्यांची आराधना करून काही उपयोग नाही..त्या प्रतिमा एक दुसऱ्यांना ही मदत करू शकत नाहीत…

इब्राहीम अ. हे एक चांगले, हुशार आणि ज्ञानी व्यक्ती होते…ज्यांना अल्लाहने त्याचा संदेशवाहक म्हणून निवडले…प्रतिमांची आराधना करण्याऐवजी इब्राहीम अ. यांनी एका आणि फक्त एका अल्लाहवर विश्वास ठेवला…

त्यांनी त्याच्या वडिलांना आणि सर्व दुसऱ्या लोकांना प्रतिमांची आराधना करण्यास थांबवले…”ज्यांना तुम्ही स्वतः बनविले त्यांची तुम्ही आराधना कशी करू शकता?…” त्यांनी त्यांना विचारले,” या प्रतिमा तुम्हाला कशी मदत करू शकतात?…”
पण त्यांचे वडील,अझर रागावले आणि म्हणाले, “इब्राहिम मी तुला चेतावणी देतो की, मी तुला मरेपर्यंत दगडांनी मारेन, जर तू हा मूर्खपणा थांबवला नाहीस..”
यामुळे इब्राहीम अ. उदास झाले…पण ते म्हणाले की, अल्लाह तुम्हाला आर्शिवाद देवो…मी अल्लाहला प्रार्थना करेन की, तो तुमच्यासाठी दयाळू राहो…”

इब्राहीम अ. ची ही सुद्धा इच्छा होती की, लोकांनी ताऱ्यांवर, ईश्वरासारखा विश्वास ठेवणे थांबावावे…एका रात्री जेव्हा ते आकाशात ताऱ्यांची चमक पाहत होते… ते लोकांना म्हंटले, “मी सर्वात तेजस्वी ताऱ्याची आराधना करेन…”

लोक हा विचार करून थोडे आनंदी झाले की, शेवटी इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या श्रद्धेवर अनुसरण करण्यास सुरुवात केली…पण जेव्हा तो तारा मंद झाला आणि चंद्र आला, इब्राहीम अ. म्हणाले, “ओह…मी त्या ताऱ्याची आराधना करू शकत नाही, जो मंद आहे…मी चंद्राची आराधना करेन…”
पुन्हा जेव्हा चंद्र मावळला आणि तेजस्वी सूर्य उगवला…इब्राहीम अ. म्हणाले, “ओह, हा सूर्य चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे…मी याला ईश्वर बनवतो…” पण जेव्हा सूर्यास्त झाला आणि सूर्य दिसेनासा झाला…इब्राहीम अ. लोकांकडे येऊन बोलले, “लोकहो…जर मला माझ्या अल्लाहने योग्य रस्ता दाखवला नसता तर मी भलतीकडेच भटकलो असतो..”

मी अल्लाहला सोडून कुणावरही विश्वास करणार नाही…एक आणि फक्त एक अल्लाह, ज्याने ह्या पृथ्वीवरची आणि आकाशातली प्रत्येक गोष्ट बनविली…


इब्राहीम अ. यांच्याशी लोक वाद करत राहिले आणि त्यांच्या प्रतिमांची भीती दाखवत राहिले.
इब्राहिम अ. म्हणाले, “मी तुमच्या प्रतिमांच्या आराध्याला का घाबरु, जर तुम्ही एक आणि फक्त एक खऱ्या अल्लाहला घाबरत नाही?”
मी तुमच्या पैकी एक नाही…मी एकटा अल्लाहकडे वळेल…जो स्वर्गाचा आणि धरतीचा प्रभु आहे…

तरीही लोकांनी मनुष्याने बनविलेल्या प्रतिमांची आराधना करने चालू ठेवले…
एकदा इब्राहीम अ. ने शांतपणेे सांगितले,
“मी तुमच्या प्रतीमांबरोबर एक पेच करणार आहे…हे यासाठी कारण मला माहीत आहे, या प्रतिमा कुणालाच मदत आणि नुकसान करू शकत नाही…”

एक दिवस जेव्हा शहराचा प्रत्येक जण, एका मोठ्या धार्मिक उत्सवासाठी गेला होता, इब्राहीम अ. आजारी असल्याचे सांगून  मागे राहिले…
ते सर्व लोक गेल्यावर इब्राहीम अ. त्यांच्या मोठ्या आराधनेच्या ठिकाणी गेले, जेथे शंभर प्रतिमा ठेवल्या होत्या…त्या ठिकाणी सर्व प्रकारची फळे आणि मिठाई, लोकांनी त्या प्रतिमांसाठी ठेवली होती…इब्राहीम अ. यांनी प्रतिमांना विचारले, “तुम्ही या हव्या हव्याशा वस्तू, ज्या तुमच्यासाठी ठेवल्या आहेत, का खात नाहीत?…जेव्हा लाकडाच्या आणि दगडाच्या पुतळ्यानी उत्तर दिले नाही, त्यांनी विचारले,”तुम्ही का बोलत नाही?” मग त्यांनी एक गज घेतला आणि त्यांना आकारहीन केले…फक्त एका मोठ्या प्रतिमेला तसेच ठेवले…जी सर्व कहाणी लोकांना सांगेल.
जेव्हा लोक उत्सवातून, त्या जागी वापस आले आणि पुतळे पाहीले, ते खूप रागावले…
“हे इब्राहीम शिवाय कोणीच करू शकत नाही..” ते म्हंटले…
लगेच शहरातील सर्व लोक जमा झाले…त्यांनी इब्राहीम अ. यांना बोलावले आणि विचारले की, त्यांनी त्यांच्या पुतळ्यांच्या प्रतिमांशी काय केले…


इब्राहीम अ. बोलले, ” तुमच्या सर्वात मोठ्या पुतळ्याने, बाकी पुतळ्यांना असे केले…तुमच्याच मोठ्या प्रतिमेने हे केले…तुम्ही विचारा…म्हणजे जर ती बोलत असेल तर ..”
अर्थात, पुतळे बोलत नाहीत…त्यामुळे ते स्तब्ध राहिले आणि बोलले, ” इब्राहीम, तुला चांगले माहीत आहे की, हे पुतळे बोलत नाहीत…”

“मग तुम्ही त्यांची आराधना का करता?” इब्राहीम अ. यांनी विचारले….”ह्या तुम्हाला काहीच कामाच्या नाहीत…तुम्ही का विचार करत नाही आणि समजून घेत नाही…हे पुतळे तुम्ही स्वतः बनविले…तुम्ही अशा मृत लोकांची पुतळा बनवून आराधना का करता?”
पण ते समजून घेण्यास तयारच नव्हते…


‘ नमरुद’ हा इराक (बेबीलोन)चा राजा होता, जो स्वतःला ईश्वर समजत होता…त्यानेहीे इब्राहीम अ. विषयी ऐकले. त्याने इब्राहीम अ. यांना, त्याच्या दरबारात बोलावले आणि त्यांना विचारले की, तो नमरुदला ईश्वर का मानत नाही?


इब्राहीम अ. एक धैर्यवान तरुण होते, जे अल्लाहशिवाय कुणालाही भीत नव्हते..त्यांनी उत्तर दिले,”कारण तुम्ही एक मनुष्य आहात, जसे आमच्या पैकी प्रत्येक जण आहे…आणि पुतळ्यांविषयी म्हणाल तर ते मुके,बहिरे आणि आंधळे आहेत तर मग ते ईश्वर कसे असू शकतील?”

नमरूद खूप रागावला आणि विचारले,
“तुझा अल्लाह काय करू शकतो,जे मी करू शकत नाही?”
इब्राहीम अ. बोलले, ” अल्लाह जीवन देतो आणि जीव घेतो”
नमरुद  म्हणाला, “मीही हे करू शकतो…मी कैद्याला फाशी (मृत्युदंड) देतो आणि ज्याला मृत्यूची शिक्षा दिली आहे त्याला जीवनदान देतो…”


मग इब्राहीम अ. म्हणाले, “अल्लाह सूर्याला पूर्वेतून उदय करतो आणि पश्चिमेस अस्त  करतो…तुम्ही सूर्य पश्चिमेतून उदय करून दाखवू शकता का?”

नमरुद गोंधळलेला होता…त्याला कळलेच नाही की, काय बोलावे…पण तो एक क्रूर आणि गर्विष्ठ राजा होता, त्याने आज्ञा दिली की, इब्राहीम अ. यांना एका मोठ्या आगीत फेकून देण्यात यावे…राजाच्या लोकांनी एक मोठी आग लावली आणि इब्राहीम अ. यांना त्यात फेकले…


इब्राहीम अ. यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अल्लाहची प्रार्थना केली…अल्लाहने इब्राहीम अ. वर खूप प्रेमाने आशीर्वाद दिला आणि आज्ञा केली, “हे आग…शांत होऊन जा आणि इब्राहीमला वाचवून आशीर्वाद दे.” त्याच्या भोवतालची आग शांत झाली…प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आणि इब्राहीम सुखरूप बाहेर आले….

नमरुदच्या क्रूरपना नंतर, जो इराक (बेबिलोन) चा राजा होता, ज्याने इब्राहीम अ. यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.. इब्राहीम अ. यांनी इराक सोडले आणि फिलिस्तीन मध्ये गेले आणि नंतर इजिप्त मध्ये गेले…त्याची पत्नी ‘ सारा ‘ जी त्यांच्या जवळच्या नात्यातली होती आणि त्यांचा पुतण्या ‘ लूत ‘ त्यांच्यासोबत होते… लूत अ. हे खरे ईश्र्वरावर श्रद्धा करणारे आणि विश्वास ठेवणारे होते…काही दिवसांनी ते ही अल्लाहचा संदेशवाहक बनले…

जेव्हा ते इजिप्तला गेले, लोकांनी त्यांना सांगितले की, फिरौंन (pharaoh,फैरो) खूप कपटाचारी आहे..तो इजिप्तचा राजा आहे…

जर त्याने, एका सुंदर स्त्रीला पाहिले, तर तो त्याच्या माणसांना म्हणतो, तिला उचला आणि तिला राजवाड्यात घेऊन या… जबरदस्तीे केले तरी चालेल…

इब्राहीम अ. यांची पत्नी “सारा” सुंदर  होती..त्यामुळे फिरौंनच्या लोकांनी तिला राजाकडे घेऊन गेले…एक सद्गुणी स्त्री असल्याने, तिने अल्लाहकडे मदत  मागितली…अल्लाहने तिच्या प्रार्थनेचे उत्तर दिले… फिरौंन तिला काहीच इजा पोहोचवू शकला नाही, स्पर्श करू शकला नाही..त्याचा हात एकाच जागी कडक झाला….तो हैराण झाला..

तिला राजाच्या वाईट हेतूपासून अल्लाहने संरंक्षण दिले होते…आणि वाचवले होते…फिरौंनने जाणले की, सारा एक सद्गुणी स्त्री आहे आणि कोणती तरी अज्ञात शक्ती (अल्लाह) तिला वाचवत आहे…
आता तो इतका भयभीत झाला की, त्याने साराला मोकळे केले आणि तिच्यासोबत आणखी एक सद्गुणी मुलगी जिचे नाव “हाजरा” होते, पाठविली आणि त्यांना सन्मानाने पाठविले.

इब्राहीम अ. यांनी  हाजरा शी लग्न केले…
इब्राहीम अ. हे वयस्कर झाले होते आणि त्यांना मूल नव्हते…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांना एक वारस (एक मुलगा) मिळावा…अल्लाहने या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि त्याला हाजरा पासून एक मुलगा दिला, इस्माईल..

जेव्हा हाजरा ने इस्माईल ला जन्म दिला, इब्राहीम अ. यांची पहिली पत्नी, सारा नाराज झाली, कारण तिला तिचे स्वतःचे मूल नव्हते…
त्यामुळे अल्लाहने इब्राहीम अ. यांना आज्ञा केली की, ‘हाजरा आणि तिचा मुलगा इस्माईल यांना घेऊन वाळवंटाच्या ठिकाणी घेऊन जा आणि तेथे सोडून वापस ये..’

इब्राहीम अ. यांना ही आज्ञा पाळणे खूप अवघड होते…इतक्या वर्षांनी जो मुलगा जन्माला आला,  आणि ज्याच्यासाठी खूप तीव्र इच्छा आणि प्रार्थना करावी लागली, त्याला आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला हाजराला सोडून देणे, इब्राहीम अ. यांना खूप कठीण होते…

पण ते अल्लाह ची खरी श्रध्दा करणारे होते…त्यांनी कोणताही संकोच न बाळगता ती आज्ञा पाळली…

अल्लाह च्या हुकुमाप्रमाने ते हाजरा आणि इस्माईल ला घेऊन वाळवंटाच्या ठिकाणी गेले…रस्त्यात हाजरा ने त्यांना विचारले, “तुम्ही आम्हाला कोठे आणि का घेऊन जात आहात?”
इब्राहीम अ. शांत राहिले आणि काहीही उत्तर दिले नाही…
हाजरा समजली आणि तिने विचारले,” ही अल्लाहची इच्छा आहे का?”
“हो, असेच आहे” इब्राहीम अ. यांनी उत्तर दिले…
“मग मी  प्रश्न विचारणार नाही आणि मला कशाचीच भीती नाही..निश्चितपने अल्लाह आमचे संरक्षण करेल”, हाजरा म्हणाली…हाजरा एक धैर्यंवान आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होती…
इब्राहीम अ. त्यांना निर्मनुष्य जागी घेऊन गेले…जेथे पाणी नव्हते आणि मैल पर्यन्त झाड नव्हते…आणि त्यांना तेथे सोडले…ही जागा “मक्का” होती…
जेव्हा त्यांनी हाजरा आणि इस्माईल ला निर्जन ठिकाणी एकटे सोडले, त्यांना खूप वाईट वाटले…तो त्यांच्यासाठी खूप मोठा त्याग होता…पण इब्राहीम अ. लटपटले नाही आणि कमजोर पडले नाही…
ते त्यांना सोडून वापस थोडे दूर गेले…जेव्हा ते दोघे त्यांना दिसेनासे झाले, तेव्हा ते थांबले आणि चेहरा तिकडे करून अल्लाहला कळकळीने प्रार्थना केली,” ‘ओ अल्लाह’, तुझ्या इच्छेप्रमाणे, मी माझ्या वारसाला वाळवंटाच्या ठिकाणी सोडून जात आहे… ‘ओ अल्लाह’…मी त्यांना सोडले जेणेकरून, ते तुला इथे प्रार्थना करत राहतील. कृपा करून त्यांचे रक्षण कर… लोकांनी त्यांच्याकडे येऊन, त्यांना तुझ्या धरतीतून अन्न पुरवठा होवू दे, जेणेकरून ते नेहमी तुझे आभारी राहतील”
असे म्हणून इब्राहीम अ. वळले आणि त्यांनी त्यांना अल्लाहच्या दयाळूतेवर विश्वास करून, सोडून गेले….
अल्लाह  इब्राहीम अ. च्या निष्ठेवर इतका प्रसन्न झाला की, अल्लाहने इस्माईल आणि हाजरा चे फक्त संरक्षणच केले नाही तर वचन ही दिले की, त्यांच्या नंतरच्या वंशजांची भरभराट होईल…मुहम्मद (स. अ. व.) हे त्यांच्याच पिढीतील आहेत….

इकडे हाजरा दोन शुष्क डोंगराच्या मधील वाळवंटात होती…डोंगराचे नाव “सफा” आणि “मरवा” होते…तिला काय करावे काही कळत नव्हते…जेव्हा बाळ प्रखर उष्णतेने, तहान लागल्यामुळे रडायचे, तेव्हा तीचे हृदय बाळासाठी दुखायचे…पण ती काय करू शकत होती?…तेथे पाणी नव्हते, अन्न नव्हते, छत नव्हते आणि कोणीच दिसत नव्हते…ती एक माता होती…ती कसे बसून तिच्या बाळाला मरतांना पाहू शकत होती….
ती सफा डोंगरावर, हे पाहण्यासाठी चढली की, त्या दिशेला, कोणी मदतीसाठी दिसते का? पण सगळे वाळवंट होते…मग ती पळत वापस आली, तिच्या तहानलेल्या बाळाला पाहण्यासाठी….
पुन्हा ती दुसऱ्या डोंगरावर ” मरवा ” वर पळाली… त्या दिशेला कोणी दिसते का, ज्याला ती मदतीसाठी विचारू शकते….पण तिथे कोणीच नव्हते..


स्वतःला त्रास घेऊन, हाजरा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर मदतीसाठी पळत राहिली…प्रत्येक वेळेस वापस येताना तिच्या तहानलेल्या आणि भुकेल्या बाळाला पाहत होती…अशा वर खाली आणि एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जावून आणि परत जावून सात चकरा झाल्यावर ती…अल्लाहची इच्छा असे स्वीकार करून, अल्लाहच्या इच्छेला शरण गेली, ती थकून बसली…
आणि मग अल्लाहने त्याची दयाळूता दाखविली.चमत्कारिकरित्या एक पाण्याचा फवारा (झरा), बाळाच्या जवळ वाहू लागला…
त्यालाच आज जमजम म्हणतात…”आब ए जमजम” (जमजम चे पाणी) हे पाणी खूप ताजेतवाने करणारे, उपचार करणारे, जखम भरणारे आणि उत्साहवर्धक म्हणजेच ताकद देणारे समजले जाते…आजही जे “हज” आणि “उमरा” साठी पूर्ण जगातून “मक्का” येथे जातात,अशा लाखो मनुष्यांसाठी जमजमचे पाणी उफाळून पुढे येते…

हाजराला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.. तिचे हृदय आनंदाने भरले…दोघांना, तिला आणि तिच्या बाळाला अल्लाहने वाचविले…
अल्लाहला हाजराची श्रद्धा आणि धैर्य इतके आवडले की, अल्लाहने या दिवसापासून लाखो माणसे, पुरुष, स्त्रिया, मुले, याच धर्मनिष्ठ स्त्रीने, हाजराने चाललेल्या रस्त्यावर पुन्हा पावले टाकतील..जेव्हा ते सफा आणि मरवाच्या दरम्यान, “हज “च्या अवधीत चालतील, असा आशीर्वाद दिला..

काही वेळानंतर, एक उंटाच्या गाड्या असलेल्या तांडवाने, या वाळवंटातून जात असताना, ते झऱ्याचे पाणी पाहिले आणि हाजराला, तेथे थांबून तात्पुरता मुक्काम करण्याची परवानगी मागितली…

“हो नक्कीच”, तिने उत्तर दिले…”पण या पाण्यावर तुमचा अधिकार करू नका..ते प्रत्येकासाठी मोफत असेल…”
ते लोक मानले…आणि ते तिथे काही दिवस पाण्यासाठी राहिले. (पाणी शोधणे अरेबिया मध्ये हे खूप कठीण होते. जिथे कुठे पाणी असायचे…लोक आजूबाजूला त्यांची घरे बनवायचे…) अशा प्रकारे “मक्का ” एक व्यस्त वस्ती बनले..आणि इब्राहीम अ. यांनी अल्लाहला जी प्रार्थना केली होती की, ‘त्याच्या पत्नी आणि त्याच्या वारसाचे रक्षण कर…आणि लोकांना त्यांच्याकडे येऊ दे..’ त्याचे अल्लाह कडून उत्तर मिळाले…

हाजरा आणि इस्माईल तिथेच राहिले, जेथे इब्राहीम अ. त्यांना सोडून गेले होते..इब्राहीम त्याच्या कुटुंबाला कधी कधी येऊन भेटायचे…

जेव्हा इस्माईल मोठा झाला…इब्राहीम अ. यांनी एक स्वप्न पाहिले…अल्लाह त्यांच्या मुलाची, इस्माईलची, आहुती देण्याची आज्ञा करत आहे…

इब्राहीम अ. खूप घाबरले आणि जागे झाले…पण त्यांना, तीन रात्री तेच स्वप्न पडले…त्यांना खात्री झाली की, ही अल्लाहची आज्ञा आहे…आणि त्यांना त्या आज्ञेसाठी झुकले पाहिजे…

ही इब्राहीम अ. यांच्यासाठी अत्यंत कडक परीक्षा होती…जे आता एक वृद्ध मनुष्य होते…ते त्याच्या जिवलग मुलाची आहुती कसे देऊ शकणार होते?…पण त्यांनी स्वतःच आठवण केली की, ते अल्लाहचे संदेशवाहक आहे…आणि आज्ञा न पाळण्याचा, ते कधीही विचार करू शकत नाही…

त्यामुळे ते इस्माईल कडे गेले..आणि त्याला त्यांच्यासोबत चलण्यास सांगितले…
जेव्हा ते इस्माईलला सूनसान जागी घेऊन जात होते, इस्माईलने त्याच्या वडिलांना विचारले की, ते कोठे जात आहेत…
इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या स्वप्नाविषयी त्याला सांगितले…इस्माईल त्याच्या अल्लाहनिष्ठ, वडिलांचा एक शूर मुलगा होता..घाबरून न जाता किंवा विचलित न होता तो म्हणाला, “बाबा…जर ही अल्लाहची इच्छा आहे तर करा…मी आहुती साठी तयार आहे..तुम्ही मला अल्लाहच्या इच्छेशी शरणागत (नम्र) पाहाल…”
इब्राहीम अ. ने इस्माईलला झोपविले. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, जेणेकरून, ते जे काही करणार आहे, त्यांना दिसणार नाही.लगेच अल्लाह त्यांच्याशी बोलला, “इब्राहिम खरंच…मी त्यांना पारितोषिक देतो, जे योग्य करतात..ही एक परीक्षा होती…..आणि इस्माईल च्या जागी एक कोकरू आहुती झाले होते…आणि इस्माईल जिवंत होता…

अल्लाहने त्याच्या वचनावर खरे राहून, इब्राहीम अ. आणि इस्माईलला आशीर्वाद दिला की, येणाऱ्या पिढ्या  त्यांची आठवण करतील…

या दिवसापासून  प्रत्येक मनुष्य जेव्हा “हज” साठी जातो, तेव्हा त्यांच्या आहुतीची आठवण करतो…प्रत्येक वर्षी “ईद उल अजहा” ला  प्रत्येक अनुयायी, त्याच्या ऐपतीनुसार इब्राहीम अ.  यांच्या आहुतीच्या स्मृतीत एक बकरा बळी देतो…

त्यानंतर अल्लाहची आज्ञा पाळून इब्राहीम अ. आणि इस्माईलने अल्लाहचे घर बनविले…”काबा” जेथे लोक प्रार्थना करू शकतील…

जसे इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. अल्लाहच्या घराचा पाया उंच करत होते…ते प्रार्थना करत होते. “हे अल्लाह, ही सेवा स्वीकार कर…आणि आम्हाला तुझ्या इच्छेसाठी आज्ञाधारक बनव…आणि तुझ्या कृपेवर अवलंबून राहू दे, कारण तू खूप दयाळू आहेस…”

इब्राहीम अ. यांनी अशीही प्रार्थना केली की, ही जागा एक शांतीचे शहर बनू दे…त्यांनी त्यांच्या मुलांना अल्लाहच्या श्रद्धेसमोर झुकण्यास सांगितले…आणि अल्लाहपासून कधीही दूर न जाण्यास सांगितले…
अल्लाह त्याच्या संदेशवाहकाला, इब्राहीम अ. यांवर, इतके प्रेम करत होता की, त्याने नंतर मुहम्मद (peace be upon him)ला जे शेवटचे संदेश वाहक होते, इब्राहीम अ. यांच्या श्रध्देच्या रस्त्यावर चालण्यास सांगितले….

आज जेव्हा पूर्ण जगातून, लाखो मनुष्य “काबा” ला जातात, ते तिच प्रार्थना म्हणतात, जी मुहम्मद (peace be upon him) ने शिकविली आहे.. आणि तवाफ (“काबा” ला सात चक्कर मारणे) करतात…अशाप्रकारे “इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांची अल्लाहच्या इच्छेशी अधीनता ” याची आठवण करणे, लोकांनी चालू ठेवले आहे..

काबा च्या समोर एक स्थान आहे… “मुकाम ए इब्राहीम”, जेथे  दगडावर इब्राहीम अ. यांच्या पायाचे निशाण दिसतात..हे लोकांकडून शतकांपासून संरक्षित केले गेले आहे…येथे प्रत्येक मनुष्य अल्लाहला एक खास प्रार्थना म्हणतो….आणि अल्लाहच्या प्रिय संदेशवाहकाला ज्याने “काबा” बांधला त्याला “दुआ” देतात…


इब्राहीम अ. हाजराला वाळवंटात सोडून सारा कडे आले… सारा नाराज होती..तिला स्वतःचे मूल नव्हते म्हणून…
काही वर्षांनंतर अल्लाहने इब्राहीम अ. कडे, फरिश्ते(स्वर्गदूत,angel)  पाठविले…त्यांना हे सांगण्यासाठी की, एक चांगली बातमी आहे की, त्यांना अजून एक मुलगा होईल…हे फरिश्ते मनुष्याच्या रुपात आले होते…इब्राहीम अ. यांना आशिर्वादासह शुभेच्छा देण्यासाठी आले होते…
इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या शुभेच्छा वापस केल्या.. फरिश्ते नम्रतेने त्याला म्हणाले, “आम्ही तुझ्यासाठी चांगली बातमी आणली आहे ..एक हुशार आणि बुध्दीमान मुलाविषयी…”इसाक ” आणि त्यानंतर त्याच्या पुढची पिढी… याकूब (इस्राइल)… ही अल्लाहची इच्छा आहे की तुला सारा पासून एक मुलगा होईल…

इब्राहीम अ. यांची पत्नी सारा तेथे उभी होती. ती खूप आश्चर्य चकित झाली…आणि तिने विचारले, “पण हे कसे शक्य आहे? मी एक वृद्ध स्त्री आहे आणि माझे पती ही खूप वृद्ध आहेत…आम्हाला मूल कसे होऊ शकते?”…

फरिश्ते उत्तरले ,”अल्लाहच्या इच्छेवर तुम्ही आश्चर्य करत आहात का?अल्लाह निश्चितच सर्वात मोठा आहे आणि जे काही तो इच्छा करतो, ते तो करू शकतो… तुमच्यावर त्याचे आशीर्वाद असो… आशा सोडू नका…”

“नाही, मी आशा सोडणार नाही..जे लोक श्रद्धा करत नाहीत, ते आशा सोडतात…” इब्राहीम अ. म्हंटले..

अशा प्रकारे अल्लाहने वचन दिल्याप्रमाणे सारा ला एक मुलगा झाला…इसाक…जो मोठा झाल्यावर एक संदेशवाहक बनला…आणि त्यानंतर त्याचा मुलगा याकूब (इस्राइल) अ. आणि मग त्याचा मुलगा युसुफ अ.…ही संदेशवाहक बनले…
अशाप्रकारे इब्राहीम अ. यांनी, जी प्रार्थना केली होती की, त्यांना चांगले आणि सद्गुणी मुले आणि वंशज होऊ दे…ती अल्लाहने पूर्ण केली…त्याचे दोन्ही मुले इस्माईल आणि इसाक आणि त्यांचे वंशज ही संदेशवाहक बनले…त्यामुळे इब्राहीमला “संदेश वाहकांचा पिता” म्हंटले जाते…

एक दिवस उत्सुकतेने इब्राहीम अ. यांनी अल्लाहला विचारून, त्यांना दाखविण्यास सांगितले की अल्लाह,”न्याय करण्याच्या दिवशी” मृत झालेल्यांना जिवंत कसे करेल?
अल्लाहने विचारले,” इब्राहीम, तुला  विश्वास नाही का?”

“मला खरंच विश्वास आहे…”…इब्राहीम अ. म्हणाले,” पण मला स्वतःला संतुष्ट करण्यासाठी ते पहायचे आहे”…

अल्लाहने मान्य केले…
अल्लाहने इब्राहीम अ. यांना चार पक्षी पाळण्यास सांगितले…त्यांचे आहुती देऊन, वेगवेगळे भाग (तुकडे) करण्यास सांगितले…आणि ते भाग (हिस्से) चार डोंगरावर एकमेकांपासून दूर दूर फेकण्यास सांगितले…

मग इब्राहीम अ. यांना, त्या पक्ष्यांना हाक मारण्यास सांगितली…सगळे पक्षी त्यांच्याकडे…त्यांच्या पूर्ण शरीरात वापस आले…
अल्लाहने हा चमत्कार इब्राहीम अ. यांना, त्यांच्यासाठी आणि सर्व मनुष्यांच्यासाठी  दाखविला, जेणेकरून प्रत्येक जण समजू शकेल की, जो एक वेळेस जीवन देऊ शकतो..पुन्हा एकदा “न्याय देण्याच्या दिवशी” जीवन देऊ शकतो…

ही कथा कुराण मध्ये दुसऱ्या धड्यात, “सुरे बकरा” मध्ये  वर्णन केलेली आहे…


08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...