इस्राईल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इस्राईल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १४ मे, २०२१

दाऊद सुलेमान अ. भाग 5

🌴🌴🌴पॅलेस्टाईन (फलस्तीन) आणि इस्राईल मधील इतिहास...कुरआनमधील सत्य बोधकथांच्या च्या आधारे...🌴🌴🌴

ही सत्य कथा इस्राइल या देशातली 3000 वर्षांपूर्वीची म्हणजेच 1000 BC ची आहे..

प्रोफेट मूसा (Moses) यांच्यानंतर

मूसा अ. यांचे अनुयायी आणि बनी इस्राईल चे लोक, यांनी त्यांचा एक राजा असावा अशी इच्छा केली. आणि त्यावेळच्या संदेशकर्ताच्या द्वारे  " तालुत " यास राजा बनविले गेले.

बनी इस्राइलचा राजा, “तालुत”, शत्रूंसमोर जाण्याआधी, हे माहीत करू इच्छित होता की, त्याच्या लोकांची अचूक कुवत (सामर्थ्य) किती आहे…त्याला हे माहीत करायचे होते की, त्यांच्यातले किती जन शौर्याने लढणारे आहेत…म्हणून जेव्हा, ते एका झऱ्याजवळ एकत्र आले, तो लोकांना म्हणाला, “तुमची परीक्षा घ्यायची, अल्लाहची इच्छा आहे…

"जो कोणी, त्याची पूर्ण तहान भागविण्यासाठी पाणी पियील, तो आमच्यापैकी नाही…जर तुम्ही खूप तहानलेले असाल, तर फक्त एक घोट घेऊन घसा ओलसर करू शकता…”

जवळ जवळ, सर्व बनी इस्राईलच्या

लोकांनी पूर्ण तहान भागविली आणि म्हणाले, "आमच्यात जालुत सारख्या (शत्रू) मोठ्या शक्तीशाली सैनिकाशी लढण्याचे सामर्थ्य नाही…आम्ही मागे राहू…"

म्हणून काही थोड्याच लोकांनी तालुत चे लक्षपूर्वक ऐकले आणि त्यांनी, त्या वाहत्या झऱ्यातून जास्त पाणी पिले नाही, ते तयार होते आणि तेच लढाईसाठी योग्य होते…

ज्यांनी स्वतःचे धैर्य हरवले होते, त्यांना,

जे अल्लाहचे नाव घेऊन लढण्यासाठी तयार होते, त्यांनी म्हटले,

"तुम्ही का घाबरत आहात? जरी आपण थोडे असलो आणि शत्रू आपल्या संख्येपेक्षा खूप पटीने आणि जास्त मजबूत असला, तरी आपण लढू…

अल्लाहच्या मदतीने, खूप कमकुवत आणि कमी लोकांनी मजबूत शत्रूंविरूध्दची लढाई जिंकली आहे…”

जेव्हा ह्या संख्येने कमी असलेल्या तालुतच्या सैन्याचा, पॅलेस्टाईनच्या              (फिलिस्तीन) सैन्याशी सामना झाला…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांना कणखर आणि शूर राहण्यासाठी मदत कर…

लढाई सुरू झाली…आणि शक्तीशाली पॅलेस्टिनी सैनिक जालुत पुढे आला…त्याने बनी इस्राइल मधील प्रत्येकाला त्याच्याशी लढण्याचे आव्हान केले…तो इतका बलवान होता की, कोणीही पुढे येण्याचे साहस केले नाही..

बनी इस्राइल मध्ये एक दुबळा तरुण होता “दाऊद अ.” जे पुढे चालून संदेश कर्ते बनविले गेले.

जालुत ने केलेला अपमान ते सहन करू शकले नाही..

ते त्यांच्या सैन्यातून, बाहेर आले आणि म्हणाले, ” मी तुझे आव्हान स्वीकारतो..मी तुझ्याशी लढेन…”

जालुत हसला आणि त्याने दाऊद अ. यांची  थट्टा उडविली…पण ते कणखररित्या उभे राहीले…त्यांचा निशाणा खूप चांगला होता…जेव्हा त्यांनी त्यांचा गुल्लेर (गलोल) उचलला आणि तीन दगड जालुतच्या दिशेने भिरकावले…तीन ही दगड, त्या बलवान व्यक्तीला, त्याच्या कपाळावर लागले आणि तो खाली पडला आणि मृत झाला…

यामुळे शत्रुची बाजी त्यांच्यावरच उलटली..जेव्हा पॅलेस्टिनीनी पाहीले, त्यांचा शक्तीशाली माणूस, एका तरुणाकडून मारला गेला…त्या तरुणाची बहादुरी पाहून, शत्रूने धास्ती घेतली आणि त्यांनी धैर्य गमावले आणि पळाले.

कमी संख्या असलेल्या, अल्लाहला घाबरणाऱ्या सैन्याकडून, ज्यांनी अल्लाह (ईश्वर) ची मदत आणि धैर्य मागितले होते, त्यांच्या पेक्षा जास्त पटीने (संख्येने) असणारे शत्रू पराभूत झाले…

बनी इस्राइल विजयी झाले… तेव्हापासून ते लोक तरुण दाऊद अ. यांची, त्यांच्या बहादुरी आणि धैर्यासाठी प्रशंसा करू लागले, त्यांच्यावर प्रेम करू लागले 

आणि त्याचा सन्मान करू लागले…

तालुतचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांनी दाऊद अ. यांना राजा बनविले…

हे थोडे असाधारण होते कारण, बनी इस्राइलच्या जमातीतून साधारणतः संदेशवाहक आणि पवित्र व्यक्ती असायच्या आणि राजा दुसऱ्या जमातीतील असायचा…पण दाऊद अ. हे त्यांच्याच जमातीतील होते….

नंतर अल्लाह (ईश्वर) ने त्यांना एक संदेशकर्ता ही बनविले…त्यामुळे दाऊद अ. दोन्ही होते, एक संदेशकर्ताही आणि राजाही …पण ते असे राजा नव्हते, जे त्यांच्या लोकांच्या (प्रजेच्या, जनतेच्या) पैश्यांवर जीवन जगतात…दाऊद अ. हे एक सदाचारी आणि प्रामाणिक व्यक्ती होते. ते जरी एका अफाट साम्राज्याचे बादशाह होते, तरी त्यांनी राजवाड्याची शाही संपत्ती (खजिना) ला, त्यांच्या वैयक्तिक उपयोग करण्यासाठी कधीच स्पर्श केला नाही.

त्यांनी, लोखंड आणि पोलाद यांपासून विविध वस्तू बनविल्या…आणि त्यावर उदर निर्वाह करून जगले…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांचे श्रम त्यांच्यासाठी सोपे व्हावे…

अल्लाह (ईश्वर) ने, त्याच्या संदेशवाहकाची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्या

हातात (तळहातात) लोखंड नरम होण्याचे सामर्थ्य ,बक्षिसाच्या रुपात दिले…जेणेकरून ते त्यांना आवडेल त्या साच्यात लोखंड बसवू शकतील. म्हणून ते 

त्यांचे चिलखत (लढाईत शरीर रक्षणासाठी घालावयाचे धातूचे कवच) बनवू शकले… लोखंडापासून त्याच्या स्वतःच्या हातांनी, चिलखताचे कवच बनवून ते त्यांचा  उदरनिर्वाह पूर्ण करायचे.

ते चिलखत मजबूत करण्यासाठी, लोखंडाच्या किचकट साखळ्या विणायचे.

हे विकून, अल्लाह (ईश्वर) चा संदेशवाहक आणि बनी इस्राइलचा राजा, दाऊद अ., त्यांच्या उपजिविकेसाठी कमवायचे…
अल्लाह (ईश्वर)ने दाऊद अ. यांना

महान ज्ञान दिले होते आणि निर्णय घेण्याची शक्ती दिली होती. धार्मिकता दिली होती…

त्यांनी त्यांच्या लोकांवर चांगले 

आणि न्यायाने राज्य केले…..

अल्लाह (ईश्वर) ने दाऊद अ. यांना 

त्याचा ग्रंथ दिला “जबुर”.

दाऊद अ. यांचा आवाज खूप सुंदर आणि गोड होता..प्रत्येक सकाळी जेव्हा ते “जबुर” मधून अल्लाह (ईश्वर) च्या प्रशंसेचे वाचन करायचे… त्यांचा गोड आवाज पर्वतांत घुमायचा…पर्वत त्या प्रशंसेच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटवायचे…आणि सर्व पक्षी, त्याच्यासोबत अल्लाह (ईश्वर) ची प्रशंसा करण्यासाठी, त्याच्याभोवती घोळक्याने जमा व्हायचे….त्याचा आवाज इतका नियंत्रित, ओघवता आणि स्पष्ट की, ते त्यांच्या घोड्यावर, खोगीर (saddle)
बसवतांनाा, पूर्ण “जबूर” ग्रंथ 

वाचू शकत होते. (बोलून, पाठांतर करून) 

ज्यात अल्लाह ने वर्णन केलेल्या बोधकथा आणि प्रशंसा होत्या.

पक्ष्यांची भाषा दाऊद अ. यांना समजत होती आणि ते त्यांच्यासोबत बोलू शकत होते…जसे माणसे एकमेकांशी बोलतात….

ते मानायचे की, सगळी पृथ्वी एक अल्लाह (ईश्वर) च्या मालकीची आहे.आणि सदाचारी लोक, हे या जमिनीचे खरे वारसदार आहेत.

एक दिवस दोन माणसे राजा दाऊद अ. कडे आली आणि त्यांनी त्यांच्या

आपसातील वादाचा निर्णय करण्यास 

सांगितले.


एक म्हणाला, "ह्या माणसाने त्याच्या मेंढ्यांच्या कळपाला माझ्या शेतात चरण्यासाठी आणि पीक खाण्यासाठी सोडले, जे पीक कापणीसाठी तयार होते. मी काय केले पाहिजे? मी त्याला न्यायासाठी तुमच्याकडे घेऊन आलो आहे."

दाऊद अ. यांनी सर्व काळजीपूर्वक ऐकले. मग त्यांनी निर्णय घेतला की, पूर्ण वाढ झालेल्या पिकाची किंमत तेवढीच असते जेवढी एका मेढ्यांच्या कळपाची असते. त्यामुळे तो माणूस, ज्याच्या मेंढ्यांनी 

पीक खाल्ले आहे 

त्याने त्याच्या मेंढ्यांचा कळप, शेताच्या मालकाला द्यावा.

दाऊद अ. यांंचा पुत्र सुलेमान अ.

 (जे नंतर संदेश कर्ता बनविले गेले)

 हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होते, ते म्हणाले, “माझ्या पित्याने जे काही म्हंटले आहे, ते बरोबर आहे. पण येथे एक चांगला उपाय असू शकतो. मेंढ्यांच्या मालकाने , त्याच्या मेंढ्या त्या माणसाला द्यायचा, जो शेताचा मालक आहे ,आणि जो मेंढ्याचा मालक होता, तो त्याच्या शेताकडे लक्ष ठेवेल.

शेताचा मालक, मेंढ्यांना ठेऊन घेऊ शकतो आणि त्यांचे दूध आणि लोकर उपयोगात आणू शकतो, जोपर्यंत शेतात पुन्हा पीक परिपक्व होत नाही. त्यानंतर त्याने त्या मेंढ्या, त्याच्या मालकाला परत करायच्या आणि त्याचे शेत वापस घ्यायचे.

दाऊद अ., त्यांचा तरुण पुत्र , त्या वादावर, इतक्या हुशारीने उपायाचा निर्णय घेऊ शकला , म्हणून खूप आनंदी झाले.
सुलेमान अ. मोठा होऊन, त्यांच्या पित्यासारखे उत्तम एक राजा आणि एक संदेश वाहक बनले.

सुलेमान अ. यांना ही पक्ष्यांची भाषा समजत होती आणि ते ही त्याच्या पित्यासारखे ज्ञानी होते.

प्रेषित दाऊद यांचे एक भव्य साम्राज्य होते. त्यांच्या मुलाला ते साम्राज्य , वंश परंपरेने मिळाले होते.


सुलेमान अ. एक  खूप हुशार आणि बुद्धिमान युवक होते. 

आणि ते नेहमी त्यांच्या वडिलांना, त्यांच्या चांगल्या तार्किक बुध्दी आणि ज्ञानाने चकीत करायचे. ते ही त्यांच्या पित्यासारखे खूप धार्मिक वृत्ती, कर्तव्यनिष्ठतेने मोठे झाले होते.आणि अल्लाह (ईश्वर) कडून संदेशकर्ता बनविले गेले होते…

अल्लाहने त्यांना पक्षी आणि प्राणी यांची भाषा समजण्याची प्रतिभा “बक्षीस” म्हणून दिली होती. 

अल्लाहने त्यांना वाऱ्याच्या हालचालीवरचे नियंत्रण ही दिले होते. सुलेमान अ. यांचे साम्राज्य जगातील एक भव्य, संपन्न आणि खूप उत्कृष्ट साम्राज्य होते. जे आधी कुणीही पाहिले नव्हते. त्याच्या प्रजाजनमध्ये फक्त माणसेच नव्हती तर जिन्न (आगीने बनलेले जीव), प्राणी आणि पक्षी ही होते.

सुलेमान अ. वारा नियंत्रित करू शकत होते., त्यामुळे ते स्वतःला त्यांच्या इच्छेप्रमाणे, दूर अंतरावर हवेवर स्वार होवून घेऊ जावू शकत होते.

त्यांच्या पक्षी आणि प्राण्याच्या भाषेच्या ज्ञानामुळे त्यांना खूप दूरच्या आणि विस्तृत जागे विषयी बातमी मिळण्यास मदत मिळायची.

जिन्न हे खूप शक्तीशाली जीव होते.

ते जमिनीत आणि समुद्राच्या, महासागराच्या तळाशी लपलेले अमूल्य खजिने सुलेमान अ. साठी आणायचे आणि त्यांच्या राज्यात, खूप मोठ्या आणि उत्कृष्ट इमारती, बनवायचे.
पवित्र क़ुरआन मध्ये म्हटले गेले आहे की, 

सुलेमान अ. जिन्नांचा श्रमिक म्हणून, मोठ्या इमारती, किल्ले आणि तलाव बांधण्यासाठी, वापर करायचे. शक्तीशाली आणि सहसा कुणाच्या ताब्यात न राहणारे जिन्न, सुलेमान अ. साठी न थकता काम करायचे. 

सुलेमान अ. इमारतींना, किल्ल्यांना सुंदर किमती दगडांनी आणि रत्नांनी सजवायचे. हे सगळे शक्य होते कारण सुलेमान अ. यांनी अल्लाह (ईश्वर, यहोवा) ला प्रार्थना केली होती की, त्यांना एक भव्य साम्राज्य द्यावे आणि म्हणून अल्लाहने अशा धन्यतेची कृपा केली होती.

जेव्हा सुलेमान त्यांच्या राजवाड्यात दरबार 

भरवत होते, तेव्हा जिन्न, प्राणी आणि पक्षी आज्ञाधारक पणे, त्यांच्यासमोर रांगेत उभे राहायचे. जसे दुसरे प्रजाजन उभे राहायचे.अशा प्रकारे अल्लाहने त्याच्या सद्गुणी प्रेषिताला पारितोषिक दिले होते.

एकदा जेव्हा सुलेमान अ. आणि त्यांचे सैन्य प्रवासात होते, 

ते एका दरीत आले, जी पूर्ण मुंग्यांनी भरली होती. जसे ते मुंग्यांच्या जवळ गेले, सुलेमान अ. यांनी ऐकले की, मुंग्यांच्या राजाने त्यांना लवकर त्यांच्या वारुळांत जाण्यास सांगितले, जेणेकरून ते, सुलेमानच्या सैन्याने चिरडले जावू नये. (सुलेमान यांना प्राण्यांची भाषा समजत होती. त्यांना ही समज अल्लाह म्हणजेच ईश्वराकडून देण्यात आली होती.)

सुलेमान अ. हसले., जेव्हा त्यांनी हे ऐकले आणि शक्तिशाली अल्लाहचे आभार मानले, ज्याने त्यांना छोट्या जीवांना समजण्याच्या प्रतिभेचे “बक्षीस” दिले होते, 

ज्यामुळे सुलेमान अ. त्यांच्यावर दया करू शकत होते.

’ताबूत सकीना’ त्यांनी व्यवस्थित राजवाड्यात ठेवला होता.

बादशाह_सुलेमान

🌹🌹🌹सबा ची राणी 🌹🌹🌹
एक दिवस जेव्हा राजा सुलेमान अ. यांनी दरबार भरवला होता, त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या दरबारातील हुदहुुद (हुपू; hoopoe) पक्षी गायब होता.

सुलेमान अ. त्याच्या अनुपस्थितीने नाराज झाले आणि म्हणाले, " हुदहुद कोठे आहे? मला तो तुमच्यामध्ये दिसत नाही. जर अनुपस्थित राहण्याचे एक चांगले कारण नसेल तर, मी त्याला नक्कीच शिक्षा करेन."

ते असे म्हणत असतानाच, हुदहुद उडत आत आला आणि विलंब झाल्याने दिलगिरी व्यक्त केली.

"मी एका शक्तीशाली राज्य "सबा" ची बातमी आणली आहे. त्या राज्यावर एक राणी राज्य करते , जी एका उत्कृष्ट सिंहासनावर विराजमान होते. सबा येथील लोक, खऱ्या अल्लाह (एक ईश्वर) ची उपासना सोडून, सूर्याची उपासना करतात." त्याने राजाला सांगितले.

"तू आमच्याशी खरे बोलत आहे का, हे आम्ही लवकरच माहीत करू," सुलेमान अ. म्हंटले. 

"हे घे, हे पत्र घेऊन सबा ला जा, तेथे ते पोहोचव आणि मग काय घडते ते पाहायची वाट पाहा.
हुदहुद ने सुलेमान अ. यांचे पत्र घेतले आणि सबा ला जाण्यासाठी निघाला. तेथे त्याने राणीच्या समोर ते टाकले आणि शांतपणे काय घडते , ते पाहण्याची वाट पाहू लागला.

राणीने जेव्हा ते पत्र वाचले, तिच्या सल्लागाराला काय करावे असे विचारले. "हे राजा सुलेमान कडून एक पत्र आहे. अल्लाह (ईश्वर) चा योग्य सन्मान करून आणि अल्लाहच्या नावाने सुरू केलेले आहे. त्याने अल्लाह च्या सत्यनिष्ठेला विरोध न करता,  समर्पण करण्यासाठी मला त्याच्याकडे बोलावले आहे."
मग राणीने थोडा वेळ विचार केला आणि सुलेमान अ. साठी काही मौल्यवान भेटवस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला.

पण सुलेमान अ. काही साधारण राजा नव्हते. ते अल्लाहचे (एक ईश्वराचे) संदेश कर्ता (प्रेषित) होते. ते क्रोधित झाले, जेव्हा त्यांनी पाहिले की, राणीने त्यांच्या संदेशाचा कसा अर्थ लावला. 

त्यांनी तिच्या संदेश देणाऱ्याला भेटवस्तू सहित वापस पाठविले आणि त्याला म्हंटले की, "राणीला सांग की, जर अल्लाह (ईश्वर) च्या सत्य निष्ठेकडे बोलवण्याचे उत्तर भेटवस्तू असतील, तर तो सबा ला सैन्यासह येईन."

आता राणी खरच घाबरली आणि तिने तत्काळ स्वतः सुलेमान अ.कडे जाण्याचा निर्णय घेतला.जेव्हा सुलेमान अ. यांना  तिच्या येण्याचा हेतू कळला, 

त्यांनी त्यांच्या दरबाऱ्यांना विचारले, "येथे कोणी आहे का, जो तिचे सिंहासन, ती इथे येण्याआधी आणू शकेल ."

एका जिन्नने उत्तर दिले की, "डोळ्यांची पापणी लवण्याआधी तो ते आणू शकेल." सिंहासन आणण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा तो आणला गेला, सुलेमान अ. यांनी त्याच्यात थोडा बदल केला.

जेव्हा राणी आली, तिला तो सिंहासन दाखविण्यात आला आणि विचारले, "हे तुझे सिंहासन आहे का?" तिने लगेच त्या सिंहासनाला ओळखले, कारण ती खरोखर बुद्धिमान होती, पण तिने तिचे आश्चर्य लपविले आणि म्हणाली, "हे तसेच दिसत आहे".
सुलेमान अ. यांनी तिला त्यानंतर एका सुंदर राजवाड्यात नेले, ज्याची फरशी चकाकणारी होती. तिने फरशीवर पाय ठेवण्यासाठी तिचा घागरावर उचलला. कारण तिला वाटले की, ते पाण्याचे तळे आहे. पण ती खरंच राजवाड्याची फरशी होती ज्याची पारदर्शक (विशेष मौल्यवान काचेने) फरस बंदी केली होती.(आच्छादली होती.) 

अशी त्या राजवाड्याची भव्यता होती.
जे अल्लाह ने सुलेमान अ. यांना बहाल केले होतेे. राणी इतकी प्रभावित झाली की, ती अल्लाह (ईश्वर) च्या सत्यनिष्ठेला शरण गेली.

"मी स्वतःशी चूक केली आहे. आता सुलेमान अ. सह मी या जगाच्या प्रभुला शरण जात आहे."
अशाप्रकारे सुलेमान अ. त्या सुंदर राणीला अल्लाहची शक्ती पटविण्यास सक्षम झाले.

सुलेमान अ. यांच्या पायाशी सर्व मौल्यवान सांसारिक (ऐहिक) खजिने होते. तरीही त्यांची अल्लाहवर असलेल्या श्रध्देत कमी झाली नाही. ही सुद्धा अल्लाह चीच कृपा होती.

ते नेहमी, इतके जास्त देण्यासाठी अल्लाहला आभार मानत राहिले आणि गर्विष्ठ झाले नाही. 

एकदा जेव्हा सुलेमान अ. एका उत्कृष्ट मशिदीच्या बांधकामाची देखरेख करत होते. त्यांच्या मृत्यूची वेळ आली. जेव्हा त्यांना याची जाणीव झाली की, ते मरणार आहे, ते उरलेल्या बांधकामाच्या देखरेखी विषयी चिंताग्रस्त झाले. त्यांना भीती होती की अडेल (बेलगाम, ताब्यात न राहणारे) जिन्न अर्धवट काम सोडून, मोकळे सुटतील.

अल्लाह ने याची काळजी घेतली. जेव्हा बांधकाम पूर्ण केले जात होते, सुलेमान अ. त्यांच्या चालण्याच्या काठीचा आधार घेऊन उभे राहिले. 

त्याच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा

किड्यांनी त्यांची काठी आतून पोखरून खाल्ली आणि ते कोसळले, फक्त तेव्हाच सुलेमानच्या मृत्यूचे गुपित जिन्नांसमोर प्रकट झाले. तोपर्यंत ते काम करत राहिले. कारण सुलेमान अ. यांना एकाच अवस्थेत काठीच्या मदतीने उभे राहण्याची सवय होती.

जिन्नांनी, ते सर्व , अल्लाह (ईश्वर) चे रहस्य न समजण्यालायक असल्यामुळे एकमेकांना शाप दिला. " जर आम्हाला याविषयी आधीच माहीत असते तर आम्ही या परिश्रमापासून खूप लवकर सुटका करून घेतली असती." ते म्हणाले.

ही बोध कथा आणि सत्य कथा पवित्र कुरआन मध्ये वर्णन केली आहे. कृपया मराठी कुरआन वाचा आणि ईश्वराची संकेत वचने जाणून घ्या.


सत्यकथा🍁यशायाह (Isaiah)🍁🍁राजा "हजकिया" (Hezekiah) (700BC) (साधारणतः 2700वर्षांपूर्वी) जेरुसलेम (जुडा) राज्यावर राज्य करीत होता. 

अल्लाह (ईश्वर, यहोवा,God) चा चांगला सेवक आणि राजा होता. त्यावेळी 'यशायाह' अ. हे अल्लाहचे संदेशकर्ता म्हणजेच प्रोफेट होते. 

राजा हजकीया, राज्याच्या चांगल्यासाठी, यशायाह अ. ,जे काही करण्याचा सल्ला देत होते आणि ज्यावर प्रतिबंध लावत होते, राजा ऐकत होता आणि त्यांचा आज्ञाकारी होता आणि त्यांना सल्ला मागत होता. इस्रायली लोकांमध्ये घडामोडी होत गेल्या आणि प्रकरणांना वेग आला. राज्य एका योग्य राजाच्या हातात होते आणि राज्याची प्रजा त्याला पसंत करत होती. एक दिवस राजाला एक आजार झाला. त्याच्या पायाला संसर्गित जखम झाली. 

याच काळात त्याने एक भयानक बातमी ऐकली. त्याचा एक सेवक राजवाड्यात पळत आला आणि त्याने ओरडून सांगितले, " 'बेबिलोन' चा राजा 'सनहेरीब ' (sennacherib) आपल्यावर आक्रमण करण्यास येत आहेत." 

आणि हे खरे होते. क्रूर आश्शुरी राजा साठ हजार सैन्यासह इस्राइल (जेरुसलेम) कडे येत होता.

बेबिलोन (बाबिली) हे मेसोपोटेमिया मधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते. या शहराची स्थापना 1894 BC मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली होती.(हल्लीच्या इराक, इराण, तुर्कस्तान व सीरिया या देशांचा काही भूभाग प्राचीन काळी ' मेसोपोटेमिया' भूप्रदेश नावाने ओळखला जायचा.)
{बेबिलोन चे अवशेष इराकच्या बेबीलोन प्रांतातील "अलहिल्लाह" या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात.}

लोक खूप भयभीत झाले. बातमी ऐकून राजा चिंताग्रस्त झाला आणि त्याने 

यशायाह अ. यांना विचारले, "अल्लाह ने सनहेरीब आणि त्याच्या सैन्याविषयी तुमच्यावर काय प्रकट केले (सांगितले) आहे".

"अल्लाहने आतापर्यंत मला काहीही नाही सांगितले", त्यांनी उत्तर दिले.
राजा दुःखी होता. कारण तो त्याच्या पायाच्या आजारमुळे लढाई करू शकत नव्हता.
यशायाह अ.प्रार्थना करत होते, तेव्हा अल्लाहने त्यांना एक गुप्त गोष्ट सांगितली. (प्रकट केली)

दुसऱ्या दिवशी यशायाह संदेश घेऊन राजाला भेटावयास आले.
"तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या उत्तराधिकारीची नेमणूक करा .कारण तुमची शेवटची वेळ आलेली आहे."


जेव्हा यशायाह अ. यांनी हे सांगितले, 

राजा प्रार्थना स्थळाकडे तोंड करून प्रार्थना करू लागला. त्याने गौरवशाली अल्लाहला प्रार्थना केली आणि विनंती केली, रडला.

प्रामाणिक मन, विश्वास आणि संयम ठेवून, सर्वशक्तीशाली आणि उदात्त अल्लाहला रडत आणि विनंती करत, तो म्हणाला, "हे प्रभू, माझ्या कर्मांची आठवण ठेव, इस्राइलच्या लोकांसाठी असलेले निर्णय,  सगळे तुझ्याकडूनच होते. मी जे करतो, ते तू चांगले जाणतो. माझे सर्व काम आणि माझे खुले आणि गुप्त कार्य तुझ्या समोर आहेत."

जेव्हा अल्लाहने हिजकियाची मनापासून केलेला प्रार्थना ऐकली, तेव्हा अल्लाहला त्याच्यावर दया आली.


त्या रात्री जेव्हा यशायाह प्रार्थना करत होते, अल्लाहने त्यांना राजाला आनंददायक बातमी देण्यास सांगितले की, त्याच्यावर दया झाली आहे. अल्लाह आणखी पंधरा वर्षांसाठी हिजकीयाचे वय वाढवणार आहे. आणि त्यांचा आजार बरा होणार आहे. आणि शत्रू सनहेरीब पासून वाचवणर आहे.

लगेच दुसऱ्या दिवशी यशायह अ. यांनी राजाला ही चांगली बातमी दिली. जेव्हा राजाने हे ऐकले, तो आनंदी झाला.

दुःख आणि वाईट विचार दूर झाले. त्याने वाकून प्रणाम करून प्रार्थना केली, "हे प्रभू, तू ज्याला इच्छितो त्याला राजा बनवतो आणि ज्याला इच्छितो त्याला सत्तेवरून काढून टाकतो. ज्याला इच्छितो त्याला उन्नत करतो आणि ज्याला इच्छितो त्याची अधोगती करतो. अदृश्य जाणणारा आणि स्पष्ट असणारा. सगळ्यात पहिला आणि शेवटचा. अभिव्यक्त आणि ज्ञात असणारा. तू दया दाखविली आणि अस्वस्थ लोकांच्या प्रार्थनांना उत्तर दिले."


जेव्हा राजाने त्याचे डोके वर केले, अल्लाहने यशायाह अ. यांना, राजाला आदेश देण्यास सांगितले की, अंजिराचे पाणी काढून त्याच्या जखमेवर लावावे आणि तो बरे होईल.

राजाने अल्लाहच्या आदेशाप्रमाणे पाणी लावले. हा एक चमत्कार होता. त्याचे जखम लगेच भरले. राजा आनंदी होता. त्याने म्हंटले की, "अल्लाह दया करतो आणि दुःखी लोकांच्या वेदना कमी करतो."

अल्लाहने सनहेरीब च्या सैन्याकडे मृत्यूच्या स्वर्गदूताला पाठविले. सकाळी राजा सनहेरीब ने त्याच्या सैन्याला मृत झालेले पाहिले. अल्लाहने जे वचन दिले होते ते पूर्ण केले.

शत्रूच्या सैन्यातील राजा आणि त्याचे पाच 

सहकारी सोडून कोणीच जिवंत नव्हते. या पाच सहकाऱ्यांमध्ये नबूकदनेस्सर (बूख्तनसर) ही होता.


राजा हजकिया ने त्यांना बेड्या घातल्या आणि त्याच्या राज्यात वापस नेले. 

राजाने, सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, सर्वांना दिसण्यासाठी, दरबाराच्या शिक्षा देण्याच्या जागी ठेवले आणि सत्तर दिवसापर्यंत, द्वेष आणि अपमानित करण्यासाठी कैदेत ठेवले. 

रोज प्रत्येकाला खाण्यासाठी "बारले" ची भाकरी देण्यात यायची. सत्तर दिवसानंतर त्यांना, राजाने तुरुंगात टाकले.

सत्तर दिवसानंतर अल्लाहने, यशायाह अ. यांना, सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, त्याच्या राज्यात वापस पाठवण्यास सांगितले. 

जेणेकरून ते त्याच्या प्रजेला, म्हणजेच त्याच्या राज्यातील लोकांना सावध करतील, की, त्यांच्यासोबत काय घडले. 

जेव्हा यशायाह अ. यांनी, राजा हजकिया ला, या बाबतीत संदेश दिला, तेव्हा राजाने तुरंत त्यांना मुक्त केले.
जेव्हा सनहेरीब त्याच्या लोकांत वापस गेला, त्याने त्याच्या वाजिरांना आणि सल्लागारांना जमा केले आणि सांगितले, की, त्याच्या सैन्याला कसे मारण्यात आले आणि सत्तर दिवस त्यांना किती त्रास दिला.
तेव्हा धार्मिक लोक आणि जादूगार लोक पुढे आले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला अल्लाह आणि त्यांच्या संदेशकर्त्याविषयी सूचना दिली होती.पण तुम्ही ऐकले नाही. दुसऱ्याने असे म्हंटले, तो एक असा देश आहे, ज्याला कोणी मिटवू शकत नाही. त्या देशाला कोणी जिंकू शकत नाही. सनहेरीब आता अल्लाह (ईश्वर) ला घाबरला होता. त्याने पुन्हा कधी इस्राइलवर आक्रमण करण्याचा विचार केला नाही. त्यानंतर सात वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला.

कुरआन मध्ये यशायाह अ. यांचे नाव आहे.
यहुदी (ज्यू,हिब्रू) लोक एक अल्लाहला (ईश्वराला) यहोवा म्हणतात.आणि ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात. तिन्ही ग्रंथात 

कुरआन, बायबल (इंजील) आणि तोराह (तौरेत) मध्ये जवळजवळ सारख्याच

सत्यकथा आहेत. संदेशकर्ता ही सारखेच आहेत.

पण कुरआन च्या आधीच्या ग्रंथांत, लोकांकडून बदल झाला. त्यामुळे ते मूळ ग्रंथ नाही.


अरमाया (जेरमाया) अ. 

(655BC)(2675वर्षांपूर्वी )
जेरुसलेमच्या लोकांनी फक्त एक अल्लाह

म्हणजेच ईश्वर ची (अल्लाहला ते "यहोवा" म्हणत होते.) उपासना करणे सोडून, दगडांच्या प्रतिमा बनविल्या आणि त्यांची उपासना सुरू केली.

अरमाया अ. यांनी अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, फक्त एका अल्लाहची  (ईश्वराची) उपासना करा आणि परत या. पश्र्चाताप करा. क्षमा मागा.अल्लाह दयाळू आहे.

अरमाया अ. यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला की, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. नाहीतर ते सर्व लोक नष्ट होतील.


पण त्यांचा उपदेश लोकांनी मानला नाही. त्यांनी अरमाया अ. यांना खोटं बोलणारा समजले. ते लोक गर्विष्ठ झाले. त्यांच्यामध्ये खूप लोक चुकीच्या रस्त्यावर गेले. 

पाप वाढले. लोक कुकर्म करू लागले. त्यांना चमत्कार दाखवूनही (अल्लाहच्या मदतीने) काही फरक पडत नव्हता. ते या गोष्टीवर विश्वासच करू शकत नव्हते की, अल्लाह, त्या दगडाच्या गुंबद (हैकले सुलेमानी) ला, जे जेरुसलेममध्ये सुलेमान अ. यांनी बांधले होते आणि ज्यावर अल्लाहची कृपा होती, नष्टही करू शकतो.

लोकांनी अरमाया अ. यांच्या, संदेशातील धमकी आणि चेतावणी ऐकली, ते म्हणाले,  "तू खोटे बोलत आहेस, तू असे म्हणत आहे की, अल्लाह या जमिनीला, प्रार्थना स्थळाला, [जे आधी, फक्त एका अल्लाह (यहोवा, ईश्वर)ची उपासना करण्यासाठी होते, आणि आता] जेथे दगडाच्या प्रतिमा ठेवल्या गेल्या होत्या, ग्रंथाला (ज्यामध्ये बदल केला गेला होता) नष्ट करेल?"

जेरुसलेमचा राजा खूप गर्विष्ठ होता. त्याने आदेश दिला की, "अरमायाला कैद करा आणि तुरुंगात टाका. त्यांनी अरमाया अ. यांना, जकडून तुरुंगात टाकले. ही खूप मोठी चूक होती.

अल्लाहने (ईश्वराने) नबूकदनेस्सर (nebuchadnezzar) या 

बेबीलोन (इराकचे प्राचीन शहर) च्या राजाला जेरुसलेम वर, आक्रमण करण्यास पाठवले. 

त्याने, त्याच्या सैन्यासह देशात प्रवेश केला आणि शहराला घेरले . जेव्हा हा सैन्याचा वेढा प्रदीर्घ कालावधी पर्यंत राहिला. जेरुसलेमच्या सैन्याने शरणागती पत्करली, त्यांनी त्यांच्या शहराचे दरवाजे उघडले आणि राजाच्या सैन्याने शहरात प्रवेश केला आणि ते खूप क्रूर होते. राजाने क्रूरतेने त्यांच्यावर, त्याचा कायदा लागू केला आणि त्यांना निर्दयीपणे शिक्षा केली.

राजाने, एक तृतीयांश लोकांचा वध केला आणि एक तृतीयांश लोकांना पकडले. बेबिलोनच्या सैन्याने फक्त अपंग आणि वृद्ध लोकांना जाऊ दिले. त्यांनी जेरुसलेमच्या लोकांच्या सर्व घरांना नष्ट केले. त्या सैन्याने हैकले सुलेमानीच्या इमारतीला  (प्रार्थनास्थळाला) नष्ट केले. बेबोलोनच्या सैन्याने, तेथील लोकांचे, सर्व पुस्तके आणि ग्रंथ जाळून टाकले. त्यांनी मुलांशी आणि स्त्रियांशी ही वाईट वागणूक केली. हा तेथील लोकांसाठी खूप भयावह दिवस होता.
मग त्यांनी, त्यांना घोड्यांवर स्वार होऊन पायदळी तुडविले. तरुणांना वेगळे करून स्त्रियांना बाजाराच्या ठिकाणी रक्षक म्हणून उभे केले. त्यांनी सैन्यात दहशत पसरवली आणि राजाने जेरुसलेमच्या वंशाला पूर्णपणे संपुष्टात आणले. 

हे इस्राइल अ.  (याकूब अ.) च्या वंशाच्या लोकांसाठी, जे जेरुसलेम मध्ये राहत होते, खूप भयानक दृश्य होते. ती जागा लोकांच्या रक्ताने भरली. सगळी कडे मृतदेह होते.

बेबोलोनच्या राजाला माहीत झाले की, इस्राइल च्या लोकांचा एक संदेशकर्ता आहे, ज्याला आधी पासूनच या विनाशा विषयी माहीत होते आणि त्याचे नाव अरमाया आहे. राजाने आदेश दिला की, त्या संदेश कर्त्याला तुरुंगातून बाहेर आणले जावे. अरमाया अ.शी बोलल्यानंतर राजाला जाणीव झाली, की ते खरच अल्लाह (ईश्वर) चे  खरे संदेशकर्ता (पैगंबर) होते. राजा ने त्यांची सुटका केली.
त्या पूर्ण शहराला नष्ट करून बेबिलोनचा राजा पुन्हा त्याच्या राज्यात निघाला. राजा बेबिलोनला, सर्व लूट घेऊन निघाला, ज्यामध्ये संपत्ती, सोने, हिरे, मौल्यवान खजिने होते आणि पुरुष, स्त्रिया, मुले होती, त्यांच्यात तरुणी होत्या आणि धर्मोपदेशकांची मुले होती, सर्व मिळून सत्तरहजार पर्यंत होते. अंदाजे सत्तर हजार पुरुष आणि स्त्रियांना त्याने सेवक बनविले.

इस्राइलची जमात ही अल्लाहची जमात होती. त्या लोकांकडे खूप संदेश देणारे (पैगंबर) आले. अल्लाहने त्यांना खूप संधी दिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांनी अल्लाह चा प्रत्येक आदेश तोडला. इतकेच नाही तर त्यांनी अल्लाहचा संदेश देणाऱ्यांची हत्या केली आणि दगडाच्या प्रतिमांची उपासना करणे चालू ठेवले. याच कारणाने अल्लाह (ईश्वर) त्यांच्यावर खूप क्रोधित झाला आणि पूर्ण जमातीला ध्वस्त आणि नष्ट केले.

या विध्वंसानंतर इस्राइल मध्ये नवीन युग सुरू झाले. अरमाया अ. यांनी लोकांना म्हंटले की, जे इस्राइल मध्ये हजर आहेत, त्यांनी स्वतःच्या अपराधावर पश्चाताप करून अल्लाह (ईश्वर) ला क्षमा मागावी आणि हे ही सांगितले की, अल्लाह पुन्हा एकदा त्या लोकांची भरभराट करेल. पण खूप लोक, त्या विध्वंस झालेल्या शहरात राहण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा अरमाया अ. यांचा आदेश मानण्यास नकार दिला. आणि ते सगळे लोक जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाले. त्यातील काही इजिप्त (मिस्र), स्पेन (हिजर) आणि सौदी अरेबिया (तैफ) मध्ये गेले. पण अरमाया अ. यांनी इस्राइल ची पुन्हा भरभराट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

ही सत्य घटना आहे. बायबलमध्ये पूर्ण एक chapter यावर आधारित आहे. जेरुसलेमचे लोक ( इस्राइलचे वंशज) दोन वेळा उपद्रव माजवतील व दोन वेळा जेरुसलेम नष्ट केले जाईल, अशी चेतावणी अल्लाह (यहोवा) कडून देण्यात आली होती.

कुरआन मध्ये हा संदर्भ आहे.
#कुरआनचा_काही_अंश

"4 आणि आम्ही इस्राईलच्या मुलांना, ग्रंथाद्वारे हे आधीच कळविले होते की, तुम्ही जमिनीवर दोन वेळा उपद्रव माजवाल आणि मोठ्या विद्रोहाचे प्रदर्शन कराल. 5 मग ज्या दोन घटनेच्या बाबतीत आधीच इशारा दिलेला होता, त्यांपैकी जेव्हा पहिल्या घटनेची वेळ आली, तेव्हा आम्ही आमच्या भक्तांपैकी अशा काही भक्तांना तुमच्या विरुद्ध पाठवले. जे युद्धाच्या बाबतीत फार शक्तीशाली असे होते, जे तुमच्या घरांत (घुसले व) त्यांचे वाटोळे केले. अशाप्रकारे आधीपासून वर्तवलेले भाकीत पूर्णत्वास पोहोचले.
[कुरआन 17:4-6]

________________________________


[इस्रायली लोकांच्या ग्रंथात ' तोराह ' मध्ये हे भाकीत अल्लाह (यहोवा) ने वर्तविले आहे, जो अल्लाहचाच ग्रंथ आहे , पण लोकांनी त्यात फेरबदल केले आहे. अरमाया अ. यांना त्या इस्राइलच्या वंशजाकडे, चेतावणी देण्यासाठी पाठवले होते. ही पहिली घटना होती. दुसरी घटना, जी ईसा (येशू) अ. यांच्या काळातील आहे. जेव्हा दुसऱ्या वेळेस इस्राइल च्या वंशजाने उपद्रव माजवला होता आणि विद्रोह केला होता.]

 

🐳माशाच्या पोटात 🐳
युनूस अ. हे एक ईश्वरनिष्ठ तरुण होते.

ते "निनेवेह" (सध्याच्या "मोसुल" च्या बाहेरील भागात असणारे एक प्राचीन शहर, इराक) येथे राहत होते. 

या ठिकाणचे लोक फक्त एक खऱ्या अल्लाहवर (ईश्र्वरावर) विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे अल्लाहने त्या लोकांसाठी युनूस अ. यांना, त्याचा संदेशकर्ता म्हणून निवडला. 

युनूस अ. यांनी अल्लाहच्या संदेशाचा उपदेश त्या लोकांना दिला. पण त्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने अविचारीपने त्याचा उपदेश लक्षपूर्वक ऐकला, आणि जेव्हा तो म्हणाला एकच अल्लाह (ईश्वर, पालनकर्ता) आणि तो, अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांनी त्याची थट्टा केली.
युनूस अ. यांनी त्यांना विनवणी केली, अल्लाहच्या क्रोधाविषयी आणि दंडाविषयी (शिक्षा) चेतावणी दिली. पण काहीच अर्थ नव्हता. ते त्याला पाहून अजून हसले आणि विश्वास केला नाही. 

यामुळे युनूस अ. यांची त्यांच्याकडून निराशा झाली. त्यांनी रागावून आणि अल्लाहच्या शिक्षेबद्दल चेतावणी देत, अल्लाहचा आदेश येण्याची वाट न पाहताच, निनेवेह च्या लोकांना सोडले.

यावर निनेवेह च्या लोकांना काहितरी गंभीरपने चूक झाली आहे, याची जाणीव झाली. त्यांना त्यानंतर भीती वाटली आणि वाटले की, "युनूस अ. हा अल्लाहचा खरा संदेशकर्ता होता. त्याला त्रास देऊन, त्यांनी अल्लाहला नाराज केले आहे आणि आता अल्लाहची दिलेली शिक्षा नक्कीच त्यांना नष्ट करू शकते.."

ज्या क्षणी त्यांना याची जाणीव झाली, ते पश्र्चाताप करण्यासाठी खुल्या जागेत आले, वाकून आणि अल्लाहकडे याचना करत, नमन करू लागले. त्यांनी क्षमा याचना केली आणि सत्य निष्ठा स्वीकार केली. त्यांनी इतक्या प्रामाणिकपणेे क्षमा मागितली की, अल्लाहने त्यांना क्षमा केली आणि त्यांच्यावर ती शिक्षा (दंड, आपदा) केली नाही, ज्या विषयी, युनूस अ. त्यांना चेतावणी देऊन गेले होते.

या काळात, युनूस अ. यांनी, त्यांच्या लोकांना आणि "निनेवेह" ला रागाच्या भरात सोडल्यानंतर , ते दूर जावून, एका नौकावर चढले जी, त्या क्षणी समुद्रात प्रवासासाठी निघणार होती.
ती नौका, जी लोकांनी भरली होती समुद्रात निघाली, पण रस्त्यात, एक मोठे वादळ नौकेवर आदळले आणि नौका लहरींवर हेलकावे देऊ लागली.

त्याकाळी असे मानले जायचे की, जर एखादा पळपुटा गुलाम (विकत घेतलेला नोकर, जशी त्या काळी माणसांना विकत घेऊन काम करवून घेण्यासाठी, "गुलाम" बनविण्याची पद्धत होती.), नौकेवर किंवा जहाजावर चढला तर, ते जहाज किंवा बोट बुडते.

या कारणामुळे लोकांनी संशय केला की, या बोटीवर, एक पळून आलेला गुलाम आहे. तो कोण आहे हे माहीत करण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकून, ज्या माणसाचे नाव येईल त्याला, नावेच्या बाहेर समुद्रात फेकण्याचा निर्णय घेतला..जेव्हा सगळ्या चिठ्ठ्यामधून, एका नावाची चिठ्ठी उचलण्यात आली, ते युनूस अ. यांचे नाव होते. 

कोणीच युनूस अ. यांच्यावर विश्वास करण्यास तयार नव्हता की, "युनूस पळून आलेला गुलाम नाहीं", कारण ते खूप सभ्य आणि धार्मिक वाटत होते.
तीन वेळा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि प्रत्येक वेळेस युनूस अ. यांचे नाव आले.
आता युनूस अ. यांना खात्री झाली की, 

त्यांनी अल्लाह (ईश्वर) चा आदेश येईपर्यंत वाट पाहिली नाही आणि रागाच्या भरात, निनेवेह आणि त्यांच्या लोकांना सोडून, अल्लाह (ईश्वर) ला नाराज केले आहे.

"हो, मी पळून आलेला गुलाम आहे" ते म्हणाले, मी माझ्या प्रभू आणि मालकाला (ईश्वराला) सोडून पळालो, जर तुम्हाला पुढे सुरक्षित जायचे आहे तर, मला नौकेच्या बाहेर फेका."

खूप अनिच्छिने नावेच्या लोकांनी, जे युनूस अ. यांच्याकडून सांगण्यात आले होते, ते केले आणि त्यांचा पुढचा प्रवास चालू ठेवला.
जसे युनूस अ. खोल पाण्यात पडले, 

एक मोठा मासा पोहत आला आणि त्या मास्याने त्यांना गिळले. युनूस अ. यांनी स्वतःला माश्याच्या पोटात असलेले पाहिले, जेथे अंधकार आणि खूप जास्त खोली होती. ते भयभीत आणि असहाय्य होते. जेव्हा मासा पोहायचा, युनूस अ. आतल्या आत फेकले जायचे आणि त्यांना खूप अस्वस्थ वाटायचे आणि भिती वाटायची.    "मी पुन्हा कधी दिवसाचा प्रकाश पाहू शकेन का? मी अशा दयनीय पिंजऱ्यात मरून जाईल का?"  असे विचार त्यांना यायचे.

" मी निनेवेहच्या लोकांना का सोडले?" त्यांनी त्यांच्या चुकीचा पश्र्चाताप केला आणि अल्लाहकडे क्षमा याचना केली. त्यांनी, त्यांच्या मालकाला (अल्लाहला) दया करण्याची विनंती केली आणि या दुःखातून मुक्त करण्यास प्रार्थना केली.

"हे अल्लाह, तुझ्या शिवाय कुणीच अल्लाह (ईश्वर) नाही. फक्त तूच आहेस. सगळा गौरव तुझाच आहे. मी खरंच चूक होतो." 

ते म्हणाले. त्यांचा पश्र्चाताप पाहून अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्यावर दया केली. मासा पोहत वर किनाऱ्यावर आला आणि युनूस अ. यांना बाहेर किनाऱ्यावरील रेतीवर (तोंडातून) बाहेर फेकले.
जेथे ते पडले, अस्वस्थ, खूप अशक्त आणि असहाय्य होते, जसा नवीन जन्म झालेला बालक असतो.

एक वेल, त्याच्या जवळ वाढला आणि त्यांना सावली दिली, जोपर्यंत त्यांना इतके बळ येत नाही, की ते स्वतः उठतील आणि त्यांच्या लोकांपर्यंत जातील, तोपर्यंत. आतापर्यंत त्यांच्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा शोध घेतला होता. 

जेव्हा युनूस अ. शेवटी त्यांना दिसले ते लोक त्यांना पाहून खूप आनंदित झाले. युनूस अ. यांना कळले की, लोकांनी शेवटी खरी श्रध्दा स्वीकार केली आहे. जो संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविला होता, की फक्त एका पालन कर्त्याची उपासना करा, लोकांनी त्याचे अनुसरण केले होते आणि त्या एका प्रभूची क्षमा मागितली होती.

अल्लाह, जे पश्र्चाताप करतात आणि नम्रतेते क्षमा मागतात, त्यांना क्षमा करतो.

युनूस अ. यांचे नाव पवित्र कुरआन मध्ये आहे आणि त्यांनी जी प्रार्थना माश्याच्या पोटातून केली होती, ती प्रार्थना ही पवित्र क़ुरआन मध्ये आहे..कृपया स्वतःच्या मातृभाषेत कुर आन समजून वाचा आणि जाणून घ्या की, फक्त एक अल्लाह (ईश्वर, God, यहोवा)  चा आदेश आणि संदेश काय आहे, कशामुळे खरे यश मिळते आणि सत्य काय आहे...

💞💞अय्युब चा संयम 💞💞
दीर्घकाळाच्या आणि वेदनादायक आजाराने अय्युब अ. यांना अशक्त आणि अवतीभोवती फिरण्यास असमर्थ बनविले 

होते. ते वर्षांपासून एक असहाय्य आजारी बनून राहिले होते. त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती असता तर, त्याचे धैर्य खचले असते आणि अल्लाहची निष्ठा हरवली असती आणि वेदनेने तो ओरडला असता. त्याने अल्लाहला असे दुःख आणि अस्वस्थता देण्याविषयी, ज्यात त्याचा स्वतःचा काही दोष नाही, तक्रार केली असती. 

पण अय्युब अ. यांनी संयमानेे आणि अल्लाहच्या निष्ठेत कणखर राहून त्रास सहन केला. त्यांनी त्यांच्या दुःखाविषयी कधीही तक्रार केली नाही.

लोकांनी त्यांना भेटण्यास येणे बंद केले 

आणि त्यांना मरण्यासाठी एकटे सोडून दिले. फक्त त्यांच्या पत्नीने त्याची सेवा केली आणि त्यांना प्रवृत्त केले आणि एकदा तीही एका क्षणासाठी खूप त्रासाने आणि खिन्नतेने, असंयमित झाली आणि तिने अल्लाहला तक्रार केली. 

यामुळे अय्युब अ. खूप दुखवले. ते, ज्यांनी एक शब्द ही न उच्चारता, इतक्या दिवसापासून इतका जास्त त्रास सहन केला होता, अल्लाहचे आभार न मानण्याची पत्नीची वृत्ती सहन करू शकले नाही.

त्यांनी, ते जेव्हा बरे होतील, तेव्हा त्यांच्या पत्नीला शंभर वेळा मारण्याची शपथ (वचन) घेतली. ते हे कदाचित अशामुळे ही बोलले असतील, कारण ते त्यावेळी, इतके असहाय्य होते की, ते किंचाळू शकत नव्हते. त्यांचा राग कोणत्याही तऱ्हेने व्यक्त करू शकत नव्हते.

एक पूर्ण असहाय्यतेच्या दशेत, अय्युब अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्याच्यावर दया होवू दे आणि या वेदनेतून त्यांची सुटका कर. 

अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्यावर कृपा केली. अल्लाहने आदेश दिला की, जेथे ते झोपलेले आहे, तेथे पाय जमिनीवर आपट. 

अय्युब अ. यांनी आदेश पाळला आणि जेव्हा त्यांनी असे केले, ताजे पाणी तेथपासून उसळून वाहू लागले.अल्लाहने त्याला म्हंटले की, पाणी पी आणि त्यात स्नान कर. एक वेल त्यात वाढला आणि जेथे ते आराम करत होते तेथे त्यांना सावली दिली.

अय्युब अ. अल्लाहच्या कृपेने बरे झाले, पण जेव्हा त्यांना आठवले की, त्यांनी बरे झाल्यानंतर, त्यांच्या पत्नीला मारण्याची शपथ घेतली होती, ते अस्वस्थ आणि दुःखी झाले.

एकीकडे त्यांनी अल्लाहचे नाव घेऊन केलेले वचन होते आणि दुसरीकडे त्यांची पत्नी होती, जिला ते प्रेम करत होते. ते त्यांचे वचन तोडू शकत नव्हते, पण त्यांच्या पत्नीला मारहाण करण्याचा विचार, त्यांना नाखूष करत होता. या अवघड प्रसंगातून बाहेर येण्यासाठी अल्लाहने त्याच्या सद्गुणी संदेशवाहकाची मदत केली. अल्लाहने ( ईश्वराने) आज्ञा केली की, शंभर गवताच्या काड्या जमा कर आणि त्याने त्याच्या पत्नीला एकदाच मार. अशाप्रकारे ते, त्यांचे वचन ठेऊ शकले आणि त्यांच्या पत्नीला वेदना झाली नाही.

अल्लाहने त्याच्या कृपेने अय्युब अ. यांना बरे केले, त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्यांना एकत्र केले आणि त्यांना पुष्कळ संपत्ती आणि सुख दिले.

अय्युब अ. यांनी अल्लाह ला (ईश्वर ला ) केलेली प्रार्थना (दुआ) पवित्र क़ुरआन मध्ये, अल्लाह ने प्रकट केली आहे. 

या प्रार्थनेने खूप व्यक्तींना समाधान मिळते, जेव्हा व्यक्ती निराशेच्या काळात ती प्रार्थना करतो.

स्वतःच्या मातृभाषेत पवित्र क़ुरआन वाचा आणि जीवनाचा योग्य मार्ग निवडा...

मंगळवार, २३ जून, २०२०

07. युसूफ ची कथा

युसूफ अ. 

याकूब अ.(इस्राइल) हे  खूप अल्लाहनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती होते  आणि अल्लाहचा संदेश पोहोचविणारे होते..त्यांना वेगवेगळ्या पत्नींपासून बारा मुले होती…सगळ्यात लहान मुलगा होता युसुफ अ. आणि बनी अमीन…

याकूब अ. सर्व मुलांमध्ये, त्याच्या सगळ्यात लहान मुलावर युसुफ अ. वर सर्वात जास्त प्रेम करायचे…

एक दिवस बालक युसुफ अ. यांना स्वप्न पडले की सूर्य, चंद्र आणि अकरा तारे त्यांना वाकून प्रणाम करीत आहेत..त्यांनी हे स्वप्न त्यांच्या पित्याला वर्णन केले..त्यांचे पिता त्यांना म्हणाले, की, तू ह्या स्वप्नाबद्दल तुझ्या मोठ्या भावंडांना काहीही सांगू नकोस..कारण त्यांना ईर्ष्या होऊन, ते तुला नुकसान करण्याचा प्रयत्न करतील…त्यांच्या पित्याने हे ही सांगितले की, "युसुफवर अल्लाहचे आशीर्वाद असतील..आणि तो ही अल्लाहचा संदेश सर्वांना पोहोचवेल.."

युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ युसुफ अ. वर खूप जळायचे..कारण त्यांचे वडील याकूब अ., त्यांच्यावर खूप प्रेम करायचे..

एक दिवस ते सर्व भाऊ, त्यांच्या वडिलांजवळ गेले आणि म्हणाले, "आम्ही बाहेर जात आहोत…तुम्ही आमच्यासोबत युसुफला पाठवाल का?..आम्ही त्याची चांगली काळजी घेऊ..तो आमच्यासोबत खाईल, पियील आणि खेळेल… तुम्ही त्याला आमच्यासोबत ठेवण्यासाठी विश्वास करत नाही का?…"

याकुब अ. यांना, त्यांच्या वाईट हेतूची भनक लागली…ते म्हणाले, "मला भीती वाटते की, रस्त्यात लांडगा युसुफवर आक्रमण करेल…"

पण त्या सगळ्या भावांनी त्याला पटवून दिले आणि हमी दिली की, ते त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतील..त्यामुळे भरलेल्या अंतःकरणाने याकूब अ. यांनी, युसुफ अ. यांना त्यांच्यासोबत जाऊ दिले…

जेव्हा ते सर्व जण जंगलात होते, तेव्हा मोठ्या भावांनी लहान युसुफ अ. यांना एका कोरड्या, जुन्या विहिरीत फेकले… 

ते सर्व जण रडत घरी आले आणि त्यांच्या वडिलांना म्हणाले की, लांडग्याने खरेच त्याला खाल्ले..त्यांनी युसुफ अ. यांचा रक्तळलेला कुरता (सदरा) त्यांची कहाणी सिद्धकरण्यासाठी (दाखविण्यासाठी), वापस आणला होता.. 

याकूब अ.यांनी पाहिले की, कुरता (सदरा) अजिबात फाटला नव्हता..त्यांना त्याच वेळी सगळे समजले की नक्की काय घडले असावे ..आणि ते खूप दुखी झाले…

ते म्हणाले, "मला माहित आहे, हे खरे नाही..पण मी काही तक्रार करणार नाही आणि धीर सोडणार नाही..मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागेल.."

लवकरच एक तांडा (राहण्याची व्यवस्था असलेल्या उंटाच्या गाड्या), ज्या इजिप्तकडे जात होत्या, त्या विहिरीजवळून जात असताना पाणीसाठी थांबल्या, ज्यात युसुफ अ. यांना फेकले गेले होते.

 त्या विहिरीत त्यांना युसुफ अ. आढळले..ते लोक त्यांना पाहून खूप आनंदी झाले. त्या दिवसांत गुलामाची (सेवकाची) खरेदी आणि विक्री करणे एक साधारण प्रथा होती..आणि तो ही एक चांगला तरुण युसुफ अ. सारखा मुलगा इजिप्तमध्ये विकून त्यांना एक चांगली रक्कम मिळाली असती.. 

इजिप्तच्या गुलामाच्या बाजारातून, अजीज नावाच्या एका माणसाने, जो एका शाही कुटुंबाचा सदस्य होता आणि सैन्य अधिकारी होता, युसुफ अ. यांना विकत घेतले आणि त्यांना घरी आणले आणि त्याच्या पत्नीला जुलेखाला म्हटले की, "युसुफ ला सन्मानाने वागव..तो आपल्यासाठी चांगले नशीब घेऊन येईल..आणि आपण त्याला एका मुलाप्रमाणे दत्तक घेऊ शकू…" 

युसुफ अ. मोठे होऊन खूपच देखणे तरुण झाले… अजीज त्यांच्यावर खूप दया करायचा. त्यांच्यावर  खूप प्रेम करायचा. घराच्या सर्व आर्थिक कारभाराची जबाबदारी युसुफ अ. यांना दिली होती..अजीजची सुंदर बायको युसुफ अ. यांच्याकडे आकर्षित झाली... 

एक दिवस युसुफ अ. खोलीत एकटे असताना, जुलेखा त्यांना पटवू लागली…युसुफ अ. मानले नाही..ते एक विनम्र आणि अल्लाहला घाबरणारे तरुण होते. त्यांना, त्यांच्या मालकाला, अजीजला अपमानित नव्हते करायचे आणि अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती..

त्यांनी अल्लाहची प्रार्थना केली आणि अल्लाहने त्यांना मदत केली…आणि तेथून निसटून जाणे त्यांना जमले.. 

त्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला.. जूलेखा त्यांच्या मागे पळाली आणि तिने त्याचा कुरता (सदरा) पकडून मागे ओढले..सदरा फाटला.. 

जुलेखाचा पती अजीज आणि जुलेखाचा चुलत भाऊ, जे दाराच्या बाहेर उभे होते त्यांनी दोघांना बाहेर येताना पाहिले...

तिने जे केले त्याची लाज वाटण्याऐवजी, तिने युसुफ अ. यांना दोष दिला, "या माणसाला तुरुंगात पाठविले पाहिजे, मला नुकसान पोहोचविल्याबद्दल" असे तिने तिच्या पतीला सांगितले..

युसुफ अ. यांनी हे अमान्य केले आणि त्यांनी जे काही खरे घडले, ते अजीजला सांगितले…

दोन वेगवेगळे कथन होते…अजीजला कुणावर विश्वास ठेवावा, युसुफ अ. की जुलेखा वर कळत नव्हते..

जुलेखाचा चुलत भाऊ खूप हुशार होता..तो म्हणाला, "जर युसुफ चा सदरा पुढून फाटला असेल तर जुलेखा खरी आहे आणि जर सदरा मागच्या बाजूने फाटला तर, जुलेखा खोटे बोलत आहे आणि युसुफ निरागस आहे.."

युसुफ अ. यांचा शर्ट मागून फाटला होता (कारण जुलेखाने त्याला थांबवण्यासाठी मागून ओढले होते)..यामुळे युसुफ अ. यांनी निरागसता सिद्ध झाली होती… 

अजीजला क्षणात कळाले की काय घडले..त्याने युसुफ अ. यांच्यावर विश्वास केला आणि त्याच्या बायकोला त्याची माफी मागायला सांगितली..अजीज ने युसुफ अ. यांनी माफी मागितली आणि विसरून जायला सांगितले…

पण जुलेखा विसरली नाही…तिला अपमानित झाल्यासारखे वाटले आणि तिची हार झाल्यामुळे तिला राग आला..

हळू हळू बातमी महिलांमध्ये पसरली..आणि त्या गप्पा करू लागल्या की, जुलेखा एका सेवकाच्या प्रेमात पडली.. जेव्हा जुलेखा ने हे ऐकले, तेव्हा तिने सर्व महिलांना, एक मोठ्या आणि छान मेजवानीसाठी तिच्या घरी आमंत्रित केले..

तिला त्यांना दाखवायचे होते, 'युसुफ ज्याच्याकडे ती आकर्षित झाली होती, तो साधारण व्यक्ती नव्हतां..तो विलक्षण देखणा तरुण होता..इतका देखणा की, कोणीही त्याच्याकडे आकर्षित होण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हते …

जेव्हा त्या सगळ्या महिला जेवणासाठी बसल्या, त्यांच्या हातात फळे कापन्यासाठी चाकू दिलेला होता.. जुलेखा ने युसुफ अ. यांना  बोलावले..

जसे युसुफ अ. खोलीत आले…महिला त्याच्या चकाकत्या रूपाकडे पाहतच राहिल्या..आणि त्यांनी फळे कापन्या ऐवजी स्वतःची बोटे कापून घेतली…

त्यानंतर त्यांनी जुलेखाकडे पाहून म्हटले की, "तू खरी आहेस..तो साधारण मनुष्य नाही..तो इतका चांगला दिसतो की, जसा एक स्वर्गदूत…"

जुलेखा त्यांना म्हणाली, "जर त्याने, मी जे सांगितले ते केले नाही, तर माझ्या आज्ञेनुसार त्याला तुरुंगात जावे लागेल. (कारण तो एक सेवक आहे आणि मालकिणीची आज्ञा न मानणे हा त्याच्यासाठी गुन्हा आहे)…"

हा युसुफ अ. वर अन्याय झाला होता.

युसुफ अ. यांनी जुलेखा चे ऐकून काही चुकीचे करण्याऐवजी, तुरुंगात जाणे निवडले.. आणि त्यांना (महिलांच्या सांगण्यावरून), तो निरपराधी असताना देखील तुरुंगात टाकले गेले.

युसुफ अ. जेव्हा तुरुंगात होते, त्याच तुरुंगात एक आचारी आणि शाही दरबाराचा एक साकी (मद्य देणारा), त्यांचे सहकारी कैदी होते…

एक दिवस ते युसुफ अ. जवळ आले आणि त्यांना पडलेले स्वप्न त्यांनी वर्णन केले..आचारीला स्वप्न पडले होते की तो एक ब्रेड (भाकरी किंवा पोळी) त्याच्या डोक्यावर घेऊन जात आहे..आणि पक्षी त्यातून ते खात आहेत…साकी ला स्वप्न पडले होते की तो अंगूर पासून वाईन बनवत आहे…

अल्लाहने युसुफ अ. यांना आशीर्वादासह प्रतिभा दिली होती, ज्यामुळे ते स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होते…त्यांच्या सहकारी कैद्यांना ते म्हणाले, "मी तुमच्या स्वप्नांचे अर्थ सांगेन. जे मला अल्लाहने शिकविले आहे, त्यातलाच हा एक भाग आहे…"

मग युसुफ अ. यांनी दोघांना सांगितले की, आचारी ला फाशी दिली जाईल आणि पक्षी त्याचे डोके खातील..आणि साकी कैदेतून मुक्त होईल आणि राजाला दरबारात वाईन देण्यासाठी नियुक्त केला जाईल..युसुफ अ. यांनी साकी ला, जेव्हा तो दरबारात जाईल तेव्हा, त्याच्या विषयी राजाशी बोलण्यास सांगितले…

पण साकी तुरुंगातून सुटल्यानंतर युसुफ अ. यांच्या बद्दल सर्व विसरून गेला..आणि युसुफ अ. तुरुंगात काही अजून वर्ष तसाच राहिले...

एक दिवस राजाला एक स्वप्न पडले…राजाने पाहीले की, सात अशक्त गायी, सात जाड गायींना खात आहेत…त्याने सात कोरडे आणि सात हिरवे मक्याचे कणीस पाहिले…राजाने दरबारातील लोकांना विचारले की, कुणी स्वप्नांचा अर्थ सांगू शकेल का?.. त्यानंतर साकीला, युसुफ अ. आठवले…जे अजूनही तुरुंगात होते...

त्याने राजाची आज्ञा घेतली आणि युसुफ अ. यांना  भेटण्यासाठी गेला… त्याने राजाचे स्वप्न युसुफ अ. यांना सांगितले..

त्याच्यावर राग न करता आणि त्याच्याविषयी राजाशी लवकरच बोलण्यास सांगून, युसुफ अ. यांनी, त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला…"जमिनीत सात वर्ष मकाचे पीक खूप जास्त होईल…त्यामुळे तुम्हाला जेवढे आवश्यक आहे तेवढे खा आणि बाकीचा मका सुरक्षित स्थळी ठेवा..त्यानंतर सात वर्ष खूप भयानक दुष्काळ येईल...त्या वर्षांत पाऊस होणार नाही आणि मका येणार नाही…जे तुम्ही जमा करून ठेवलेले मक्याचे दाणे आहेत, त्यातून खा..त्यानंतर त्यापुढचे वर्ष खूप पाऊस होईल आणि त्यानंतर पिकाची कापणी…." 

जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि तो, त्या व्यक्तीला भेटण्यासाठी इच्छुक झाला, ज्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता…युसुफ अ. यांच्याकडे सैनिकांना पाठविण्यात आले…पण युसुफ अ. यांनी तुरुंग सोडण्यास नकार दिला, कारण त्यांना राजाला जाणीव करून द्यायची होती की, त्यांना अन्यायपूर्वक बंद केले गेले होते… 

त्यामुळे राजाने, त्या महिलांशी योग्य चौकशी करवून घेतली, ज्यांनी मानले की, "युसुफ हा निरागस आणि सदाचारी आहे"…

त्यानंतरच युसुफ अ. तुरुंगातून बाहेर येण्यास तयार झाले...युसुफ अ. यांना सन्मानाने त्या राजाच्या दरबारात नेण्यात आले, जो आधीच युसुफ अ. च्या ज्ञान, हुशारी, निष्ठा, इमानदारी आणि पुण्य या गुणांनी प्रभावित होता…राजाने इच्छा केली की, "युसुफ अ. त्याचा प्रमुख सल्लागार बनावा.."

युसुफ अ. यांनी सुचविले की, त्यांना धान्य साठा करने आणि त्याचे व्यवस्थापन करणे याची जबाबदारी द्यावी…राजा मानला आणि त्याला याचा पूर्ण अधिकार दिला.. अशा प्रकारे अल्लाहने युसुफ अ. यांना त्यांच्या सद्गुणांमुळे, त्यांना दरबारात एक पद आणि स्थान देऊन, बक्षीस दिले, ज्यासाठी ते योग्य होते… 

पुढे येणाऱ्या वर्षांमध्ये, जेव्हा आजूबाजूच्या जमिनीत दुष्काळ (धान्याची कमी) होती, इजिप्त मधील जनतेला खाण्यासाठी अजूनही पुष्कळ अन्न होते..हे सगळे युसुफ अ. यांच्या, देशाच्या खाद्य राखीव संग्रहातील, चांगल्या व्यवस्थापन मुळे होते..शेजारील देशातून लोक अन्नासाठी इजिप्त मध्ये येत होते.. 

युसुफ अ. यांचे भाऊ त्यांना येऊन भेटले का?…युसुफ अ. यांचे  पिता..त्यांना भेटले का?...

सगळीकडे खूप वाईट दुष्काळ पसरला आणि इजिप्त च्या जवळचे आणि दूरचे लोक, इजिप्त मध्ये आले…त्यामध्ये युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ ही " कानान " वरून (त्यांचे गाव, जे सध्या इस्राइल मध्ये आहे) आले होते..

युसुफ अ. यांनी, जरी त्यांच्या भावांना पाहताक्षणी ओळखले होते, तरी त्या भावांनी, त्यांना ओळखले नव्हते…

युसुफ अ. त्यांना म्हणाले, "पुढच्या वेळेस येताना त्यांच्या सर्वात लहान भावाला (बनी अमीन, जो युसुफ अ. चा सख्खा भाऊ होता) घेऊन या...नाहीतर पुढच्या वेळी धान्य मिळणार नाही.."

सगळे भाऊ घरी (कानान) आल्यावर, त्यांच्या वडिलांजवळ ,याकूब अ. जवळ गेले आणि जे काही झाले ते सांगितले..आणि म्हंटले की, "आमच्यासोबत बनी अमीन ला पाठवा…आम्ही वचन देतो की, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि येताना जास्त धान्य आणू..पण याकूब अ., त्यांनी जे युसुफ अ. सोबत केले होते, ते विसरले नव्हते आणि त्यांची बनी अमीनला त्यांच्यासोबत पाठवायची इच्छा नव्हती..

त्यांच्यावर दुसऱ्या वेळेस विश्वास ठेवण्यासाठी ते अजिबात इच्छुक नव्हते…तरीसुद्धा जेव्हा भावांनी जोर दिला आणि अल्लाहची शपथ घेतली की, "ते बनी अमीन ची पूर्ण जबाबदारी घेतील"…याकूब अ. यांनी त्याला जावू दिले…

जेव्हा ते जात होते तेव्हा याकूब अ. यांनी, त्यांना इजिप्त मध्ये प्रवेश करताना शहराच्या वेगवेगळ्या दरवाजाने प्रवेश करायचा सल्ला दिला..

सर्व भाऊ बनी अमीन सोबत इजिप्तकडे निघाले..पूर्ण रस्ता मोठ्या भावांनी बनी अमीन ला टोमणे मारले आणि चिडविले..जेव्हा ते इजिप्तला पोहोचले आणि युसुफ अ. यांच्या जवळ गेले.

युसुफ अ. यांनी, त्यांच्या सख्ख्या भावाला लगेच ओळखले आणि त्याला स्वतःविषयी सांगितले..त्यांनी हे ही सांगितले की, मोठे भाऊ ज्या पद्धतीने वागवीत आहेत, त्याची यापुढे काळजी करायची आवश्यकता नाही…जे अन्न धान्य ते विकत घेण्यासाठी आले होते ते त्यांनी दिले.

पण जाण्याआधी एक चांदीची वाटी युसुफ अ. यांनी बनी अमीन च्या उंटावरच्या पिशवीत ठेवली.. सर्व भाऊ जसे निघणार होते, राजाच्या सेवकांना राजाची चांदीची वाटी हरवल्याचे आढळले…त्यांनी तांडा (उंटांच्या गाड्यांचा समूह) थांबवला आणि त्यांच्या समानांत शोधले.. वाटी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत सापडली…

हा इजिप्तचा कायदा होता की, कोणताही चोर, जिथे त्याने गुन्हा केला, ते शहर सोडून जाऊ शकत नाही…त्यामुळे बनी अमीनला जाण्याची आज्ञा नव्हती…

हेच युसुफ अ. यांना पाहीजे होते…यामुळे युसुफ अ. यांना, त्यांच्या लहान भावाला त्यांच्याजवळ ठेवण्यासाठी निमित्त मिळाले होते…बनी अमीनलाही हे कळले होते…

पण त्याचे मोठे भाऊ अत्यंत चिंता करू लागले..कारण त्यांनी त्यांच्या पित्याला याकूब अ. यांना, बनी अमीनला सुरक्षित वापस आणण्याचे वचन दिले होते…त्यांनी युसुफ अ. कडे विनवणी केली की, "त्याला (बनी अमीनला) जावू द्यावे आणि आमच्या पैकी एकाला त्याच्या जागी ठेवून घ्यावे."…पण युसुफ अ. मानले नाही…

ते म्हणाले, "हे चूक आहे की, ज्याने गुन्हा केला त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणाला ठेवून घ्यावे"…

सर्व भाऊ यावर खूप उदास झाले होते..सर्वात मोठा भाऊ म्हणाला, "मी माझ्या वडिलांना बनी अमीन बद्दल शब्द दिला आहे..मी त्याच्याविना जाणार नाही..जोपर्यंत अल्लाह याविषयी काही ठरवत नाही.."

बाकीचे सर्व भाऊ घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना सगळी कहाणी सांगितली, "तुमचा मुलगा चोर आहे, हे सगळे त्याच्यामुळे घडले…"

याकूब अ. हे विश्वास करण्यासाठी तयार नव्हते. "हे अशक्य आहे..बनी अमीन कधीही चोरी करणार नाही…पण जरी मी त्यासाठी काही करू शकत नसलो तरी मी धीर धरेन आणि तक्रार करणार नाही…"

याकूब अ. यांनी  त्यांचे, दिवस आणि रात्र दुःखात आणि प्रार्थना करण्यात घालविले…ते इतके रडले की, त्यांची दृष्टी गेली..पण त्यांनी धीर सोडला नाही…

त्यांची मुले त्यांच्यावर नाराज झाली. ते म्हणाले, "जर तुम्ही रडणे थांबवले नाही, तर तुम्ही मरून जाल…"

"मी तुम्हाला काहीच म्हणत नाही…मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागत आहे…आणि त्याच्यातर्फेच मदत मिळेल, तुमच्याकडून नाही" युसुफ अ. म्हंटले… 

याकूब अ. यांनी त्यांच्या मुलांना, वापस इजिप्तला जावून युसुफ अ. आणि बनी अमीनला बघून येण्यास सांगितले आणि आशा सोडली नाही…

सर्व भाऊ युसुफ अ. यांच्या जवळ तिसऱ्या वेळेस गेले आणि म्हणाले, "आम्ही वापस आलो, कारण आमची गरज आहे…आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, तरी कृपा करून आम्हाला आमच्या कुटुंबासाठी धान्य द्या. आमच्यावर दया दाखवा..आम्ही तुमचे खरेच खूप आभारी राहू.."

युसुफ अ. यांना, त्यांच्याच कुटुंबाची दशा ऐकून खूप वाईट वाटले..पण त्यांना, त्यांच्याशी केलेल्या त्यांच्या निर्दयीपणाची आठवण करून द्यायची होती. "आठवा, तुम्हाला एक भाऊ होता का…युसुफ?..त्याच्याशी तुम्ही काय केले?"

तेव्हा त्यांना जाणीव झाली की, 'हा चांगला माणूस खरंच त्यांचा भाऊ, युसुफ आहे…ज्याला त्यांनी विहिरीत फेकून दिले होते '….

"तू खरच युसुफ आहे का?" त्यांना विश्वास बसत नव्हता आणि स्वतःची लाज ही वाटत होती…

"हो" युसुफ अ. यांनी उत्तर दिले…

"खरंच आम्ही चुकलो…आम्हाला माफ कर"

युसुफ अ. यांनी त्यांना माफ केले..आणि अल्लाहला प्रार्थना केली की, "त्यांच्यावर कृपा दृष्टी व्हावी"…

मग त्यांनी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला इजिप्तमध्ये आणण्यास सांगितले…युसुफ अ. यांनी त्यांच्या वडिलांसाठी, त्यांचा सदरा दिला आणि म्हटले की, "हा सदरा त्यांच्या डोळ्यावर लावा…आणि त्यांची दृष्टी परत येईल.."

कानान ला तांडा ( उंटाच्या गाड्या) वापस येण्याआधीच याकूब अ. म्हणाले की, "हवेत युसुफच्या असण्याचा आभास होत आहे"..

लोक बोलत राहिले की, "खरंच तुमचे डोके काम करीत नाही…हे कसे शक्य आहे जर युसुफचे काहीच शिल्लक राहिले नाही?"

पण याकूब अ. यांना खात्री होती की, त्यांचा मुलगा जिवंत आहे…

लवकरच त्याची मुले, युसुफ अ. बद्दल चांगली बातमी घेऊन घरी पोहोचली…आणि त्याचा सदरा, त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर ठेवला…याकूब अ. यांना, लगेच दृष्टी वापस मिळाली आणि ते म्हणाले, "मी म्हणालो नव्हतो का की, जे अल्लाहकडून मला कळले, ते तुम्हाला नाही कळले..मी अल्लाहला तुम्हाला माफ करण्यासाठी प्रार्थना करेल…

नंतर पूर्ण कुटुंब इजिप्तला गेले…युसुफ अ. आता इजिप्तचा राजा बनले होते…ते त्यांना घेण्यासाठी शहराच्या गेट पाशी आले.. त्यांनी त्यांच्या पित्याला खूप आदराने आणि सन्मानाने, त्यांच्या दरबारात संरक्षण दिले. जेव्हा युसुफ अ. त्यांच्या सिंहासन वर चढले, तेव्हा त्याच्या कुटुंबासह सर्वांनी त्यांना वाकून प्रणाम केला…

आणि अशा प्रकारे त्यांचे बालपणाचे स्वप्न खरे झाले की, त्यांचे आईवडील आणि अकरा भाऊ, जे स्वप्नात सूर्य, चंद्र आणि तारे होते, ते त्याला वाकून प्रणाम करीत होते…


08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...