याकूब लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
याकूब लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ जून, २०२०

07. युसूफ ची कथा

युसूफ अ. 

याकूब अ.(इस्राइल) हे  खूप अल्लाहनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती होते  आणि अल्लाहचा संदेश पोहोचविणारे होते..त्यांना वेगवेगळ्या पत्नींपासून बारा मुले होती…सगळ्यात लहान मुलगा होता युसुफ अ. आणि बनी अमीन…

याकूब अ. सर्व मुलांमध्ये, त्याच्या सगळ्यात लहान मुलावर युसुफ अ. वर सर्वात जास्त प्रेम करायचे…

एक दिवस बालक युसुफ अ. यांना स्वप्न पडले की सूर्य, चंद्र आणि अकरा तारे त्यांना वाकून प्रणाम करीत आहेत..त्यांनी हे स्वप्न त्यांच्या पित्याला वर्णन केले..त्यांचे पिता त्यांना म्हणाले, की, तू ह्या स्वप्नाबद्दल तुझ्या मोठ्या भावंडांना काहीही सांगू नकोस..कारण त्यांना ईर्ष्या होऊन, ते तुला नुकसान करण्याचा प्रयत्न करतील…त्यांच्या पित्याने हे ही सांगितले की, "युसुफवर अल्लाहचे आशीर्वाद असतील..आणि तो ही अल्लाहचा संदेश सर्वांना पोहोचवेल.."

युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ युसुफ अ. वर खूप जळायचे..कारण त्यांचे वडील याकूब अ., त्यांच्यावर खूप प्रेम करायचे..

एक दिवस ते सर्व भाऊ, त्यांच्या वडिलांजवळ गेले आणि म्हणाले, "आम्ही बाहेर जात आहोत…तुम्ही आमच्यासोबत युसुफला पाठवाल का?..आम्ही त्याची चांगली काळजी घेऊ..तो आमच्यासोबत खाईल, पियील आणि खेळेल… तुम्ही त्याला आमच्यासोबत ठेवण्यासाठी विश्वास करत नाही का?…"

याकुब अ. यांना, त्यांच्या वाईट हेतूची भनक लागली…ते म्हणाले, "मला भीती वाटते की, रस्त्यात लांडगा युसुफवर आक्रमण करेल…"

पण त्या सगळ्या भावांनी त्याला पटवून दिले आणि हमी दिली की, ते त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतील..त्यामुळे भरलेल्या अंतःकरणाने याकूब अ. यांनी, युसुफ अ. यांना त्यांच्यासोबत जाऊ दिले…

जेव्हा ते सर्व जण जंगलात होते, तेव्हा मोठ्या भावांनी लहान युसुफ अ. यांना एका कोरड्या, जुन्या विहिरीत फेकले… 

ते सर्व जण रडत घरी आले आणि त्यांच्या वडिलांना म्हणाले की, लांडग्याने खरेच त्याला खाल्ले..त्यांनी युसुफ अ. यांचा रक्तळलेला कुरता (सदरा) त्यांची कहाणी सिद्धकरण्यासाठी (दाखविण्यासाठी), वापस आणला होता.. 

याकूब अ.यांनी पाहिले की, कुरता (सदरा) अजिबात फाटला नव्हता..त्यांना त्याच वेळी सगळे समजले की नक्की काय घडले असावे ..आणि ते खूप दुखी झाले…

ते म्हणाले, "मला माहित आहे, हे खरे नाही..पण मी काही तक्रार करणार नाही आणि धीर सोडणार नाही..मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागेल.."

लवकरच एक तांडा (राहण्याची व्यवस्था असलेल्या उंटाच्या गाड्या), ज्या इजिप्तकडे जात होत्या, त्या विहिरीजवळून जात असताना पाणीसाठी थांबल्या, ज्यात युसुफ अ. यांना फेकले गेले होते.

 त्या विहिरीत त्यांना युसुफ अ. आढळले..ते लोक त्यांना पाहून खूप आनंदी झाले. त्या दिवसांत गुलामाची (सेवकाची) खरेदी आणि विक्री करणे एक साधारण प्रथा होती..आणि तो ही एक चांगला तरुण युसुफ अ. सारखा मुलगा इजिप्तमध्ये विकून त्यांना एक चांगली रक्कम मिळाली असती.. 

इजिप्तच्या गुलामाच्या बाजारातून, अजीज नावाच्या एका माणसाने, जो एका शाही कुटुंबाचा सदस्य होता आणि सैन्य अधिकारी होता, युसुफ अ. यांना विकत घेतले आणि त्यांना घरी आणले आणि त्याच्या पत्नीला जुलेखाला म्हटले की, "युसुफ ला सन्मानाने वागव..तो आपल्यासाठी चांगले नशीब घेऊन येईल..आणि आपण त्याला एका मुलाप्रमाणे दत्तक घेऊ शकू…" 

युसुफ अ. मोठे होऊन खूपच देखणे तरुण झाले… अजीज त्यांच्यावर खूप दया करायचा. त्यांच्यावर  खूप प्रेम करायचा. घराच्या सर्व आर्थिक कारभाराची जबाबदारी युसुफ अ. यांना दिली होती..अजीजची सुंदर बायको युसुफ अ. यांच्याकडे आकर्षित झाली... 

एक दिवस युसुफ अ. खोलीत एकटे असताना, जुलेखा त्यांना पटवू लागली…युसुफ अ. मानले नाही..ते एक विनम्र आणि अल्लाहला घाबरणारे तरुण होते. त्यांना, त्यांच्या मालकाला, अजीजला अपमानित नव्हते करायचे आणि अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती..

त्यांनी अल्लाहची प्रार्थना केली आणि अल्लाहने त्यांना मदत केली…आणि तेथून निसटून जाणे त्यांना जमले.. 

त्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला.. जूलेखा त्यांच्या मागे पळाली आणि तिने त्याचा कुरता (सदरा) पकडून मागे ओढले..सदरा फाटला.. 

जुलेखाचा पती अजीज आणि जुलेखाचा चुलत भाऊ, जे दाराच्या बाहेर उभे होते त्यांनी दोघांना बाहेर येताना पाहिले...

तिने जे केले त्याची लाज वाटण्याऐवजी, तिने युसुफ अ. यांना दोष दिला, "या माणसाला तुरुंगात पाठविले पाहिजे, मला नुकसान पोहोचविल्याबद्दल" असे तिने तिच्या पतीला सांगितले..

युसुफ अ. यांनी हे अमान्य केले आणि त्यांनी जे काही खरे घडले, ते अजीजला सांगितले…

दोन वेगवेगळे कथन होते…अजीजला कुणावर विश्वास ठेवावा, युसुफ अ. की जुलेखा वर कळत नव्हते..

जुलेखाचा चुलत भाऊ खूप हुशार होता..तो म्हणाला, "जर युसुफ चा सदरा पुढून फाटला असेल तर जुलेखा खरी आहे आणि जर सदरा मागच्या बाजूने फाटला तर, जुलेखा खोटे बोलत आहे आणि युसुफ निरागस आहे.."

युसुफ अ. यांचा शर्ट मागून फाटला होता (कारण जुलेखाने त्याला थांबवण्यासाठी मागून ओढले होते)..यामुळे युसुफ अ. यांनी निरागसता सिद्ध झाली होती… 

अजीजला क्षणात कळाले की काय घडले..त्याने युसुफ अ. यांच्यावर विश्वास केला आणि त्याच्या बायकोला त्याची माफी मागायला सांगितली..अजीज ने युसुफ अ. यांनी माफी मागितली आणि विसरून जायला सांगितले…

पण जुलेखा विसरली नाही…तिला अपमानित झाल्यासारखे वाटले आणि तिची हार झाल्यामुळे तिला राग आला..

हळू हळू बातमी महिलांमध्ये पसरली..आणि त्या गप्पा करू लागल्या की, जुलेखा एका सेवकाच्या प्रेमात पडली.. जेव्हा जुलेखा ने हे ऐकले, तेव्हा तिने सर्व महिलांना, एक मोठ्या आणि छान मेजवानीसाठी तिच्या घरी आमंत्रित केले..

तिला त्यांना दाखवायचे होते, 'युसुफ ज्याच्याकडे ती आकर्षित झाली होती, तो साधारण व्यक्ती नव्हतां..तो विलक्षण देखणा तरुण होता..इतका देखणा की, कोणीही त्याच्याकडे आकर्षित होण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हते …

जेव्हा त्या सगळ्या महिला जेवणासाठी बसल्या, त्यांच्या हातात फळे कापन्यासाठी चाकू दिलेला होता.. जुलेखा ने युसुफ अ. यांना  बोलावले..

जसे युसुफ अ. खोलीत आले…महिला त्याच्या चकाकत्या रूपाकडे पाहतच राहिल्या..आणि त्यांनी फळे कापन्या ऐवजी स्वतःची बोटे कापून घेतली…

त्यानंतर त्यांनी जुलेखाकडे पाहून म्हटले की, "तू खरी आहेस..तो साधारण मनुष्य नाही..तो इतका चांगला दिसतो की, जसा एक स्वर्गदूत…"

जुलेखा त्यांना म्हणाली, "जर त्याने, मी जे सांगितले ते केले नाही, तर माझ्या आज्ञेनुसार त्याला तुरुंगात जावे लागेल. (कारण तो एक सेवक आहे आणि मालकिणीची आज्ञा न मानणे हा त्याच्यासाठी गुन्हा आहे)…"

हा युसुफ अ. वर अन्याय झाला होता.

युसुफ अ. यांनी जुलेखा चे ऐकून काही चुकीचे करण्याऐवजी, तुरुंगात जाणे निवडले.. आणि त्यांना (महिलांच्या सांगण्यावरून), तो निरपराधी असताना देखील तुरुंगात टाकले गेले.

युसुफ अ. जेव्हा तुरुंगात होते, त्याच तुरुंगात एक आचारी आणि शाही दरबाराचा एक साकी (मद्य देणारा), त्यांचे सहकारी कैदी होते…

एक दिवस ते युसुफ अ. जवळ आले आणि त्यांना पडलेले स्वप्न त्यांनी वर्णन केले..आचारीला स्वप्न पडले होते की तो एक ब्रेड (भाकरी किंवा पोळी) त्याच्या डोक्यावर घेऊन जात आहे..आणि पक्षी त्यातून ते खात आहेत…साकी ला स्वप्न पडले होते की तो अंगूर पासून वाईन बनवत आहे…

अल्लाहने युसुफ अ. यांना आशीर्वादासह प्रतिभा दिली होती, ज्यामुळे ते स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होते…त्यांच्या सहकारी कैद्यांना ते म्हणाले, "मी तुमच्या स्वप्नांचे अर्थ सांगेन. जे मला अल्लाहने शिकविले आहे, त्यातलाच हा एक भाग आहे…"

मग युसुफ अ. यांनी दोघांना सांगितले की, आचारी ला फाशी दिली जाईल आणि पक्षी त्याचे डोके खातील..आणि साकी कैदेतून मुक्त होईल आणि राजाला दरबारात वाईन देण्यासाठी नियुक्त केला जाईल..युसुफ अ. यांनी साकी ला, जेव्हा तो दरबारात जाईल तेव्हा, त्याच्या विषयी राजाशी बोलण्यास सांगितले…

पण साकी तुरुंगातून सुटल्यानंतर युसुफ अ. यांच्या बद्दल सर्व विसरून गेला..आणि युसुफ अ. तुरुंगात काही अजून वर्ष तसाच राहिले...

एक दिवस राजाला एक स्वप्न पडले…राजाने पाहीले की, सात अशक्त गायी, सात जाड गायींना खात आहेत…त्याने सात कोरडे आणि सात हिरवे मक्याचे कणीस पाहिले…राजाने दरबारातील लोकांना विचारले की, कुणी स्वप्नांचा अर्थ सांगू शकेल का?.. त्यानंतर साकीला, युसुफ अ. आठवले…जे अजूनही तुरुंगात होते...

त्याने राजाची आज्ञा घेतली आणि युसुफ अ. यांना  भेटण्यासाठी गेला… त्याने राजाचे स्वप्न युसुफ अ. यांना सांगितले..

त्याच्यावर राग न करता आणि त्याच्याविषयी राजाशी लवकरच बोलण्यास सांगून, युसुफ अ. यांनी, त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला…"जमिनीत सात वर्ष मकाचे पीक खूप जास्त होईल…त्यामुळे तुम्हाला जेवढे आवश्यक आहे तेवढे खा आणि बाकीचा मका सुरक्षित स्थळी ठेवा..त्यानंतर सात वर्ष खूप भयानक दुष्काळ येईल...त्या वर्षांत पाऊस होणार नाही आणि मका येणार नाही…जे तुम्ही जमा करून ठेवलेले मक्याचे दाणे आहेत, त्यातून खा..त्यानंतर त्यापुढचे वर्ष खूप पाऊस होईल आणि त्यानंतर पिकाची कापणी…." 

जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि तो, त्या व्यक्तीला भेटण्यासाठी इच्छुक झाला, ज्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता…युसुफ अ. यांच्याकडे सैनिकांना पाठविण्यात आले…पण युसुफ अ. यांनी तुरुंग सोडण्यास नकार दिला, कारण त्यांना राजाला जाणीव करून द्यायची होती की, त्यांना अन्यायपूर्वक बंद केले गेले होते… 

त्यामुळे राजाने, त्या महिलांशी योग्य चौकशी करवून घेतली, ज्यांनी मानले की, "युसुफ हा निरागस आणि सदाचारी आहे"…

त्यानंतरच युसुफ अ. तुरुंगातून बाहेर येण्यास तयार झाले...युसुफ अ. यांना सन्मानाने त्या राजाच्या दरबारात नेण्यात आले, जो आधीच युसुफ अ. च्या ज्ञान, हुशारी, निष्ठा, इमानदारी आणि पुण्य या गुणांनी प्रभावित होता…राजाने इच्छा केली की, "युसुफ अ. त्याचा प्रमुख सल्लागार बनावा.."

युसुफ अ. यांनी सुचविले की, त्यांना धान्य साठा करने आणि त्याचे व्यवस्थापन करणे याची जबाबदारी द्यावी…राजा मानला आणि त्याला याचा पूर्ण अधिकार दिला.. अशा प्रकारे अल्लाहने युसुफ अ. यांना त्यांच्या सद्गुणांमुळे, त्यांना दरबारात एक पद आणि स्थान देऊन, बक्षीस दिले, ज्यासाठी ते योग्य होते… 

पुढे येणाऱ्या वर्षांमध्ये, जेव्हा आजूबाजूच्या जमिनीत दुष्काळ (धान्याची कमी) होती, इजिप्त मधील जनतेला खाण्यासाठी अजूनही पुष्कळ अन्न होते..हे सगळे युसुफ अ. यांच्या, देशाच्या खाद्य राखीव संग्रहातील, चांगल्या व्यवस्थापन मुळे होते..शेजारील देशातून लोक अन्नासाठी इजिप्त मध्ये येत होते.. 

युसुफ अ. यांचे भाऊ त्यांना येऊन भेटले का?…युसुफ अ. यांचे  पिता..त्यांना भेटले का?...

सगळीकडे खूप वाईट दुष्काळ पसरला आणि इजिप्त च्या जवळचे आणि दूरचे लोक, इजिप्त मध्ये आले…त्यामध्ये युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ ही " कानान " वरून (त्यांचे गाव, जे सध्या इस्राइल मध्ये आहे) आले होते..

युसुफ अ. यांनी, जरी त्यांच्या भावांना पाहताक्षणी ओळखले होते, तरी त्या भावांनी, त्यांना ओळखले नव्हते…

युसुफ अ. त्यांना म्हणाले, "पुढच्या वेळेस येताना त्यांच्या सर्वात लहान भावाला (बनी अमीन, जो युसुफ अ. चा सख्खा भाऊ होता) घेऊन या...नाहीतर पुढच्या वेळी धान्य मिळणार नाही.."

सगळे भाऊ घरी (कानान) आल्यावर, त्यांच्या वडिलांजवळ ,याकूब अ. जवळ गेले आणि जे काही झाले ते सांगितले..आणि म्हंटले की, "आमच्यासोबत बनी अमीन ला पाठवा…आम्ही वचन देतो की, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि येताना जास्त धान्य आणू..पण याकूब अ., त्यांनी जे युसुफ अ. सोबत केले होते, ते विसरले नव्हते आणि त्यांची बनी अमीनला त्यांच्यासोबत पाठवायची इच्छा नव्हती..

त्यांच्यावर दुसऱ्या वेळेस विश्वास ठेवण्यासाठी ते अजिबात इच्छुक नव्हते…तरीसुद्धा जेव्हा भावांनी जोर दिला आणि अल्लाहची शपथ घेतली की, "ते बनी अमीन ची पूर्ण जबाबदारी घेतील"…याकूब अ. यांनी त्याला जावू दिले…

जेव्हा ते जात होते तेव्हा याकूब अ. यांनी, त्यांना इजिप्त मध्ये प्रवेश करताना शहराच्या वेगवेगळ्या दरवाजाने प्रवेश करायचा सल्ला दिला..

सर्व भाऊ बनी अमीन सोबत इजिप्तकडे निघाले..पूर्ण रस्ता मोठ्या भावांनी बनी अमीन ला टोमणे मारले आणि चिडविले..जेव्हा ते इजिप्तला पोहोचले आणि युसुफ अ. यांच्या जवळ गेले.

युसुफ अ. यांनी, त्यांच्या सख्ख्या भावाला लगेच ओळखले आणि त्याला स्वतःविषयी सांगितले..त्यांनी हे ही सांगितले की, मोठे भाऊ ज्या पद्धतीने वागवीत आहेत, त्याची यापुढे काळजी करायची आवश्यकता नाही…जे अन्न धान्य ते विकत घेण्यासाठी आले होते ते त्यांनी दिले.

पण जाण्याआधी एक चांदीची वाटी युसुफ अ. यांनी बनी अमीन च्या उंटावरच्या पिशवीत ठेवली.. सर्व भाऊ जसे निघणार होते, राजाच्या सेवकांना राजाची चांदीची वाटी हरवल्याचे आढळले…त्यांनी तांडा (उंटांच्या गाड्यांचा समूह) थांबवला आणि त्यांच्या समानांत शोधले.. वाटी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत सापडली…

हा इजिप्तचा कायदा होता की, कोणताही चोर, जिथे त्याने गुन्हा केला, ते शहर सोडून जाऊ शकत नाही…त्यामुळे बनी अमीनला जाण्याची आज्ञा नव्हती…

हेच युसुफ अ. यांना पाहीजे होते…यामुळे युसुफ अ. यांना, त्यांच्या लहान भावाला त्यांच्याजवळ ठेवण्यासाठी निमित्त मिळाले होते…बनी अमीनलाही हे कळले होते…

पण त्याचे मोठे भाऊ अत्यंत चिंता करू लागले..कारण त्यांनी त्यांच्या पित्याला याकूब अ. यांना, बनी अमीनला सुरक्षित वापस आणण्याचे वचन दिले होते…त्यांनी युसुफ अ. कडे विनवणी केली की, "त्याला (बनी अमीनला) जावू द्यावे आणि आमच्या पैकी एकाला त्याच्या जागी ठेवून घ्यावे."…पण युसुफ अ. मानले नाही…

ते म्हणाले, "हे चूक आहे की, ज्याने गुन्हा केला त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणाला ठेवून घ्यावे"…

सर्व भाऊ यावर खूप उदास झाले होते..सर्वात मोठा भाऊ म्हणाला, "मी माझ्या वडिलांना बनी अमीन बद्दल शब्द दिला आहे..मी त्याच्याविना जाणार नाही..जोपर्यंत अल्लाह याविषयी काही ठरवत नाही.."

बाकीचे सर्व भाऊ घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना सगळी कहाणी सांगितली, "तुमचा मुलगा चोर आहे, हे सगळे त्याच्यामुळे घडले…"

याकूब अ. हे विश्वास करण्यासाठी तयार नव्हते. "हे अशक्य आहे..बनी अमीन कधीही चोरी करणार नाही…पण जरी मी त्यासाठी काही करू शकत नसलो तरी मी धीर धरेन आणि तक्रार करणार नाही…"

याकूब अ. यांनी  त्यांचे, दिवस आणि रात्र दुःखात आणि प्रार्थना करण्यात घालविले…ते इतके रडले की, त्यांची दृष्टी गेली..पण त्यांनी धीर सोडला नाही…

त्यांची मुले त्यांच्यावर नाराज झाली. ते म्हणाले, "जर तुम्ही रडणे थांबवले नाही, तर तुम्ही मरून जाल…"

"मी तुम्हाला काहीच म्हणत नाही…मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागत आहे…आणि त्याच्यातर्फेच मदत मिळेल, तुमच्याकडून नाही" युसुफ अ. म्हंटले… 

याकूब अ. यांनी त्यांच्या मुलांना, वापस इजिप्तला जावून युसुफ अ. आणि बनी अमीनला बघून येण्यास सांगितले आणि आशा सोडली नाही…

सर्व भाऊ युसुफ अ. यांच्या जवळ तिसऱ्या वेळेस गेले आणि म्हणाले, "आम्ही वापस आलो, कारण आमची गरज आहे…आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, तरी कृपा करून आम्हाला आमच्या कुटुंबासाठी धान्य द्या. आमच्यावर दया दाखवा..आम्ही तुमचे खरेच खूप आभारी राहू.."

युसुफ अ. यांना, त्यांच्याच कुटुंबाची दशा ऐकून खूप वाईट वाटले..पण त्यांना, त्यांच्याशी केलेल्या त्यांच्या निर्दयीपणाची आठवण करून द्यायची होती. "आठवा, तुम्हाला एक भाऊ होता का…युसुफ?..त्याच्याशी तुम्ही काय केले?"

तेव्हा त्यांना जाणीव झाली की, 'हा चांगला माणूस खरंच त्यांचा भाऊ, युसुफ आहे…ज्याला त्यांनी विहिरीत फेकून दिले होते '….

"तू खरच युसुफ आहे का?" त्यांना विश्वास बसत नव्हता आणि स्वतःची लाज ही वाटत होती…

"हो" युसुफ अ. यांनी उत्तर दिले…

"खरंच आम्ही चुकलो…आम्हाला माफ कर"

युसुफ अ. यांनी त्यांना माफ केले..आणि अल्लाहला प्रार्थना केली की, "त्यांच्यावर कृपा दृष्टी व्हावी"…

मग त्यांनी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला इजिप्तमध्ये आणण्यास सांगितले…युसुफ अ. यांनी त्यांच्या वडिलांसाठी, त्यांचा सदरा दिला आणि म्हटले की, "हा सदरा त्यांच्या डोळ्यावर लावा…आणि त्यांची दृष्टी परत येईल.."

कानान ला तांडा ( उंटाच्या गाड्या) वापस येण्याआधीच याकूब अ. म्हणाले की, "हवेत युसुफच्या असण्याचा आभास होत आहे"..

लोक बोलत राहिले की, "खरंच तुमचे डोके काम करीत नाही…हे कसे शक्य आहे जर युसुफचे काहीच शिल्लक राहिले नाही?"

पण याकूब अ. यांना खात्री होती की, त्यांचा मुलगा जिवंत आहे…

लवकरच त्याची मुले, युसुफ अ. बद्दल चांगली बातमी घेऊन घरी पोहोचली…आणि त्याचा सदरा, त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर ठेवला…याकूब अ. यांना, लगेच दृष्टी वापस मिळाली आणि ते म्हणाले, "मी म्हणालो नव्हतो का की, जे अल्लाहकडून मला कळले, ते तुम्हाला नाही कळले..मी अल्लाहला तुम्हाला माफ करण्यासाठी प्रार्थना करेल…

नंतर पूर्ण कुटुंब इजिप्तला गेले…युसुफ अ. आता इजिप्तचा राजा बनले होते…ते त्यांना घेण्यासाठी शहराच्या गेट पाशी आले.. त्यांनी त्यांच्या पित्याला खूप आदराने आणि सन्मानाने, त्यांच्या दरबारात संरक्षण दिले. जेव्हा युसुफ अ. त्यांच्या सिंहासन वर चढले, तेव्हा त्याच्या कुटुंबासह सर्वांनी त्यांना वाकून प्रणाम केला…

आणि अशा प्रकारे त्यांचे बालपणाचे स्वप्न खरे झाले की, त्यांचे आईवडील आणि अकरा भाऊ, जे स्वप्नात सूर्य, चंद्र आणि तारे होते, ते त्याला वाकून प्रणाम करीत होते…


08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...