कुराण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुराण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ जून, २०२०

यशायाह (Isaiah)

🍁🍁यशायाह (Isaiah)🍁🍁
राजा "हजकिया" (Hezekiah) (700BC) (साधारणतः 2700वर्षांपूर्वी) जेरुसलेम (जूदा) या राज्यावर राज्य करीत होता. अल्लाहचा चांगला सेवक आणि राजा होता. त्यावेळी 'यशायाह ' हे अल्लाहचे संदेश कर्ता होते. राजा हजकीया, राज्याच्या चांगल्यासाठी, यशायाह,जे काही करण्याचा सल्ला देत होते आणि ज्यावर प्रतिबंध लावत होते, राजा ऐकत होता आणि त्यांचा आज्ञाकारी होता आणि त्यांना सल्ला मागत होता. इस्रायली लोकांमध्ये घडामोडी होत गेल्या आणि प्रकरणांना वेग आला. राज्य एका योग्य राजाच्या हातात होते आणि राज्याची प्रजा त्यांना पसंत करत होती. एक दिवस राजाला एक आजार झाला. त्याचा पायाला संसर्गित जखम झाली. याच काळात त्यांनी एक भयानक बातमी ऐकली. त्यांचा एक सेवक राजवाड्यात पळत आला आणि त्याने ओरडून सांगितले, " ' बेबिलोन ' चा राजा 'सनहेरीब ' (sennacherib) आपल्यावर आक्रमण करण्यास येत आहेत." आणि हे खरे होते. क्रूर आश्शुरी राजा साठ हजार सैन्यासह इस्राइल (जेरुसलेम) कडे येत होता.

बेबिलोन (बाबिली) हे मेसोपोटेमिया मधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते. या शहराची स्थापना 1894 BC मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली होती.(हल्लीच्या इराक, इराण, तुर्कस्तान व सीरिया या देशांचा काही भूभाग प्राचीन काळी ' मेसोपोटेमिया' भूप्रदेश नावाने ओळखला जायचा.)
{बेबिलोन चे अवशेष इराकच्या बेबीलोन प्रांतातील अल हिल्लाह या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात.}

लोक खूप भयभीत झाले.बातमी ऐकून राजा चिंताग्रस्त झाला आणि त्याने यशायाह ला विचारले, "अल्लाह ने सेनेरब आणि त्याच्या सैन्याविषयी तुमच्यावर काय प्रकट केले (सांगितले) आहे".
"अल्लाहने आतापर्यंत मला काहीही नाही सांगितले", त्यांनी उत्तर दिले.
राजा दुःखी होता. कारण तो त्याच्या पायाच्या आजारमुळे लढाई करू शकत नव्हता.
यशायाह प्रार्थना करत होते, तेव्हा अल्लाहने त्यांना एक गुप्त गोष्ट सांगितली. (प्रकट केली)
दुसऱ्या दिवशी यशायाह संदेश घेऊन राजाला भेटावयास आले.
"तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या उत्तराधिकारीची नेमणूक करा .कारण तुमची शेवटची वेळ आलेली आहे."
जेव्हा यशायाहने हे सांगितले, राजा प्रार्थना स्थळाकडे तोंड करून प्रार्थना करू लागला. त्याने गौरवशाली अल्लाहला प्रार्थना केली आणि विनंती केली, रडला.
प्रामाणिक मन, विश्वास आणि संयम ठेवून, सर्वशक्तीशाली आणि उदात्त अल्लाहला रडत आणि विनंती करत, तो म्हणाला" हे प्रभू, माझ्या कर्मांची आठवण ठेव, इस्राइलच्या लोकांसाठी असलेला निर्णय, सगळे तुझ्याकडूनच होते. मी जे करतो, ते तू चांगले जाणतो. माझे सर्व काम आणि माझे खुले आणि गुप्त कार्य तुझ्या समोर आहेत."
जेव्हा अल्लाहने हिजकियाची मनापासून केलेला प्रार्थना ऐकली, तेव्हा अल्लाहला त्याच्यावर दया आली.
त्या रात्री जेव्हा यशायाह प्रार्थना करत होते, अल्लाहने त्यांना राजाला आनंददायक बातमी देण्यास सांगितले की, त्याच्यावर दया झाली आहे. अल्लाह आणखी पंधरा वर्षांसाठी हिजकीयाचे वय वाढवणार आहे. आणि त्यांचा आजार बरा होणार आहे. आणि शत्रू सनहेरीब पासून वाचवनार आहे.

लगेच दुसऱ्या दिवशी यशायह ने राजाला ही चांगली बातमी दिली. जेव्हा राजाने हे ऐकले, तो आनंदी झाला.
दुःख आणि वाईट विचार दूर झाले. त्याने वाकून प्रणाम करून प्रार्थना केली, " हे प्रभू, तू ज्याला इच्छितो त्याला राजा बनवतो आणि ज्याला इच्छितो त्याला सत्तेवरून काढून टाकतो.ज्याला इच्छितो त्याला उन्नत करतो आणि ज्याला इच्छितो त्याची अधोगती करतो. अदृश्य जाणणारा आणि स्पष्ट असणारा. सगळ्यात पहिला आणि शेवटचा. अभिव्यक्त आणि ज्ञात असणारा. तू दया दाखविली आणि अस्वस्थ लोकांच्या प्रार्थनांना उत्तर दिले."
जेव्हा राजाने त्याचे डोके वर केले, अल्लाहने यशायाह ला राजाला आदेश देण्यास सांगितला की, अंजिराचे पाणी काढून त्याच्या जखमेवर लावावे आणि तो बरे होईल.

राजाने अल्लाहच्या आदेशा प्रमाणे पाणी लावले. हा एक चमत्कार होता. त्याचे जखम लगेच भरले. राजा आनंदी होता. त्याने म्हंटले की, ' अल्लाह दया करतो आणि दुःखी लोकांच्या वेदना कमी करतो.

अल्लाहने सनहेरीब च्या सैन्याकडे मृत्यु च्या स्वर्गदुताला पाठविले. सकाळी राजा सनहेरीब ने त्याच्या सैन्याला मृत झालेले पाहिले.अल्लाहने जे वचन दिले होते ते पूर्ण केले. राजा आणि त्याचे पाच सहकारी सोडून कोणीच जिवंत नव्हते.या पाच सहकाऱ्यांमध्ये नबूकदनेस्सर (बूख्त नसर) ही होता.
राजा हजकिया ने त्यांना बेड्या घातल्या आणि त्यांच्या राज्यात वापस नेले. त्यांनी सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, सर्वांना दिसण्यासाठी, दरबाराच्या शिक्षा देण्याच्या जागी ठेवले आणि सत्तर दिवसापर्यंत, द्वेष आणि अपमानित करण्यासाठी कैदेत ठेवले. रोज प्रत्येकाला खाण्यासाठी बारले ची भाकरी देण्यात यायची. सत्तर दिवसानंतर त्यांना राजाने तुरुंगात टाकले.

सत्तर दिवसानंतर अल्लाहने यशायाह ला सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांच्या राज्यात वापस पाठवण्यास सांगितले. जेणेकरून ते त्यांच्या लोकांना सावध करतील, की त्यांच्यासोबत काय घडले. जेव्हा यशायाह ने राजा हजकिया ला या बाबतीत संदेश दिला, तेव्हा राजाने तुरंत त्यांना मुक्त केले.
जेव्हा सनहेरीब त्याच्या लोकांत वापस गेला, त्याने त्याच्या वाजिरांना आणि सल्लागारांना जमा केले आणि सांगितले, की त्यांच्या सैन्याला कसे मारण्यात आले आणि सत्तर दिवस त्यांना त्रास दिला.
तेव्हा धार्मिक लोक आणि जादूगार लोक पुढे आले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला अल्लाह आणि त्यांच्या संदेशकर्त्या विषयी सूचना दिली होती.पण तुम्ही ऐकले नाही. दुसऱ्याने असे म्हंटले, तो एक असा देश आहे ज्याला कोणी मिटवू शकत नाही. त्या देशाला कोणी जिंकू शकत नाही. सनहेरीब आता अल्लाह ला घाबरला होता. त्याने पुन्हा कधी इस्राएलवर आक्रमण करण्याचा विचार केला नाही. त्यानंतर सात वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला.

#कुराणसत्यकथा

कुराण मध्ये यशायाह चे नाव आहे.
यहुदी( ज्यू,हिब्रू) लोक अल्लाह ला याहोदा म्हणतात.आणि ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात.तिन्ही ग्रंथात कुराण,बायबल आणि तोराह( तोरेत) मध्ये जवळजवळ सारख्याच कथा आहेत. संदेशकर्ता ही सारखेच आहेत.पण कुराण च्या आधीचे ग्रंथ काही धार्मिक लोकांकडून बदलण्यात आले.त्यामुळे ते मूळ ग्रंथ नाही.


08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन 

(*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.)

इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्या लोकांना, वंशजाला पसंद करत नव्हते….कारण बनी इस्राइल, एक आणि एक अल्लाह ची उपासना करत होते…

इजिप्तचे लोक आणि सैनिक, बनी इस्राईल वर अन्याय करत होते…त्यांच्याशी वाईट वागत होते…इजिप्तचे लोक, खूप शक्तिशाली होते…त्यामुळे गरीब, अत्याचार होणारे बनी इस्राईल, यांना त्यांच्या क्रूरतेपासून आणि निर्दयतेपासून, खूप कमी संरक्षण मिळायचे…ते त्यांचा आवाज उठवू शकत नव्हते…

त्या काळी, इजिप्तच्या राजाला, फिरौंन (फैरों, pharo) म्हंटले जायचे…

इजिप्त च्या लोकांना ज्योतिष विद्येत, जादू आणि भविष्यकथन यामध्ये खूप विश्वास होता…

एका भविष्य कथन करणाऱ्याने (ज्योतिषी) फिरौंनला सांगितले की एक मुलगा, बनी इस्राईलच्या जमातीत जन्म घेईल, जो त्याचे राज्य कोसळण्यास कारण होईल…

फिरौंन यावर खूप नाराज झाला आणि त्याने आज्ञा दिली की, बनी इस्राईलच्या कोणत्याही कुटुंबात जन्माला येणाऱ्या, प्रत्येक मुलाला जन्मताच मारून टाकावे…

याच काळात, एक मुलगा बनी इस्राइलमध्ये जन्माला आला…त्याची आई खूप घाबरली…तिने त्याचा जन्म गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण जर राजाच्या कोणत्याही सैनिकांनी त्या मुलाला, शोधले तर ते लगेच त्याला मारून टाकतील…

तिने अल्लाहकडे प्रार्थना केली आणि अल्लाहने तिला मार्गदर्शन केले की, एका लाकडाच्या पेटीत त्या बाळाला ठेव आणि ती पेटी नाईल नदीत सोड…तिने अल्लाहवर विश्वास ठेऊन ती आज्ञा पाळली…आणि अल्लाह ने तिला वचन दिले की, तिचा मुलगा सुरक्षित राहील…आणि ती पुन्हा लवकरच त्याच्या जवळ जाईल…

त्यामुळे तिने जेव्हा बाळाला एका लाकडाच्या पेटीत ठेवले आणि नदीच्या पाण्यावर तरंगू दिले, तेव्हा तिने तिच्या मोठ्या मुलीला, मरियमला सांगितले की, त्या पेटीकडे नजर ठेव…

ती पेटी राजवाड्याच्या दिशेने वाहत चालली होती आणि मरियम पेटीच्या मागे मागे नदीच्या काठावरून जात होती…जेव्हा पेटी राजवाड्याच्या जवळून जात होती, काही दरबारातील महिलांनी पाहिले की, ते छान आणि गोंडस बाळ, त्याचा अंगठा चोकत आरामात पेटीत खेळत आहे…त्यांनी ते बाळ राणीकडे आणले, जी फिरौंनची पत्नी होती… आसिया…
आसिया त्या बाळाला पाहून खूप आनंदी झाली कारण तिला स्वतःचे मूल नव्हते…तिने, त्या बाळाला दत्तक घेण्यासाठी, तिच्या पतीची परवानगी मागितली…पण तिच्या पतीला ही कल्पना आवडली नाही…

"हे मूल मला इजा करू शकते, जसे ज्योतिषाने भविष्य कथन केले आहे…" त्याने नकारार्थी उत्तर दिले…
पण आसियाने याचना केली, "या मुलाला मारू नका…तो आपल्यासाठी चांगला ही असू शकेल…"
अनिच्छेने तो मानला…

हे ठरवले गेले की, ते बाळ राजवाड्यात मोठे होईल आणि एक महिला त्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याला दूध पाजण्यासाठी नियुक्त केली जाईल..जी महिला त्या बाळाला दूध देण्यासाठी नियुक्त केली गेली, बाळाने तिच्याकडून दूध घेतले नाही..आणि रडणे चालू ठेवले…मग मरियम (जी त्याची बहीण होती, पण हे कुणालाही माहीत नव्हते…) पुढे आली आणि म्हणाली, मी तुम्हाला एका महिलेविषयी सांगू शकते, जी खूप चांगली आहे आणि या बाळाला दूध पाजू शकते…

मरियमला त्या महिलेला बोलण्यास सांगण्यात आले…ती घरी आली आणि तिच्या आईला तिथे वापस घेऊन गेली…त्या बाळाने, त्याच्या आईच्या हातात गेल्यावर लगेच रडणे थांबवले…आणि दूध घेतले…

प्रत्येक जण आनंदी झाला…आणि त्या आईला, त्या लहान बाळाची देखभाल करण्याचे आणि दूध पाजण्याचे काम देण्यात आले…जो तिचाच मुलगा होता. (पण हे कुणालाही माहीत नव्हते)..

या बाळाचे नाव होते, "मूसा".
मूसा अ., एका राजकुमारासारखा फिरौंनच्या राजवाड्यात मोठा झाला…तो एक बलवान, सद्गुणी आणि योग्य तरुण बनला…पण तो जे अवतीभोवती पाहत होता, ते त्याला आवडत नव्हते…
नेहमी, जेव्हा तो शहरात, त्याच्या लोकांना भेटायला जायचा आणि पहायचा की इजिप्तचे लोक, गरीब लोकांशी निर्दयीतेने आणि क्रूरपणाने वागायचे…, तो त्यांच्या अन्यायाने शिकार झालेल्या लोकांना मदत करायचा…त्याला क्रूरता आवडायची नाही..त्याला खूप राग यायचा जो त्याला स्वतःला सहन होत नव्हता…
एक दिवस एका बलवान इजिप्तच्या माणसाने, एका गरीब व्यक्तीला खूप मारले…त्या माणसाने मदतीसाठी मुसाला बोलावले…मुसा खूप रागावला आणि इजिप्तच्या माणसाला त्याने एक थोबाडीत मारले…इतक्या जोरात मारले की तो माणूस खाली पडला आणि मृत झाला…
आता मुसा, जे झाले त्यामुळे, घाबरला आणि नाराज झाला…त्याला त्या माणसाचा जीव घ्यायचा नव्हता…ते झाले कारण अन्याय पाहून, त्याचा राग अनावर झाला…त्याने अल्लाहची क्षमा याचना केली…
जेव्हा इजिप्तच्या लोकांना कळले की, मुसाने एका माणसाला मारले आहे, फिरौंनच्या लोकांनी त्याला शोध सुरू केला..आणि म्हणून मुसाला इजिप्त सोडावे लागले…तो एका "मदयन" नावाच्या जागी गेला…

जेव्हा तो तेथे आला, त्याने एका विहिरीभोवती खूप लोकं पहिली…ते त्या विहिरीतून पानी काढत होते..आणि त्यांच्या शेळ्यांना आणि मेंढ्यांना देत होते…त्या गर्दीपासून, थोड्याच अंतरावर दोन तरुण मुली, त्यांच्या शेळ्यांसोबत उभ्या होत्या आणि शांततेने, प्रत्येकाची पाळी संपण्याची वाट पाहत होत्या..ज्यामुळे त्यांची पाणी घेण्याची पाळी येईल…
"तुम्ही पण तुमच्या हिश्श्याचे पाणी का नाही घेत?" मुसाने विचारले…
"कारण आम्ही इतके धैर्यवान नाही, आम्हाला प्रत्येकाचे होईपर्यंत वाट पाहावी लागेल…आमचे पिता, इथे स्वतःहून येण्यासाठी, खूप वृद्ध आणि अशक्त आहेत…त्यामुळे आम्हाला वाट पाहावी लागेल" ,त्या म्हणाल्या…

एक शक्तिशाली आणि सभ्य तरुण असल्याने आणि ज्याला न्याय देण्याची खूप चांगली बुध्दी असल्याने, मुसा पुढे झाला त्यांच्यासाठी पाणी काढले आणि त्यांच्या गुरांना दिले….
जेव्हा मुली घरी गेल्या, त्यांनी त्यांच्या पित्याला सांगितले की, कसे एका दयाळू तरुण माणसाने त्यांना मदत केली…त्यांचे पिता एक पवित्र व्यक्ती होते…एक संदेशवाहक होते…"शोएब".
ते त्यांच्या मुलींना म्हणाले की, "वापस जा आणि त्या तरुणाला घेऊन या…"
जेव्हा दोघींमधील एक मुलगी मुसाला बोलावण्यासाठी वापस गेली, तो एका झाडाखाली झोपला होता…थकलेला आणि भुकेला होता..आणि अल्लाहला प्रार्थना करत होता की मदत कर…ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली की, तिचे पिता त्याला भेटण्यासाठी इच्छुक आहेत…
म्हणून मुसा उठला आणि तिच्यासोबत तिच्या घरी गेला…
शोएबने त्याला छान जेवण दिले आणि मग विचारले की, तो कोण आहे… मुसाने त्यांना फिरौंन आणि त्याच्या लोकांचा, गरीब बनी इस्राइलवरच्या अन्यायाची कहाणी सांगितली…आणि त्याच्या स्वतःच्या सुटकेची कहाणी सांगितली..त्या वृद्ध संदेश वाहकाने त्याला म्हंटले की, त्याला काही काळजी करण्याचे कारण नाही..कारण आता तो, एका सुरक्षित जागी, मित्रांत आला आहे…
दोघीपैकी एका मुलीने, तिच्या पित्याला मुसाला एका मेंढपाळच्या कामावर ठेवण्यास सांगितले ..शेळ्यांची देखभाल करण्यासाठी कारण तो बलवान, सद्गुणी आणि प्रामाणिक होता…

म्हणून त्यांचा पिता मुसाला म्हणाला, "जर तू आमच्यासोबत राहिला आणि आठ ते दहा वर्ष आमच्या शेळ्यांची देखभाल केली, तर मी माझ्या मुलीशी तुझे लग्न करून देईन…"

…..मुसा तेथे राहण्यास आणि त्यांच्यासाठी काम करण्यास तयार झाला… तेवढ्या वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, त्याने लग्न करण्याची परवानगी मागितली आणि त्याच्या पत्नीसोबत, त्याच्या गुरांच्या कळपाला घेऊन, त्याने मदयन सोडले…

इजिप्तला जातांना, मुसाने एका टेकडीवर एक प्रकाश पहिला…त्याने त्याच्या पत्नीला जोपर्यंत तो तेथून(टेकडीवरून), काही आग घेऊन येत नाही, तोपर्यंत वाट पाहण्यास सांगितले…त्याने विचार केला की कोणी, जो त्याला रस्ता दाखवण्यास पात्र आहे, तेथे असेन…

त्यामुळे आगीकडे गेला…पण तो काही साधारण प्रकाश नव्हता…तो अल्लाहचा प्रकाश होता…

जसा मुसाजवळ गेला, तो प्रकाश दूर आणि आणखी दूर गेला…तो घाबरला आणि तेथून वापस येण्यासाठी फिरला…पण एका आवाजाने त्याला थांबवले…, "ओ, मुसा..मी तुझा अल्लाह आहे…तुझे पादत्राणे काढ…तू एका पवित्र "तोवा" च्या दरीत उभा आहे…मी तुला माझा संदेशवाहक म्हणून निवडले आहे…त्यामुळे तुला जे सांगितले जाईल, नीट काळजीपूर्वक ऐक…"

अशाप्रकारे अल्लाह मुसाशी बोलला आणि त्याला संदेशवाहक बनविले…मुसा गोंधळलेला होता…अल्लाहने त्याला विचारले की, त्याच्या हातात काय आहे?..
"ती माझी काठी आहे", मुसाने उत्तर दिले….
"खाली टाक", आज्ञा आली…

मुसाने आज्ञा पाळली आणि त्याला आश्चर्य वाटले, ती काठी एक भयंकर साप बनली…
"आता ती काठी उचल आणि घाबरु नको", आज्ञा आली आणि तो साप, पुन्हा काठी बनला…
मग मुसाला आज्ञा देण्यात आली की, त्याचा हाथ, त्याच्या दुसऱ्या भुजेच्या खाली घेऊन जा…आणि बाहेर काढ…
तो हात, त्याच्यावर काही जळण्याचे निशांनांविना चमकू लागला…(मुसा जेव्हा बालक होता तेव्हा त्याचा हात जळला होता…)

हे दोन चमत्कार मुसाला देऊन, अल्लाहने आज्ञा केली की, इजिप्तला वापस जा आणि त्याच्या खऱ्या धर्माची शिकवण, फिरौंनला आणि त्याच्या लोकांना दे. पण मुसाला भीती वाटत होती की, ते त्याला मारून टाकतील कारण त्याने, त्यांच्यामधील एका इजिप्शियनला मारले होते…अल्लाहने त्याला आश्वासनं दिले की ते तसे करणार नाही…

मुसाला त्याचे शब्द बोलतांना अडचण येत होती…तो थोडा तोतरे बोलायचा…म्हणून तो अल्लाहला म्हणाला की, त्याच्या भावाला, हारूनला(aron) सुध्दा, एक संदेशवाहक बनव, त्यामुळे तो मुसाला मदत करेन…

"हे ओझे सहन करण्यासाठी, माझ्या मनाला (हृदयाला) धैर्य दे आणि जे लोक ऐकतील त्यांच्यासाठी, माझे बोलणे स्पष्ट आणि प्रभावात्मक होऊ दे…" मुसाने अल्लाहला प्रार्थना केली…
अल्लाहने त्याला, त्याने जे मागितले सगळे दिले आणि दोघा भावांना, अल्लाहचा संदेश घेऊन, इजिप्तच्या दरबारात जाण्याची आज्ञा केली…
"तुमची शिकवण देतांना दयाळू रहा, कठोर राहू नका"…त्यांना सांगण्यात आले…

अल्लाहच्या मदतीने मुसा बळकट झाला आणि त्याच्या संदेशवाहक भावासोबत, हारून सोबत तो, इजिप्तच्या दरबारात जावून अल्लाहची शिकवण देण्यासाठी निघाला…

🌊मुसा आणि फिरौंन 3🌊
जेव्हा मुसा आणि हारून अल्लाहच्या संदेशाची शिकवण फिरौंन आणि त्याच्या लोकांना देण्यासाठी इजिप्त मध्ये आले, तेव्हा त्यांना दिसले की, बनी इस्राईल दयनीय अवस्थेत जगत आहेत…त्यांना कठोर गुलामी करण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे…

मुसा आणि हारून फिरौंनच्या दरबारात गेले आणि त्यांनी घोषणा केली की, ते त्यांच्या लोकांना, बनी इस्राईलला इजिप्त पासून दूर घेऊन जाण्यासाठी आले आहेत…त्यांच्या बापदादाच्या धरतीवर….

फिरौंनने लोकांना घेऊन जाण्यास नकार दिला आणि म्हंटला, " तू विसरला का, मुसा, की तू माझ्या राजवाड्यात माझ्या मुलासारखा मोठा झाला आहेस? आणि आता तू उपकार विसरून कृतघ्न बनला आहेस…?"

मुसाने उत्तर दिले , " माझ्या अल्लाहने मला मार्गदर्शन केले आहे आणि मला एक संदेशवाहक बनविले आहे…तू मला लहानाचे मोठे केले, या अशा एक मोठ्या उपकारामुळे, मी माझ्या सर्व लोकांना दुःख सहन करायला लावू का ?

फिरौंनने मुसाचे काही ऐकले नाही आणि त्याच्या शिकवणी वर खूप नाराज झाला कारण तो स्वतःला अल्लाह ( ईश्वर) समजत होता…

"तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, मुसा? कोण आहे तुझा अल्लाह?" त्याने विचारले…

"माझा अल्लाह हा, तो आहे …ज्याने हे विश्व बनविले…त्याला भूतकाळाविषयी पूर्ण ज्ञान आहे…त्याने ही धरती, तुझ्या त्यावर चालण्यासाठी बनविली आणि तोच पाऊस खाली पाठवतो.." मुसा उत्तरला…

"हा हा…", फिरौंन हसला…" , मला माहित आहे की माझ्याशिवाय कोणीच ईश्वर नाही…" मग तो त्याच्या मंत्र्यांकडे वळला आणि म्हणाला, " हमाम, खूप उंच इमारत बनली का? जेणेकरून मी त्याच्या शिखरावर चढू शकेल आणि मुसाच्या अल्लाहला भेटेन…, नक्कीच तो खोटे बोलत आहे…

पण त्याच्या मनात फिरौंनला खात्री नव्हती…त्याने मुसाला घाबरवन्याचा प्रयत्न केला…
"मी तुला तुरुंगात टाकेल , मुसा,जर तू म्हणाला की माझ्याशिवाय दुसरा कोणी ईश्वर आहे"..तो म्हणाला. "जर तो बरोबर आहे, तर तू मला काही स्पष्ट निशाण सिध्द करण्यासाठी दाखविले पाहिजे… "

मुसा तयार झाला…अल्लाह ने त्याला दोन चमत्कार दाखविण्याची शक्ती सोबत आशीर्वाद दिला..त्याने त्याची काठी खाली फेकली आणि ती एका सापात बदलली…मग त्याने त्याचा हाथ त्याच्या काखेत नेला आणि बाहेर काढला…तो प्रखरतेने चमकू लागला…यावर दरबारातील लोक म्हणाले, "हा माणूस नक्कीच जादूगार आहे.."

फिरौंनने इजिप्तच्या सगळ्या हुशार जादूगारांना, त्यांची जादू मुसाला दाखविण्यासाठी बोलावले…

एक दिवस आणि वेळ स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आली आणि हे मान्य करण्यात आले की जो स्पर्धेत जिंकेल, तो योग्य आहे, असे मानण्यात येईल…त्या काळी जादूचे खेळ इजिप्त मध्ये खूप प्रसिद्ध होते…त्यामुळे सर्व शहरातून लोक हे पाहण्यासाठी आले…

मुसाने स्पर्धा ठेवण्यासाठी ,फिरौंनचे मन बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, "आम्ही जादूगार नाही, आम्ही अल्लाहचे संदेशवाहक आहोत. अल्लाहवर शंका करू नको..तो तुझा नाश करू शकतो…"

पण फिरौंनने निश्चय केला होता की स्पर्धा ठेवायची…कारण तो त्याच्या जादू गारांवर अगदीं खात्री बाळगून होता…

शेवटी मुसा मानला…," ठीक आहे, हे प्रत्येकाला सत्य काय आहे ते सिद्ध करेल…"

जादू गारांनी फिरौंनला विचारले, " जर आम्ही जिंकलो तर तुम्ही पारितोषिक देणार का?"
"नक्कीच", फिरौंन उत्तर ला…"मी तुम्हाला उच्च पद ही देईन".

"कोण सुरू करनार?" जादू गारांनी विचारले.."तू का आम्ही ?"

"तुम्ही" मुसा ने उत्तर दिले…

जादूगारांनी त्यांच्या सळया आणि काठ्या खाली फेकल्या, ज्या सापांमध्ये बदलल्या…काही क्षणासाठी मुसाला चिंता वाटली की, ह्याने ती गर्दी प्रभावित झाली असेल…

पण अल्लाह ने त्याला आधार दिला, " काळजी करू नको, मुसा, तू जिंकशील…तुझी काठी फेक"
मुसाने तसे केले…आणि त्याची काठी एक मोठा सर्प होऊन त्या सापाने त्याच्या आजूबाजूचे सर्व साप गिळून टाकले…प्रत्येक जण आश्चर्य चकित झाला…ह्याने जादूगारांची पराजय सिद्ध झाली.. आणि सत्याचा विजय झाला…ह्याने हेही सिद्ध झाले, की मुसा आणि हारून हे अल्लाहचे खरे संदेशवाहक होते…
जेव्हा जादुगारांना ह्याची जाणीव झाली, ते सगळे गुडघ्यावर पडून वाकून नमन करू लागले…आणि म्हणाले, " आम्ही मूसाच्या अल्लाहवर विश्वास करतो. जो खरोखर विश्वाचा ईश्वर आहे……

फिरौंन यावर संतापला होता आणि ओरडला, " जर तुमचे धैर्य असेल तर तसे करा. मी तुमचा डावा हाथ आणि उजवा पाय कापून टाकेन आणि तुम्हाला झाडांना अटकवेल.."

"तुला जे आनंद देईल ते तू कर," जादूगारांनी उत्तर दिले…,"पण आता आम्ही सत्य निष्ठा स्वीकार केली आहे…आमचा अल्लाह, आमच्या भूतकाळातील जादू दाखविण्याच्या पापासाठी आम्हाला क्षमा करो, जे तू आमच्याकडून जबरदस्तीने करून घेतले…."

थोड्या संख्येने तरुण व्यक्ती, जेव्हा त्यांनी हे घडलेले पाहिले, मुसाच्या धर्माचे अनुयायी बनले…पण ते, त्यांची श्रद्धा उघडपणे जाहीर करण्यास, फिरौंनच्या भीतीमुळे घाबरत होते…

मुसा इजिप्तमध्ये लोकांना उपदेश देत होता…इजिप्त मध्ये एक खूप श्रीमंत माणूस राहत होता "कारून". त्याचा खजिना अगणित होता…त्याने शक्तिशाली माणसे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळण्यासाठी ठेवले होते..ते त्या चाव्यांच्या ओझ्याने पार थकून गेले होते…

मुसा नेहमी रस्त्यात आणि शहराच्या चौकात उपदेश द्यायचा…तो त्याच्या लोकांना आठवण करून द्यायचा की, फक्त एका आणि एकाच अल्लाहची आराधना करा..आणि सांसारिक गोष्टींची काळजी करणे थांबवा…त्याचवेळेस कारून तेथून जात होता…भव्य रुबाबदार अंगरखा घातलेला त्याचा पोषाक होता आणि त्याच्या मागे त्याचे सेवक, जे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळून होते…चालत होते…
त्याच्या संपत्तीचे आणि सामर्थ्याचे , हे प्रदर्शन होते…यामुळे जे तरुण लोक मूसाचे ऐकत होते, त्यांचे ध्यान विचलित झाले…
त्यांच्यातले काही, कारूनच्या अवाढव्य संपत्तीला एक मत्सराने भरलेल्या नजरेने पाहण्यासाठी, अल्लाहच्या संदेशाचे शब्द सोडून, तिकडे वळले…त्यांनी या जीवनंतरच्या स्वर्गाच्या सुखापेक्षा, अशा संपत्तीची इच्छा केली…
या कारूनच्या संपत्तीच्या आणि सामर्थ्याच्या प्रदर्शनाने मुसाचे कार्य अजुन कठीण केले… मुसाने कारूनला म्हंटले, "अल्लाह ने तुझ्यावर कृपा केली आहे आणि तुला इतकी जास्त संपत्ती दिली आहे…तू गरीबांसाठी दयाळू होऊन त्यांना दान केले पाहिजे…"
कारून निर्लज्जपणे फुशारकी मारत म्हणाला, "ही माझी संपत्ती आहे, जी मी माझ्या कौशल्याने आणि बुध्दीने मिळविली आहे…तुझ्या अल्लाहने मला दिली नाही…मी का या संपत्तीला दान देऊ? मी मूर्ख नाही मुसा…"
मुसा खूप नाराज झाला…पण तो काही करू शकत नव्हता…कारून त्याची संपत्ती गरिबांना आणि गरजूंना वाटू इच्छित नव्हता…तो स्वार्थी आणि हट्टी होता…आणि असे मानत होता की, त्याची संपत्ती त्याच्या कष्टांचे फळ आहे…आणि अल्लाहची कृपा नाही…
अल्लाह त्यांना देतो, जो त्याला आनंदी ठेवतो..(गरिबांना दान करून) आणि त्यांच्याकडून घेतो, जो त्याला नाराज करतो…लवकरच लोकांना कळाले की , स्वर्गाचा आणि धरतीचा भव्य खजिना कोण नियंत्रित करतो…
अल्लाहने कारूनला जे पुष्कळ दिले होते, ते त्याच्याकडून घेतले….फुशारकी मारणारा कारून बुडाला…आणि जमिनीत त्याच्या खजिन्याच्या सोबत नष्ट झाला… त्याचा पैसा त्याच्या किंवा कुणाच्याही, काही कामी आला नाही…
जेव्हा लोकांनी त्याचे भाग्य पाहिले, त्यांना जाणीव झाली की मुसा बरोबर होता पण तो गर्विष्ठ आणि फुशारकी मारणारा विनाशक होता….(तो कसा बुडाला हे पुढील भागात)

कुराणसत्यकथा

🌊मुसा आणि फिरौंन-4🌊
"फिरौंनला घाबरु नका", मुसा त्याच्या लोकांना म्हणाला. " अल्लाह वर निष्ठा ठेवा आणि त्याला मदत मागा…"
मुसा त्याच्या लोकांना इजिप्तपासून त्यांच्या बापदादांच्या (युसुफ आणि याकूब) जमिनीवर घेऊन जाण्यास इच्छुक होता…पण ते इजिप्शियनचे नोकर(गुलाम) होते, त्यामुळे जाऊ शकत नव्हते…
मुसाने त्याच्याकडून जितके होऊ शकते तितके त्यांना मदत केली आणि मार्ग दर्शन केले…

जेव्हा फिरौंनला मुसाचा हेतू समजला, त्याने मुसाला आणि तरुण बनी इस्राईलचे लोक, जे मुसाच्या धर्माचे अनुयायी बनले होते, त्यांना मारण्याचा निर्णय घेतला…पण त्याच्या दरबारातील एका दरबाऱ्याला ,जो गुप्तपणे मुसाच्या धर्माचा अनुयायी बनला होता, त्याने फिरौंनला तसे करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला.
"तुम्ही त्याला का मारू इच्छिता?" त्याने विचारले.."फक्त यासाठी का? की, तो असे मानतो की, तुम्ही त्याचे ईश्वर नाही…"

मग तो धैर्याने बोलला आणि लोकांना त्या शिक्षेची आठवण करून दिली , जी, त्या लोकांवर येणार आहे, ज्यांनी पूर्वी खऱ्या ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे…

या त्याच्याविरोधात खुल्या बंडाने, फिरौंन खूप रागावला आणि त्या माणसाला सुद्धा, मारण्याची धमकी दिली…

जेव्हा फिरौंनच्या क्रौर्यतेने सगळ्या मर्यादा पार केल्या..,अल्लाह ने मुसा आणि त्याच्या लोकांना आज्ञा केली की, रात्री शांततेने इजिप्त सोडून जा…त्यामुळे मुसा,हारून आणि बनी इस्राईल चे लोक शांततेने "काणान" (आताचे पॅलेस्टाईन किंवा फिलिस्तिन) कडे निघाले…जी त्यांच्या बापदादांची जमीन होती…

इजिप्त पासून खूप दूरचा रस्ता होता आणि रस्त्यात नदी होती…(काही म्हणतात तो समुद्र होता).त्यांना दुसऱ्या काठावर जाण्यासाठी, ती नदी पार करायची होती…पण ते तसे करू शकण्याआधी, फिरौंनने शोधून काढले की, त्यांनी सुटका करून घेतली आहे…

तो मोठ्या सैन्यासह तो त्यांच्या मागे गेला…बनी इस्राईल चे लोक, भयंकर घाबरले आणि मुसाकडे वळून म्हणाले, "आता, आपण पकडले गेलो…"
"नाही, कधीही नाही," मुसाने उत्तर दिले.."अल्लाह आपल्या सोबत आहे. तो आपल्याला मार्ग दाखवेल…"

या अशा असहाय्यतेच्या वेळी, जेव्हा फिरौंनचे सैन्य मागे होते आणि खोल पाणी समोर होते, त्यांना अल्लाहशिवाय कोणीच मदत करू शकत नव्हते…आणि अल्लाह ने केली.
अल्लाह ने मुसाला आज्ञा केली की, त्याच्या काठीने पाण्यावर वार कर…त्याने तसे केले आणि लोकांना त्यामधून चालण्यासाठी, मधला कोरडा रस्ता सोडून, पानी विभागले (दोन भाग झाले..) बनी इस्राईलच्या लोकांनी नदी पार केली आणि सुरक्षितपणे दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले…

जेव्हा फिरौंनच्या सैन्याने हे पाहिले, ते पाणी पार करण्यासाठी त्याच रस्त्यावरून धावले, जो एका चमत्काराने निर्माण झाला होता…पण जसे ते मध्यभागी पोहोचले, पाणी मोठ्या लहरींच्या रूपाने, वापस आले आणि पूर्ण सैन्य बुडाले….
फिरौंन मरताना ओरडला, "हो, मी विश्वास करतो, बनी इस्राईल ज्याची निष्ठा करतात, तोच ईश्वर आहे…दुसरा कोणताही नाही…"
आणि अल्लाह म्हणाला, " तर तू शेवटी मला मानले ".पण, खूप उशीर झाला होता …

(फिरौंनचे शरीर अजूनही तसेच आहे…. संग्रहालयात ठेवलेले आहे…ज्या पाण्यात तो बुडाला होता तो रेड सी ( red sea)
आहे असे मानतात…आणि तिथले पाणी हे खूप खारे असल्याने त्याचे शरीर तसेच राहीले..आणि अल्लाहने कुराण मध्ये हे सांगितले आहे की येणाऱ्या पिढ्यांना ते शरीर पाहता यावे आणि त्याला दिलेली शिक्षेची आठवण व्हावी म्हणून ते शरीर तसेच ठेवण्यात येईल….)

नदी पार केल्यानंतर मुसा आणि बनी इस्राइलचे लोक, अशा निर्जन ठिकाणी पोहोचले, जेथे पाणी, झाडे आणि घरे नव्हती….
इस्राइलचे लोक नम्र आणि सौम्य झाले होते…शतकांपासून ते दाबून राहिले होते, त्यामुळे ते धैर्य आणि आत्मविश्वास गमावून बसले होते…
इजिप्तमधून सुटकेनंतर ते थकून गेले होते…ते भुकेले होते आणि घाबरलेले होते…आणि त्यांना मार्गदर्शन, मदत आणि आश्वासनं पाहिजे होते…
मुसा आणि हारून साठी हे एक कठीण काम होते…
मुसा आणि हारूनने त्यांना समजावून सांगितले की, "जर त्यांनी अल्लाहची आज्ञा पाळत राहिले, तर अल्लाह निश्चितपणे त्यांची मदत करेल.. फिरौंनच्या हातून अपमानाच्या जीवनापेक्षा, एक स्वातंत्र्य जीवन आणि सत्य श्रद्धा ही कितीतरी चांगली आहे…"

इतक्या दिवसापासून जे लोक दाबून जीवन जगत होते, त्यांनी त्यांचा आत्मविश्वास आणि काही नवीन करून दाखवायची इच्छा गमावली होती….
त्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केली, "मुसा, तू आम्हाला कोठे आणले आहे? इथे पाणी नाही…आम्ही काय पिणार आहे? तहानेने आम्ही मारून जावू…"
मुसाने अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने त्याला म्हंटले की, त्याची काठी, एका खडकावर मार… मुसाने तसे केले आणि बारा पाण्याचे झरे (प्रवाह), त्या कोरड्या खडकातून वाहू लागले…जेणेकरून तेथे प्रत्येकासाठी पुष्कळ पाणी झाले…

त्यांनी मुसाकडे वळून म्हंटले, "आता आम्हाला पाणी आहे, पण अन्नाविषयी काय? आम्ही भुकेले आहोत…आम्ही काय खाणार? पुन्हा मुसाने अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने उत्तर दिले, "काळजी करू नको मुसा, तुम्हाला अन्न ही मिळून जाईल".
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक झोपेतूनं उठले, त्यांनी झुडूपांवर काही मऊ आणि पांढरे पाहीले…हे "मन्न" होते…एक प्रकारचे अन्न ज्याचा आकाशातून थेंबासारखा पाऊस झाला होता…त्याची चव गोड होती…
दिवसा, जोऱ्याचां वारा आला आणि त्याच्यासोबत एक खूप मोठा क्वेलस (लहान पक्षी) चा कळप उडत आला…आणि जमिनीवर सर्वीकडे बसला…लोकांनी त्यांना हातांनी पकडले आणि जेवणासाठी भाजले…हे "सलवा" होते….
त्या दिवसापासून बनी इस्राइलच्या लोकांना रोज मन्न आणि सलवा भेटू लागले…पण अल्लाहने त्यांना दुसऱ्या दिवसासाठी अन्न जमा करून ठेवण्यास मनाही केली…
अल्लाहने त्यांना अन्न आणि पाणी पुरविल्यावर, लोक पून्हा मुसा कडे येऊन म्हणाले, "आम्हाला येथे घरे ही नाही आणि सावली ही नाही, मुसा…आम्ही उन्हाच्या उष्णतेने मरून जाऊ, असे आम्हाला वाटते…
मुसाने अल्लाहला प्रार्थना केली..अल्लाहने उन्हापासून त्यांच्या रक्षणासाठी भारी ढग पाठविले…

लवकरच त्यांचा त्रास कमी होईल, जेव्हा ते त्यांना वचन दिलेल्या, त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर ( कानान म्हणजेच फिलिस्तीन किंवा palestine) पोहोचतील आणि हे सर्व, एका चांगल्या कारणासाठीच होते की त्यांनी इजिप्त सोडले, हे सर्व त्यांना समजावणे मुसाला कठीण होऊन बसले… मुसाने अल्लाहच्या मदतीने त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या….
त्यांनी आपसांत वाद आणि भांडण सुरू केले…
ते म्हणाले, "मुसा मन्न आणि सलवा पुरेसे नाही…आम्हाला कांदा, लसूण, डाळ आणि हिरव्या भाज्या पाहिजेत…तुझ्या अल्लाहला हे देण्यास सांग"
त्यांच्या कृतघ्नतेने मुसा नाराज झाला आणि म्हणाला, "इतक्या चांगल्या अन्ना ऐवजी तुम्हाला या सामान्य वस्तू पाहिजे का? बरं, मग तुम्ही एका शहरात जा आणि तेथे राहा जेथे तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल…"

लवकरच ते एका शहरा पासून जात असताना त्यांनी पाहिले की , लोक दगडाच्या पुतळ्याची आराधना करत होते….ते मुसा ला म्हणाले की, " मुसा, आमच्यासाठी ही अशी प्रतिमा बनव".
मुसा खूप नाराज झाला आणि त्याला वीट आला," अरेरे…", तो म्हणाला…," तुम्ही खरेच अज्ञानी आहात…तुम्हाला अजूनही तुमच्यासाठी, एकाच आणि खऱ्या अल्लाहच्या ऐवजी, पुतळे(प्रतिमा) पाहिजे का?
बनी इस्राइलच्या लोकांनी आग्रह केला… खूप थोडे होते, जे खरंच अल्लाहवर विश्वास करत होते, ते सोडून बाकी सर्व खरंच अज्ञानी आणि खूप कृतघ्न होते….

अल्लाहने मुसाला वचन दिले होते की, जेव्हा त्याचे लोक इजिप्त सोडतील, त्याला अल्लाहचा कायदा देण्यात येईल…म्हणून इजिप्त सोडल्यानंतर तो "तूर" (माउंट सिनिन) या डोंगरावर प्रार्थनेसाठी गेला….त्याने त्याच्या भावाला हारूनला, "जेव्हा तो दूर असेन तेव्हा, त्याच्या लोकांची काळजी घेण्यास सांगितले…"

तेथे मुसाने अल्लाहला चाळीस दिवस पूर्ण भक्तीने प्रार्थना केली, "हे माझ्या प्रभु….माझ्यासमोर प्रकट हो, जेणेकरून मी तुला पाहू शकेन", त्याने प्रार्थना केली….
आणि अल्लाहने उत्तर दिले, "हे तुझ्यासाठी शक्य नाही, की तू मला प्रत्यक्षपने पाहू शकशील…पण जर तू आग्रह करत असशील तर, त्या टेकडीकडे पाहा….जर मला पाहण्यासाठी, तू ते सहन करू शकला, तर तू पाहू शकतो…".
मुसाने आग्रह केला आणि जेव्हा अल्लाहने त्याची तेजस्विता (प्रकाश,चमक) टेकडीला दाखविली…,ती टेकडी विखरली आणि मुसा बेशुद्ध होऊन खाली पडला…

जेव्हा तो शुध्दीवर आला, म्हणाला, "तुझा गौरव असू दे, हे अल्लाह…मी तुझी क्षमेची याचना करतो आणि मी तो पहिला विश्वास करणारा आहे…"
अल्लाहने मुसाला त्याचा कायदा दिला आणि त्याचा ग्रंथ दिला "तोरैत (तोराह) आणि म्हणाला, " मुसा मी तुझ्याशी संभाषण केले…आणि तुला एक प्रेषित (संदेष्टा) म्हणून निवडले….म्हणून मी जे दिले आहे ते घे आणि कृतज्ञ (आभारी) राहा..ते मजबुतीने पकड…आणि तुझ्या लोकांना त्या खऱ्या श्रध्येचे अनुसरण करावयास सांग…"

जेव्हा मुसा दूर, तूर डोंगरावर होता, त्याच्या लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड केले…
तेथे त्यांच्यामध्ये एक जादूगार होता.. सामरी…

त्याने त्या लोकांकडून सोन्याचे अलंकार जमा केले आणि त्यांना वितळविले….ते पातळ सोने एका साच्यात ओतले आणि एक सोन्याचे बछडे बनविले जे आवाज काढू शकत होते….मग त्याने लोकांना त्याची आराधना करण्यास सांगितले….
जेव्हा मुसा तूर डोंगरावरून वापस आला आणि त्याच्या लोकांना एका सोन्याच्या बछड्याची आराधना करतांना पाहिले…तो उग्र झाला…त्याने त्याच्या भावाला, त्याची दाढी धरून ओढले…आणि म्हणाला," मी तुला सांगितले नव्हते का, की त्यांना मार्ग दर्शन कर आणि माझ्या अनुपस्थितीत त्यांची काळजी घे? तू ते का केले नाही?
हारून म्हणाला, "भाऊ, या लोकांसमोर माझ्यावर रागावू नको…अल्लाहला माहीत आहे, की मी त्यांना म्हंटले होते की, ते जे करत आहेत, ते करू नका…जर मी त्यांच्याशी जास्त कठोर नव्हतो, तर ते केवळ या भीती पायी की ,जेव्हा तू दूर असशील, तेव्हा ते आपसांत भांडतील….आणि तू वापस आल्यावर माझ्यावर रागावशील…"

मुसा त्याच्या लोकांकडे वळला आणि म्हणाला, "माझ्या लोकांनो, तुम्ही हे का केले? तुम्हाला अल्लाहने त्याच्या कृपेचे वचन दिले नव्हते का? मग का तुम्ही एवढ्या लवकर त्याला विसरला? तुम्हाला स्वतःला मारण्यासाठी, अल्लाहचा प्रकोप पाहिजे का? कारण तुम्ही, मला दिलेले तुमचे वचन तोडले…."
त्या सोन्याच्या बछड्याकडे इशारा करत तो म्हणाला," आणि आता पाहा तुमच्या आराध्याकडे…आपण त्याला आगीत वितळवू आणि त्याचे अवशेष समुद्रात टाकू…एक आणि फक्त एक अल्लाहच्या शिवाय दुसरा कोणताही प्रभु नाही…माझ्या लोकांनो, तुम्ही, एक सोन्याचा बछडा तयार करून आणि त्याची आराधना करून, एक अपराध केला आहे… आता खऱ्या अल्लाहकडे वळा, आणि त्याची क्षमा याचना करा…आणि त्याला असे बलिदान द्या की, तो तुमच्यावर दया करो…"

मुसाचे लोक आधी होते तसेच हट्टी होते..त्यांनी, जोपर्यंत ते अल्लाहला त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तोपर्यंत, अल्लाह वर विश्वास ठेवण्यास नकार दिला…मुसाने त्याच्याकडून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला की, ते शक्य नाही, पण त्यांनी आग्रह धरला….

शेवटी, मुसाने, त्यांच्यामधील सत्तर लोकांना निवडले…आणि त्यांना त्याच्यासोबत तूर डोंगरावर घेऊन गेला…,जेथे त्याने अल्लाहशी संभाषण केले होते..पण हेही त्यांना पटवून देण्यात पुरेसे नव्हते…त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी अल्लाहला पाहण्याचा आग्रह धरला…
अल्लाह त्यांच्या हट्टीपणावर रागावला…भयानक वीज चमकली, मेघ गर्जना झाली आणि भूकंप आला…आणि सर्व सत्तर माणसे मृत होऊन खाली पडली…
जेव्हा मुसाने हे पाहीले, त्याने अल्लाहला पूर्ण प्रामाणिक ते ने याचना केली की, त्याच्या लोकांना, त्यांच्या अविश्वासाठी क्षमा कर, "हे माझ्या प्रभु, आमच्यावर दया कर…आम्हाला सर्वांना, काही लोकांच्या मूर्खते मुळे, नष्ट करू नकोस."

अल्लाहने दया दाखविली आणि मृत लोकांना पुन्हा जीवन देऊन, वापस आणले….जेणेकरून ते कृतज्ञ बनतील…ते त्यांचे डोळे चोळत उठले आणि चमत्कार पाहून चकीत झाले…
अल्लाहने म्हंटले, "माझी कृपा त्यांच्यासाठी असेल जे योग्य करतील आणि दान देतील आणि त्यांच्यासाठी असेल जे प्रेषितांना (संदेशवाहक) ज्यांचे नाव त्यांच्या ग्रंथात , इंजिल( बायबल) आणि तोरैत ( तोराह) आहे, अनुसरण करतील…..ते असे असतील, ज्यांची भरभराट होईल…

जेव्हा हे सत्तर लोक, त्यांच्या लोकांकडे वापस गेले, त्यांनी त्यांचा अनुभव वर्णन केला आणि म्हणाले की मुसा खरंच अल्लाहचां एक संदेश वाहक आहे…त्यांनी त्यांना जे सांगितले त्यावरही विश्वास करण्यास सांगितले…पण लोक अजूनही शंका करत होते…आणि ऐकण्यासाठी इच्छुक नव्हते….

मुसाने अल्लाहला प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा अल्लाहने, तूर डोंगर उचलून, त्या लोकांच्या डोक्यावर आणून, त्यांना चमत्कार दाखविला. जेव्हा त्यांनी पाहिले की, तो डोंगर त्यांच्या वर पडणारच आहे, ते घाबरले आणि ओरडले, "आम्ही विश्वास करतो की, मुसा हा अल्लाह चा संदेश वाहक आहे आणि तोरैत हा अल्लाह चा प्रकट झालेला ग्रंथ आहे…..

…मराठीत भाषांतर असलेले कुराण वाचावे…

कुराणसत्यकथा

🟢 मूसा आणि खिझ्र -5🟢
खीझ्र एक ज्ञानी माणूस होता…
जेव्हा मुसाने खिझ्रच्या ज्ञानाविषयी ऐकले, तो एका सहकाऱ्यासोबत त्याला शोधण्यासाठी निघाला….आणि जोपर्यंत त्यांना तो भेटत नाही, तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही असा निर्णय घेतला…

जेव्हा ते एका जागी पोहोचले जेथे दोन पाण्याचे प्रवाह(झरे) एका प्रवाहात एकत्र होऊन वाहत होते…, मुसा खूप थकला आणि एका खडकावर गाढ झोपला…

तेथे, मासा जो त्यांनी त्यांच्या दुपारच्या जेवणासाठी आणला होता, जिवंत झाला आणि त्याने पाण्यात उडी मारली…आणि पोहत एक चंदेरी रेषा बनवत दूर गेला…. मुसाच्या सहकाऱ्याने हे पाहीले पण याबाबत मुसाला सांगण्यास विसरला…त्यामुळे त्यांनी, जोपर्यंत मुसाला भूक लागत नाही आणि तो सहकाऱ्याला मास्या विषयी विचारत नाही, तोपर्यंत, त्यांचा प्रवास चालू ठेवला…

त्यानंतर, सहकाऱ्याने मुसाला जे घडले आहे ते सांगितले…मुसाला त्या क्षणी वाटले की, त्याला खीझ्र कडे जाण्यासाठी, मार्ग दाखविण्यासाठी तो एक संकेत होता….म्हणून तो वापस त्या जागी गेला, जेथे तो गाढ झोपला होता…आणि त्याला एक संतासारखा माणूस त्याच खडकावर बसलेला दिसला…तो खीझ्र होता….

मुसाने त्याला अभिवादन केले आणि म्हंटले, जे अल्लाह खिझ्र च्या द्वारे मुसाला माहीत करवून देणार होते…ते तो जाणण्यासाठी आला आहे…

खिझ्र म्हणाला, अल्लाहने मला त्याच्या काही रहस्याचे ज्ञान दिले आहे….जे तुला माहित नाही…तुला ते विचित्र वाटेल आणि त्यामुळे जेव्हा तू माझ्यासोबत असशील, तेव्हा तुला स्वतःला प्रश्न विचारण्यापासून थांबवणे, हे तुझ्यासाठी अवघड होईल…

पण जेव्हा मुसाने वचन दिले की, तो संयमी राहील. खिझ्र मुसाला त्याच्या सोबत घेऊन जाण्यास आणि शिकण्यास, या अटीवर की तो फक्त लक्ष देऊन पाहिलं आणि कोणतेही प्रश्न विचारणार नाही, तयार झाला…

मुसा खिझ्र सोबत गेला…लवकरच ते एका नदीवर आले आणि खिझ्र ने नदी पार करण्यासाठी, एक नाव भाड्याने घेतली…नावे वरील लोक खिझ्र ला ओळखत होते…आणि त्यांना नदी पार करवून देण्यासाठी, त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही…

जेव्हा ते नदी पार करत होते, खिझ्र ने एक फळी तोडून, नावेत एक छिद्र केले…..हे जास्त विचित्र होते… मुसा यावर नाराज झाला…आणि खिझ्र ला म्हणाला,…"या अशाप्रकारे, त्यांच्या दयाळुते ची तू भरपाई करणार आहे का? तू ते का केले?"

"मी तुला म्हटले नव्हते का, की कोणताही प्रश्न विचारायचा नाही?", खिझ्र बोलला….

त्याच वेळेस एक पक्षी आला आणि नौकेच्या पुढच्या निमुळत्या भागावर बसला आणि एक थेंब पाणी पिला…तिकडे इशारा करून खिझ्र म्हणाला," अल्लाह च्या ज्ञान शी तुलना करतांना, जे एका महासागरा सारखे आहे, आपले ज्ञान त्या एका थेंबासारखे आहे…"

मुसाला त्याची चूक कळली, वचनाची आठवण करून त्याने माफी मागितली, "मी पुढच्या वेळेस जास्त सावध राहील….", तो म्हणाला…..

जेव्हा ते नदीच्या पलीकडे, शहरात पोहोचले आणि ते त्या शहरातून जात असताना, त्यांनी एका मुलाला पाहिले…काहीच खास कारण नसतांना खिझ्र ने त्या मुलाला मारले…..

हे मुसासाठी सहन करने खूप कठीण होते….तो त्याचे वचन विसरला आणि त्याने रागाने विचारले," त्या निरागस मुलाला तू का मारले?"

खिझ्रने काहीच उत्तर दिले नाही….त्याने फक्त मुसाला त्याच्या वाचनाची आठवण करून दिली…आणि म्हणाला," जर तू पुन्हा एकदा तुझे वचन तोडले तर मी तुला सोडून जाईल"

मुसाणें माफी मागितली…आणि वचन दिले की पुन्हा प्रश्न विचारणार नाही…
लवकरच ते दुसऱ्या शहरात पोहोचले जेथे, कुणालाही आश्रय देण्यास नाखूष असे लोकं होते….त्यांनी मुसा आणि खिझ्र, या प्रवाश्यांना कोणतेही अन्न आणि निवारा दिला नाही…
खिझ्र एका भिंतीजवळ आला, जी अगदी कोसळणारच होती… खिझ्र ने ती भिंत, कामाचे काहीही पैसे न घेता दुरुस्त केली….

मुसाला ही निर्दयपनाच्यासाठी दयाळूता कळाली नाही….तो स्वतःला विचारण्यापासून थांबवू शकला नाही, "जर ते लोक आपल्याशी इतके निर्दयी राहिले, तर तू हे का केले? कमीत कमी त्यामुळे काही अन्न विकत घेण्यासाठी, तू काही पैसे घेऊ शकत होता"

"अरेरे", खिझ्र म्हणाला…," तू संयम ठेऊ शकला नाही…आपण वेगळे होण्याची ही वेळ आहे…पण मी तुला सांगतो की मी का केले आणि मी काय केले"
"ती नाव ज्या मध्ये मी छिद्र पाडले, ती गरीब लोकांची होती, ज्यांनी त्यापासून त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह मिळवला… नदीच्या पलीकडे राहणारा राजा खूप क्रूर आहे आणि सगळी चांगली चालणारी नावे जबरदस्तीने घेऊन टाकतो….त्याने ती नाव ही घेतली असती…म्हणून मी त्यात छिद्र पाडले…"
"पण तू त्या मुलाला का मारले?" मुसाने विचारले…

"मी त्याला मारले कारण त्याचे माता पिता खूप साधे आणि सद्गुणी लोक आहेत," खिझ्र म्हणाला," पण तो एक खूप दुष्ट व्यक्ती म्हणून मोठा होणार होता…आणि त्यांचे जीवन दयनीय करणार होता….
यामुळे ते नाराज झाले असतील पण या वेदना आणि दुःख खूप कमी आहे, त्यापेक्षा जेव्हा तो मोठा होऊन एक पापी बनला असता आणि तेव्हा त्यांना जे सहन करावे लागले असते….अल्लाह लवकरच त्यांना दुसरा मुलगा देईल जो त्यांच्या वृधदापकाळात एक आनंद देईल"

"शेवटच्या कृत्य काय होते? तू ती भिंत का नीट केली, त्या लोकांनी आपल्याला इतका निर्दयपना दाखवूनही," मुसा म्हणाला….

"बरं, मी तसे केले कारण त्या भिंतिखाली, दोन अनाथ मुलांच्या मालकीचा खजिना लपलेला आहे…" खिझ्र म्हणाला…," त्यांचे पिता खूप सद्गुणी मनुष्य होते…आणि ही अल्लाह ची ईच्छा आहे की जेव्हा ही मुले मोठी होतील, तेव्हा खजिना शोधून काढतील…"

मुसा समोर हे सर्व स्पष्ट केल्यानंतर खिझ्र म्हणाला," लक्षात घे, मी स्वतःहून काहीही केलेले नाही, ही सर्व अल्लाह ची इच्छा होती…"
मग खिझ्र मुसाला आश्चर्यचकित सोडून निघून गेला…आणि तो या विचारांत हरवून गेला, की अल्लाह च्या रहस्यांविषयी मनुष्याला किती कमी माहीत आहे…खरंच प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि एकट्या अल्लाहला सर्व माहीत आहे…

(Surah Al- Kahf (Chapter 18, verses 60-82).
सुरत 18 अल कहफ: आयत 60-82
मध्ये ही कथा आहे….मराठी भाषांतर असलेले कुराण वाचा…

कुराणसत्यकथा

🍀🌼🌺बनी इस्राइल 6🌺🌼🍀
बनी इस्राइलचे लोक, एक खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले, जे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे (आधीचे कानान(canaan) फिलिस्तीन, palestine) वचन दिले होती…त्याच्या जवळच होते…
मुसाने त्यांना म्हंटले की, त्यांच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा,
मुसाने म्हंटले, की धैर्याने, आणि अल्लाह वरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा…जर असे कराल तर , विजय त्यांचाच होईल, असे आश्वासन दिले…
त्यांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला…मुसा ने बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले…
जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी भयानक कहाण्या सांगितल्या…लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला…
"आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मुसा. तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो…", ते म्हणाले…मुसा काहीच मदत करू शकत नव्हता…
मुसा त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेला होता…त्याने त्याचे उरलेले आयुष्य, त्यांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले… स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात गेली…

🍂🏵️शिस्य🏵️🍂
मुसाच्या मृत्युनंतर त्याचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले…मुसाने आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले…आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले…त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले…आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला…जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत…

शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाह ने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की शहरात विनम्रतेने…अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा…

त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला…त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही…त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली…हे त्यांच्या मर्यादा पेक्षा अती झाले होते…अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला…

💖हरझाकील💖
मुसाचा दुसरा अनुयायी हरझाकील ने सुद्धा बनी इस्राइलच्या लोकांना, अल्लाहने दिलेल्या संदेशाच्या मार्गावर लढत राहण्यास वारंवार प्रेरित केले…
एकदा त्याने खूप अडचणीने आणि एक पूर्ण फौज जमा केली…तो शत्रूवर एक खास आक्रमण करण्याची योजना करून होता…तेव्हा हजारो लोकांनी त्याला एकटे सोडले…ते पळून गेले आणि मरणापासून सुटका करण्यासाठी, एका दरीत लपून बसले… हरझाकिल, या भित्रेपणा आणि त्याला एकटे सोडून जाण्याची कृती वर, इतका निराश झाला आणि दुखावला की त्याने अल्लाह ला प्रार्थना केली…अल्लाह ने त्या पळून गेलेल्या लोकांना कठोर शिक्षा केली….
त्याच दरीत जेथे त्यांनी आश्रय घेतला होता, त्यांच्या वर मृत्यू आला…ते मृत झाले, जेथे ते जिवंत राहण्यासाठी आले होते…
काही दिवसांनंतर जेव्हा हरझाकिल त्या दरीतून गेला आणि त्याने त्या युद्धातून पळून गेलेल्यांचे भाग्य (विधिलिखित) पाहिले, त्याला खूप वाईट वाटले…त्याने पुन्हा अल्लाहची प्रार्थना केली, या वेळेस दयेसाठी प्रार्थना केली…आणि अल्लाहने, जो सर्वांत मोठा क्षमा करणारा आहे, त्यांना त्यांचे जीवन पुन्हा वापस दिले …की ते पुन्हा अल्लाह कडे वळतील आणि कृतज्ञ राहतील…आणि असा गुन्हा, पुन्हा करणार नाही…

🌷शम्मील🌷(samuel)

शामोल हा एक पवित्र व्यक्ती होता…त्यानेही बनी इस्राइल च्या लोकांचे , शत्रूं विरूध्द मार्गदर्शन आणि नेतृत्व केले…अल्लाह ने त्यांना संदेश वाहक बनविले….
जेव्हा शामोल वृद्ध झाला, बनी इस्राइल त्याला म्हणाले, " आम्हाला वाटते तू आम्हाला एक राजा निश्चित करून द्यावा, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि लढाईत आमचे नेतृत्व करण्यासाठी…"
शामोल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून म्हणाला, की ते सर्व खूप ज्ञानी नाहीत पण त्यांनी आग्रह धरला…

पुढील भाग लवकरच…
(आता ही त्या देशांमध्ये जी लढाई चालली आहे…त्याचा इतिहास इथूनच सुरू झालेला आहे…तिकडील लढाईचे वातावरण समजण्यासाठी हा इतिहास समजून घ्यावा लागतो…इस्राइल या देशाचे लोकं हे मूसाचे (a) अनुयायी आहेत…पण मुसा नंतर ईसा(a) आणि मुहम्मद(saw) हे प्रेषित आले, त्यामुळे तिन्ही धर्माच्या लोकांचा एकाच जागेचा इतिहास आहे…)
प्रत्येक कथेत, एका आणि फक्त एकाच अल्लाहवर, परमेश्वरावर आणि परमात्म्यावर विश्वास ठेवण्यास सांगितला आहे…ज्याची प्रतिमा,पुतळा बनूच शकत नाही…कारण तो कसा दिसतो किंवा आहे…हे पाहण्याचे सामर्थ्य मनुष्याच्या डोळ्यांत नाही…कुणीच. त्या सर्व शक्तिमान निर्मात्याला पाहिले नाही…

कुराणसत्यकथा

🍀🌼🌺बनी इस्राइल 6🌺🌼🍀
बनी इस्राइलचे लोक, एक खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले, जे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे (आधीचे कानान(canaan) फिलिस्तीन, palestine) वचन दिले होती…त्याच्या जवळच होते…
मुसाने त्यांना म्हंटले की, त्यांच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा,
मुसाने म्हंटले, की धैर्याने, आणि अल्लाह वरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा…जर असे कराल तर , विजय त्यांचाच होईल, असे आश्वासन दिले…
त्यांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला…मुसा ने बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले…
जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी भयानक कहाण्या सांगितल्या…लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला…
"आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मुसा. तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो…", ते म्हणाले…मुसा काहीच मदत करू शकत नव्हता…
मुसा त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेला होता…त्याने त्याचे उरलेले आयुष्य, त्यांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले… स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात गेली…

🍂🏵️शिस्य🏵️🍂
मुसाच्या मृत्युनंतर त्याचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले…मुसाने आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले…आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले…त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले…आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला…जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत…

शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाह ने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की शहरात विनम्रतेने…अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा…

त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला…त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही…त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली…हे त्यांच्या मर्यादा पेक्षा अती झाले होते…अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला…

💖हरझाकील💖
मुसाचा दुसरा अनुयायी हरझाकील ने सुद्धा बनी इस्राइलच्या लोकांना, अल्लाहने दिलेल्या संदेशाच्या मार्गावर लढत राहण्यास वारंवार प्रेरित केले…
एकदा त्याने खूप अडचणीने आणि एक पूर्ण फौज जमा केली…तो शत्रूवर एक खास आक्रमण करण्याची योजना करून होता…तेव्हा हजारो लोकांनी त्याला एकटे सोडले…ते पळून गेले आणि मरणापासून सुटका करण्यासाठी, एका दरीत लपून बसले… हरझाकिल, या भित्रेपणा आणि त्याला एकटे सोडून जाण्याची कृती वर, इतका निराश झाला आणि दुखावला की त्याने अल्लाह ला प्रार्थना केली…अल्लाह ने त्या पळून गेलेल्या लोकांना कठोर शिक्षा केली….
त्याच दरीत जेथे त्यांनी आश्रय घेतला होता, त्यांच्या वर मृत्यू आला…ते मृत झाले, जेथे ते जिवंत राहण्यासाठी आले होते…
काही दिवसांनंतर जेव्हा हरझाकिल त्या दरीतून गेला आणि त्याने त्या युद्धातून पळून गेलेल्यांचे भाग्य (विधिलिखित) पाहिले, त्याला खूप वाईट वाटले…त्याने पुन्हा अल्लाहची प्रार्थना केली, या वेळेस दयेसाठी प्रार्थना केली…आणि अल्लाहने, जो सर्वांत मोठा क्षमा करणारा आहे, त्यांना त्यांचे जीवन पुन्हा वापस दिले …की ते पुन्हा अल्लाह कडे वळतील आणि कृतज्ञ राहतील…आणि असा गुन्हा, पुन्हा करणार नाही…

🌷शम्मील🌷(samuel)

शामोल हा एक पवित्र व्यक्ती होता…त्यानेही बनी इस्राइल च्या लोकांचे , शत्रूं विरूध्द मार्गदर्शन आणि नेतृत्व केले…अल्लाह ने त्यांना संदेश वाहक बनविले….
जेव्हा शामोल वृद्ध झाला, बनी इस्राइल त्याला म्हणाले, " आम्हाला वाटते तू आम्हाला एक राजा निश्चित करून द्यावा, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि लढाईत आमचे नेतृत्व करण्यासाठी…"
शामोल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून म्हणाला, की ते सर्व खूप ज्ञानी नाहीत पण त्यांनी आग्रह धरला…

पुढील भाग लवकरच…
(आता ही त्या देशांमध्ये जी लढाई चालली आहे…त्याचा इतिहास इथूनच सुरू झालेला आहे…तिकडील लढाईचे वातावरण समजण्यासाठी हा इतिहास समजून घ्यावा लागतो…इस्राइल या देशाचे लोकं हे मूसाचे (a) अनुयायी आहेत…पण मुसा नंतर ईसा(a) आणि मुहम्मद(saw) हे प्रेषित आले, त्यामुळे तिन्ही धर्माच्या लोकांचा एकाच जागेचा इतिहास आहे…)
प्रत्येक कथेत, एका आणि फक्त एकाच अल्लाहवर, परमेश्वरावर आणि परमात्म्यावर विश्वास ठेवण्यास सांगितला आहे…ज्याची प्रतिमा,पुतळा बनूच शकत नाही…कारण तो कसा दिसतो किंवा आहे…हे पाहण्याचे सामर्थ्य मनुष्याच्या डोळ्यांत नाही…कुणीच. त्या सर्व शक्तिमान निर्मात्याला पाहिले नाही…

कुराणसत्यकथा

ताबूतसकिना

❤️💚💕ताबूत सकीना💕💚❤️💚
ताबूत सकीना म्हणजेच The ark of the Covenant.
यामध्ये (पेटीत) मूसा (अ) आणि आणखी दुसऱ्या प्रेषितांचे (संदेश वाहकांचे) काही पवित्र अवशेष होते म्हणजेच आहेत…

लढाई करता वेळेस, बनी इस्राइलचे लोक या पेटीला स्वतःच्या सैन्यासमोर समोर, पुढच्या रांगेत ठेवायचे…आणि अल्लाह त्यांना त्या पेटीच्या उज्ज्वल भविष्य सूचकतेच्या गुणांमुळे, विजय देत असे…

प्रेषितांच्या अवशेषामुळे, ज्यांनी प्रेषित अल्लाहच्या इच्छेने लोकांसमोर संदेशवाहक म्हणून स्वतःला प्रस्तुत केले, पुढे न पाहिलेल्या मदतीचे आश्वासन मिळायचे….

"ताबूत सकीना" मध्ये अल्लाहने मुसाला तूर डोंगरावर जो ग्रंथ दिला, तो, एका शुभ दगडाच्या दोन भागावर अंतर्लिखित आहे, त्यात मुसाला दिलेला कायदा म्हणजे नीतिशास्त्र आणि आराधना अंतर्लिखित केला गेला आहे, ज्याला टेन कमांडमेंटस असे म्हणतात, जे तोराह या ग्रंथात आहेत. आणि मूसाची पवित्र काठी आहे…

हा "ताबूत सकीना", जो तिन्ही धर्मात शुभ मानला जातो यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम, हा सध्या कुठे आहे हे कुणालाही माहीत नाही…पण सर्व त्याच्या शोधात आहे…कारण तो कसा आणि केव्हा गायब झाला? याचा इतिहास काय? आणि तो प्राप्त झाल्यावर काय काय या जगात घडणार आहे, याचे प्राचीन पुस्तकांमध्ये जे भाकीत आहे, यांविषयी जे भविष्य वर्तविले आहे त्याविषयी येणाऱ्या लेखांत असेल…(Wikipedia search करू शकता..)

🌿🌿तलुत 🌿🌿

शम्मिल ने अल्लाह ला प्रार्थना केली आणि अल्लाहच्या मदतीने, बनी अमीनच्या जमातीतल्या तलुत ला, एक शक्तिशाली आणि देखण्या तरुण व्यक्तीला, त्यांचा शासक म्हणून नियुक्त केले…
बनी इस्राइलच्या लोकांना हे आवडले नाही कारण तालुत एक गरीब माणूस होता आणि तो त्यांच्या जमातितील नव्हता…त्यांनी त्याचा आदेश पाळण्यास नकार दिला….
शम्मील ने त्यांना म्हंटले की, एक शासकाला त्याच्या कुटुंबावरून किंवा जन्मावरून नाही तर, वैयक्तिक गुणांवरून प्रशंसित करायला हवे… तलुत कडे एका चांगल्या राजाचे सर्व गुण आणि ज्ञान आहे, जे त्याला अल्लाह ने दिलेले आहे…

बनी इस्राइलच्या लोकांनी त्यांचा वाद चालू ठेवला..त्यांना काही तरी सत्याचा पुरावा पाहिजे होता की, तलुतला अल्लाह ने नियुक्त केले आहे…

शम्मिल त्यांना म्हंटला की एक पुरावा म्हणून, ते "ताबूत सकीना" ची पेटी पुन्हा वापस मिळवतील..ज्यात मुसा आणि हारूनचे अवशेष आहेत…जे ते गमावून बसले होते…तो म्हणाला की, फरिश्ते (स्वर्गदूत) त्या पेटीला वापस घेऊन येतील…

पॅलेस्टाईन( फिलिस्तिंन) च्या लोकांनी ती पेटी असा विचार करून घेतली होती की, त्या पेटीला व्यवस्थित ठेवतील, हे त्यांच्या साठी दुर्भाग्य ठरले..त्यांनी त्या पेटीपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला…यासाठी ते दोन गायींच्या मागे गेले, ज्या त्यांना बनी इस्राइल च्या लोकांपर्यंत घेऊन आल्या आणि ते तेथे त्या पेटीला सोडून गेले…

त्यामुळे बनी इस्राइल च्या लोकांना त्यांची पेटी शाबूत वापस मिळाली…या पुरव्यानंतर त्यांना तलुत ला राजा म्हणून स्वीकार करावे लागले…


ज्यू लोक (यहुदी/जुदाइजम/Judaism/Hebrew/इब्रानी) हे इस्राईलचे लोक आहेत…ते मूसा अ.(Moses/मोशे) यांना अल्लाहचे संदेशवाहक मानतात…

[याकूब अ. (ज्यांना "इस्राईल" ही म्हंटले जाते), याकूब अ. यांचे पुत्र... युसुफ अ. आणि युसुफ अ. यांचे अकरा भाऊ इजिप्त (मिस्र) मध्ये स्थायिक झाले…आणि फक्त एकाच अल्लाहची (ज्याला ते यहोवा/ yahweh म्हणत होते) शिकवण देत राहिले…त्यांना "बनी इसराईल" म्हणजेच इस्राईलची (याकूब अ. यांची) संतान म्हंटले जात होते…ते ज्या जागेतून इजिप्तमध्ये आले होते, ती जागा म्हणजे जुने "कानान"(फिलिस्तीन/palestine) हे सध्या इस्राइल या देशामध्ये आहे. मुहम्मद स. अ. व. येण्याआधी हे पूर्वीचे लोक अल्लाह ला यहोवा (yahweh) असे म्हणून संबोधित करत होते. कुराण मध्ये वारंवार "बनी इस्राईल" ला अल्लाह ने संबोधित केले आहे.)] 

कुराणसत्यकथा


अय्युब चा संयम

💞💞अय्युब चा संयम 💞💞
दीर्घकाळाच्या आणि वेदनादायक आजाराने अय्युबला अशक्त आणि अवतीभोवती फिरण्यास असमर्थ बनविले होते. तो वर्षांपासून एक असहाय्य आजारी बनून राहिला होता. त्याच्या जागी दुसरा व्यक्ती असता तर, त्याचे धैर्य खचले असते आणि अल्लाहची निष्ठा हरवली असती आणि वेदनेने तो ओरडला असता. त्याने अल्लाहला असे दुःख आणि अस्वस्थता देण्याविषयी, ज्यात त्याचा स्वतःचा काही दोष नाही, तक्रार केली असती. पण अय्युबने संयमानेे आणि अल्लाहच्या निष्ठेत कणखर राहून त्रास सहन केला. त्याने त्याच्या दुःखाविषयी कधीही तक्रार केली नाही.
लोकांनी त्याला भेटण्यास येणे बंद केले आणि त्याला मरण्यासाठी सोडून दिले. फक्त त्याच्या पत्नीने त्याची सेवा केली आणि त्याला प्रवृत्त केले.आणि एकदा तीही एका क्षणासाठी खूप त्रासाने आणि खिन्नतेने, असंयमित झाली आणि तिने अल्लाहला तक्रार केली. यामुळे अय्युब खूप दुखवला. तो, ज्याने , ज्याने एक शब्द ही न उच्चारता, इतक्या दिवसापासून इतका जास्त त्रास सहन केला होता, अल्लाहचे आभार न मानण्याची वृत्ती सहन करू शकला नाही. त्याने, तो जेव्हा बरे होईल, तेव्हा त्याच्या पत्नीला शंभर वेळा मारण्याची शपथ (वचन) घेतली.तो हे कदाचित अशामुळे ही बोलला असेल, कारण तो इतका त्यावेळी असहाय्य होता की, तो किंचाळू शकत नव्हता. त्याचा राग कोणत्याही तऱ्हेने व्यक्त करू शकत नव्हता.
एक पूर्ण असहाय्यतेच्या दशेत, अय्युबने अल्लाहला प्रार्थना केली, की त्याच्यावर दया होवू दे आणि या वेदनेतून त्याची सुटका कर. अल्लाहने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याच्यावर कृपा केली. अल्लाहने आदेश दिला की, जेथे तो झोपलेला आहे, तेथे त्याचा पाय जमिनीवर आपट. अय्युबने आदेश पाळला आणि जेव्हा त्याने असे केले, ताजे पाणी तेथपासून उसळून वाहू लागले.अल्लाहने त्याला म्हंटले की, पाणी पी आणि त्यात स्नान कर. एक वेल त्यात वाढला आणि जेथे तो आराम करत होता तेथे त्याला सावली दिली.
अय्युब अल्लाहच्या कृपेने बरा झाला, पण जेव्हा त्याला आठवले की, त्याने बरे झाल्यानंतर, त्याच्या पत्नीला मारण्याची शपथ घेतली होती, तो अस्वस्थ आणि दुःखी झाला. एकीकडे त्याने अल्लाहचे नाव घेऊन केलेले वचन होते आणि दुसरीकडे त्याची पत्नी होती, जिला तो प्रेम करत होता. तो त्याचे वचन तोडू शकत नव्हता, पण त्याच्या पत्नीला मारहाण करण्याचा विचार त्याला नाखूष करत होता.या अवघड प्रसंगातून बाहेर येण्यासाठी अल्लाहने त्याच्या सद्गुणी संदेशवाहकाची मदत केली.त्याने आज्ञा केली की शंभर गवताच्या काड्या जमा कर आणि त्याने त्याच्या पत्नीला एकदाच मार. अशाप्रकारे तो त्याचे वचन ठेऊ शकला आणि त्याच्या पत्नीला वेदना झाली नाही.
अल्लाहने त्याच्या कृपेने अय्युबला बरे केले, त्याच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्याला एकत्र केले आणि त्याला पुष्कळ संपत्ती आणि सुख दिले.
अय्युबच्या प्रार्थनेने खूप व्यक्तींना समाधान मिळते, जेव्हा तो निराशेच्या काळात ती प्रार्थना करतो.
#अय्युबचाकुराणसंदर्भ #इस्लाम #मुस्लिम #मुसलमन #कुराण #एकेश्वर #ईश्वर

#कुराणसत्यकथा


इस्लाम आणि कुराण चा इतिहास…

🌿इस्लाम आणि कुराण चा इतिहास…🌿
अल्लाहने लाखो प्रेषित (संदेष्टा, अल्लाह चा संदेश मनुष्या पर्यंत पोहोचविणारा) पाठविले…जे प्रत्येक जातीत एकाच परमात्म्याची,अल्लाहची आराधना करण्यास सांगायचे….

कुराणमध्ये पंचवीस प्रेषित( संदेष्टा, अल्लाह चा संदेश मनुष्या पर्यंत पोहोचविणारा) नाव आहे…कुराण, बायबल आणि तोराह या ग्रंथांत सारखाच इतिहास आहे…

वर्ष आणि संदेशवाहकांचे नाव..आणि स्थान
खालीलप्रमाणे….

  1. आदम (4000 Before Christ) - (हव्वा,हाबील आणि काबील )(श्रीलंका, सौदी अरब)
    यांना सहीफा म्हणजे छोटा ग्रंथ दिला..
    "शीस" यांनाही छोटा ग्रंथ दिला गेला…
  2. इद्रीस
  3. नुह (3761 BC)(तूर्क)
  4. हुद (3000 BC)(सौदीअरब)
    *उजैर
  5. सालेह (2520 BC) (सौदी अरब)
  6. लुत(सौदी अरब)(2000BC)(इजिप्त,सौदी अरब)
  7. इब्राहीम (2000 BC )(इराक, फिलीस्तीन,इजिप्त,सौदी अरब ) यांना सहिफा म्हणजे छोटा ग्रंथ दिला…
  8. इस्माईल (2000BC) (सौदी अरब)
  9. इसाक (2000BC)
  10. याकूब (इस्राईल,इजिप्त)
  11. युसुफ (इस्राईल, इजिप्त)
  12. शुएब
  13. अय्युब
  14. मुसा (1817 BC) (इजिप्त, इस्राईल) यांना "Torah म्हणजेच तौरेत" हा ग्रंथ
    देण्यात आला….
  15. हारून (1817BC) इजिप्त ,इस्राईल
    *खिझ्र
  16. धुल किफ्ल
  17. दाऊद (इस्राईल)(1000 BC) यांना "जबूर" हा ग्रंथ देण्यात आला..
  18. सुलैमान (इस्राईल)(1000BC)
  19. इलियास
  20. अलयशा
  21. युनूस
  22. जकरिया
  23. याहया
  24. ईसा( येशू) (6-4 BC ) (इस्राईल) यांना "बायबल म्हणजेच इन्जील" हा ग्रंथ देण्यात आला...
  25. मुहम्मद (570 AD) (सौदी अरब) यांना "कुराण" हा ग्रंथ देण्यात आला… 2020 AD- सध्याचे वर्ष येशू ख्रिस्त म्हणजेच ईसा मसिह हे जेव्हा या जगातून गेले.(त्यांना वर उचलण्यात आले आणि ते पुन्हा जमिनीवर येणार यांच्याविषयी सविस्तर पुढच्या लेखात) तेव्हापासून ची तारीख 01.01.0001
    अशी धरण्यात आल्यावर त्या आधीचा जो इतिहास आहे त्याला BC म्हणजे Before Christ म्हणजे येशू ख्रिस्त पूर्वीचा काळ असे म्हणतात…आणि त्यानंतरचा काळ याला AD म्हणजे Anno Domini म्हणजे येशू ख्रिस्त नंतरचा काळ असे म्हणतात….

BC म्हणजे Before Christ….
AD म्हणजे Anno Domini

मुसलमान विषयी मूळ माहिती

🌴💕बिस्मिल्ला हिर्रहमान निर्रहिम 💕🌴मनुष्याचा धर्म कोणता?

'इस्लाम'

धर्मानुसार मनुष्य कोण आहे?

' मुसलमान '

इस्लाम काय शिकवतो?

'अल्लाह एक आहे.तोच आराधनेच्या आणि उपासनेच्या योग्यतेचा आहे '

अल्लाहचा पहिला संदेशवाहक कोण होता?

"आदम अलैहिस्सलाम"

शेवटचा संदेशवाहक कोण आहे?

"मुहम्मद सल्ललाहु अलैही वस्सलम" अल्लाह चे शेवटचे संदेशवाहक आहेत..

यांचा जन्म कुठे झाला?

' मक्का '

यांचे इंतेकाल ( निधन) कुठे झाले?

' मदिना '

मक्का शहर कोणत्या देशात आहे?

'सौदी अरब'

तेथील भाषा कोणती आहे?

' अरबी '

अल्लाह चा किताब ( ग्रंथ) कोणता?

" कुरआन शरीफ "

हा किताब ( ग्रंथ) कुठे संदेश वाहका वर प्रकट झाले?

काही मक्का आणि काही मदिना मध्ये (सौदी अरब या देशातील ही दोन शहरे आहेत)

इस्लाम चा कलिमा कोणता? ( अव्वल (पहिला) कलमा तय्यब )

"ला इलाहा इल्लल्लाहू मुहम्मदूर्रसुलुल्लाह"

शहादत चा कलमा काय आहे?(दोम (दुसरा) कलमा)

" अशहादु अल्लाह इलाह इल्ललाहु व अशहादु अन्ना मुहम्मदन अब्दुहू व रसूलुह"

महम्मद (स. अ. व.) कोण होते?
ते अल्लाहचे(परमात्म्याचे) शेवटचे "संदेशवाहक" होते...आपण त्यांचे अनुयायी आहोत...

ते कुठे जन्मले?
सौदी अरब मध्ये "मक्का" या शहरात ते जन्मले...

त्यांच्या पित्याचे आणि आजोबांचे नाव काय आहे?
त्यांच्या पित्याचे नाव "अब्दुल्लाह" आणि आजोबांचे नाव "अब्दुल मुत्तलिब" होते...

ते जीवनभर कोठे राहिले?
53 वर्ष वयापर्यंत ते मक्का येथे राहिले...त्यानंतर ते मदिना येथे स्थलांतरित झाले...आणि दहा वर्ष तेथे राहिले..आणि वयानुसार 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले...

हे कसे समजले की ते संदेशवाहक आहेत?
त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या...अशा गोष्टी दाखवल्या आणि सांगितल्या जो कोणी मनुष्य सांगू अथवा दाखवू शकत नाही...

हे कसे कळले की कुराण अल्लाहचा(परमात्म्याचा) ग्रंथ आहे?

कुराण मुहम्मद( स अ व) यांच्याकडे एक फरिश्ता(स्वर्गदूत) घेऊन यायचा आणि ऐकवायचा...आणि ते वाक्य मुहम्मद (स अ व) यांना पाठ होऊन जायचे...

कुराण किती दिवसात त्यांच्यावर उतरला?

कुराण थोडा थोडा उतरला..कधी एक आयत ( वाक्य) ,कधी दोन चार आयते (वाक्य), कधी एक सुरत(धडा).
पूर्ण तेवीस वर्षांत कुराण उतरला...

अल्लाह चे किती ग्रंथ आहेत?

खूप किताब म्हणजेच ग्रंथ उतरले...मुख्य चार आहेत...
1. तोरेत- ही मुसा अलै. यांच्यावर उतरली...
2. जबुर- ही दाऊद अलै. यांच्यावर उतरली...
3.इंजील(बाइबल)- ही ईसा अलै. यांच्यावर उतरली...
4. कुराण - ही मुहम्मद (स अ व) वर उतरली...

पुढच्या भागात "कयामत" विषयी वाचा....फॉलो करा आणि शेअर करा लाईक करा...

11


फरिश्ते

⭐फरिश्ते⭐फरिश्ते( ज्यांना मलाइका आणि मराठीत स्वर्गदूत म्हणतात. इंग्लिश मध्ये angel) ते कोण आहेत?

फरिश्ते अल्लाहने (ईश्वराने) प्रकाशापासून बनविले आहेत.आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत.ते ना स्त्रिया आहेत ना पुरुष.ते अल्लाहची (ईश्वराची) प्रत्येक गोष्ट ऐकतात...जे काम त्याने सांगितले ते काम करत राहतात...

फरिश्ते किती आहेत?

ते एकदा अल्लाह च्या शिवाय कोणालाच माहीत नाही...पण खूप आहेत...त्यांना पंख आहेत...

त्यात चार फरिश्ते मुख्य आणि प्रसिध्द आहेत...

1) ह. जिब्राईल अलै. जे अल्लाह चे (ईश्वराचे) ग्रंथ आणि आज्ञा संदेशवाहकांपर्यंत आणत होते...हाच फरिश्ता मुहम्मद स. अ. व. यांना कुराण चे वाक्य (आयत) आणि सुरत ( धडा) ऐकवून जात होते...आणि मुहम्मद स. अ. व. ते पाठ करत होते...

2) ह. इसराफिल अलै. जे कयामत (प्रलय म्हणजे जग संपण्याच्या दिवशी) आल्यावर शंख फुंकतील..

3) ह. मिकाईंल अलै. जे पाऊसाची व्यवस्था आणि प्रत्येक जीवाला रोजचा दाना पोहोचविण्याचे काम करत आहेत...

4) ह. इजराईल अलै.जे प्रत्येक जीवाला त्यातील आत्मा काढून मृत्यू देतात...

माणसाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन फरिश्ते असतात, किरामन आणि कातीबिन जे प्रत्येकाच्या खांद्यावर असतात...म्हणूनच नमाज मध्ये दोन्हीकडे तोंड करून सलाम केला जातो...उजव्या बाजूचा फरिश्ता आपल्या चांगल्या कामाची( कर्माची) यादी लिहितो..आणि डाव्या बाजूचा फरिश्ता आपल्या वाईट कामाची( कर्माची ) यादी लिहितो...

जेव्हा आपण वॉश रूम मध्ये जातो तेव्हा हे फरिश्ते आत येत नाहीत...बाहेरच थांबतात..बाकी प्रत्येक वेळेस सोबत असतात...

जेव्हा माणूस मृत्यू पावतो, तेव्हा कब्र मध्ये दोन फरिश्ते, मुनकिर आणि नकीर त्याला तीन प्रश्न विचारण्यास येतात...

त्यांचे तीन प्रश्न असतात...

  1. तुमचा अल्लाह(ईश्वर,God) कोण आहे?
  2. तुमचा धर्म कोणता?
  3. मुहम्मद स. अ. व. यांच्याविषयी तुम्ही काय जाणता?

मलिक हा फरिश्ता जहन्नुम (नरक) ची देखरेख करतो आणि रिदवान जन्नत (स्वर्ग)ची देखरेख करतो...ते संरक्षक आहेत...

🌊️कयामत🌊
कयामत (प्रलय) (महाविनाश) चा दिवस कशाला म्हणतात?
-जेव्हा सर्व जिवंत मनुष्य आणि इतर जीव मरून जातील आणि पूर्ण जग मिटून जाईल....पर्वत कापसाच्या गोळ्यासारखे उडत फिरतील...तारे खाली पडतील.म्हणजेच प्रत्येक वस्तू तुटून मिटून (नष्ट) जाईल...या दिवसाला "कयामत" चा दिवस म्हणतात...

सर्व मनुष्य आणि जीव कसे मरतील?

-इस्राफिल नावाचा फरिश्ता ( स्वर्गदूत) आधी सुर(शंख) फुंकेल...त्याची आवाज इतकी भयानक आणि कठोर असेल की त्या धक्क्याने सर्व मरून जातील आणि प्रत्येक वस्तू तुटून मिटून जाईल...

कयामात कधी येईल?

-कयामात येण्याची ठीक वेळ अल्लाहच्या व्यतिरिक्त कुणालाच माहीत नाही...
पण तो दिवस शुक्रवार असणार आहे आणि मुहर्रम (मुस्लिम महिना) ची दिनांक 10 असणार आहे.... अजून काही निशान्या आहेत...ज्यामुळे कयामात येणार आहे हे कळून जाईल..

खालील निशाण्या आहेत...
1. जेव्हा अपराध जगात जास्त होतील..
2. लोक आईवडिलांची ऐकणार नाहीत...आणि त्यांच्यावर अन्याय करतील...
3. संपत्ती आणि पैशांची रक्कम यामध्ये फसवेगिरी होईल...
4. गाणे, वाजवणे आणि नाच चे प्रदर्शन आणि मजा, जास्त होईल...
5. येणारी पिढी , मागच्या पिढीला वाईट म्हणेल...
6.कमी जाणणारे आणि काहीच न जाणणारे लोक मालक बनतील..
7.कमी योग्यतेचे लोकं, मोठी उंच इमारत बनवतील...
8. अशे लोक ज्यांची योग्यता नाही, त्यांना मोठी मोठी पदे मिळतील...

तर कयामात आली आहे असे समजावे..

मेल्यानंतर जिवंत होणे म्हणजे काय आहे?

-कयामात मध्ये सर्व वस्तू आणि जीव नष्ट होतील...मग इस्राफिल पुन्हा एकदा सुर (शंख) फुंकतील...
यावेळेस सर्व मनुष्य जिवंत होतील.. "हश्र"च्या मैदानावर अल्लाहच्या समोर सर्व जमा होतील.. पेशी होईल...हिशोब होईल...चांगले आणि वाईट काम(कर्म) यांचा मोबदला दिला जाईल...

🌴🌐चमत्कार(मोजजे,miracles)�🌐🌴

हे फक्त प्रेषित म्हणजेच संदेशवाहक किंवा संदेष्टा करू शकत होते...ते असे अल्लाह (ईश्वराच्या) च्या मदतीने करत होते...नेहमीच्या सवयी पेक्षा विरूद्ध गोष्ट, अद्भुत वाटणारी घटना, ज्यामुळे ते पाहून, जगातील लोक आणखी जवळ येतात आणि लोकांना कळते, की ते प्रेषित व्यक्ती अल्लाह (ईश्वराने) ने पाठविलेले आहेत...

🍀🍀जिन्न...🍀🍀

अल्लाहने (परमात्म्याने), त्याने बनविलेल्या जिवांमध्ये जिन्न आणि मनुष्य जातीला त्याची आराधना, उपासना करण्याचा आदेश दिला आहे...

जिन्न परमात्म्याने बनविलेला एक जीव आहे...जो आगीने (अंगारांनी) बनलेला आहे...जिन्न चे शरीर आपल्याला दिसत नाहीत...पण ते जेव्हा कोणत्या तरी माणसाच्या किंवा प्राण्याच्या शरीरात असतात, तेव्हा दिसतात...त्यांना स्वतःचे रूप बदलून प्राण्याच्या किंवा माणसाच्या शरीरात जाण्याची शक्ती परमात्म्याने दिली आहे...त्यांच्यात पुरुष ही आहेत आणि स्त्रियाही...आणि त्यांची मुलेही होतात...
दोन प्रकारचे जिन्न आहेत...चांगले जिन्न आणि वाईट जिन्न....हे जिन्न छिद्रात राहतात...चांगले जिन्न मनुष्या सारखीच अल्लाहची ( ईश्वराची) आराधना करतात...आणि ग्रंथातील मजकूर ऐकण्याचा प्रयत्न करतात...

वाईट जिन्न माणसाला आराधना करू देत नाहीत...आणि वाईट मार्ग दाखवतात...वाईट सवय लावतात..हे सगळे वाईट जिन्न, इब्लिस म्हणजेच शैतांन (evil) या जिन्नचे मित्र आहेत, कारण ईबलिस ने मनुष्य जातीचे लक्ष विचलित करता यावे आणि त्याला वाईट मार्गात अडकवता यावे, यासाठी मुदत मागितली होती...
जे मनुष्य अल्लाह ची ( एकाच परमात्म्याची) आराधना करतात आणि मनापासून श्रद्धा करतात आणि त्याच्या कृपेसाठी प्रार्थना करतात, ते अल्लाहच्या (परमात्म्याच्या ) मदतीने वाईट गोष्टींना परावृत्त करतात...

🍂🍂नशीब....🍂🍂

प्रत्येक गोष्ट आणि चांगले, वाईट यासाठी परमात्म्याने एक अंदाज (तर्क, अनुमान) निश्चित केला आहे...प्रत्येक गोष्ट जेव्हा बनते किंवा जीव जन्मतो, त्याच्या आधी परमात्मा त्याला जाणतो...त्याच्या या ज्ञानाला आणि अंदाजाला (तर्काला,अनुमानाला) नशीब म्हणतात...

🍁🍁🍁प्रोफेट( प्रेषित, संदेष्टा, मनुष्यापर्यंत परमात्म्याचा संदेश पोहोचविणारा)....🍁🍁🍁

जो मनुष्य अल्लाहची (परमात्म्याची) सेवा करतो,आदर करतो...त्याचा आदेश सर्व माणसांपर्यंत पोहचवितो...खरे बोलतो आणि असतो....खोटे बोलत नाही...आणि ज्याला फक्त आणि फक्त या कामांसाठी अल्लाह निवडतो...त्यांना प्रोफेट म्हणजेच प्रेषित म्हणतात... प्रत्येक जातीत प्रेषित येऊन गेले....ज्यांनी एका आणि फक्त एका परमात्म्याला प्रार्थना करण्यासाठी उपदेश केला.... लाखो संदेश वाहक धरतीवर आले..त्यांनी एकाच ईश्वराला माना हाच संदेश दिला... भारतात ही असा संदेश देणारे संदेश वाहक नक्कीच आले असतील...कारण परमेश्वर हिशोब करण्याच्या दिवशी विचारणार आहे, की मी तुझ्याकडे संदेश देण्यासाठी .... ला पाठविले होते, तू ऐकले का? कुराणमध्ये पंचवीस संदेश वाहकांचे नाव आहे...


08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...