अल्लाह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अल्लाह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १४ मे, २०२१

दाऊद सुलेमान अ. भाग 5

🌴🌴🌴पॅलेस्टाईन (फलस्तीन) आणि इस्राईल मधील इतिहास...कुरआनमधील सत्य बोधकथांच्या च्या आधारे...🌴🌴🌴

ही सत्य कथा इस्राइल या देशातली 3000 वर्षांपूर्वीची म्हणजेच 1000 BC ची आहे..

प्रोफेट मूसा (Moses) यांच्यानंतर

मूसा अ. यांचे अनुयायी आणि बनी इस्राईल चे लोक, यांनी त्यांचा एक राजा असावा अशी इच्छा केली. आणि त्यावेळच्या संदेशकर्ताच्या द्वारे  " तालुत " यास राजा बनविले गेले.

बनी इस्राइलचा राजा, “तालुत”, शत्रूंसमोर जाण्याआधी, हे माहीत करू इच्छित होता की, त्याच्या लोकांची अचूक कुवत (सामर्थ्य) किती आहे…त्याला हे माहीत करायचे होते की, त्यांच्यातले किती जन शौर्याने लढणारे आहेत…म्हणून जेव्हा, ते एका झऱ्याजवळ एकत्र आले, तो लोकांना म्हणाला, “तुमची परीक्षा घ्यायची, अल्लाहची इच्छा आहे…

"जो कोणी, त्याची पूर्ण तहान भागविण्यासाठी पाणी पियील, तो आमच्यापैकी नाही…जर तुम्ही खूप तहानलेले असाल, तर फक्त एक घोट घेऊन घसा ओलसर करू शकता…”

जवळ जवळ, सर्व बनी इस्राईलच्या

लोकांनी पूर्ण तहान भागविली आणि म्हणाले, "आमच्यात जालुत सारख्या (शत्रू) मोठ्या शक्तीशाली सैनिकाशी लढण्याचे सामर्थ्य नाही…आम्ही मागे राहू…"

म्हणून काही थोड्याच लोकांनी तालुत चे लक्षपूर्वक ऐकले आणि त्यांनी, त्या वाहत्या झऱ्यातून जास्त पाणी पिले नाही, ते तयार होते आणि तेच लढाईसाठी योग्य होते…

ज्यांनी स्वतःचे धैर्य हरवले होते, त्यांना,

जे अल्लाहचे नाव घेऊन लढण्यासाठी तयार होते, त्यांनी म्हटले,

"तुम्ही का घाबरत आहात? जरी आपण थोडे असलो आणि शत्रू आपल्या संख्येपेक्षा खूप पटीने आणि जास्त मजबूत असला, तरी आपण लढू…

अल्लाहच्या मदतीने, खूप कमकुवत आणि कमी लोकांनी मजबूत शत्रूंविरूध्दची लढाई जिंकली आहे…”

जेव्हा ह्या संख्येने कमी असलेल्या तालुतच्या सैन्याचा, पॅलेस्टाईनच्या              (फिलिस्तीन) सैन्याशी सामना झाला…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांना कणखर आणि शूर राहण्यासाठी मदत कर…

लढाई सुरू झाली…आणि शक्तीशाली पॅलेस्टिनी सैनिक जालुत पुढे आला…त्याने बनी इस्राइल मधील प्रत्येकाला त्याच्याशी लढण्याचे आव्हान केले…तो इतका बलवान होता की, कोणीही पुढे येण्याचे साहस केले नाही..

बनी इस्राइल मध्ये एक दुबळा तरुण होता “दाऊद अ.” जे पुढे चालून संदेश कर्ते बनविले गेले.

जालुत ने केलेला अपमान ते सहन करू शकले नाही..

ते त्यांच्या सैन्यातून, बाहेर आले आणि म्हणाले, ” मी तुझे आव्हान स्वीकारतो..मी तुझ्याशी लढेन…”

जालुत हसला आणि त्याने दाऊद अ. यांची  थट्टा उडविली…पण ते कणखररित्या उभे राहीले…त्यांचा निशाणा खूप चांगला होता…जेव्हा त्यांनी त्यांचा गुल्लेर (गलोल) उचलला आणि तीन दगड जालुतच्या दिशेने भिरकावले…तीन ही दगड, त्या बलवान व्यक्तीला, त्याच्या कपाळावर लागले आणि तो खाली पडला आणि मृत झाला…

यामुळे शत्रुची बाजी त्यांच्यावरच उलटली..जेव्हा पॅलेस्टिनीनी पाहीले, त्यांचा शक्तीशाली माणूस, एका तरुणाकडून मारला गेला…त्या तरुणाची बहादुरी पाहून, शत्रूने धास्ती घेतली आणि त्यांनी धैर्य गमावले आणि पळाले.

कमी संख्या असलेल्या, अल्लाहला घाबरणाऱ्या सैन्याकडून, ज्यांनी अल्लाह (ईश्वर) ची मदत आणि धैर्य मागितले होते, त्यांच्या पेक्षा जास्त पटीने (संख्येने) असणारे शत्रू पराभूत झाले…

बनी इस्राइल विजयी झाले… तेव्हापासून ते लोक तरुण दाऊद अ. यांची, त्यांच्या बहादुरी आणि धैर्यासाठी प्रशंसा करू लागले, त्यांच्यावर प्रेम करू लागले 

आणि त्याचा सन्मान करू लागले…

तालुतचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांनी दाऊद अ. यांना राजा बनविले…

हे थोडे असाधारण होते कारण, बनी इस्राइलच्या जमातीतून साधारणतः संदेशवाहक आणि पवित्र व्यक्ती असायच्या आणि राजा दुसऱ्या जमातीतील असायचा…पण दाऊद अ. हे त्यांच्याच जमातीतील होते….

नंतर अल्लाह (ईश्वर) ने त्यांना एक संदेशकर्ता ही बनविले…त्यामुळे दाऊद अ. दोन्ही होते, एक संदेशकर्ताही आणि राजाही …पण ते असे राजा नव्हते, जे त्यांच्या लोकांच्या (प्रजेच्या, जनतेच्या) पैश्यांवर जीवन जगतात…दाऊद अ. हे एक सदाचारी आणि प्रामाणिक व्यक्ती होते. ते जरी एका अफाट साम्राज्याचे बादशाह होते, तरी त्यांनी राजवाड्याची शाही संपत्ती (खजिना) ला, त्यांच्या वैयक्तिक उपयोग करण्यासाठी कधीच स्पर्श केला नाही.

त्यांनी, लोखंड आणि पोलाद यांपासून विविध वस्तू बनविल्या…आणि त्यावर उदर निर्वाह करून जगले…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांचे श्रम त्यांच्यासाठी सोपे व्हावे…

अल्लाह (ईश्वर) ने, त्याच्या संदेशवाहकाची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्या

हातात (तळहातात) लोखंड नरम होण्याचे सामर्थ्य ,बक्षिसाच्या रुपात दिले…जेणेकरून ते त्यांना आवडेल त्या साच्यात लोखंड बसवू शकतील. म्हणून ते 

त्यांचे चिलखत (लढाईत शरीर रक्षणासाठी घालावयाचे धातूचे कवच) बनवू शकले… लोखंडापासून त्याच्या स्वतःच्या हातांनी, चिलखताचे कवच बनवून ते त्यांचा  उदरनिर्वाह पूर्ण करायचे.

ते चिलखत मजबूत करण्यासाठी, लोखंडाच्या किचकट साखळ्या विणायचे.

हे विकून, अल्लाह (ईश्वर) चा संदेशवाहक आणि बनी इस्राइलचा राजा, दाऊद अ., त्यांच्या उपजिविकेसाठी कमवायचे…
अल्लाह (ईश्वर)ने दाऊद अ. यांना

महान ज्ञान दिले होते आणि निर्णय घेण्याची शक्ती दिली होती. धार्मिकता दिली होती…

त्यांनी त्यांच्या लोकांवर चांगले 

आणि न्यायाने राज्य केले…..

अल्लाह (ईश्वर) ने दाऊद अ. यांना 

त्याचा ग्रंथ दिला “जबुर”.

दाऊद अ. यांचा आवाज खूप सुंदर आणि गोड होता..प्रत्येक सकाळी जेव्हा ते “जबुर” मधून अल्लाह (ईश्वर) च्या प्रशंसेचे वाचन करायचे… त्यांचा गोड आवाज पर्वतांत घुमायचा…पर्वत त्या प्रशंसेच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटवायचे…आणि सर्व पक्षी, त्याच्यासोबत अल्लाह (ईश्वर) ची प्रशंसा करण्यासाठी, त्याच्याभोवती घोळक्याने जमा व्हायचे….त्याचा आवाज इतका नियंत्रित, ओघवता आणि स्पष्ट की, ते त्यांच्या घोड्यावर, खोगीर (saddle)
बसवतांनाा, पूर्ण “जबूर” ग्रंथ 

वाचू शकत होते. (बोलून, पाठांतर करून) 

ज्यात अल्लाह ने वर्णन केलेल्या बोधकथा आणि प्रशंसा होत्या.

पक्ष्यांची भाषा दाऊद अ. यांना समजत होती आणि ते त्यांच्यासोबत बोलू शकत होते…जसे माणसे एकमेकांशी बोलतात….

ते मानायचे की, सगळी पृथ्वी एक अल्लाह (ईश्वर) च्या मालकीची आहे.आणि सदाचारी लोक, हे या जमिनीचे खरे वारसदार आहेत.

एक दिवस दोन माणसे राजा दाऊद अ. कडे आली आणि त्यांनी त्यांच्या

आपसातील वादाचा निर्णय करण्यास 

सांगितले.


एक म्हणाला, "ह्या माणसाने त्याच्या मेंढ्यांच्या कळपाला माझ्या शेतात चरण्यासाठी आणि पीक खाण्यासाठी सोडले, जे पीक कापणीसाठी तयार होते. मी काय केले पाहिजे? मी त्याला न्यायासाठी तुमच्याकडे घेऊन आलो आहे."

दाऊद अ. यांनी सर्व काळजीपूर्वक ऐकले. मग त्यांनी निर्णय घेतला की, पूर्ण वाढ झालेल्या पिकाची किंमत तेवढीच असते जेवढी एका मेढ्यांच्या कळपाची असते. त्यामुळे तो माणूस, ज्याच्या मेंढ्यांनी 

पीक खाल्ले आहे 

त्याने त्याच्या मेंढ्यांचा कळप, शेताच्या मालकाला द्यावा.

दाऊद अ. यांंचा पुत्र सुलेमान अ.

 (जे नंतर संदेश कर्ता बनविले गेले)

 हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होते, ते म्हणाले, “माझ्या पित्याने जे काही म्हंटले आहे, ते बरोबर आहे. पण येथे एक चांगला उपाय असू शकतो. मेंढ्यांच्या मालकाने , त्याच्या मेंढ्या त्या माणसाला द्यायचा, जो शेताचा मालक आहे ,आणि जो मेंढ्याचा मालक होता, तो त्याच्या शेताकडे लक्ष ठेवेल.

शेताचा मालक, मेंढ्यांना ठेऊन घेऊ शकतो आणि त्यांचे दूध आणि लोकर उपयोगात आणू शकतो, जोपर्यंत शेतात पुन्हा पीक परिपक्व होत नाही. त्यानंतर त्याने त्या मेंढ्या, त्याच्या मालकाला परत करायच्या आणि त्याचे शेत वापस घ्यायचे.

दाऊद अ., त्यांचा तरुण पुत्र , त्या वादावर, इतक्या हुशारीने उपायाचा निर्णय घेऊ शकला , म्हणून खूप आनंदी झाले.
सुलेमान अ. मोठा होऊन, त्यांच्या पित्यासारखे उत्तम एक राजा आणि एक संदेश वाहक बनले.

सुलेमान अ. यांना ही पक्ष्यांची भाषा समजत होती आणि ते ही त्याच्या पित्यासारखे ज्ञानी होते.

प्रेषित दाऊद यांचे एक भव्य साम्राज्य होते. त्यांच्या मुलाला ते साम्राज्य , वंश परंपरेने मिळाले होते.


सुलेमान अ. एक  खूप हुशार आणि बुद्धिमान युवक होते. 

आणि ते नेहमी त्यांच्या वडिलांना, त्यांच्या चांगल्या तार्किक बुध्दी आणि ज्ञानाने चकीत करायचे. ते ही त्यांच्या पित्यासारखे खूप धार्मिक वृत्ती, कर्तव्यनिष्ठतेने मोठे झाले होते.आणि अल्लाह (ईश्वर) कडून संदेशकर्ता बनविले गेले होते…

अल्लाहने त्यांना पक्षी आणि प्राणी यांची भाषा समजण्याची प्रतिभा “बक्षीस” म्हणून दिली होती. 

अल्लाहने त्यांना वाऱ्याच्या हालचालीवरचे नियंत्रण ही दिले होते. सुलेमान अ. यांचे साम्राज्य जगातील एक भव्य, संपन्न आणि खूप उत्कृष्ट साम्राज्य होते. जे आधी कुणीही पाहिले नव्हते. त्याच्या प्रजाजनमध्ये फक्त माणसेच नव्हती तर जिन्न (आगीने बनलेले जीव), प्राणी आणि पक्षी ही होते.

सुलेमान अ. वारा नियंत्रित करू शकत होते., त्यामुळे ते स्वतःला त्यांच्या इच्छेप्रमाणे, दूर अंतरावर हवेवर स्वार होवून घेऊ जावू शकत होते.

त्यांच्या पक्षी आणि प्राण्याच्या भाषेच्या ज्ञानामुळे त्यांना खूप दूरच्या आणि विस्तृत जागे विषयी बातमी मिळण्यास मदत मिळायची.

जिन्न हे खूप शक्तीशाली जीव होते.

ते जमिनीत आणि समुद्राच्या, महासागराच्या तळाशी लपलेले अमूल्य खजिने सुलेमान अ. साठी आणायचे आणि त्यांच्या राज्यात, खूप मोठ्या आणि उत्कृष्ट इमारती, बनवायचे.
पवित्र क़ुरआन मध्ये म्हटले गेले आहे की, 

सुलेमान अ. जिन्नांचा श्रमिक म्हणून, मोठ्या इमारती, किल्ले आणि तलाव बांधण्यासाठी, वापर करायचे. शक्तीशाली आणि सहसा कुणाच्या ताब्यात न राहणारे जिन्न, सुलेमान अ. साठी न थकता काम करायचे. 

सुलेमान अ. इमारतींना, किल्ल्यांना सुंदर किमती दगडांनी आणि रत्नांनी सजवायचे. हे सगळे शक्य होते कारण सुलेमान अ. यांनी अल्लाह (ईश्वर, यहोवा) ला प्रार्थना केली होती की, त्यांना एक भव्य साम्राज्य द्यावे आणि म्हणून अल्लाहने अशा धन्यतेची कृपा केली होती.

जेव्हा सुलेमान त्यांच्या राजवाड्यात दरबार 

भरवत होते, तेव्हा जिन्न, प्राणी आणि पक्षी आज्ञाधारक पणे, त्यांच्यासमोर रांगेत उभे राहायचे. जसे दुसरे प्रजाजन उभे राहायचे.अशा प्रकारे अल्लाहने त्याच्या सद्गुणी प्रेषिताला पारितोषिक दिले होते.

एकदा जेव्हा सुलेमान अ. आणि त्यांचे सैन्य प्रवासात होते, 

ते एका दरीत आले, जी पूर्ण मुंग्यांनी भरली होती. जसे ते मुंग्यांच्या जवळ गेले, सुलेमान अ. यांनी ऐकले की, मुंग्यांच्या राजाने त्यांना लवकर त्यांच्या वारुळांत जाण्यास सांगितले, जेणेकरून ते, सुलेमानच्या सैन्याने चिरडले जावू नये. (सुलेमान यांना प्राण्यांची भाषा समजत होती. त्यांना ही समज अल्लाह म्हणजेच ईश्वराकडून देण्यात आली होती.)

सुलेमान अ. हसले., जेव्हा त्यांनी हे ऐकले आणि शक्तिशाली अल्लाहचे आभार मानले, ज्याने त्यांना छोट्या जीवांना समजण्याच्या प्रतिभेचे “बक्षीस” दिले होते, 

ज्यामुळे सुलेमान अ. त्यांच्यावर दया करू शकत होते.

’ताबूत सकीना’ त्यांनी व्यवस्थित राजवाड्यात ठेवला होता.

बादशाह_सुलेमान

🌹🌹🌹सबा ची राणी 🌹🌹🌹
एक दिवस जेव्हा राजा सुलेमान अ. यांनी दरबार भरवला होता, त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या दरबारातील हुदहुुद (हुपू; hoopoe) पक्षी गायब होता.

सुलेमान अ. त्याच्या अनुपस्थितीने नाराज झाले आणि म्हणाले, " हुदहुद कोठे आहे? मला तो तुमच्यामध्ये दिसत नाही. जर अनुपस्थित राहण्याचे एक चांगले कारण नसेल तर, मी त्याला नक्कीच शिक्षा करेन."

ते असे म्हणत असतानाच, हुदहुद उडत आत आला आणि विलंब झाल्याने दिलगिरी व्यक्त केली.

"मी एका शक्तीशाली राज्य "सबा" ची बातमी आणली आहे. त्या राज्यावर एक राणी राज्य करते , जी एका उत्कृष्ट सिंहासनावर विराजमान होते. सबा येथील लोक, खऱ्या अल्लाह (एक ईश्वर) ची उपासना सोडून, सूर्याची उपासना करतात." त्याने राजाला सांगितले.

"तू आमच्याशी खरे बोलत आहे का, हे आम्ही लवकरच माहीत करू," सुलेमान अ. म्हंटले. 

"हे घे, हे पत्र घेऊन सबा ला जा, तेथे ते पोहोचव आणि मग काय घडते ते पाहायची वाट पाहा.
हुदहुद ने सुलेमान अ. यांचे पत्र घेतले आणि सबा ला जाण्यासाठी निघाला. तेथे त्याने राणीच्या समोर ते टाकले आणि शांतपणे काय घडते , ते पाहण्याची वाट पाहू लागला.

राणीने जेव्हा ते पत्र वाचले, तिच्या सल्लागाराला काय करावे असे विचारले. "हे राजा सुलेमान कडून एक पत्र आहे. अल्लाह (ईश्वर) चा योग्य सन्मान करून आणि अल्लाहच्या नावाने सुरू केलेले आहे. त्याने अल्लाह च्या सत्यनिष्ठेला विरोध न करता,  समर्पण करण्यासाठी मला त्याच्याकडे बोलावले आहे."
मग राणीने थोडा वेळ विचार केला आणि सुलेमान अ. साठी काही मौल्यवान भेटवस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला.

पण सुलेमान अ. काही साधारण राजा नव्हते. ते अल्लाहचे (एक ईश्वराचे) संदेश कर्ता (प्रेषित) होते. ते क्रोधित झाले, जेव्हा त्यांनी पाहिले की, राणीने त्यांच्या संदेशाचा कसा अर्थ लावला. 

त्यांनी तिच्या संदेश देणाऱ्याला भेटवस्तू सहित वापस पाठविले आणि त्याला म्हंटले की, "राणीला सांग की, जर अल्लाह (ईश्वर) च्या सत्य निष्ठेकडे बोलवण्याचे उत्तर भेटवस्तू असतील, तर तो सबा ला सैन्यासह येईन."

आता राणी खरच घाबरली आणि तिने तत्काळ स्वतः सुलेमान अ.कडे जाण्याचा निर्णय घेतला.जेव्हा सुलेमान अ. यांना  तिच्या येण्याचा हेतू कळला, 

त्यांनी त्यांच्या दरबाऱ्यांना विचारले, "येथे कोणी आहे का, जो तिचे सिंहासन, ती इथे येण्याआधी आणू शकेल ."

एका जिन्नने उत्तर दिले की, "डोळ्यांची पापणी लवण्याआधी तो ते आणू शकेल." सिंहासन आणण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा तो आणला गेला, सुलेमान अ. यांनी त्याच्यात थोडा बदल केला.

जेव्हा राणी आली, तिला तो सिंहासन दाखविण्यात आला आणि विचारले, "हे तुझे सिंहासन आहे का?" तिने लगेच त्या सिंहासनाला ओळखले, कारण ती खरोखर बुद्धिमान होती, पण तिने तिचे आश्चर्य लपविले आणि म्हणाली, "हे तसेच दिसत आहे".
सुलेमान अ. यांनी तिला त्यानंतर एका सुंदर राजवाड्यात नेले, ज्याची फरशी चकाकणारी होती. तिने फरशीवर पाय ठेवण्यासाठी तिचा घागरावर उचलला. कारण तिला वाटले की, ते पाण्याचे तळे आहे. पण ती खरंच राजवाड्याची फरशी होती ज्याची पारदर्शक (विशेष मौल्यवान काचेने) फरस बंदी केली होती.(आच्छादली होती.) 

अशी त्या राजवाड्याची भव्यता होती.
जे अल्लाह ने सुलेमान अ. यांना बहाल केले होतेे. राणी इतकी प्रभावित झाली की, ती अल्लाह (ईश्वर) च्या सत्यनिष्ठेला शरण गेली.

"मी स्वतःशी चूक केली आहे. आता सुलेमान अ. सह मी या जगाच्या प्रभुला शरण जात आहे."
अशाप्रकारे सुलेमान अ. त्या सुंदर राणीला अल्लाहची शक्ती पटविण्यास सक्षम झाले.

सुलेमान अ. यांच्या पायाशी सर्व मौल्यवान सांसारिक (ऐहिक) खजिने होते. तरीही त्यांची अल्लाहवर असलेल्या श्रध्देत कमी झाली नाही. ही सुद्धा अल्लाह चीच कृपा होती.

ते नेहमी, इतके जास्त देण्यासाठी अल्लाहला आभार मानत राहिले आणि गर्विष्ठ झाले नाही. 

एकदा जेव्हा सुलेमान अ. एका उत्कृष्ट मशिदीच्या बांधकामाची देखरेख करत होते. त्यांच्या मृत्यूची वेळ आली. जेव्हा त्यांना याची जाणीव झाली की, ते मरणार आहे, ते उरलेल्या बांधकामाच्या देखरेखी विषयी चिंताग्रस्त झाले. त्यांना भीती होती की अडेल (बेलगाम, ताब्यात न राहणारे) जिन्न अर्धवट काम सोडून, मोकळे सुटतील.

अल्लाह ने याची काळजी घेतली. जेव्हा बांधकाम पूर्ण केले जात होते, सुलेमान अ. त्यांच्या चालण्याच्या काठीचा आधार घेऊन उभे राहिले. 

त्याच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा

किड्यांनी त्यांची काठी आतून पोखरून खाल्ली आणि ते कोसळले, फक्त तेव्हाच सुलेमानच्या मृत्यूचे गुपित जिन्नांसमोर प्रकट झाले. तोपर्यंत ते काम करत राहिले. कारण सुलेमान अ. यांना एकाच अवस्थेत काठीच्या मदतीने उभे राहण्याची सवय होती.

जिन्नांनी, ते सर्व , अल्लाह (ईश्वर) चे रहस्य न समजण्यालायक असल्यामुळे एकमेकांना शाप दिला. " जर आम्हाला याविषयी आधीच माहीत असते तर आम्ही या परिश्रमापासून खूप लवकर सुटका करून घेतली असती." ते म्हणाले.

ही बोध कथा आणि सत्य कथा पवित्र कुरआन मध्ये वर्णन केली आहे. कृपया मराठी कुरआन वाचा आणि ईश्वराची संकेत वचने जाणून घ्या.


सत्यकथा🍁यशायाह (Isaiah)🍁🍁राजा "हजकिया" (Hezekiah) (700BC) (साधारणतः 2700वर्षांपूर्वी) जेरुसलेम (जुडा) राज्यावर राज्य करीत होता. 

अल्लाह (ईश्वर, यहोवा,God) चा चांगला सेवक आणि राजा होता. त्यावेळी 'यशायाह' अ. हे अल्लाहचे संदेशकर्ता म्हणजेच प्रोफेट होते. 

राजा हजकीया, राज्याच्या चांगल्यासाठी, यशायाह अ. ,जे काही करण्याचा सल्ला देत होते आणि ज्यावर प्रतिबंध लावत होते, राजा ऐकत होता आणि त्यांचा आज्ञाकारी होता आणि त्यांना सल्ला मागत होता. इस्रायली लोकांमध्ये घडामोडी होत गेल्या आणि प्रकरणांना वेग आला. राज्य एका योग्य राजाच्या हातात होते आणि राज्याची प्रजा त्याला पसंत करत होती. एक दिवस राजाला एक आजार झाला. त्याच्या पायाला संसर्गित जखम झाली. 

याच काळात त्याने एक भयानक बातमी ऐकली. त्याचा एक सेवक राजवाड्यात पळत आला आणि त्याने ओरडून सांगितले, " 'बेबिलोन' चा राजा 'सनहेरीब ' (sennacherib) आपल्यावर आक्रमण करण्यास येत आहेत." 

आणि हे खरे होते. क्रूर आश्शुरी राजा साठ हजार सैन्यासह इस्राइल (जेरुसलेम) कडे येत होता.

बेबिलोन (बाबिली) हे मेसोपोटेमिया मधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते. या शहराची स्थापना 1894 BC मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली होती.(हल्लीच्या इराक, इराण, तुर्कस्तान व सीरिया या देशांचा काही भूभाग प्राचीन काळी ' मेसोपोटेमिया' भूप्रदेश नावाने ओळखला जायचा.)
{बेबिलोन चे अवशेष इराकच्या बेबीलोन प्रांतातील "अलहिल्लाह" या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात.}

लोक खूप भयभीत झाले. बातमी ऐकून राजा चिंताग्रस्त झाला आणि त्याने 

यशायाह अ. यांना विचारले, "अल्लाह ने सनहेरीब आणि त्याच्या सैन्याविषयी तुमच्यावर काय प्रकट केले (सांगितले) आहे".

"अल्लाहने आतापर्यंत मला काहीही नाही सांगितले", त्यांनी उत्तर दिले.
राजा दुःखी होता. कारण तो त्याच्या पायाच्या आजारमुळे लढाई करू शकत नव्हता.
यशायाह अ.प्रार्थना करत होते, तेव्हा अल्लाहने त्यांना एक गुप्त गोष्ट सांगितली. (प्रकट केली)

दुसऱ्या दिवशी यशायाह संदेश घेऊन राजाला भेटावयास आले.
"तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या उत्तराधिकारीची नेमणूक करा .कारण तुमची शेवटची वेळ आलेली आहे."


जेव्हा यशायाह अ. यांनी हे सांगितले, 

राजा प्रार्थना स्थळाकडे तोंड करून प्रार्थना करू लागला. त्याने गौरवशाली अल्लाहला प्रार्थना केली आणि विनंती केली, रडला.

प्रामाणिक मन, विश्वास आणि संयम ठेवून, सर्वशक्तीशाली आणि उदात्त अल्लाहला रडत आणि विनंती करत, तो म्हणाला, "हे प्रभू, माझ्या कर्मांची आठवण ठेव, इस्राइलच्या लोकांसाठी असलेले निर्णय,  सगळे तुझ्याकडूनच होते. मी जे करतो, ते तू चांगले जाणतो. माझे सर्व काम आणि माझे खुले आणि गुप्त कार्य तुझ्या समोर आहेत."

जेव्हा अल्लाहने हिजकियाची मनापासून केलेला प्रार्थना ऐकली, तेव्हा अल्लाहला त्याच्यावर दया आली.


त्या रात्री जेव्हा यशायाह प्रार्थना करत होते, अल्लाहने त्यांना राजाला आनंददायक बातमी देण्यास सांगितले की, त्याच्यावर दया झाली आहे. अल्लाह आणखी पंधरा वर्षांसाठी हिजकीयाचे वय वाढवणार आहे. आणि त्यांचा आजार बरा होणार आहे. आणि शत्रू सनहेरीब पासून वाचवणर आहे.

लगेच दुसऱ्या दिवशी यशायह अ. यांनी राजाला ही चांगली बातमी दिली. जेव्हा राजाने हे ऐकले, तो आनंदी झाला.

दुःख आणि वाईट विचार दूर झाले. त्याने वाकून प्रणाम करून प्रार्थना केली, "हे प्रभू, तू ज्याला इच्छितो त्याला राजा बनवतो आणि ज्याला इच्छितो त्याला सत्तेवरून काढून टाकतो. ज्याला इच्छितो त्याला उन्नत करतो आणि ज्याला इच्छितो त्याची अधोगती करतो. अदृश्य जाणणारा आणि स्पष्ट असणारा. सगळ्यात पहिला आणि शेवटचा. अभिव्यक्त आणि ज्ञात असणारा. तू दया दाखविली आणि अस्वस्थ लोकांच्या प्रार्थनांना उत्तर दिले."


जेव्हा राजाने त्याचे डोके वर केले, अल्लाहने यशायाह अ. यांना, राजाला आदेश देण्यास सांगितले की, अंजिराचे पाणी काढून त्याच्या जखमेवर लावावे आणि तो बरे होईल.

राजाने अल्लाहच्या आदेशाप्रमाणे पाणी लावले. हा एक चमत्कार होता. त्याचे जखम लगेच भरले. राजा आनंदी होता. त्याने म्हंटले की, "अल्लाह दया करतो आणि दुःखी लोकांच्या वेदना कमी करतो."

अल्लाहने सनहेरीब च्या सैन्याकडे मृत्यूच्या स्वर्गदूताला पाठविले. सकाळी राजा सनहेरीब ने त्याच्या सैन्याला मृत झालेले पाहिले. अल्लाहने जे वचन दिले होते ते पूर्ण केले.

शत्रूच्या सैन्यातील राजा आणि त्याचे पाच 

सहकारी सोडून कोणीच जिवंत नव्हते. या पाच सहकाऱ्यांमध्ये नबूकदनेस्सर (बूख्तनसर) ही होता.


राजा हजकिया ने त्यांना बेड्या घातल्या आणि त्याच्या राज्यात वापस नेले. 

राजाने, सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, सर्वांना दिसण्यासाठी, दरबाराच्या शिक्षा देण्याच्या जागी ठेवले आणि सत्तर दिवसापर्यंत, द्वेष आणि अपमानित करण्यासाठी कैदेत ठेवले. 

रोज प्रत्येकाला खाण्यासाठी "बारले" ची भाकरी देण्यात यायची. सत्तर दिवसानंतर त्यांना, राजाने तुरुंगात टाकले.

सत्तर दिवसानंतर अल्लाहने, यशायाह अ. यांना, सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, त्याच्या राज्यात वापस पाठवण्यास सांगितले. 

जेणेकरून ते त्याच्या प्रजेला, म्हणजेच त्याच्या राज्यातील लोकांना सावध करतील, की, त्यांच्यासोबत काय घडले. 

जेव्हा यशायाह अ. यांनी, राजा हजकिया ला, या बाबतीत संदेश दिला, तेव्हा राजाने तुरंत त्यांना मुक्त केले.
जेव्हा सनहेरीब त्याच्या लोकांत वापस गेला, त्याने त्याच्या वाजिरांना आणि सल्लागारांना जमा केले आणि सांगितले, की, त्याच्या सैन्याला कसे मारण्यात आले आणि सत्तर दिवस त्यांना किती त्रास दिला.
तेव्हा धार्मिक लोक आणि जादूगार लोक पुढे आले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला अल्लाह आणि त्यांच्या संदेशकर्त्याविषयी सूचना दिली होती.पण तुम्ही ऐकले नाही. दुसऱ्याने असे म्हंटले, तो एक असा देश आहे, ज्याला कोणी मिटवू शकत नाही. त्या देशाला कोणी जिंकू शकत नाही. सनहेरीब आता अल्लाह (ईश्वर) ला घाबरला होता. त्याने पुन्हा कधी इस्राइलवर आक्रमण करण्याचा विचार केला नाही. त्यानंतर सात वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला.

कुरआन मध्ये यशायाह अ. यांचे नाव आहे.
यहुदी (ज्यू,हिब्रू) लोक एक अल्लाहला (ईश्वराला) यहोवा म्हणतात.आणि ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात. तिन्ही ग्रंथात 

कुरआन, बायबल (इंजील) आणि तोराह (तौरेत) मध्ये जवळजवळ सारख्याच

सत्यकथा आहेत. संदेशकर्ता ही सारखेच आहेत.

पण कुरआन च्या आधीच्या ग्रंथांत, लोकांकडून बदल झाला. त्यामुळे ते मूळ ग्रंथ नाही.


अरमाया (जेरमाया) अ. 

(655BC)(2675वर्षांपूर्वी )
जेरुसलेमच्या लोकांनी फक्त एक अल्लाह

म्हणजेच ईश्वर ची (अल्लाहला ते "यहोवा" म्हणत होते.) उपासना करणे सोडून, दगडांच्या प्रतिमा बनविल्या आणि त्यांची उपासना सुरू केली.

अरमाया अ. यांनी अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, फक्त एका अल्लाहची  (ईश्वराची) उपासना करा आणि परत या. पश्र्चाताप करा. क्षमा मागा.अल्लाह दयाळू आहे.

अरमाया अ. यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला की, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. नाहीतर ते सर्व लोक नष्ट होतील.


पण त्यांचा उपदेश लोकांनी मानला नाही. त्यांनी अरमाया अ. यांना खोटं बोलणारा समजले. ते लोक गर्विष्ठ झाले. त्यांच्यामध्ये खूप लोक चुकीच्या रस्त्यावर गेले. 

पाप वाढले. लोक कुकर्म करू लागले. त्यांना चमत्कार दाखवूनही (अल्लाहच्या मदतीने) काही फरक पडत नव्हता. ते या गोष्टीवर विश्वासच करू शकत नव्हते की, अल्लाह, त्या दगडाच्या गुंबद (हैकले सुलेमानी) ला, जे जेरुसलेममध्ये सुलेमान अ. यांनी बांधले होते आणि ज्यावर अल्लाहची कृपा होती, नष्टही करू शकतो.

लोकांनी अरमाया अ. यांच्या, संदेशातील धमकी आणि चेतावणी ऐकली, ते म्हणाले,  "तू खोटे बोलत आहेस, तू असे म्हणत आहे की, अल्लाह या जमिनीला, प्रार्थना स्थळाला, [जे आधी, फक्त एका अल्लाह (यहोवा, ईश्वर)ची उपासना करण्यासाठी होते, आणि आता] जेथे दगडाच्या प्रतिमा ठेवल्या गेल्या होत्या, ग्रंथाला (ज्यामध्ये बदल केला गेला होता) नष्ट करेल?"

जेरुसलेमचा राजा खूप गर्विष्ठ होता. त्याने आदेश दिला की, "अरमायाला कैद करा आणि तुरुंगात टाका. त्यांनी अरमाया अ. यांना, जकडून तुरुंगात टाकले. ही खूप मोठी चूक होती.

अल्लाहने (ईश्वराने) नबूकदनेस्सर (nebuchadnezzar) या 

बेबीलोन (इराकचे प्राचीन शहर) च्या राजाला जेरुसलेम वर, आक्रमण करण्यास पाठवले. 

त्याने, त्याच्या सैन्यासह देशात प्रवेश केला आणि शहराला घेरले . जेव्हा हा सैन्याचा वेढा प्रदीर्घ कालावधी पर्यंत राहिला. जेरुसलेमच्या सैन्याने शरणागती पत्करली, त्यांनी त्यांच्या शहराचे दरवाजे उघडले आणि राजाच्या सैन्याने शहरात प्रवेश केला आणि ते खूप क्रूर होते. राजाने क्रूरतेने त्यांच्यावर, त्याचा कायदा लागू केला आणि त्यांना निर्दयीपणे शिक्षा केली.

राजाने, एक तृतीयांश लोकांचा वध केला आणि एक तृतीयांश लोकांना पकडले. बेबिलोनच्या सैन्याने फक्त अपंग आणि वृद्ध लोकांना जाऊ दिले. त्यांनी जेरुसलेमच्या लोकांच्या सर्व घरांना नष्ट केले. त्या सैन्याने हैकले सुलेमानीच्या इमारतीला  (प्रार्थनास्थळाला) नष्ट केले. बेबोलोनच्या सैन्याने, तेथील लोकांचे, सर्व पुस्तके आणि ग्रंथ जाळून टाकले. त्यांनी मुलांशी आणि स्त्रियांशी ही वाईट वागणूक केली. हा तेथील लोकांसाठी खूप भयावह दिवस होता.
मग त्यांनी, त्यांना घोड्यांवर स्वार होऊन पायदळी तुडविले. तरुणांना वेगळे करून स्त्रियांना बाजाराच्या ठिकाणी रक्षक म्हणून उभे केले. त्यांनी सैन्यात दहशत पसरवली आणि राजाने जेरुसलेमच्या वंशाला पूर्णपणे संपुष्टात आणले. 

हे इस्राइल अ.  (याकूब अ.) च्या वंशाच्या लोकांसाठी, जे जेरुसलेम मध्ये राहत होते, खूप भयानक दृश्य होते. ती जागा लोकांच्या रक्ताने भरली. सगळी कडे मृतदेह होते.

बेबोलोनच्या राजाला माहीत झाले की, इस्राइल च्या लोकांचा एक संदेशकर्ता आहे, ज्याला आधी पासूनच या विनाशा विषयी माहीत होते आणि त्याचे नाव अरमाया आहे. राजाने आदेश दिला की, त्या संदेश कर्त्याला तुरुंगातून बाहेर आणले जावे. अरमाया अ.शी बोलल्यानंतर राजाला जाणीव झाली, की ते खरच अल्लाह (ईश्वर) चे  खरे संदेशकर्ता (पैगंबर) होते. राजा ने त्यांची सुटका केली.
त्या पूर्ण शहराला नष्ट करून बेबिलोनचा राजा पुन्हा त्याच्या राज्यात निघाला. राजा बेबिलोनला, सर्व लूट घेऊन निघाला, ज्यामध्ये संपत्ती, सोने, हिरे, मौल्यवान खजिने होते आणि पुरुष, स्त्रिया, मुले होती, त्यांच्यात तरुणी होत्या आणि धर्मोपदेशकांची मुले होती, सर्व मिळून सत्तरहजार पर्यंत होते. अंदाजे सत्तर हजार पुरुष आणि स्त्रियांना त्याने सेवक बनविले.

इस्राइलची जमात ही अल्लाहची जमात होती. त्या लोकांकडे खूप संदेश देणारे (पैगंबर) आले. अल्लाहने त्यांना खूप संधी दिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांनी अल्लाह चा प्रत्येक आदेश तोडला. इतकेच नाही तर त्यांनी अल्लाहचा संदेश देणाऱ्यांची हत्या केली आणि दगडाच्या प्रतिमांची उपासना करणे चालू ठेवले. याच कारणाने अल्लाह (ईश्वर) त्यांच्यावर खूप क्रोधित झाला आणि पूर्ण जमातीला ध्वस्त आणि नष्ट केले.

या विध्वंसानंतर इस्राइल मध्ये नवीन युग सुरू झाले. अरमाया अ. यांनी लोकांना म्हंटले की, जे इस्राइल मध्ये हजर आहेत, त्यांनी स्वतःच्या अपराधावर पश्चाताप करून अल्लाह (ईश्वर) ला क्षमा मागावी आणि हे ही सांगितले की, अल्लाह पुन्हा एकदा त्या लोकांची भरभराट करेल. पण खूप लोक, त्या विध्वंस झालेल्या शहरात राहण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा अरमाया अ. यांचा आदेश मानण्यास नकार दिला. आणि ते सगळे लोक जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाले. त्यातील काही इजिप्त (मिस्र), स्पेन (हिजर) आणि सौदी अरेबिया (तैफ) मध्ये गेले. पण अरमाया अ. यांनी इस्राइल ची पुन्हा भरभराट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

ही सत्य घटना आहे. बायबलमध्ये पूर्ण एक chapter यावर आधारित आहे. जेरुसलेमचे लोक ( इस्राइलचे वंशज) दोन वेळा उपद्रव माजवतील व दोन वेळा जेरुसलेम नष्ट केले जाईल, अशी चेतावणी अल्लाह (यहोवा) कडून देण्यात आली होती.

कुरआन मध्ये हा संदर्भ आहे.
#कुरआनचा_काही_अंश

"4 आणि आम्ही इस्राईलच्या मुलांना, ग्रंथाद्वारे हे आधीच कळविले होते की, तुम्ही जमिनीवर दोन वेळा उपद्रव माजवाल आणि मोठ्या विद्रोहाचे प्रदर्शन कराल. 5 मग ज्या दोन घटनेच्या बाबतीत आधीच इशारा दिलेला होता, त्यांपैकी जेव्हा पहिल्या घटनेची वेळ आली, तेव्हा आम्ही आमच्या भक्तांपैकी अशा काही भक्तांना तुमच्या विरुद्ध पाठवले. जे युद्धाच्या बाबतीत फार शक्तीशाली असे होते, जे तुमच्या घरांत (घुसले व) त्यांचे वाटोळे केले. अशाप्रकारे आधीपासून वर्तवलेले भाकीत पूर्णत्वास पोहोचले.
[कुरआन 17:4-6]

________________________________


[इस्रायली लोकांच्या ग्रंथात ' तोराह ' मध्ये हे भाकीत अल्लाह (यहोवा) ने वर्तविले आहे, जो अल्लाहचाच ग्रंथ आहे , पण लोकांनी त्यात फेरबदल केले आहे. अरमाया अ. यांना त्या इस्राइलच्या वंशजाकडे, चेतावणी देण्यासाठी पाठवले होते. ही पहिली घटना होती. दुसरी घटना, जी ईसा (येशू) अ. यांच्या काळातील आहे. जेव्हा दुसऱ्या वेळेस इस्राइल च्या वंशजाने उपद्रव माजवला होता आणि विद्रोह केला होता.]

 

🐳माशाच्या पोटात 🐳
युनूस अ. हे एक ईश्वरनिष्ठ तरुण होते.

ते "निनेवेह" (सध्याच्या "मोसुल" च्या बाहेरील भागात असणारे एक प्राचीन शहर, इराक) येथे राहत होते. 

या ठिकाणचे लोक फक्त एक खऱ्या अल्लाहवर (ईश्र्वरावर) विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे अल्लाहने त्या लोकांसाठी युनूस अ. यांना, त्याचा संदेशकर्ता म्हणून निवडला. 

युनूस अ. यांनी अल्लाहच्या संदेशाचा उपदेश त्या लोकांना दिला. पण त्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने अविचारीपने त्याचा उपदेश लक्षपूर्वक ऐकला, आणि जेव्हा तो म्हणाला एकच अल्लाह (ईश्वर, पालनकर्ता) आणि तो, अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांनी त्याची थट्टा केली.
युनूस अ. यांनी त्यांना विनवणी केली, अल्लाहच्या क्रोधाविषयी आणि दंडाविषयी (शिक्षा) चेतावणी दिली. पण काहीच अर्थ नव्हता. ते त्याला पाहून अजून हसले आणि विश्वास केला नाही. 

यामुळे युनूस अ. यांची त्यांच्याकडून निराशा झाली. त्यांनी रागावून आणि अल्लाहच्या शिक्षेबद्दल चेतावणी देत, अल्लाहचा आदेश येण्याची वाट न पाहताच, निनेवेह च्या लोकांना सोडले.

यावर निनेवेह च्या लोकांना काहितरी गंभीरपने चूक झाली आहे, याची जाणीव झाली. त्यांना त्यानंतर भीती वाटली आणि वाटले की, "युनूस अ. हा अल्लाहचा खरा संदेशकर्ता होता. त्याला त्रास देऊन, त्यांनी अल्लाहला नाराज केले आहे आणि आता अल्लाहची दिलेली शिक्षा नक्कीच त्यांना नष्ट करू शकते.."

ज्या क्षणी त्यांना याची जाणीव झाली, ते पश्र्चाताप करण्यासाठी खुल्या जागेत आले, वाकून आणि अल्लाहकडे याचना करत, नमन करू लागले. त्यांनी क्षमा याचना केली आणि सत्य निष्ठा स्वीकार केली. त्यांनी इतक्या प्रामाणिकपणेे क्षमा मागितली की, अल्लाहने त्यांना क्षमा केली आणि त्यांच्यावर ती शिक्षा (दंड, आपदा) केली नाही, ज्या विषयी, युनूस अ. त्यांना चेतावणी देऊन गेले होते.

या काळात, युनूस अ. यांनी, त्यांच्या लोकांना आणि "निनेवेह" ला रागाच्या भरात सोडल्यानंतर , ते दूर जावून, एका नौकावर चढले जी, त्या क्षणी समुद्रात प्रवासासाठी निघणार होती.
ती नौका, जी लोकांनी भरली होती समुद्रात निघाली, पण रस्त्यात, एक मोठे वादळ नौकेवर आदळले आणि नौका लहरींवर हेलकावे देऊ लागली.

त्याकाळी असे मानले जायचे की, जर एखादा पळपुटा गुलाम (विकत घेतलेला नोकर, जशी त्या काळी माणसांना विकत घेऊन काम करवून घेण्यासाठी, "गुलाम" बनविण्याची पद्धत होती.), नौकेवर किंवा जहाजावर चढला तर, ते जहाज किंवा बोट बुडते.

या कारणामुळे लोकांनी संशय केला की, या बोटीवर, एक पळून आलेला गुलाम आहे. तो कोण आहे हे माहीत करण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकून, ज्या माणसाचे नाव येईल त्याला, नावेच्या बाहेर समुद्रात फेकण्याचा निर्णय घेतला..जेव्हा सगळ्या चिठ्ठ्यामधून, एका नावाची चिठ्ठी उचलण्यात आली, ते युनूस अ. यांचे नाव होते. 

कोणीच युनूस अ. यांच्यावर विश्वास करण्यास तयार नव्हता की, "युनूस पळून आलेला गुलाम नाहीं", कारण ते खूप सभ्य आणि धार्मिक वाटत होते.
तीन वेळा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि प्रत्येक वेळेस युनूस अ. यांचे नाव आले.
आता युनूस अ. यांना खात्री झाली की, 

त्यांनी अल्लाह (ईश्वर) चा आदेश येईपर्यंत वाट पाहिली नाही आणि रागाच्या भरात, निनेवेह आणि त्यांच्या लोकांना सोडून, अल्लाह (ईश्वर) ला नाराज केले आहे.

"हो, मी पळून आलेला गुलाम आहे" ते म्हणाले, मी माझ्या प्रभू आणि मालकाला (ईश्वराला) सोडून पळालो, जर तुम्हाला पुढे सुरक्षित जायचे आहे तर, मला नौकेच्या बाहेर फेका."

खूप अनिच्छिने नावेच्या लोकांनी, जे युनूस अ. यांच्याकडून सांगण्यात आले होते, ते केले आणि त्यांचा पुढचा प्रवास चालू ठेवला.
जसे युनूस अ. खोल पाण्यात पडले, 

एक मोठा मासा पोहत आला आणि त्या मास्याने त्यांना गिळले. युनूस अ. यांनी स्वतःला माश्याच्या पोटात असलेले पाहिले, जेथे अंधकार आणि खूप जास्त खोली होती. ते भयभीत आणि असहाय्य होते. जेव्हा मासा पोहायचा, युनूस अ. आतल्या आत फेकले जायचे आणि त्यांना खूप अस्वस्थ वाटायचे आणि भिती वाटायची.    "मी पुन्हा कधी दिवसाचा प्रकाश पाहू शकेन का? मी अशा दयनीय पिंजऱ्यात मरून जाईल का?"  असे विचार त्यांना यायचे.

" मी निनेवेहच्या लोकांना का सोडले?" त्यांनी त्यांच्या चुकीचा पश्र्चाताप केला आणि अल्लाहकडे क्षमा याचना केली. त्यांनी, त्यांच्या मालकाला (अल्लाहला) दया करण्याची विनंती केली आणि या दुःखातून मुक्त करण्यास प्रार्थना केली.

"हे अल्लाह, तुझ्या शिवाय कुणीच अल्लाह (ईश्वर) नाही. फक्त तूच आहेस. सगळा गौरव तुझाच आहे. मी खरंच चूक होतो." 

ते म्हणाले. त्यांचा पश्र्चाताप पाहून अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्यावर दया केली. मासा पोहत वर किनाऱ्यावर आला आणि युनूस अ. यांना बाहेर किनाऱ्यावरील रेतीवर (तोंडातून) बाहेर फेकले.
जेथे ते पडले, अस्वस्थ, खूप अशक्त आणि असहाय्य होते, जसा नवीन जन्म झालेला बालक असतो.

एक वेल, त्याच्या जवळ वाढला आणि त्यांना सावली दिली, जोपर्यंत त्यांना इतके बळ येत नाही, की ते स्वतः उठतील आणि त्यांच्या लोकांपर्यंत जातील, तोपर्यंत. आतापर्यंत त्यांच्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा शोध घेतला होता. 

जेव्हा युनूस अ. शेवटी त्यांना दिसले ते लोक त्यांना पाहून खूप आनंदित झाले. युनूस अ. यांना कळले की, लोकांनी शेवटी खरी श्रध्दा स्वीकार केली आहे. जो संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविला होता, की फक्त एका पालन कर्त्याची उपासना करा, लोकांनी त्याचे अनुसरण केले होते आणि त्या एका प्रभूची क्षमा मागितली होती.

अल्लाह, जे पश्र्चाताप करतात आणि नम्रतेते क्षमा मागतात, त्यांना क्षमा करतो.

युनूस अ. यांचे नाव पवित्र कुरआन मध्ये आहे आणि त्यांनी जी प्रार्थना माश्याच्या पोटातून केली होती, ती प्रार्थना ही पवित्र क़ुरआन मध्ये आहे..कृपया स्वतःच्या मातृभाषेत कुर आन समजून वाचा आणि जाणून घ्या की, फक्त एक अल्लाह (ईश्वर, God, यहोवा)  चा आदेश आणि संदेश काय आहे, कशामुळे खरे यश मिळते आणि सत्य काय आहे...

💞💞अय्युब चा संयम 💞💞
दीर्घकाळाच्या आणि वेदनादायक आजाराने अय्युब अ. यांना अशक्त आणि अवतीभोवती फिरण्यास असमर्थ बनविले 

होते. ते वर्षांपासून एक असहाय्य आजारी बनून राहिले होते. त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती असता तर, त्याचे धैर्य खचले असते आणि अल्लाहची निष्ठा हरवली असती आणि वेदनेने तो ओरडला असता. त्याने अल्लाहला असे दुःख आणि अस्वस्थता देण्याविषयी, ज्यात त्याचा स्वतःचा काही दोष नाही, तक्रार केली असती. 

पण अय्युब अ. यांनी संयमानेे आणि अल्लाहच्या निष्ठेत कणखर राहून त्रास सहन केला. त्यांनी त्यांच्या दुःखाविषयी कधीही तक्रार केली नाही.

लोकांनी त्यांना भेटण्यास येणे बंद केले 

आणि त्यांना मरण्यासाठी एकटे सोडून दिले. फक्त त्यांच्या पत्नीने त्याची सेवा केली आणि त्यांना प्रवृत्त केले आणि एकदा तीही एका क्षणासाठी खूप त्रासाने आणि खिन्नतेने, असंयमित झाली आणि तिने अल्लाहला तक्रार केली. 

यामुळे अय्युब अ. खूप दुखवले. ते, ज्यांनी एक शब्द ही न उच्चारता, इतक्या दिवसापासून इतका जास्त त्रास सहन केला होता, अल्लाहचे आभार न मानण्याची पत्नीची वृत्ती सहन करू शकले नाही.

त्यांनी, ते जेव्हा बरे होतील, तेव्हा त्यांच्या पत्नीला शंभर वेळा मारण्याची शपथ (वचन) घेतली. ते हे कदाचित अशामुळे ही बोलले असतील, कारण ते त्यावेळी, इतके असहाय्य होते की, ते किंचाळू शकत नव्हते. त्यांचा राग कोणत्याही तऱ्हेने व्यक्त करू शकत नव्हते.

एक पूर्ण असहाय्यतेच्या दशेत, अय्युब अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्याच्यावर दया होवू दे आणि या वेदनेतून त्यांची सुटका कर. 

अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्यावर कृपा केली. अल्लाहने आदेश दिला की, जेथे ते झोपलेले आहे, तेथे पाय जमिनीवर आपट. 

अय्युब अ. यांनी आदेश पाळला आणि जेव्हा त्यांनी असे केले, ताजे पाणी तेथपासून उसळून वाहू लागले.अल्लाहने त्याला म्हंटले की, पाणी पी आणि त्यात स्नान कर. एक वेल त्यात वाढला आणि जेथे ते आराम करत होते तेथे त्यांना सावली दिली.

अय्युब अ. अल्लाहच्या कृपेने बरे झाले, पण जेव्हा त्यांना आठवले की, त्यांनी बरे झाल्यानंतर, त्यांच्या पत्नीला मारण्याची शपथ घेतली होती, ते अस्वस्थ आणि दुःखी झाले.

एकीकडे त्यांनी अल्लाहचे नाव घेऊन केलेले वचन होते आणि दुसरीकडे त्यांची पत्नी होती, जिला ते प्रेम करत होते. ते त्यांचे वचन तोडू शकत नव्हते, पण त्यांच्या पत्नीला मारहाण करण्याचा विचार, त्यांना नाखूष करत होता. या अवघड प्रसंगातून बाहेर येण्यासाठी अल्लाहने त्याच्या सद्गुणी संदेशवाहकाची मदत केली. अल्लाहने ( ईश्वराने) आज्ञा केली की, शंभर गवताच्या काड्या जमा कर आणि त्याने त्याच्या पत्नीला एकदाच मार. अशाप्रकारे ते, त्यांचे वचन ठेऊ शकले आणि त्यांच्या पत्नीला वेदना झाली नाही.

अल्लाहने त्याच्या कृपेने अय्युब अ. यांना बरे केले, त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्यांना एकत्र केले आणि त्यांना पुष्कळ संपत्ती आणि सुख दिले.

अय्युब अ. यांनी अल्लाह ला (ईश्वर ला ) केलेली प्रार्थना (दुआ) पवित्र क़ुरआन मध्ये, अल्लाह ने प्रकट केली आहे. 

या प्रार्थनेने खूप व्यक्तींना समाधान मिळते, जेव्हा व्यक्ती निराशेच्या काळात ती प्रार्थना करतो.

स्वतःच्या मातृभाषेत पवित्र क़ुरआन वाचा आणि जीवनाचा योग्य मार्ग निवडा...

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

कुरआन च्या बोधकथा..4 मूसा अ.

याकूब (Jacob,इस्राइल) अ., युसुफ अ. आणि युसुफ अ. यांचे अकरा भाऊ इजिप्त(मिस्र) मध्ये स्थायिक झाले...आणि फक्त एक अल्लाहची (पालनकर्त्याची) निष्ठा करण्याची शिकवण देत राहिले...त्यांना "बनी इसराइल" म्हणजेच इस्राइलची संतान म्हंटले जात होते..


इजिप्शियन एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते...त्यामुळे ते, बनी इस्राइलला पसंत करत नव्हते....कारण बनी इस्राइल फक्त एक आणि एक अल्लाह (ईश्वर) ची उपासना करत होते...

इजिप्शियन बनी इस्राइल वर, अन्याय करत होते...त्यांच्याशी वाईट वागत होते...इजिप्शियन खूप शक्तिशाली होते...त्यामुळे गरीब, अत्याचार सहन करणारे, बनी इस्राइल यांना, त्यांच्या क्रूरतेपासून आणि निर्दयतेपासून, खूप कमी संरक्षण मिळायचे...ते त्यांचा आवाज उठवू शकत नव्हते...

त्या काळी, इजिप्तच्या राजाला, फिरौंन (फैरों, Pharo) म्हंटले जायचे...

इजिप्शियन लोकांना ज्योतिष विद्येत, जादू आणि भविष्य कथन यामध्ये खूप विश्वास होता...

एका भविष्य कथन करणाऱ्याने (ज्योतिषी) फिरौंनला सांगितले की एक मुलगा, बनी इस्राइलच्या जमातीत जन्म घेईल, जो त्याचे राज्य कोसळण्यास कारण होईल...

फिरौंन यावर खूप नाराज झाला आणि त्याने आज्ञा दिली की, बनी इस्राइलच्या कोणत्याही कुटुंबात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला जन्मताच मारून टाकावे...

याच काळात, एक मुलगा, बनी इस्राईल मध्ये जन्माला आले...त्याची आई खूप घाबरली...तिने त्या बाळाचा जन्म गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण जर राजाच्या कोणत्याही सैनिकांनी त्या बाळाला  शोधले, तर ते लगेच त्याला मारून टाकतील, असे तिला वाटले.

तिने अल्लाह (ईश्वर) कडे प्रार्थना केली आणि अल्लाहने तिला मार्गदर्शन केले की, "एका लाकडाच्या पेटीत त्या बाळाला ठेव आणि ती पेटी नाईल नदीत सोड..." 

तिने अल्लाहवर विश्वास ठेऊन ती आज्ञा पाळली...आणि अल्लाहने तिला वचन दिले की, "तिचा मुलगा सुरक्षित राहील आणि ती पुन्हा लवकरच त्याच्या जवळ जाईल..."

तिने बाळाला एका लाकडाच्या पेटीत ठेवले आणि नदीच्या पाण्यावर तरंगू दिले आणि  तिच्या मोठ्या मुलीला, मरियमला सांगितले की, त्या पेटीकडे नजर ठेव...

ती पेटी राजवाड्याच्या दिशेने वाहत चालली होती आणि मरियम पेटीच्या मागे मागे नदीच्या काठावरून जात होती...जेव्हा पेटी राजवाड्याच्या जवळून जात होती, काही दरबारातील महिलांनी पाहिले की, एक छान आणि गोंडस बाळ, त्याचा अंगठा चोकत आरामात पेटीत खेळत आहे... त्यांनी ते बाळ राणीकडे आणले, जी फिरौंनची पत्नी होती...आसिया...

आसिया त्या बाळाला पाहून खूप आनंदी झाली, कारण तिला स्वतःचे मूल नव्हते...तिने, त्या बाळाला  दत्तक घेण्यासाठी, तिच्या पतीची परवानगी मागितली...पण तिच्या पतीला ही कल्पना आवडली नाही..."हे मूल मला इजा करू शकते, जसे ज्योतिषाने भविष्य कथन केले आहे..." त्याने नकारार्थी उत्तर दिले...

पण आसियाने याचना केली, "या मुलाला मारू नका...तो आपल्यासाठी चांगला ही असू शकेल..."

अनिच्छेने तो मानला...

हे ठरवले गेले की, ते बाळ राजवाड्यात मोठे होईल आणि एक महिला त्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याला दूध पाजण्यासाठी नियुक्त केली जाईल..जी महिला त्या बाळाला दूध देण्यासाठी नियुक्त केली गेली, बाळाने तिच्याकडून दूध घेतले नाही..आणि रडणे चालूच ठेवले...

मग मरियम (जी बाळाची बहीण होती, पण हे कुणालाही माहीत नव्हते..) पुढे आली आणि म्हणाली, मी तुम्हाला एका महिलेविषयी सांगू शकते, जी खूप चांगली आहे आणि या बाळाला दूध पाजू शकते...

मरियमला, त्या महिलेला बोलावण्यास सांगण्यात आले...ती घरी आली आणि तिच्या आईला तिथे वापस घेऊन गेली...त्या बाळाने लगेच, त्याच्या आईच्या हातात गेल्यावर, रडणे थांबवले...आणि दूध पिणे सुरू केले...

प्रत्येक जण आनंदी झाला...आणि त्या आईला, त्या लहान बाळाची देखभाल करण्याचे आणि दूध पाजण्याचे काम देण्यात आले...(जो की तिचाच मुलगा होता...). 

या बाळाचे नाव होते, मूसा अ.(मोशे, Moses)

मूसा अ. एका राजकुमारासारखे, फिरौंनच्या राजवाड्यात मोठे झाले...ते एक बलवान, सद्गुणी आणि योग्य तरुण बनले...पण ते, जे अवतीभोवती पाहत होते, ते त्यांना आवडत नव्हते...

नेहमी, ते शहरात, त्यांच्या लोकांना भेटायला जायचे आणि पहायचे की, इजिप्तचे लोक, गरीब लोकांशी निर्दयतेने आणि क्रूरपणाने वागायचे. मूसा अ., इजिप्त च्या लोकांच्या, अन्यायाने शिकार झालेल्या लोकांना मदत करायचे...त्यांना क्रूरता आवडायची नाही..त्यांना खूप राग यायचा, जो त्यांना सहन होत नव्हता...

एक दिवस, एका बलवान इजिप्तच्या माणसाने, एका गरीब व्यक्तीला खूप मारले...त्या गरीब व्यक्तीने मदतीसाठी मूसा अ. यांना बोलावले... मूसा अ. खूप रागावले आणि इजिप्तच्या माणसाला त्यांनी, जोऱ्याने मारले...इतक्या जोऱ्यात मारले की, तो माणूस खाली पडला आणि मृत झाला...

आता मूसा अ., जे अनपेक्षितपणे घडले, त्यामुळे घाबरले आणि हताश झाले...त्यांना त्या माणसाचा जीव घ्यायचा नव्हता...असे यामुळे झाले, कारण अन्याय पाहून, त्यांचा राग अनावर झाला...त्यांनी अल्लाहची क्षमायाचना केली...

जेव्हा इजिप्तच्या लोकांना कळले की, मूसा अ. यांनी एका माणसाला मारले आहे, फिरौंनच्या लोकांनी त्यांचा शोध सुरू केला..आणि म्हणून, मूसा अ. यांना इजिप्त सोडावे लागले...

ते एका "मदयन" नावाच्या जागी गेले...

जेव्हा ते तेथे आले, त्यांनी एका विहिरीभोवती खूप लोकं पहिली...ते त्या विहिरीतून पानी काढत होते..आणि त्यांच्या बकऱ्यांना आणि मेंढ्यांना देत होते...

त्या गर्दीपासून, थोड्याच अंतरावर दोन तरुण मुली त्यांच्या  मेंढ्यासोबत उभ्या होत्या आणि शांततेने, त्यांची पाळी संपण्याची वाट पाहत होत्या..ज्यामुळे त्यांची, पाणी काढण्याची पाळी येईल....

"तुम्ही पण तुमच्या हिश्श्याचे पाणी का नाही घेत?" मूसा अ. यांनी विचारले...

"कारण आम्ही इतके धैर्यवान नाही, आम्हाला त्यांचे होईपर्यंत वाट पाहावी लागेल...आमचे पिता, इथे स्वतःहून येण्यासाठी, खूप वृद्ध आणि अशक्त आहेत...त्यामुळे आम्हाला वाट पाहावी लागेल", त्या म्हणाल्या...

एक शक्तिशाली आणि सभ्य तरुण असल्याने आणि ज्यांना न्याय देण्याची खूप चांगली बुध्दी असल्याने, मूसा अ. पुढे झाले, आणि त्यांच्यासाठी पाणी काढले आणि त्यांच्या  मेंढ्यांना दिले....

जेव्हा मुली घरी गेल्या, त्यांनी त्यांच्या पित्याला सांगितले की, कसे एका दयाळू तरुण माणसाने त्यांना मदत केली...त्यांचे पिता एक पवित्र  व्यक्ती होते...एक संदेशवाहक होते..."शोएब अ. "

ते त्यांच्या मुलींना म्हणाले की, "वापस जा आणि त्या तरुणाला घेऊन या..."

जेव्हा दोघींमधील एक मुलगी मूसा अ. यांना बोलावण्यासाठी वापस गेली, ते एका झाडाखाली झोपले होते...थकलेले आणि भुकेले होते..आणि अल्लाहला प्रार्थना करत होते की, मदत कर...

ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली की, तिचे पिता, त्यांना भेटण्यासाठी इच्छुक आहेत...

म्हणून मूसा अ. उठले आणि तिच्यासोबत तिच्या घरी गेले...

शोएब अ. यांनी त्यांना छान जेवण दिले आणि मग विचारले की, ते कोण आहे... मूसा अ. यांनी, त्यांना फिरौंन आणि त्यांच्या गरीब लोकांच्या, बनी इस्राईलवरच्या अन्यायाची कहाणी सांगितली...आणि त्यांची स्वतःच्या सुटकेची कहाणी सांगितली..

त्या वृद्ध संदेशवाहकाने त्यांना म्हंटले की, त्यांना काही काळजी करण्याचे कारण नाही..कारण आता ते, एका सुरक्षित जागी, मित्रांत आले आहे...

दोघींपैकी एका मुलीने, तिच्या पित्याला मूसा अ. यांना, एका मेंढपाळाच्या कामावर ठेवण्यास सांगितले .. मेंढ्यांची देखभाल करण्यासाठी कारण ते बलवान, सद्गुणी आणि प्रामाणिक व्यक्ती होते...

त्यांचे पिता मूसा अ. यांना म्हणाले, "जर तुम्ही आमच्यासोबत राहिले आणि आठ ते दहा वर्ष आमच्या मेंढ्याची देखभाल केली, तर मी माझ्या मुलीशी तुमचे लग्न करून देईन..."

मूसा अ. तेथे राहण्यास आणि त्यांच्यासाठी काम करण्यास तयार झाले... तेवढ्या वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, त्यांनी लग्न करण्याची परवानगी मागितली आणि त्यांच्या पत्नीसोबत, त्यांच्या मेंढ्याच्या कळपाला घेऊन, मदयन सोडले...

इजिप्तला जातांना, मूसा अ. यांनी, एका टेकडीवर एक प्रकाश पहिला...त्यांनी त्यांच्या पत्नीला जोपर्यंत ते तेथून (टेकडीवरून), काही आग घेऊन येत नाही, तोपर्यंत वाट पाहण्यास सांगितले...त्यांनी असाही विचार केला की कोणी, जो त्याला रस्ता दाखवण्यास पात्र आहे, तेथे असेन...

त्यामुळ ते आगीकडे गेले...पण तो काही साधारण प्रकाश नव्हता...तो अल्लाह (ईश्वर) चा प्रकाश होता...

जसे मूसा अ. जवळ गेले, तो प्रकाश दूर आणि आणखी दूर गेला...ते घाबरले आणि तेथून वापस येण्यासाठी फिरले...पण एका आवाजाने त्यांना थांबवले..., "ओ, मूसा..मी तुझा अल्लाह (ईश्वर) आहे...तुझी पादत्राणे काढ...तू एका पवित्र " तोवा"च्या दरीत उभा आहे...मी तुला माझा संदेशवाहक म्हणून निवडले आहे...त्यामुळे तुला जे सांगितले जाईल, नीट काळजीपूर्वक ऐक..."

अशाप्रकारे अल्लाह मूसा अ. यांच्याशी बोलले आणि त्यांना संदेशवाहक बनविले...

मूसा अ. गोंधळलेले होते...अल्लाहने त्यांना विचारले की, "तुझ्या हातात काय आहे?..

"ती माझी काठी आहे", मूसा अ. यांनी उत्तर दिले....

"खाली टाक", आज्ञा आली...

मूसा अ. यांनी आज्ञा पाळली आणि त्यांना आश्चर्य वाटले, ती काठी एक भयंकर साप बनली...

"आता ती काठी उचल आणि घाबरु नको", आज्ञा आली आणि तो साप पुन्हा काठी बनला...

मग मूसा अ. यांना आज्ञा देण्यात आली की, "तुझा हात, तुझ्या भुजेच्या खाली (बगलेत) घेऊन जा...आणि बाहेर काढ...

त्यांच्या हातावरचे, जळल्याचे डाग होतेे, तेे जावून, तो हात चमकू लागला...(मूसा अ. जेव्हा बालक होते, तेव्हा त्यांचा हात पोळला होता...)

हे दोन चमत्कार ( miracles, मोजजे) मूसा अ. यांना देऊन,अल्लाहने आज्ञा केली की, "इजिप्तला वापस जा आणि त्यांच्या 
खऱ्या एक अल्लाह ( ईश्वर) च्या
धर्माचा संदेश, फिरौंनला आणि त्यांच्या तेथील लोकांना दे."

पण मूसा अ. यांना भीती 
वाटत होती की, ते 
इजिप्त  चे लोक त्यांना मारून
टाकतील. कारण त्यांनी, त्यांच्यामधल्या एका इजिप्शियनला मारले होते...अल्लाहने त्यांना आश्वासनं दिले की, ते तसे करणार नाही...

मूसा अ. यांना, शब्द बोलतांना, थोडी अडचण येत होती...ते थोडे अडकून बोलायचे...म्हणून ते अल्लाहला म्हणाले की, त्यांच्या भावाला, हारून अ. यांना सुध्दा, एक संदेशवाहक बनव, त्यामुळे हारून अ., मूसा अ. यांना मदत करतील...

"हे ओझे सहन करण्यासाठी, माझ्या मनाला (हृदयाला) धैर्य दे आणि माझे बोलणे स्पष्ट आणि प्रभावात्मक होऊ दे...जे लोक ऐकतील त्यांच्यासाठी.." मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली...

अल्लाहने त्यांना, त्यांनी जे मागितले सगळे दिले...आणि दोघा भावांना, अल्लाहचा संदेश घेऊन इजिप्तच्या दरबारात जाण्याची आज्ञा केली...

"तुमचा संदेश देतांना दयाळू रहा, कठोर राहू नका"...त्यांना सांगण्यात आले...

अल्लाहच्या मदतीने मूसा अ. बळकट झाले आणि त्यांच्या संदेशवाहक भावासोबत, हारून अ. यांच्यासोबत ते, इजिप्तच्या दरबारात जावून अल्लाहचा संदेश 
सांगण्यासाठी निघाले...

जेव्हा मूसा अ. आणि हारून अ. , 
फक्त एक अल्लाह (ईश्वर) ची श्रद्धा बाळगून, त्याच्यासमोर झुका, हा संदेश, उपदेश, फिरौंन आणि त्याच्या 
लोकांना देण्यासाठी इजिप्त मध्ये आले, 
तेव्हा त्यांना दिसले की, बनी इस्राईल ची जमात, दयनीय अवस्थेत जगत आहेत...
त्यांना  कठोर गुलामी करण्यासाठी 
जबरदस्ती केली जात आहे...

मूसा अ. आणि हारून अ. फिरौंनच्या दरबारात गेले आणि त्यांनी घोषणा केली की, ते त्यांच्या लोकांना, म्हणजे बनी इस्राईलला, इजिप्त पासून दूर घेऊन जाण्यासाठी आले आहेत...त्यांच्या बापदादाच्या धरतीवर....
[जेथून याकूब अ. इजिप्त मध्ये आले होते,आणि जेथे इब्राहीम अ. आणि इसाक अ. यांनी जीवन व्यतीत केले होते..](ही सत्यकथा या पेज च्या आधीच्या भागांत लिहिली आहे..)

फिरौंनने लोकांना घेऊन जाण्यास नकार दिला आणि , म्हणाला, "मूसा, तू माझ्या राजवाड्यात माझ्या मुलासारखा मोठा झाला आहेस? आणि आता तू उपकार विसरून कृतघ्न बनला आहेस...?"

मूसा अ. यांनी उत्तर दिले , "माझ्या अल्लाहने मला मार्गदर्शन केले आहे आणि मला एक संदेशवाहक बनविले आहे...तुम्ही मला लहानाचे मोठे केले, या अशा एक मोठ्या उपकारामुळे, मी माझ्या सर्व लोकांना दुःख सहन करायला लावू का ?

फिरौंनने मूसा अ. यांचे काही ऐकले नाही आणि त्यांच्या संदेशावर वर खूप नाराज झाला, कारण तो स्वतःला अल्लाह (प्रभू) समजत होता...

"तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, मूसा? कोण आहे तुझा अल्लाह (यहोवा)?" त्याने विचारले...

"माझा अल्लाह हा, तो आहे ...ज्याने हे विश्व बनविले...त्याला भूतकाळाविषयी पूर्ण ज्ञान आहे...त्याने ही धरती, तुझ्या चालण्यासाठी बनविली आणि तोच पाऊस खाली पाठवतो.." मूसा अ. उत्तरले...

"हा हा...", फिरौंन हसला..." , मला माहीत आहे की, माझ्याशिवाय कोणीच प्रभू नाही..." मग तो त्याच्या मंत्र्यांकडे वळला आणि म्हणाला, "हमाम, खूप उंच इमारत बनली का? जेणेकरून मी त्याच्या शिखरावर चढू शकेल आणि मूसाच्या अल्लाहला भेटेन..., नक्कीच तो खोटे बोलत आहे..."

पण मनातून फिरौंनला खात्री नव्हती...त्याने मूसा अ. यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला.
"मी तुला तुरुंगात टाकेल, मूसा, जर तू म्हणाला की, माझ्याशिवाय दुसरा कोणी प्रभू आहे"..तो म्हणाला. "जर तू बरोबर आहे, तर तू मला काही स्पष्ट निशान्या, तुझे म्हणणे सिध्द करण्यासाठी दाखविल्या पाहिजेत... "

मूसा अ. तयार झाले...अल्लाहने त्यांना, दोन चमत्कार (Miracles, मोजजे)
दाखविण्याच्या शक्ती सोबत आशीर्वाद दिला होता.
त्यांनी त्यांची काठी खाली फेकली आणि ती एका सापात बदलली...मग त्यांनी त्यांचा हाथ त्याच्या काखेत नेला आणि बाहेर काढला...तो प्रखरतेने चमकू लागला...यावर दरबारातील लोक म्हणाले, "हा माणूस नक्कीच जादूगार आहे.." 

फिरौंनने इजिप्तच्या सगळ्या हुशार जादूगारांना, त्यांची जादू मूसा अ. यांना दाखविण्यासाठी बोलावले...

एक दिवस आणि वेळ स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आली आणि  हे मान्य करण्यात आले की, जो स्पर्धेत जिंकेल, तो खरा योग्य आहे, असे मानण्यात येईल...त्या काळी जादूचे खेळ इजिप्त मध्ये खूप प्रसिद्ध होते...त्यामुळे सर्व शहरातून लोक ते पाहण्यासाठी आले...

मूसा अ. यांनी स्पर्धा ठेवण्याबद्दल, फिरौंनचे मन बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, "आम्ही जादूगार नाही, आम्ही अल्लाहचे  संदेशवाहक आहोत. अल्लाहवर शंका करू नको..तो तुझा नाश करू शकतो..."

पण फिरौंनने निश्चय केला होता की, स्पर्धा ठेवायची...कारण तो त्याच्या जादूगारांवर अगदीं खात्री बाळगून होता...

शेवटी मूसा अ. मानले...," ठीक आहे, यामुळे प्रत्येकासमोर सत्य काय आहे ते सिद्ध होईल..."

जादूगारांनी फिरौंनला विचारले, "जर आम्ही जिंकलो तर तुम्ही पारितोषिक देणार का?"

"नक्कीच", फिरौंन उत्तरला..."मी तुम्हाला उच्च पद ही देईन".

"कोण सुरू करनार?" जादूगारांनी विचारले.."तू का आम्ही ?"

"तुम्ही" मूसा अ. यांनी उत्तर दिले...

जादूगारांनी त्यांच्या सळया आणि काठ्या खाली फेकल्या, ज्या सापांमध्ये बदलल्या...काही क्षणासाठी मूसा अ. यांना चिंता वाटली की, ह्यामुळे ती गर्दी प्रभावित झाली असेल...

पण अल्लाहने त्याला धीर दिला, "काळजी करू नको, मूसा, तू जिंकशील...तुझी काठी फेक"

मूसा अ. यांनी तसे केले...आणि त्यांची काठी एक मोठा सर्प बनून, त्या सापाने त्याच्या आजूबाजूचे सर्व साप गिळून टाकले...प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला...ह्याने जादूगारांचा पराजय सिद्ध  झाला.. आणि सत्याचा विजय झाला...ह्याने हेही सिद्ध झाले, की मूसा अ. आणि हारून अ. हे अल्लाहचे खरे संदेशवाहक होते...

जेव्हा जादूगारांना ह्याची जाणीव झाली, ते सगळे गुडघ्यावर पडून वाकून नमन करू लागले...आणि म्हणाले, " आम्ही मूसाच्या अल्लाहवर विश्वास करतो. जो खरोखर विश्वाचा निर्माता आहे......

फिरौंन यावर संतापला होता आणि ओरडला, "जर तुमचे धैर्य असेल तर तसे करा. मी तुमचा डावा हाथ आणि उजवा पाय कापून टाकेन आणि तुम्हाला झाडांना अडकवेल.."

"तुला जे आनंद देईल ते तू कर," जादूगारांनी उत्तर दिले...,"पण आता आम्ही सत्य निष्ठा स्वीकार केली आहे...आमचा अल्लाह,
(ईश्वर)आमच्या भूतकाळातील जादू दाखविण्याच्या पापासाठी आम्हाला क्षमा करो, जे तू आमच्याकडून जबरदस्तीने करून घेतले...."

थोड्या संख्येनेे, तरुण व्यक्ती, जेव्हा त्यांनी हे घडलेले पाहिले, मूसा अ. यांच्या धर्माचे अनुयायी बनले...पण ते, त्यांची श्रद्धा उघडपणे जाहीर करण्यास, फिरौंनच्या भीतीमुळे घाबरत होते...

मूसा अ. इजिप्त मध्ये लोकांना उपदेश देत होते...इजिप्त मध्ये एक खूप श्रीमंत माणूस राहत होता "कारून". त्याचा खजिना अगणित होता...त्याने शक्तिशाली माणसे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळण्यासाठी ठेवली होती...ते त्या चाव्यांच्या ओझ्याने पार थकून गेले होते...

मूसा अ. नेहमी रस्त्यात आणि शहराच्या चौकात उपदेश द्यायचे...ते त्यांच्या लोकांना आठवण करून द्यायचे की, फक्त एका आणि एकाच अल्लाहची (ईश्वराची) आराधना करा...आणि सांसारिक गोष्टींची काळजी करणे थांबवा...

एकदा त्याचवेळेस "कारून" तेथून जात होता...भव्य रुबाबदार अंगरखा घातलेला त्याचा पोषाख होता  आणि त्याच्या मागे त्याचे सेवक, जे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळून होते...चालत होते...

त्याच्या संपत्तीचे आणि सामर्थ्याचे हे प्रदर्शन होते...यामुळे जे तरुण लोक मूसा अ. यांचे ऐकत होते, त्यांचे ध्यान विचलित झाले...

त्यांच्यातले काही, कारूनच्या अवाढव्य संपत्तीला, एक मत्सराने भरलेल्या नजरेने पाहण्यासाठी, अल्लाहच्या संदेशाचे शब्द सोडून, तिकडे वळले...त्यांनी, 
 जीवना नंतर, येणाऱ्या मृत्यू 
नंतरच्या स्वर्गाच्या सुखापेक्षा, अशा संपत्तीची, जी जास्त दिवस राहत नाही, इच्छा केली...

या कारूनच्या संपत्तीच्या आणि सामर्थ्याच्या प्रदर्शनाने मूसा अ. यांचे कार्य अजून कठीण केले... मूसा अ. यांनी कारूनला म्हंटले, "अल्लाहने तुझ्यावर कृपा केली आहे आणि तुला इतकी जास्त संपत्ती दिली आहे...तू गरीबांसाठी दयाळू होऊन, त्यांना दान केले पाहिजे..."

कारून निर्लज्जपणे फुशारकी मारत म्हणाला, "ही माझी संपत्ती आहे, जी मी माझ्या कौशल्याने आणि बुध्दीने मिळविली आहे...तुझ्या अल्लाहने मला दिली नाही...मी का या संपत्तीला दान देऊ? मी मूर्ख नाही, मूसा..."

मूसा अ. खूप नाराज झाले...पण ते काही करू शकत नव्हते...कारून त्याची संपत्ती गरिबांना आणि गरजूंना वाटू इच्छित नव्हता...तो स्वार्थी आणि हट्टी होता...आणि असे मानत होता की, त्याची संपत्ती त्याच्या कष्टांचे फळ आहे...आणि अल्लाहची कृपा नाही...

अल्लाह त्यांना देतो, जो त्याला आनंदी ठेवतो..(गरिबांना दान करून) आणि त्यांच्याकडून घेतो, जो त्याला नाराज करतो...लवकरच लोकांना कळाले की, स्वर्गाचा आणि धरतीचा भव्य खजिना कोण नियंत्रित करतो...

अल्लाहने कारूनला जे पुष्कळ दिले होते, ते त्याच्याकडून घेतले....फुशारकी मारणारा कारून जमिनीत त्याच्या खजिन्याच्यासोबत नष्ट झाला..धसला गेला... त्याचा पैसा त्याच्या किंवा कुणाच्याही, काही कामी आला नाही...

जेव्हा लोकांनी त्याचे भाग्य पाहिले, त्यांना जाणीव झाली की, मूसा अ. बरोबर होते आणि तो गर्विष्ठ आणि फुशारकी मारणारा नाश होणाऱ्यांमध्ये होता....

"फिरौंनला घाबरु नका", मूसा अ. 
त्यांच्या लोकांना म्हणाले,
 " अल्लाह वर निष्ठा ठेवा आणि त्याला मदत मागा..."

मूसा अ. त्यांच्या लोकांना इजिप्तपासून त्यांच्या बापदादांच्या (युसुफ अ. आणि याकूब अ.) जमिनीवर घेऊन जाण्यास इच्छुक होता...पण ते इजिप्शियनचे नोकर (गुलाम) होते, त्यामुळे जाऊ शकत नव्हते...

मूसा अ. यांनी त्याच्याकडून जितके होऊ शकते तितके त्यांना मदत केली आणि मार्ग दर्शन केले...

जेव्हा फिरौंनला मूसा अ. यांचा हेतू समजला, त्याने मूसा अ. यांना आणि बनी इस्राईलचे तरुण लोक, जे मूसा अ. यांच्या धर्माचे अनुयायी बनले होते, त्यांना मारण्याचा निर्णय घेतला...

पण त्याच्या दरबारातील एका दरबाऱ्याला ,जो गुप्तपणे  मूसा अ. यांच्या धर्माचा अनुयायी बनला होता, त्याने फिरौंनला तसे करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला.

"तुम्ही त्याला का मारू इच्छिता?" त्याने विचारले.."फक्त यासाठी का? की, तो असे मानतो की, तुम्ही त्याचे प्रभू नाही..."

मग तो धैर्याने बोलला आणि लोकांना त्या शिक्षेची आठवण करून दिली, जी, त्या लोकांवर येणार आहे, ज्यांनी पूर्वी खऱ्या प्रभूचे अस्तित्व नाकारले आहे...

या त्याच्याविरोधातल्या खुल्या बंडाने, फिरौंन खूप रागावला आणि त्याला सुद्धा, मारण्याची धमकी दिली...

जेव्हा फिरौंनच्या क्रौर्यतेने सगळ्या मर्यादा पार केल्या..,अल्लाह ने मूसा अ. आणि त्याच्या लोकांना आज्ञा केली की, रात्री शांततेने इजिप्त सोडून जा...त्यामुळे मूसा अ., हारून अ. आणि बनी इस्राईलचे लोक शांततेने "कानान" (आताचे पॅलेस्टाईन किंवा फिलिस्तिन) कडे निघाले...जी त्यांच्या बापदादांची जमीन होती...

इजिप्तपासून खूप दूरचा रस्ता होता आणि रस्त्यात नदी होती...(काही म्हणतात तो समुद्र होता).त्यांना दुसऱ्या काठावर जाण्यासाठी, ती नदी पार करायची होती...पण ते तसे करू शकण्याआधी, फिरौंनने शोधून काढले की, त्यांनी सुटका करून घेतली आहे...

तो मोठ्या सैन्यासह तो त्यांच्या मागे गेला...बनी इस्राईलचे लोक, भयंकर घाबरले आणि मूसा अ. कडे वळून म्हणाले, "आता, आपण पकडले गेलो..."

"नाही, कधीही नाही, "मूसा अ. यांनी उत्तर दिले.."अल्लाह (ईश्वर) आपल्या सोबत आहे. 
तो आपल्याला मार्ग दाखवेल..."

या अशा असहाय्यतेच्या वेळी, जेव्हा फिरौंनचे सैन्य मागे होते आणि खोल पाणी समोर होते, त्यांना अल्लाहशिवाय कोणीच मदत करू शकत नव्हते...आणि अल्लाहने मदत केली.

अल्लाहने मूसा अ. यांना आज्ञा केली की, "तुझ्या काठीने पाण्यावर वार कर...". त्यांनी तसे केले आणि लोकांना त्यामधून चालण्यासाठी, मध्ये कोरडा रस्ता बनून, पानी दोन्हींकडे विभागले (दोन भाग झाले..) बनी इस्राईलच्या लोकांनी नदी पार केली आणि सुरक्षितपणे दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले...

जेव्हा फिरौंनच्या सैन्याने हे पाहिले, ते पाणी पार करण्यासाठी त्याच रस्त्यावरून धावले, जो एका चमत्काराने निर्माण झाला होता...पण जसे ते मध्यभागी पोहोचले, मोठ्या लहरींच्या रूपाने, पाणी वापस आले आणि पूर्ण सैन्य बुडाले....

फिरौंन मरताना ओरडला, "हो, मी विश्वास करतो, बनी इस्राईल ज्याची निष्ठा करतात, तो एकच अल्लाह  (यहोवा, ईश्वर) आहे...दुसरा कोणताही नाही..."

आणि अल्लाह म्हणाला, "तर तू शेवटी मला मानले."  पण, खूप उशीर झाला होता ...

(फिरौंनचे शरीर अजूनही तसेच आहे.... संग्रहालयात ठेवलेले आहे...ज्या पाण्यात तो बुडाला होता तो "रेड सी ( red sea)" आहे, असे मानतात...आणि तिथले पाणी हे खूप खारे असल्याने त्याचे शरीर तसेच राहीले..आणि अल्लाहने कुरआन
मध्ये हे सांगितले आहे की, येणाऱ्या पिढ्यांना ते शरीर पाहता यावे आणि त्याला दिलेली शिक्षेची आठवण व्हावी म्हणून ते शरीर तसेच ठेवण्यात येईल....)

नदी पार केल्यानंतर मूसा अ. आणि बनी इस्राइल चे लोक अशा निर्जन ठिकाणी पोहोचले, जेथे पाणी, झाडे आणि घरे नव्हती....

इस्राइलचे लोक नम्र आणि सौम्य झाले होते...शतकांपासून ते दाबून राहिले होते, त्यामुळे ते धैर्य आणि आत्मविश्वास गमावून बसले होते...

इजिप्त मधून सुटकेनंतर ते थकून गेले होते...ते भुकेले होते आणि घाबरलेले होते...आणि त्यांना मार्गदर्शन, मदत आणि आश्वासन पाहिजे होते...

मूसा अ. आणि हारून अ. यांच्यासाठी हे एक कठीण काम होते...

मूसा अ. आणि हारून अ. यांनी, त्यांना समजावून सांगितले की, जर ते अल्लाहची आज्ञा पाळत राहिले, तर अल्लाह (ईश्वर) निश्चितपणे त्यांची मदत करेल.. फिरौंनच्या हातून अपमानाच्या जीवनापेक्षा, एक 
स्वतंत्र जीवन आणि सत्य श्रद्धा ही कितीतरी चांगली आहे...

इतक्या दिवसापासून, जे लोक दाबून जीवन जगत होते, त्यांनी त्यांचा आत्मविश्वास आणि काही नवीन  करून दाखवायची इच्छा गमावली होती....

त्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केली, "मूसा, तू आम्हाला कोठे आणले आहे? इथे पाणी नाही...आम्ही काय पिणार आहे? तहानेने आम्ही मरून जावू..."

मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने त्यांना म्हंटले की, "त्याची काठी, एका खडकावर मार...". मूसाने अ. यांनी तसे केले आणि बारा पाण्याचे झरे (प्रवाह), त्या कोरड्या खडकातून वाहू लागले...जेणेकरून तेथे प्रत्येकासाठी पुष्कळ पाणी झाले...

त्यांनी मूसा अ. यांच्याकडे वळून म्हंटले, "आता आम्हाला पाणी आहे, पण अन्नाविषयी काय? आम्ही भुकेले आहोत...आम्ही काय खाणार? पुन्हा मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने उत्तर दिले, "काळजी करू नको मूसा, तुम्हाला अन्नही मिळून जाईल".

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक झोपेतून उठले, त्यांनी झुडूपांवर, काही मऊ आणि पांढरे पाहीले...हे "मन्न" होते...एक प्रकारचे अन्न ज्याचा आकाशातून थेंबासारखा पाऊस झाला होता...त्याची चव गोड होती...

दिवसा, जोऱ्याचा वारा आला आणि त्याच्यासोबत एक खूप मोठा क्वेलस् (लहान पक्षी) चा कळप उडत आला...आणि जमिनीवर सर्वीकडे बसला...लोकांनी त्यांना हातांनी पकडले आणि जेवणासाठी भाजले...हे "सलवा" होते....

त्या दिवसापासून बनी इस्राइलच्या लोकांना रोज मन्न आणि सलवा भेटू लागले...पण अल्लाहने त्यांना दुसऱ्या दिवसासाठी अन्न जमा करून ठेवण्यास मनाही केली...

अल्लाहने त्यांना अन्न आणि पाणी पुरविल्यावर, लोक पुन्हा मूसा अ. यांच्याकडे येऊन म्हणाले, "आम्हाला येथे घरे ही नाही आणि सावली ही नाही, मूसा...आम्ही उन्हाच्या उष्णतेने मरून जाऊ, असे आम्हाला वाटते...

मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली..अल्लाहने उन्हापासून त्यांच्या रक्षणासाठी भारी ढग पाठविले...

लवकरच त्यांचा त्रास कमी होईल, जेव्हा ते त्यांना वचन दिलेल्या, त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर पोहोचतील...आणि हे सर्व एका चांगल्या कारणासाठीच होते की, त्यांनी इजिप्त सोडले, हे  त्या लोकांना समजावणे मूसा अ. यांना कठीण होऊन बसले... मूसा अ. यांनी, अल्लाहच्या मदतीने त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या....

त्यांनी आपसांत वाद आणि भांडण
सुरू केले...

ते म्हणाले, " मूसा मन्न आणि सलवा पुरेसे नाही...आम्हाला कांदा, लसूण, डाळ,आणि हिरव्या भाज्या पाहिजेत...तुझ्या अल्लाहला हे देण्यास सांग"

त्यांच्या कृतघ्नते ने मूसा अ. नाराज झाले, "इतक्या चांगल्या अन्नाऐवजी तुम्हाला या सामान्य वस्तू पाहिजे का? बरं, मग तुम्ही एका शहरात जा आणि तेथे राहा, जेथे तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल..."

लवकरच ते एका शहरापासून जात असताना त्यांनी पाहिले की , लोक दगडाच्या पुतळ्याची आराधना करत होते....ते मूसा अ. यांना म्हणाले की, "मूसा, आमच्यासाठीही अशी प्रतिमा बनव".

मूसा अ. खूप नाराज झाले आणि त्यांना वीट आला. "अरेरे...", ते म्हणाले..., "तुम्ही खरेच अज्ञानी आहात...तुम्हाला अजूनही तुमच्यासाठी, एकाच आणि खऱ्या अल्लाह 
(ईश्वर) च्या  ऐवजी, पुतळे (प्रतिमा)  पाहीजे का?

बनी इस्राइलच्या लोकांनी आग्रह केला... खूप थोडे जे खरंच अल्लाहवर विश्वास करत होते, ते सोडून बाकी सर्व खरंच अज्ञानी आणि खूप कृतघ्न  होते....

अल्लाहने मूसा अ. यांना वचन दिले होते की, जेव्हा त्यांचे लोक इजिप्त सोडतील, त्यांना अल्लाह (ईश्वर) चा कायदा 
( commandmends) देण्यात येईल...
म्हणून इजिप्त सोडल्यानंतर मूसा अ. 
"तूर" या पर्वतावर प्रार्थनेसाठी गेले....त्यांनी त्यांच्या भावाला हारून अ. यांना, जेव्हा ते दूर असतील तेव्हा, त्यांच्या लोकांची काळजी घेण्यास सांगितले...

तेथे मूसा अ. यांनी अल्लाहला चाळीस दिवस पूर्ण भक्तीने प्रार्थना केली. "हे माझे प्रभु....माझ्यासमोर प्रकट हो, जेणेकरून मी तुला पाहू शकेन", त्यांनी प्रार्थना केली....

आणि अल्लाहने उत्तर दिले, "हे तुझ्यासाठी शक्य नाही, की तू मला प्रत्यक्षपने पाहू शकशील...पण जर तू आग्रह करत असशील तर, त्या टेकडीकडे पाहा....जर मला पाहण्यासाठी, तू ते सहन करू शकला, तर तू करू शकतो...". मूसा अ. यांनी  आग्रह केला...

आणि जेव्हा अल्लाह ( ईश्वर) ने त्याची तेजस्विता (प्रकाश,चमक) टेकडीवर
दाखविली, ती टेकडी विखरली आणि मूसा अ. बेशुद्ध होऊन खाली पडले...

जेव्हा ते शुध्दीवर आले, मूसा अ. म्हणाले, "तुझा गौरव असू दे, हे अल्लाह...मी क्षमेची याचना करतो आणि मी तो पहिला विश्वास करणारा आहे..."

अल्लाहने मूसा अ. यांना त्यांचा कायदा दिला आणि त्यांचा ग्रंथ दिला "तौरात 
(तोराह) आणि म्हणाला, 
"मूसा मी तुझ्याशी संभाषण केले...आणि तुला एक प्रेषित (संदेष्टा) म्हणून निवडले....म्हणून मी जे दिले आहे, ते घे आणि कृतज्ञ (आभारी) राहा..ते मजबुतीने पकड...आणि तुझ्या लोकांना त्या खऱ्या श्रद्धेचे अनुसरण करावयास सांग..."

जेव्हा मूसा अ. दूर, तूर डोंगरावर होते, त्यांच्या लोकांनी त्यांच्याविरुद्ध बंड केले...

तेथे त्यांच्यामध्ये एक जादूगार होता.. सामरी...

त्याने त्या लोकांकडून सोन्याचे अलंकार जमा केले आणि त्यांना वितळविले....ते पातळ सोने एका साच्यात ओतले आणि एक सोन्याचे बछडे बनविले. जे आवाज काढू शकत होते....मग त्याने लोकांना त्याची आराधना करण्यास सांगितले....

जेव्हा मूसा अ. तूर डोंगरावरून वापस आले आणि त्यांच्या लोकांना, एका सोन्याच्या बछड्याची आराधना करतांना पाहीले...ते उग्र झाले...त्यांनी त्यांच्या भावाला त्याची दाढी पकडून ओढले...आणि म्हणाले, "मी तुला सांगितले नव्हते का, की त्यांना मार्गदर्शन कर आणि माझ्या अनुपस्थितीत त्यांची काळजी घे? तू ते का केले नाही?"

हारून अ. म्हणाले, "भाऊ, या लोकांसमोर माझ्यावर रागावू नको...अल्लाहला माहीत आहे, की मी त्यांना म्हंटले होते की, ते जे करत आहेत, ते करू नका...जर मी त्यांच्याशी जास्त कठोर नव्हतो, तर ते केवळ या भीतीपायी की ,जेव्हा तू दूर असशील, तेव्हा ते आपसांत भांडतील....आणि तू  वापस आल्यावर माझ्यावर रागावशील..."

मूसा अ. त्यांच्या लोकांकडे वळले आणि म्हणाले, माझ्या लोकांनो, तुम्ही हे का केले? तुम्हाला अल्लाहने त्याच्या कृपेचे वचन दिले नव्हते का? मग का तुम्ही एवढ्या लवकर त्याला विसरला? तुम्हाला स्वतःला मारण्यासाठी, अल्लाहचा प्रकोप पाहीजे आहे का? कारण तुम्ही मला दिलेले तुमचे वचन तोडले...."

त्या सोन्याच्या बछड्याकडे इशारा करत ते म्हणाले, "आणि आता पाहा तुमच्या आराध्याकडे...आपण त्याला आगीत वितळवू आणि त्याचे अवशेष समुद्रात टाकू...एक आणि फक्त एक अल्लाहच्या शिवाय दुसरा कोणताही प्रभु नाही...माझ्या लोकांनो, तुम्ही, एक सोन्याचा बछडा तयार करून आणि त्याची आराधना करून, एक अपराध केला आहे... आता खऱ्या अल्लाहकडे वळा, आणि त्याची क्षमा याचना करा...आणि त्याला असे बलिदान द्या की, तो तुमच्यावर दया करो..."

मूसा अ. यांचे लोक आधी होतेे, तसेच हट्टी होते. त्यांनी, जोपर्यंत ते अल्लाहला त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तोपर्यंत, अल्लाहवर विश्वास ठेवण्यास नकार दिला... मूसा अ. यांनी  सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला की, ते शक्य नाही, पण त्यांनी आग्रह धरला....

शेवटी, मूसा अ. यांनी, त्यांच्यामधील सत्तर लोकांना निवडले...आणि त्यांना स्वतःसोबत तूर डोंगरावर घेऊन गेले, जेथे त्यांनी अल्लाहशी संभाषण केले होते..पण हेही त्यांना पटवून देण्यात पुरेसे नव्हते...त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी अल्लाहला पाहण्याचा आग्रह धरला...

अल्लाह त्यांच्या हट्टीपणावर रागावला...भयानक वीज चमकली, मेघ गर्जना झाली आणि भूकंप आला...आणि सर्व सत्तर माणसे मृत होऊन खाली पडली...

जेव्हा मूसा अ. यांनी हे पाहीले, त्यांनी अल्लाहला पूर्ण प्रामाणिकतेने याचना केली की, त्यांच्या लोकांना, त्यांच्या अविश्वासाठी क्षमा कर, "हे माझ्या प्रभु, आमच्यावर दया कर...आम्हाला सर्वांना, काही लोकांच्या मूर्खतेमुळे, नष्ट करू नकोस."

अल्लाहने दया दाखविली आणि मृत लोकांना पुन्हा जीवन देऊन, वापस आणले....जेणेकरून ते कृतज्ञ बनतील...ते त्यांचे डोळे चोळत उठले आणि चमत्कार पाहून चकीत झाले...

अल्लाहने म्हंटले, "माझी कृपा त्यांच्यासाठी असेल जे योग्य करतील आणि दान देतील आणि त्यांच्यासाठी असेल जे प्रेषितांना  (संदेशवाहक) ज्यांचे नाव त्यांच्या ग्रंथात , इंजिल (बायबल) आणि तौरात (तोराह) आहे, अनुसरण करतील.....ते असे असतील, ज्यांची भरभराट होईल...

जेव्हा हे सत्तर लोक, त्यांच्या लोकांकडे वापस गेले, त्यांनी त्यांचा अनुभव वर्णन केला आणि म्हणाले, "मूसा खरंच अल्लाहचा एक  संदेशवाहक आहे..."

त्यांनी त्यांना जो वृत्तान्त सांगितला, त्यावर विश्वास करण्यासही सांगितले...पण ते लोक अजूनही शंका करत होते...आणि ऐकण्यासाठी इच्छुक नव्हते....

मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा अल्लाहने, तूर डोंगर उचलून, त्या लोकांच्या डोक्यावर आणून, त्यांना चमत्कार दाखविला. जेव्हा त्यांनी पाहिले की, तो डोंगर त्यांच्यावर पडणारच आहे, ते घाबरले आणि ओरडले, "आम्ही विश्वास करतो की, मूसा हा अल्लाहचा संदेशवाहक आहे आणि हा तौरात 
(Torah) हा अल्लाह (ईश्वर) चा 
 प्रकट झालेला ग्रंथ आहे...

बनी इस्राइलचे लोक, एक खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले, जे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे वचन दिले होती...त्याच्या जवळच होते...

मूसा अ. यांनी त्यांना म्हंटले की, "तुमच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि तुमची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा."

मूसा अ. म्हंटले, "धैर्याने, आणि अल्लाहवरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा...जर असे कराल तर , विजय तुमचाच होईल."  त्यांनी असे आश्वासन दिले...

त्या लोकांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला...

मूसा अ. यांनी बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले...

जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी भयानक कहाण्या सांगितल्या...लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला... 

"आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मूसा.  तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो" , ते म्हणाले... मूसा अ. काहीच मदत करू शकत नव्हते...

मूसा अ. त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेले होते...त्यांनी त्यांचे उरलेले आयुष्य, त्या लोकांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले... स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात त्यांची शेवटची
वर्षे गेली...

मूसा अ. यांच्या मृत्युनंतर त्यांचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले... मूसा अ. यांनी आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले...आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले...

त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले...आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला...जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत...

शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाहने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की, शहरात विनम्रतेने...अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा...

त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला. त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही...

त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली...हे त्यांच्या मर्यादापेक्षा अती झाले होते...अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला...


🌴🌴🌍मूसा अ. आणि खिझ्र अ.

खीझ्र अ. हे एक ज्ञानी माणूस होते...

जेव्हा मूसा अ. यांनी खिझ्र अ.यांच्या ज्ञानाविषयी ऐकले,  एका सहकाऱ्यासोबत त्यांना शोधण्यासाठी निघाले....आणि जोपर्यंत त्यांना ते भेटत नाही, तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही, असा निर्णय घेतला...

जेव्हा ते एका जागी पोहोचले जेथे दोन पाण्याचे प्रवाह (झरे), एका प्रवाहात एकत्र होऊन वाहत होते..., मूसा अ. खूप थकले आणि एका खडकावर गाढ झोपले...

तेथे, मासा जो त्यांनी त्यांच्या दुपारच्या जेवणासाठी आणला होता, जिवंत झाला आणि त्याने पाण्यात उडी मारली...आणि पोहत एक चंदेरी रेषा बनवत दूर गेला.... मूसा अ. यांच्या सहकाऱ्याने हे पाहीले पण याबाबत मूसा अ. यांना सांगण्यास विसरला...

त्यामुळे त्यांनी, जोपर्यंत मूसा अ. यांना भूक लागत नाही आणि ते, सहकाऱ्याला मास्याविषयी विचारत नाही, तोपर्यंत, त्यांचा प्रवास पुढेे तसाच चालू ठेवला.

त्यानंतर, सहकाऱ्याने मूसा अ. यांना जे घडले आहे ते सांगितले... मूसा अ. यांना त्या क्षणी वाटले की, त्यांना
खीझ्रकडे जाण्यासाठी, मार्ग दाखविण्यासाठी तो एक संकेत होता....

म्हणून ते वापस त्या जागी गेले, जेथे ते गाढ झोपले होते...आणि त्यांनाा, एक संतासारखे व्यक्ती त्याच खडकावर बसलेले दिसले...ते खीझ्र अ. होते....

मूसा अ. यांनी, त्यांना अभिवादन केले आणि म्हंटले, "जे अल्लाह खिझ्रच्या द्वारे मूसाला माहीत करवून देणार होते...ते जाणण्यासाठी मी आलो आहे..."

खिझ्र अ. म्हणाले, "अल्लाहने (ईश्वराने)
मला त्याच्या काही रहस्याचे ज्ञान दिले आहे....जे तुला माहीत नाही...तुला ते विचित्र वाटेल आणि त्यामुळे जेव्हा तू माझ्यासोबत असशील, तेव्हा तुला स्वतःला प्रश्न विचारण्यापासून थांबवणे, हे तुझ्यासाठी अवघड होईल..."

पण जेव्हा मूसा अ. यांनी वचन दिले की, ते संयमी राहील. खिझ्र अ. मूसा अ. यांना त्यांच्या सोबत घेऊन जाण्यास आणि शिकण्यास, या अटीवर की ते फक्त लक्ष देऊन पाहतील आणि कोणतेही प्रश्न विचारणार नाही, तयार झाले...

मूसा अ. खिझ्र अ. सोबत गेले...लवकरच ते एका नदीवर आले आणि खिझ्र अ. यांनी नदी पार करण्यासाठी, एक नाव भाड्याने घेतली...नावे वरील लोक खिझ्र अ. यांना ओळखत होते...आणि त्यांना नदी पार करवून देण्यासाठी, त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही...

जेव्हा ते नदी पार करत होते, खिझ्र अ. यांनी, एक फळी तोडून, नावेत एक छिद्र केले.....हे जास्त विचित्र होते... मूसा अ. यावर नाराज झाले...आणि खिझ्र अ. यांना  म्हणाले, "या अशाप्रकारे, त्यांच्या दयाळुतेची तुम्ही भरपाई करणार आहात का? तुम्ही ते का केले?"

"मी तुला म्हटले नव्हते का, की कोणताही प्रश्न विचारायचा नाही?", खिझ्र अ. बोलले....

त्याच वेळेस एक पक्षी आला आणि नौकेच्या पुढच्या निमुळत्या भागावर बसला आणि एक थेंब पाणी पिला...तिकडे इशारा करून खिझ्र अ. म्हणाले, " अल्लाहच्या ज्ञानाशी तुलना करतांना, जे एका महासागरासारखे आहे, आपले ज्ञान त्या एका थेंबासारखे आहे..."

मूसा अ. यांना त्यांची चूक कळली, वचनाची आठवण करून, त्यांनी माफी मागितली, "मी पुढच्या वेळेस जास्त सावध राहील", ते म्हणाले.....

जेव्हा ते नदीच्या पलीकडे, शहरात पोहोचले आणि ते त्या शहरातून जात असताना, त्यांनी एका मुलाला पाहिले...काहीच खास कारण नसतांना खिझ्र अ. यांनी त्या मुलाला मारले.....

हे मूसा अ. यांच्यासाठी सहन करने खूप कठीण होते....ते त्यांचे वचन विसरले आणि त्यांनी रागाने विचारले, "त्या निरागस मुलाला तुम्ही का मारले?"

खिझ्र अ. यांनी काहीच उत्तर दिले नाही....त्यांनी फक्त मूसा अ. यांना त्यांच्या वाचनाची आठवण करून दिली...आणि म्हणाले, "जर तू पुन्हा एकदा तुझे वचन तोडले तर मी तुला सोडून जाईल"

मूसा अ. यांनी माफी मागितली...आणि वचन दिले की, पुन्हा प्रश्न विचारणार नाही...

लवकरच ते दुसऱ्या शहरात पोहोचले जेथे, कुणालाही आश्रय देण्यास नाखूष असे लोक होते....त्यांनी मूसा अ. आणि खिझ्र अ., या प्रवाश्यांना कोणतेही अन्न आणि निवारा दिला नाही...

खिझ्र अ. एका भिंतीजवळ आले, जी अगदी कोसळणारच होती... खिझ्र अ. यांनी ती भिंत, कामाचे काहीही पैसे न घेता दुरुस्त केली....

मूसा अ. यांना, ही निर्दयपनाच्या बदले, दयाळूता कळाली नाही....ते स्वतःला विचारण्यापासून थांबवू शकले नाही, "जर ते लोक आपल्याशी इतके निर्दयी राहिले, तर तुम्ही हे का केले? कमीत कमी त्यामुळे काही अन्न विकत घेण्यासाठी, तुम्ही काही पैसे घेऊ शकत होता"

"अरेरे", खिझ्र अ. म्हणाले, "तू संयम ठेऊ शकला नाही...आपण वेगळे होण्याची ही वेळ आहे...पण मी तुला सांगतो की मी का केले आणि मी काय केले"

"ती नाव ज्या मध्ये मी छिद्र पाडले, ती गरीब लोकांची होती, ज्यांनी त्यापासून त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह मिळवला... नदीच्या पलीकडे राहणारा राजा खूप क्रूर आहे आणि सगळी चांगली चालणारी नावे जबरदस्तीने घेऊन टाकतो....त्याने ती नाव ही घेतली असती...म्हणून मी त्यात छिद्र पाडले..."

"पण तुम्ही त्या मुलाला का मारले?" मूसा अ. यांनी विचारले...

"मी त्याला मारले कारण त्याचे माता पिता खूप साधे आणि सद्गुणी लोक आहेत," खिझ्र अ. म्हणाले,      "पण तो एक खूप दुष्ट व्यक्ती म्हणून मोठा होणार होता...आणि त्यांचे जीवन दयनीय करणार होता....यामुळे ते नाराज झाले असतील पण या वेदना आणि दुःख खूप कमी आहे, त्यापेक्षा जेव्हा तो मोठा होऊन एक पापी बनला असता आणि तेव्हा त्यांना जे सहन करावे लागले असते....अल्लाह लवकरच त्यांना दुसरा मुलगा देईल जो त्यांच्या वृद्धापकाळात एक आनंद देईल"

"शेवटच्या कृत्य काय होते? तुम्ही ती भिंत का नीट केली, त्या लोकांनी आपल्याला इतका निर्दयपना दाखवूनही," मूसा अ. म्हणाले....

"बरं, मी तसे केले कारण त्या भिंतीखाली, दोन अनाथ मुलांच्या मालकीचा खजिना लपलेला आहे..." खिझ्र अ. म्हणाले, "त्यांचे पिता खूप सद्गुणी मनुष्य होते...आणि ही अल्लाहची इच्छा आहे की, जेव्हा ही मुले मोठी होतील, तेव्हा खजिना शोधून काढतील..."

मूसा अ. समोर हे सर्व स्पष्ट केल्यानंतर खिझ्र म्हणाले, " लक्षात घे, मी स्वतःहून काहीही केलेले नाही, ही सर्व अल्लाहची इच्छा होती..."

मग खिझ्र अ. मुसा अ. यांना, आश्चर्यचकित सोडून निघून गेले...आणि ते, या विचारांत हरवून गेले, की अल्लाहच्या रहस्यांविषयी मनुष्याला किती कमी माहीत आहे...खरंच प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि एकट्या अल्लाहला सर्व माहीत आहे...

सोमवार, २९ जून, २०२०

ईसा अ.

🌹🌴ईसा अ.🌴🌹
मरियम एका पवित्र वातावरणात मोठी झाली. सदाचारी लोकांत, ती एक खूप धार्मिक (ईश्वरनिष्ठ) मुलगी बनली. तिने तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीत प्रार्थना करण्यात खर्च केला आणि स्वतःला अल्लाहच्या सेवेसाठी अर्पण केले. तिची धर्म निष्ठा इतकी चांगली होती की, तिच्यापेक्षा मोठे लोकही तिचा सन्मान करायचे आणि तिच्याकडून प्रेरणा घ्यायचे.

तिची ईश्वर निष्ठा आणि पावित्र्य असाधारण होते. जे तिला ओळखत होते, त्या प्रत्येकाकडून तिने, तिची प्रतिष्ठा जिंकली होती.

एक दिवस जेव्हा मरियम तिच्या खोलीतून, एका वेगळ्या जागेत, जिथे पडदे टाकून आच्छादन केले होते, गेली तेव्हा तिने एक  व्यक्ती तिच्यासमोर उभा राहिलेला पाहिले. मरियम घाबरली होती. "कोण आहे तू?" तिने विचारले. "ईश्र्वरासाठी जवळ येऊ नकोस. मी अल्लाहचा आश्रय मागते तुझ्यापासून"

तो व्यक्ती उत्तरला, "घाबरु नको, मी अल्लाहचा दूत (स्वर्गदूत) आहे आणि अल्लाहकडून फक्त संदेश देणारा म्हणून  पाठविण्यात आलो आहे. तुला हे सांगण्यासाठी की, तुला एक पवित्र मुलगा होईल."

"पण जर मला कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नाही (मी विवाहित नाही), तर मला एक पुत्र कसा होईल. मी शील भ्रष्ट (वाईट स्त्री) नाही?", ती म्हणाली.

"ती अल्लाह (ईश्वर) ची इच्छा आहे. ते, त्याच्यासाठी खूप कठीण नाही. जेव्हा तो काही निर्माण करण्याची इच्छा करतो, म्हणतो, होऊन जा आणि ती होते. तुझा पुत्र, एक खूप पवित्र मुलगा असेल." असे म्हणून, स्वर्गदूत दिसेनासा झाला आणि मरियमला विस्मित (स्तंभित) करून गेला.

नंतर काही दिवसांनी, जेव्हा तिचा पुत्र जन्मायची वेळ जवळ आली, मरियम, लोकांपासून बाजूला, एका दूरच्या ठिकाणी गेली. तेथे एकटी, घाबरलेली आणि भुकेने आणि तहानेने अशक्त झालेल्या अवस्थेत, एका   झाडाच्या खाली झोपली आणि वेदनेने ओरडू लागली, "मी इच्छा करते, हे होण्याआधी मी मरून गेलेली असावी आणि सर्वजण मला विसरून गेलेले असावे."

एक सुखद आवाज तिच्याशी बोलला, "दुःखी होऊ नको मरियम. तुझ्या प्रभूने, एक पाण्याचा झरा तुझ्याखालून (जवळून), प्रदान (प्रवाहित) केला आहे आणि जर तू झाडाचे खोड हलवशील, तर पुष्कळ ताज्या आणि पिकलेल्या खजुरी तुझ्यावर पडतील. तू खा आणि पी आणि तुझ्या पुत्राला पाहून आनंद घे."

तिचा पुत्र ईसा (अ.), सर्व लोकांपासून दूर अशा जागी जन्मला. 

मरियम ने जरी, तिच्या लहान बाळाला कुशीत घेतले, तरी तिच्यात, त्या बाळाला घेऊन, तिच्या लोकांकडे जाण्याचे साहस नव्हते. ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकेलं? ते काय म्हणतील? तिच्या बाळाचा जन्म, ती कसे समजावून सांगू शकेल? ती दयनीय अवस्थेत होती आणि काय करावे तिला समजत नव्हते. पण अल्लाहने (ईश्वराने) तिला दिलासा दिला. 

"लोकांना काहीही सांगू नको, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नको, फक्त संकेत करून सांग की, तू उपवास करीत आहे आणि त्या दिवशी, काहीही न बोलण्याची शपथ घेतली आहे." तिला आदेश दिला गेला.

अल्लाह (ईश्वरा) च्या मदतीने बळकट होऊन, निरागस मरियमने तिच्या बाळाला उचलले आणि तिच्या लोकांकडे परत गेली. जेव्हा त्यांनी तिला, तिच्या हातात असलेल्या, एका बाळा सोबत येतांना पाहिले, ते तिच्या भोवती जमा झाले.

"मरियम, किती लाजेची गोष्ट आहे! तुझे मातापिता ईश्र्वरनिष्ठ लोक होते, तू हे काय केले?"  आणि ते त्या मुलाविषयी जाणण्यास इच्छुक होते.

मरियमने त्यांना उत्तर दिले नाही. तिने फक्त त्या मुलाकडे इशारा केला.

"तू वेडी आहे का? आम्ही एका नवजात बाळासोबत कसे बोलू शकतो, मरियम ?"

त्यानंतर लगेच प्रत्येकाला पूर्ण आश्चर्य देऊन, मरियमच्या हातातील बाळाने बोलावयास सुरुवात केली. "मी अल्लाह (ईश्वर) चा संदेश पोहोचविणारा आहे," ते बाळ म्हणाले, "त्याने मला एक ग्रंथ (इंजील, बायबल) दिला आहे आणि मला एक प्रेषित (संदेशकर्ता, पैगंबर) बनविले आहे. त्याने मला आज्ञा दिली की, माझ्या (अल्लाहच्या, ईश्वराच्या) प्रार्थना म्हण आणि दानशूर बन आणि माझ्यावर आशीर्वाद दिला की, जिथे मी असेल, तो मला माझ्या आईशी दयाळू असणारा बनवेल आणि माझ्यावर ज्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या दिवशी मी मृत्यू पावेन, ज्या दिवशी मला पुन्हा वर उचलण्यात येईल, त्या दिवशी शांती देईल."

प्रत्येकाने, डोळे विस्फारून आश्चर्याने लक्ष देऊन ऐकले. त्यांचा या चमत्कारवर विश्वास बसत नव्हता. हे ईसा अ. (येशू, Jesus) होते. अल्लाहचे संदेशकर्ता म्हणजेच प्रोफेट.

जे लोक, मरियमची, जी पवित्र आणि निरागस होती, निंदा करण्यास आले होते,  ते सगळे नवजात बालकाचे बोलणे ऐकून शांत झाले. मरियमच्या विषयी पवित्र क़ुरआन म्हणते, "अल्लाह (ईश्वरा) ने मरियमला, त्या सर्व देशांच्या, सर्व स्त्रियांमधून वरचा दर्जा देऊन निवडले."

ईसा अ., मरियम चे पुत्र, ज्यांना पवित्र कुरआन मध्ये मसीह ही म्हंटले आहे, मोठे होऊन एक खूप सद्गुणी आणि धार्मिक व्यक्ती बनले.

ईसा अ.च्या नात्यातले यहया अ., जकरिया अ. चे पुत्र होते, एक प्रेषित (संदेशकर्ता) होते. ते अल्लाहचा संदेश लोकांमध्ये, उपदेशाद्वारे सांगायचे. प्रवचन द्यायचे. पण यहया अ. यांना, जुदा (Judaea) चा राजा पसंत करत नव्हता. त्याने त्यांची हत्या करविली.

यहया अ. हे , त्यांच्या पित्याच्या, जकरिया अ. च्या, जीवनकाळात उशिरा जन्मले होते. जकारिया अ. यांच्या अल्लाह (ईश्वर) ला केलेल्या प्रार्थनांचे, ते उत्तर होते. अल्लाह (ईश्वर) नेच त्यांच्यासाठी यहया हे नाव निवडले होते.

यहया अ. यांच्या कुटुंबीयांसाठी, जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी ही फार दुःखाची बातमी होती. यहया अ. यांच्या मृत्यू नंतर लोकांना योग्य मार्गावर नेऊन, नेतृत्व करण्याची भारी जबाबदारी, ईसा अ. वर आली.

इस्राइलचे (याकूब चे) वंशज म्हणजेच "बनी इस्राइल" इतके साधे लोक नव्हते की, त्यांचे सहजरीत्या नेतृत्व करून त्यांना सरळ मार्गावर आणावे. ते धीट होते आणि प्रत्येक गोष्टीसाठी टीकात्मक होते आणि फक्त मतभेद दर्शविण्यासाठी वाद घालणारे होते.

त्यांच्यामधील श्रीमंत लोक, गरीब लोकांसाठी क्रूर होते. त्यांच्यामध्ये आपसांमध्ये, कपटकारस्थान आणि भांडणे होती. त्यामुळे ही गोष्ट चकित करणारी नव्हती की, "रोमन" लोकांनी त्यांच्या देशावर नियंत्रण केले होते. आणि ते त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर, फक्त सेवकासारखे राहत होते. त्यांचे राज्यकर्ते म्हणजे राजा आणि इतर प्रधान, फक्त नावापुरते होते, ते फक्त दुसऱ्याच्या हातातील बाहुले होते आणि खरी सत्ता "रोमन गवर्नर" च्या हातात होती.

तेथील सर्व लोक आजारपणात, भयात, गरिबीत आणि दुबळेपणात जीवन जगत होते. ते विटंबना आणि मानहानी आणि दुःखाचे आयुष्य जगत होते. आजूबाजूला सर्वीकडे दारिद्र्य पसरले होते. तेथे त्यांना कोणीही योग्य मार्ग दाखविणारा नव्हता. ते सर्व मेंढ्यांच्या विखुरलेल्या कळपा सारखे होते.

अशा वेळेस ईसा अ. अल्लाहचा संदेश आणि इन्जील ग्रंथ (बायबल) घेऊन, त्यांना मार्गदर्शन करण्यास आले.

ईसा अ. खूप सौम्यपणे संभाषण करणारे आणि विनयशील व्यक्ती होते. त्यांनी त्यांच्या लोकांची अवस्था पाहिली, त्यांचे दुःख जाणले. ते लोकांशी प्रेमाने बोलले. त्यांना दिलासा दिला आणि त्यांना मार्गदर्शन केले.

प्रत्येक वेळेस मार्ग दाखविताना ते असे म्हणत की, एक आणि एकच अल्लाह (यहोवा, yahewe, ईश्वर, God) आहे. ज्याने त्यांना प्रेषित (संदेशकर्ता) म्हणून त्या लोकांकडे पाठविले आहे. ईसा अ. यांनी त्या लोकांची, भविष्याबाबत आणि परलोकाबाबत आशा जागविली. ईसा अ. यांनी आश्वासन दिले की, ते जर सदाचारी, संयमी आणि धैर्य ठेवून राहतील, तर अल्लाह (ईश्वर) त्यांना पारितोषिक देईल.

गरीब लोकांनी ईसा अ. वर विश्वास ठेवला आणि त्यांना मनापासून खूप प्रेम दिले. ते त्यांच्याकडे त्यांचे दुःख घेऊन आले. ईसा अ. त्यांच्यासाठी मसीह (Messiah) होते. अल्लाह (ईश्वरा) ने ईसा अ. यांना आजारातून लोकांना बरे करण्याची शक्ती दिली होती. त्यांनी आजारी लोकांना आणि आंधळ्या लोकांना फक्त स्पर्श करून बरे केले.

त्या काळात सगळ्या आजारांपेक्षा जास्त घातक आणि भयभीत करणारा आजार कुष्ठरोग (महारोग/leprosy) होता. कारण त्यावर काही उपाय नव्हता. त्यावेळी असे मानले जायचे की, हा पसरणारा म्हणजेच संसर्गजन्य आजार आहे आणि ज्या लोकांना कुष्ठरोग व्हायचा, त्यांना सर्वांपासून दूर करून आणि दूर घेऊन जाऊन एका खड्ड्यात किंवा दरीत (जी दरी कुष्ठरोग्यांना फेकण्यासाठी असायची) फेकले जायचे. जेथे त्यांना मरण्यासाठी सोडून देण्यात यायचे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र ही या भीतीने की, त्यांनाही हा आजार पकडेल किंवा त्यांनाही संसर्ग होईल, त्यांना भेटायला जात नव्हते. या हताश लोकांसाठी ईसा अ. एक आशेचा किरण बनून आले होते. कारण अल्लाह (ईश्वर) ने ईसा अ. यांना आजारापासून लोकांना, बरे करण्याची शक्ती दिली होती.

ईसा अ. यांना लोकांकडून प्रेम आणि आदरभाव मिळत होता. प्रत्येक ठिकाणी लोक त्यांच्या मागोमाग जात होते. लोक त्यांचे उपदेश आणि प्रवचन लक्षपूर्वक ऐकत होते आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास करत होते. ईसा अ. यांनी अल्लाहचा संदेश, जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे सर्विकडे पोहोचविला.

ईसा अ. यांनी लोकांना एकमेकांवर प्रेम करण्यास शिकविले आणि शत्रूला क्षमा करण्यास शिकविले. एक आणि फक्त एकच अल्लाहवर (ईश्वर, यहोवा (yahewe), God) विश्वास करण्यास शिकविले. त्यांनी लोकांना सांगितले की, "मूसा अ. (Moses) यांचा धर्म खरा होता आणि ते स्वतः एक संदेशकर्ते म्हणून, ही सत्यता, सिद्ध करण्यासाठी आले आहेत."

"मूसाने तुमच्याकडे जो कायदा आणला आहे, त्याची पुष्टी करण्यासाठी आणि अजून एक संदेशकर्ता "अहमद" (मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम), माझ्यानंतर येणार असल्याची चांगली वार्ता देण्यासाठी, मला यावे लागले आहे," त्यांनी लोकांना म्हंटले.

अहमद (मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम), हे ईसा अ.नंतर साधारणतः पाचशे वर्षांनंतर आले.

ईसा अ. यांनी, त्यांचा संदेश चहूबाजूंना देण्यासाठी, दूरदूर पर्यंत प्रवास केला आणि सर्व लोकांना उपदेश करत राहिले. नाझरेथ (नासरत), जे गलिली (Galilee) मध्ये होते, तेथपासून जेरुसलेम पर्यंत (जे जुदामध्ये होते),  सर्व गरीब लोकांनी त्यांचे ऐकले आणि त्यांच्या उपदेशांमध्ये, एका छान यशस्वी जीवनासाठी आशेचा किरण पाहिला. त्यांनी संयमित आणि नम्र राहून सामर्थ्य (बळ) संपादन केले.

पण श्रीमंत आणि शक्तीशाली लोक, ईसा अ. च्या विरुद्ध झाले. त्यांनी ईसा अ. यांच्या संदेशामध्ये, एका क्रांतीचे बीज पाहिले.

जेरुसलेम आणि जुदाचे श्रीमंत लोक, ईसा अ. ची वाढती लोकप्रियता पाहून भयभीत झाले. त्यामुळे त्यांनी ईसा अ. यांना अपमानित केले. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या अनुयायांसाठी जीवन जगणे अवघड केले. पण ईसा अ. यांनी कुणालाही हानि किंवा इजा पोहोचविली नाही आणि त्यांचे कार्य शांततेने चालू ठेवले. त्यांचे जे विश्वसनीय समर्थक होते, त्यांना "हवारीज" म्हंटले जात होते, ज्यांनी त्यांना प्रत्येक कार्यात मदत केली.

एकदा या समर्थकांनी, म्हणजेच हवारिज (disciples) यांनी, ईसा अ. यांना विनंती केली, की अल्लाह (ईश्वर) ला, स्वर्गातून त्यांच्यासाठी, एक भव्य भोजन (मेजवानी) पाठविण्यास सांगा. ईसा अ. यांनी अशी अवास्तव  मागणी करण्यापासून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आग्रह केला की, यामुळे त्यांची श्रद्धा मजबूत होईल.

अनिच्छिने ईसा अ. यांनी मान्य केले आणि त्यांनी अल्लाह (ईश्वर) ला, त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली. अल्लाह (ईश्वरा) ने, त्याच्या प्रिय प्रेषिताची (संदेशकर्त्याची) प्रार्थना ऐकली आणि त्याच्या हवारिज साठी (disciples साठी), अन्न आकाशातून (स्वर्गातून) खाली पाठविले. याचवेळी अल्लाह (ईश्वर) ने, त्यांना चेतावणी दिली की, जर त्यांच्यापैकी कोणीही, या चमत्कारानंतर अविश्वास दाखविला, तर एक कठोर शिक्षा, त्याची वाट पाहत असेन.

ज्यू लोक (श्रीमंत आणि हट्टी असलेले), ईसा अ. यांना हानि पोहोचविण्यासाठी, एका संधीच्या शोधात होते. त्यांनी ईसा अ. विरुद्ध योजना केली आणि कट रचला.

शेवटी ते  ईसा अ. विरुद्ध, जे त्यांच्या प्रशासनासाठी एक धोकादायक व्यक्ती बनत चालले होते, तक्रार करण्यास "रोमन गवर्नर- पोंटीअस पाइलेट (Pontius pilate)" कडे गेले. त्यांनी ईसा अ. वर, प्रशासनाविरोधात आणि लोकांच्या धर्माविरोधात, लोकांच्या मनात विष कालवत असल्याचा आरोप केला.

रोमन गवर्नर, त्यांनी जो काही आरोप केला, तो पुरावा असल्याशिवाय मानण्यास तयार नव्हते. पण श्रीमंत आणि शक्तीशाली ज्यू लोकांनी, गवर्नरला असे भासविले की, हा एक कट आहे. त्यांनी विनवणी केली की, जर ईसा अ. यांना वेळेत थांबविले नाही, तर त्यांची गरीब लोकांमध्ये वाढती लोकप्रियता सरकारसाठी (प्रशासनासाठी) एक धोक्याची पूर्वसूचना असेल.

शेवटी पाइलेट यांनी ईसा अ. यांना अटक करण्यासाठी आदेश दिला. लोकांचा विरोध, बंड आणि प्रतिक्रिया टाळण्यासाठी, हे लपवून केले जाणार होते. काही अप्रामाणिक लोकांच्या मदतीने एक कट रचण्यात आला. ईसा अ. यांना अटक केली गेली आणि गवर्नर समोर आणण्यात आले.

ईसा अ. वर, देशद्रोहाचा आरोप म्हणजेच लोकांच्या मनात त्यांच्या धर्माविरुद्ध आणि प्रशासनाविरुद्ध विष कालवण्याचा आरोप करण्यात आला. त्यांचे शत्रू त्यांना मृत्यू देण्यास इच्छुक होते. त्या काळात अशा आरोपासाठी शिक्षा "क्रूसावर म्हणजे वध स्तंभावर मरण" अशी होती. क्रूस (वधस्तंभ) म्हणजे सलीब, हा लाकडाचा क्रॉस (+ च्या आकारासारखा) होता, ज्यावर त्या व्यक्तीला खिळे ठोकून बांधले जायचे आणि रक्तस्त्राव होऊन मरण येईपर्यंत तो व्यक्ती तिथेच सोडला जायचा.

त्या जमिनीच्या (देशाच्या) श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांच्या आग्रहातर, ही शिक्षा ईसा अ. यांच्यासाठी सुनावली गेली. पण अल्लाहने, त्यांच्यावर उदारतेने, दया करून ईसा अ. यांना वाचवले. अल्लाह ने ईसा अ. यांना आकाशात वर उचलले.

ईसा अ. हे अल्लाह चे प्रिय प्रेषित होते, ज्यांचे जीवन चमत्कारांनी भरलेले आहे. कधी कधी लोक इतक्या चमत्कारांविषयी ऐकतात, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. "एक मूल त्याच्या पित्याविना कसे जन्मू शकते?", लोक विचारतात.

जरी ईसा अ. अल्लाहचे प्रेषित होते, तरी ते एकटे असे मनुष्य होते, ज्यांचा जन्माचा इतिहास खूप असामान्य आहे. पण हे फक्त, अल्लाहची शक्ती आणि सामर्थ्य सिद्ध करतात, ज्याच्यासाठी काहीही अशक्य नाही.

यासाठी आदम अ. यांचे उदाहरण आहे, ज्यांचा जन्म माता आणि पिता, दोन्ही नसतांना झाला, ते मातीपासून बनविले गेले आणि त्यांच्यात आत्मा फुंकला गेला. कारण अल्लाह(ईश्वर) सामर्थ्यशाली आहे आणि तो सगळ्या विश्वाचा निर्माता आहे. त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही.अल्लाहने दगडांतून झरे प्रवाहित केले, धरतीतून झाडे उगविली, मास्यांना पाण्यात पोहायला शिकविले, पक्ष्यांना हवेत उडण्यास बनविले. त्याने मानवाला सर्व प्राणिमात्रांवर वरचा दर्जा दिला. ज्यामुळे माणूस एक स्पष्ट चिन्ह पाहू शकतो आणि प्रकृती आणि प्राणी व पक्ष्यां विषयी विचार करू शकतो आणि त्यांच्या निर्मात्याचा आभारी, कृतज्ञ बनू शकतो. त्याने मानवाला हे सर्व समजण्यासाठी आणि अल्लाह (ईश्वरा) च्या उदारतेची प्रशंसा करण्यासाठी, अल्लाहच्या आदेशांवर मजबूत श्रद्धा ठेवण्यासाठी बुद्धिमत्ता दिली.

कुणालाही अल्लाहच्या (ईश्वराच्या) बरोबरीने किंवा समकक्ष समजणे, हे खूप मोठे पाप आहे.

ईसा अ. च्या नंतर, काही दशकांनी, ज्यू (यहुदी) लोकांनी रोमन विरुद्ध बंडखोरी केली आणि इ.स. 66 मध्ये जेरूसलेमवर नियंत्रण केले आणि पहिले रोमन-यहुदी युद्ध सुरू केले. इ.स. 70 मध्ये रोमन लोकांनी "जेरुसलेम" वर नियंत्रण केले आणि दुसऱ्या वेळेस बांधल्या गेलेल्या, प्रार्थना स्थळाला (हैकले सुलेमानी/second temple)
नष्ट केले, ज्यामध्ये पश्चिमेच्या भिंतीचा फक्त काही भाग शिल्लक होता. (जरी अलिकडील पुरातत्व शोधांनी भिंतीचा काही भाग नंतरच्या काळात दिलेला आहे). पाश्चात्य भिंत यहूदींसाठी(ज्यू लोकांसाठी) एक पवित्र स्थान आहे.

इस्राइलचे लोक दोन वेळा उपद्रव माजवतील आणि दोन वेळा त्यांचा विनाश होईल, असेच आधीच "तौरात" म्हणजेच "Torah"  या ग्रंथात वर्तविले होते, जो ग्रंथ मूसा अ. यांना देण्यात आला होता. त्यातली ही दुसरी वेळ होती.

पहिली वेळ ती होती, जेव्हा बेबिलोंनच्या राजाने विनाश केला होता. ही सत्य कथा आधी एका भागात होती...

कुरआन मध्ये हा संदर्भ आहे.

#कुरआनचा_काही_अंश

4 आणि आम्ही इस्राईल च्या मुलांना, ग्रंथाद्वारे हे आधीच कळविले होते की, तुम्ही जमिनीवर दोन वेळा उपद्रव माजवाल आणि मोठ्या विद्रोहाचे प्रदर्शन कराल.

( कुरआन 17:4)

[इस्रायली लोकांच्या ग्रंथात ' तोराह ' मध्ये हे भाकीत अल्लाह (यहोवा, ईश्वर)ने वर्तविले आहे, जो अल्लाह चाच ग्रंथ आहे.]

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...