लूत अ. हे इब्राहीम अ. च्याच भावाचे पुत्र म्हणजेच त्यांचे पुतणे होते…जेव्हा इब्राहीम अ. यांनी त्यांचा देश सोडला, तेव्हा लूत अ. ही त्यांच्या बरोबर होते.. लूत अ. खूप सद्गुणी असे अल्लाहचे संदेशवाहक होते…
त्यांचा देश सोडल्यानंतर, इब्राहीम अ. हे आधी जेरुसलेमला गेले आणि अल्लाहकडून लूत अ. यांना सदोम या ठिकाणी, जे जॉर्डनच्या पूर्वेत आहे, पाठविण्यात आले. तेथे राहणाऱ्या पापी आणि वाईट लोकांना, अल्लाहच्या संदेशाची शिकवण देण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले होते.
हे लोक प्रत्येक व्यवसायी, जो त्यांच्या रस्त्यात येत होता, त्याला लुटत होते…त्यांना न्याय काय असतो याचे ज्ञान नव्हते…
एक दिवस एक प्रवासी, त्याची अमानत म्हणजे त्याची कमावलेली संपत्ती… घेऊन जात होता… एका माणसाने त्याच्या कपाळाला एक दगड मारला…आणि त्याला पकडून म्हंटले, "माझ्या दगडाने तुला लागले आहे…तुला जे घडले याची भरपाई द्यावी लागेल"...
प्रवासी खूप रागावला आणि म्हणाला, "तू मूर्ख आहेस का? तू कशाविषयी बोलत आहे…तू मला मारले..तू मारेकरी आहेस…तुला मला भरपाई दिली पाहिजे…"
ते दरबारात गेले…पण न्यायाधीशाने त्या मारेकऱ्याच्या कडून निर्णय दिला, ज्याने प्रवाश्याला मारले होते आणि म्हणाला, "हो, हा बरोबर आहे…याच्या दगडाने तुला मारले… आता तुला याची भरपाई करावी लागेल…"
या अन्यायावर , प्रवासी इतका नाराज झाला की, त्याने एक दगड उचलला आणि न्यायाधीशाच्या डोक्याला मारला…
"बरं.." तो मारल्यानंतर म्हणाला, "आता तुला मला भरपाई द्यावी लागेल. ज्याला तू मला भरपाई द्यायला सांगितली होती, त्याला तू ही भरपाई देऊ शकतो."...
लूत अ. यांनी, या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की, ते पापाने भरलेले जीवन जगत आहेत. ..पण त्यांनी त्यांची थट्टा उडविली…ते म्हणाले की, "जर तू इतका चांगला आहेस, तर तू आमच्यासोबत राहू शकत नाही…येथून चालला जा…आम्ही तुझ्यासारखे का होऊ?"
लूत अ. दुःखी झाले..त्यांनी त्यांच्याकडून अल्लाहचा संदेश देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता…पण त्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही…
एक दिवस तीन स्वर्ग दूत (फरिश्ते), जे खूप देखणे तरुण दिसत होते.. लूत अ. यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे आले. ते म्हणाले, "तुम्ही अनोळखी दिसत आहात…कोण आहात तुम्ही?"
स्वर्ग दूत त्यांना म्हणाले की, ते अल्लाहकडून पाठविण्यात आलेले फरिश्ते आहेत. जे त्या लोकांना, जे ऐकत नाहीत त्यांना शिक्षा देण्यासाठी आले आहेत.
त्यांनी सांगितले की, "पूर्ण शहर नष्ट होणार आहे…" आणि त्यांनी लूत अ.यांना सांगितले की, "तुमच्या कुटुंबाला घेऊन, रात्रीच्या शांततेत हे शहर सोडून जा. कोणीच मागे पाहू नका…तुम्हाला सूर्योदय होण्याच्या आधी, जो प्रकाश दिसतो. म्हणजेच पहाट…त्याआधी ही जागा सोडायची आहे…"
जेव्हा ते बोलत होते, तेव्हा शहरातील सगळे वाईट लोक आले आणि त्यांनी देखण्या तरुणांना पाहिले, "यांना आम्हाला दे", ते म्हणाले…
"हे तुझे पाहुणे आहेत…नाही का?"
"आम्ही तुला म्हटले नव्हते का की, कुणी पाहुणे येऊ देऊ नको… आता त्यांना आमच्या हवाले कर…आम्हाला त्यांच्यासोबत हवे ते करण्यासाठी…"
लूत अ. यांनी त्यांना विनवणी केली, "इतके क्रूर होऊ नका. त्यांच्या पाहुण्यांसमोर इतका वाईट व्यवहार करू नका"…
पण त्यांनी ऐकले नाही आणि जोर देत राहिले…
ते तरुण मुले…निश्चितच अल्लाहचे फरिश्ते होते…आणि त्यांना कुणीच काही करू शकत नव्हते…ते लूत अ. यांना म्हणाले, "आमची काळजी करू नको आणि शांततेने हे शहर सोडून जा"...
त्यामुळे लूत अ. यांनी, ते शहर, रात्रीच्या अंधारात, त्याच्या कुटुंबीयासोबत सोडले…पण त्यांच्या पत्नीला सदोमच्या लोकांवर दया आली. तिने अल्लाहची आज्ञा मानली नाही. तिने जातांना मागे वळून पाहिले आणि ती, जे मागे राहीले आणि ज्यांना शिक्षा मिळाली, त्यांच्यामध्ये ती ही होती…ती दगडाची झाली…
पहाटे एक खूप भयानक आवाजाने त्या लोकांना पकडले...एक जोरदार कडक आणि भाजलेल्या दगडांचा फवारा होता…
पूर्ण शहर, तेथे राहणाऱ्या लोकांसहीत आणि त्याजमिनीत उगवलेल्या प्रत्येकासहीत उध्वस्त झाले…
आज इतक्या हजारो वर्षानंतर त्या शहराचा उध्वस्त ढिगारा.. मृत समुद्राच्या जवळ दिसतो…ज्या मृत समुद्रात कुणीही जिवंत राहू शकत नाही…काही लोक विश्वास करतात की, हे ढिगारे आणि समुद्र याची आठवण करून देतात की, अल्लाहचा शाप ज्यामुळे सदोमचे आज्ञा न पाळणारे लोक, नष्ट झाले…तो किती वेदनादायी आहे…