रविवार, ५ डिसेंबर, २०२१

आदम अलैहिस्सलाम आणि एक अहंकारी

✔️📗2:30 ३०. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी धरतीवर एक खलीफा (असा समूह जो एकमेकांनंतर येईल) बनवीत आहे. तेव्हा (फरिश्ते) म्हणाले, काय तू धरतीवर अशा लोकांना निर्माण करशील, जे तिच्यावर फसाद आणि रक्तपात करतील आणि आम्ही तुझ्या स्तुती-प्रशंसेसह तुझे गुणगान आणि तुझी पवित्रता वर्णन करतो. त्याने फर्माविले, जे मी जाणतो तुम्ही नाही जाणत. 

2:31 ३१. आणि त्या (अल्लाह) ने आदमला सर्व नावे शिकवून त्या चीज वस्तूंना फरिश्त्यांसमोर प्रस्तुत केले आणि फर्माविले, तुम्ही सच्चे असाल तर या चीज वस्तुंची नावे सांगा.  

2:32 ३२. फरिश्ते म्हणाले, हे अल्लाह! तू तर पवित्र (दोष- व्यंग नसलेला) आहे. आम्हाला तर तेवढेच ज्ञान आहे, जेवढे तू आम्हाला शिकविले आहे परिपूर्ण ज्ञान आणि बुद्धी कुशलता राखणारा केवळ तूच आहे. 

2:33 ३३. सर्वश्रेष्ठ अल्लाहने आदमला फर्माविले, तुम्ही यांची नावे सांगा. जेव्हा त्यांनी ती नावे सांगितली तेव्हा फर्माविले, काय मी तुम्हाला सांगितले नव्हते की मी आकाशांच्या आणि धरतीच्या अदृश्य गोष्टी जाणतो आणि जे तुम्ही करता किंवा लपविता तेही जाणतो. 

2:34 ३४. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा. तेव्हा इब्लीसशिवाय सर्वांनी सजदा केला. त्याने इन्कार केला आणि घमेंड दाखविली  आणि तो काफिरां (इन्कारी लोकां) पैकीच होता. 

2:35 ३५. आणि आम्ही फर्माविले हे आदम! तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये राहा आणि जिथून इच्छा होईल तिथून वाटेल तेवढे खा व प्या. परंतु या झाडाच्या जवळ जाऊ नका, अन्यथा अत्याचारी ठराल. 

2:36 ३६. परंतु सैताानाने त्यांना बहकवून तिथून बाहेर घालविलेच आणि आम्ही सांगून टाकले की उतरा येथून (जा, चालते व्हा), तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि एक ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला धरतीवर राहायचे आणि लाभ घ्यायचे आहे. 

 2:37 ३७. आदमने आपल्या पालनकर्त्याकडून काही वचने शिकून घेतली (आणि अल्लाहजवळ क्षमायाचना केली). अल्लाहने त्यांची तौबा (क्षमायाचना) कबूल केली. निःसंशय तोच तौबा कबूल करणारा, दया करणारा आहे. 

 2:38 ३८. आम्ही फर्माविले, तुम्ही सर्व येथून उतरा, मग जर तुमच्याजवळ माझ्याकडून मार्गदर्शन आले तर जो कोणी माझ्या उचित मार्गाचा स्वीकार करील त्यांच्यावर कसलेही भय राहणार नाही, ना ते दुःखी होतील. 

 2:39 ३९. आणि जे कुप्र (इन्कार) आणि असत्याद्वारे आमच्या आयतींना खोटे ठरवतील ते जहन्नममध्ये राहणारे आहेत. नेहमी त्यातच राहतील.
(Qur'an 2:30-39)
==================================

 4:1 १. हे लोकांनो! आपल्या त्या पालनकर्त्याचे भय राखा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले आणि त्याच्यापासूनच त्याच्या पत्नीलाही निर्माण केले, आणि त्या दोघांपासून अनेक स्त्री-पुरुष पसरविले आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याच्या नावाने तुम्ही एकमेकांकडे याचना करतात आणि नाते-संबंध तोडण्यापासूनही (स्वतःला वाचवा) निःसंशय, अल्लाह तुम्हा सर्वांची देखरेख करणारा आहे. 
(Qur'an 4:1)
==================================

✔️📗7:11 ११. आणि आम्ही तुम्हाला निर्माण केले, मग तुमचे रूप घडविले, मग आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसला सोडून सर्वांनी सजदा केला कारण तो सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. 

 7:12 १२. (अल्लाहने) फर्माविले, जेव्हा मी तुला सजदा करण्याचा आदेश दिला, तेव्हा कोणत्या कारणाने तुला सजदा करण्यापासून रोखले. तो म्हणाला, मी याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले आहे. 

 7:13 १३. (अल्लाहने) आदेश दिला की तू आकाशातून खाली उतर, आकाशात राहून घमेंड करण्याचा तुला काहीच हक्क नाही. तेव्हा चल निघ. निःसंशय तू धिःक्कारलेल्यांपैकी आहेस. 

 7:14 १४. (सैतान) म्हणाला, मला (कयामतपर्यंत) संधी प्रदान कर, जेव्हा लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील. 

 7:15 १५. (अल्लाहने) फर्माविले, तुला ती संधी प्रदान केली गेली. 

 7:16 १६. (सैतान) म्हणाला, तू मला धिःक्कारल्यामुळे मी त्यांच्यासाठी तुझ्या सरळ मार्गावर बसेन. 

 7:17 १७. मग त्यांच्या समोरून आणि पाठीमागून आणि उजव्या व डाव्या बाजूने हल्ला करीन आणि तुला यांच्यात अधिकांश लोक कृतज्ञशील आढळणार नाहीत.  

 7:18 १८. (अल्लाहने) फर्माविले, तू यापासून (येथून) अपमानित होऊन निघून जा जे त्यांच्यापैकी तुझ्या मार्गावर चालतील तर मी तुम्हा सर्वांनी जहन्नमला भरून टाकीन. 

 7:19 १९. आणि (आम्ही फर्माविले की) हे आदम! तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये राहा, मग जिथून इच्छा होईल तिथून खा, आणि त्या झाडाच्या जवळ जाऊ नका अन्यथा अत्याचारी ठराल. 

 7:20 २०. मग सैतानाने दोघांच्या मनात कुविचार निर्माण केला, यासाठी की दोघांच्या वर त्यांची लज्जास्थाने उघड करावीत आणि सांगितले की तुम्हा दोघांच्या पालनकर्त्याने तुम्हाला या झाडापासून अशासाठी रोखले आहे की तुम्ही दोघे फरिश्ते व्हाल किंवा सदैवकाळ राहणारे व्हाल. 

 7:21 २१. त्याने (सैतानाने) त्या दोघांच्या समोर शपथ घेतली की, मी तुम्हा दोघांचा शुभचिंतक आहे. 

 7:22 २२. अशा प्रकारे धोकेबाजीने दोघांना खाली आणले, मग त्या दोघांनी झाडाचा स्वाद घेताच, दोघांवर त्यांची गुप्तांगे उघड झाली आणि ते आपल्यावर जन्नतची पाने चिकटवू लागले, आणि त्यांच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने दोघांना पुकारले की काय मी तुम्हा दोघांना या झाडापासून रोखले नव्हते? आणि तुम्हाला सांगितले नव्हते की सैतान तुमचा खुला शत्रू आहे. 

 7:23 २३. दोघे म्हणाले, हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही स्वतःवर जुलून करून घेतला आणि जर तू आम्हाला माफ केले नाही आणि आमच्यावर दया केली नाही तर आम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी होऊ. 

 7:24 २४. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही खाली उतरा. तुम्ही आपसात वैरी आहात आणि तुम्हाला एक अवधीपर्यंत धरतीत राहावयाचे आणि लाभ प्राप्त करून घ्यायचे आहे. 

7:25 २५. फर्माविले की तुम्ही त्यातच जीवन व्यतीत कराल आणि त्यातच मरण पावाल आणि त्यातूनच बाहेर काढले जाल. 

7:26 २६. हे आदमच्या पुत्रांनो! आम्ही तुम्हाला असे वस्त्र प्रदान केले जे तुमच्या लज्जास्थानांना झाकेल आणि शोभा देईल आणि सर्वांत उत्तम वस्त्र, अल्लाहच्या भयाचे वस्त्र आहे. ही अल्लाहची निशाणी आहे यासाठी की यांनी स्मरण राखावे. 

 7:27 २७. हे आदमच्या पुत्रांनो! तुम्हाला सैतानाने बहकवून न द्यावे, जसे तुमच्या माता-पित्याला जन्नतमधून बाहेर घालिवले. त्याने त्यांचे वस्त्र उतरवून दिले, यासाठी की त्यांना त्यांची गुप्तांगे दाखवावीत. निःसंशय तो आणि त्याचे जातीबांधव तुम्हाला अशा ठिकाणाहून पाहतात की तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. आम्ही सैतानांना अशा लोकांचे मित्र बनविले, जे ईमान (विश्वास) राखत नाही.
(Qur'an 7:11-27)
==================================

 ✔️📗7:189 १८९. तो (अल्लाह) असा आहे की ज्याने तुम्हाला फक्त एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच्याद्वारे त्याची जोडी बनवली, यासाठी की त्याने आपल्या त्या जोडीदारापासून सुख चैन प्राप्त करावी, मग पतीने पत्नीशी जवळीक केली, तेव्हा तिला गर्भ राहिला हलकासा, मग ती त्याला घेऊन चालत फिरत राहिली. जेव्हा तिला भार जाणवू लागला, तेव्हा पती-पत्नी दोघे अल्लाहशी, जो त्यांचा स्वामी आहे, दुआ (प्रार्थना) करू लागले की जर तू आम्हाला सहीसलामत (व्यवस्थित स्वरूपात) संतान प्रदान केली तर आम्ही खूप खूप आभार मानू. (Qur'an 7:189)
==================================

✔️📗15:28 २८. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी एक मानव, काळ्या सडलेल्या, खनकणाऱ्या मातीपासून निर्माण करणार आहे. 

15:29 २९. तर जेव्हा मी त्याला पूर्ण बनवून घेईन आणि त्यात आपला आत्मा फुंकेन तेव्हा तुम्ही सर्व त्याला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका) 

15:30 ३०. यास्तव सर्वच्या सर्व फरिश्त्यांनी आपला माथा टेकला. 

15:31 ३१. परंतु इब्लिसने सजदा करणाऱ्यांमध्ये सामील होण्यास इन्कार केला. 

15:32 ३२. (अल्लाहने) फर्माविले, हे इब्लिस! तुला झाले तरी काय की तू सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही? 

15:33 ३३. तो म्हणाला, मी असा नाही की या मानवाला सजदा करावा, ज्याला तू काळ्या आणि सडलेल्या खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले आहे. 

15:34 ३४. (अल्लाहने) फर्माविले, आता तू जन्नतमधून चालता हो कारण तू धिःक्कारलेला आहेस. 

15:35 ३५. आणि तुझ्यावर कयामतच्या दिवसापर्यंत माझ्यातर्फे धिःक्कार आहे. 

15:36 ३६. तो म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! मला त्या दिवसापर्यंत संधी प्रदान कर की लोकांना दुसऱ्यांदा (जिवंत करून) उठविले जाईल. 

15:37 ३७. फर्माविले, (ठीक आहे) तू त्यांच्यापैकी आहेस, ज्यांना संधी दिली गेली आहे. 

15:38 ३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची. 

15:39 ३९. (सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला मार्गभ्रष्ट केलेस तर मीदेखील शपथ घेतो की मी सुद्धा धरतीत त्यांच्यासाठी मोह माया निर्माण करीन आणि त्या सर्वांना बहकवून मार्गभ्रष्ट करीन. 

15:40 ४०. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, ज्यांना तू निवडून घेतले आहे. 

15:41 ४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे. 
(Qur'an 15:28-41)
==================================

✔️📗17:61 ६१. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला. तो म्हणाला, काय मी त्याला सजदा करू, ज्याला तू मातीपासून बनविले आहे. 

17:62 ६२. ठीक आहे, पण पाहा तू त्याला माझ्यावर श्रेष्ठता तर प्रदान केली आहे, परंतु जर तू मला कयामतपर्यंत संधी देशील तर मी याच्या संततीला, फार कमी लोकांशिवाय आपल्या काबूत करेन. 

17:63 ६३. (अल्लाहने) आदेश दिला, जा, त्यांच्यापैकी जो कोणी तुझा अनुयायी होईल तर तुम्हा सर्वांची शिक्षा जहन्नम आहे, जो पुरेपूर मोबदला आहे. 

17:64 ६४. त्यांच्यापैकी तू ज्याला देखील आपल्या बोलण्याने बहकवू शकशील बहकव आणि त्यांच्यावर आपले स्वार आणि प्यादे चढवून आण, आणि त्यांच्या धन आणि संततीमधून आपलाही हिस्सा लाव, आणि त्यांना (खोटे) वचन दे. त्यांच्याशी जेवढी देखील वचने (वायदे) सैतानाचे असतात, सर्वच्या सर्व पूर्ण दगाबाजी आहे. 

17:65 ६५. माझ्या सच्चा दासांवर तुझा कोणताही प्रभाव आणि काबू नाही आणि तुमचा पालनकर्ता मोठा काम बनविणारा पुरेसा आहे. 
(Qur'an 17:61-65)
==================================

✔️📗18:50 ५०. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमच्या पुढे सजदा करा, तेव्हा इब्लिस (सैताना) खेरीज सर्वांनी सजदा केला तो जिन्नांपैकी होता. त्याने आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची अवज्ञा केली. काय तरीही तुम्ही त्याला आणि त्याच्या संततीला, मला सोडून आपला मित्र बनवित आहात? वास्तविक तो तुम्हा सर्वांचा शत्रू आहे. अशा जुलमी लोकांचा किती वाईट मोबदला आहे.
(Qur'an 18:50)
==================================

✔️📗20:115 ११५. आणि आम्ही आदमला अगोदरच ताकीदपूर्ण आदेश दिला होता, परंतु त्यांना त्याचा विसर पडला आणि आम्हाला त्यांच्यात कोणताही दृढनिश्चय आढळला नाही. 

20:116 ११६. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना सांगितले की आदमला सजदा करा तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला, त्याने साफ इन्कार केला. 

20:117 ११७. तेव्हा आम्ही सांगितले, हे आदम! हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा शत्रु आहे (लक्षात ठेवा) असे न व्हावे की त्याने तुम्हा दोघांना जन्नतमधून बाहेर घालवावे, ज्यामुळे तुम्ही संकटात सापडावे. 

20:118 ११८. इथे तर तुम्हाला ही सवलत आहे की ना तुम्ही उपाशी राहता, ना नग्न. 

20:119 ११९. आणि इथे ना तुम्ही तहानलेले राहता, ना उन्हाने त्रस्त राहता. 

20:120 १२०. परंतु सैतानाने आदमच्या मनात कुविचार टाकला, म्हणाला, हे आदम! काय मी तुम्हाला चिरस्थायी जीवनाचा वृक्ष आणि त्या राज्यसत्तेची खबर देऊ जी कधीही जुनी न व्हावी. 

20:121 १२१. यास्तव त्या दोघांनी त्या झाडातून काही खाल्ले, मग त्यांची गुप्तांगे उघडी झालीत आणि ते जन्नतची पाने आपल्या अंगावर चिकटवू लागले. आदमने आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली आणि बहकले. 

20:122 १२२. मग त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना उपकृत केले, आदमची तौबा कबूल केली आणि त्यांचे मार्गदर्शन केले. 

20:123 १२३. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही दोघेही इथून खाली उतरा. तुम्ही आपसात एकमेकांचे शत्रू आहात. आता तुमच्याजवळ जेव्हा कधीही माझ्याकडून मार्गदर्शन पोहचेल, तर जो कोणी माझ्या मार्गदर्शनाचे पालन करील तर तो न बहकेल, ना कष्ट- यातनाग्रस्त होईल.

20:124 १२४. आणि जो कोणी माझ्या स्मरणापासून तोंड फिरविल, त्याचे जीवन तंगी- अडचणीचे राहील आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याला आंधळा करून उठवू. 

20:125 १२५. (तो) म्हणेल, हे पालनकर्त्या! मला तू आंधळा बनवून का उठविले? वास्तविक मी चांगले बघू शकत होतो. 

20:126 १२६. उत्तर मिळेल, असेच व्हायला पाहिजे होते. तू माझ्या (तर्फे) आलेल्या आयातींचा विसर पाडला, तद्‌वतच आज तुझाही विसर पाडला जात आहे. 

20:127 १२७. आणि आम्ही असाच मोबदला प्रत्येक माणसाला देत असतो, जो मर्यादेचे उल्लंघन करील आणि आपल्या पालनकर्त्याच्या आयतींवर ईमान न राखेल आणि निःसंशय आखिरत (मरणोत्तर जीवना) चा अज़ाब मोठा सक्त आणि चिरस्थायी आहे. 
(Qur'an 20:115-127)
==================================

✔️📗38:71 ७१. जेव्हा तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने फरिश्त्यांना सांगितले, मी मातीपासून मानवाला निर्माण करणार आहे. 

38:72 ७२. तर जेव्हा मी त्याला यथायोग्य करीन आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा (माथा टेका) 

38:73 ७३. तेव्हा सर्व फरिश्त्यांनी सजदा केला.

38:74 ७४. परंतु इब्लिसने (केला नाही) त्याने घमेंड केली आणि तो इन्कार करणाऱ्यांपैकी होता. 

38:75 ७५. (अल्लाहने) फर्माविले की हे इब्लिस! त्याला (आदमला) सजदा करण्यापासून तुला कोणत्या गोष्टीने रोखले, ज्याला मी आपल्या हातांनी बनविले, काय तू गर्विष्ठ झाला आहेस की तू उच्च दर्जा राखणाऱ्यांपैकी आहेस? 

38:76 ७६. (त्याने) उत्तर दिले की मी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले. 

38:77 ७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला. 

38:78 ७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे. 

38:79 ७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील. 

38:80 ८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस. 

38:81 ८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत . 

38:82 ८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन. 

38:83 ८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील. 

38:84 ८४. फर्माविले, सत्य हेच आहे आणि मी सत्यच सांगत असतो.

38:85 ८५. की मी तुझ्याद्वारे आणि तुझ्या सर्व अनुयायींद्वारे जहन्नमला भरून टाकेन. 
(Qur'an 38:71-85)
==================================
अनुवाद-  — Muhammad Shafi’i Ansari 

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

जिब्राईल (Alaihissalam), प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) शी बोलले ?

[सौजन्य -वरील वेबसाईट वरून गुगल ट्रान्सलेटर च्या मदतीने भाषांतर मराठीत भाषांतर करण्याचा प्रयत्न. अधिक वाचण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर दाबून वाचा.]

प्रश्न - कोणता पुरावा आहे की, जिब्राईल (Alaihissalam), 
प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) शी बोलले ?

अल्लाहची स्तुती असो. 

निःसंशय, जिबराईल (Alaihissalam) यांनी, दोघांच्यामध्ये कोणताही अडथळा आणि पडदा न राहता, प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) यांच्याशी थेट संवाद साधला, आणि प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) यांनी त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपात पाहिले. 
ही वस्तुस्थिती  "क़ुरआन" च्या  अनेक आयत (कुरआनचे श्लोक) आणि "अहदीस" म्हणजेच प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) यांनी सांगितलेल्या आणि कृती केलेल्या गोष्टींच्या अहवाला मध्ये नोंदवली गेली आहे.

1. अल्लाह म्हणतो.

"शपथ आहे नक्षत्राची जेव्हा तो अस्तंगत झाला,
तुमचा मित्र भटकलेला नाही की बहकलेलाही नाही.
तो आपल्या इच्छेने बोलत नाही,

हा तर एक दिव्यबोध आहे जो त्याच्यावर अवतरला जातो.

त्याला जबरदस्त बलशालीने शिकविले आहे.
जो मोठा विवेकशील आहे. तो समोर येऊन उभा राहिला

जेव्हा तो वरील क्षितिजावर होता,

मग जवळ आला आणि वर अधांतरी झाला,

येथपावेतो की दोन धनुष्याइतके किंवा त्याहून काही कमी अंतर उरले.

तेव्हा त्याने अल्लाहच्या दासाला दिव्यबोध पोचविले जे काही दिव्यबोध त्याला पोहोचवायचे होते.

दृष्टिने जे काही पाहिले, मनाने त्यात असत्य मिसळले नाही.

आता काय तुम्ही त्या गोष्टीवर त्याच्याशी भांडता ज्याला तो डोळ्यांनी पाहतो?"

(क़ुरआन 53:1-12)

 कुरआनवरील भाष्यकार यांनी असे म्हटले आहे की “एका सामर्थ्यशाली” चा अर्थ जिब्राईल    (Alaihissalam) आहे, ज्याने मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) यांना प्रकटीकरण शिकवले. प्रकटीकरण असे झाले की,  जिब्राईल (Alaihissalam) थेट, मुहम्मद (अल्लाहचे शांती आणि आशीर्वाद) यांच्याशी बोलले. हे दर्शविणाऱ्या खालील आयत आहेत. 

"ही सर्व जगांच्या पालनकर्त्याकडून अवतरलेली वस्तू आहे.

ही घेऊन तुझ्या हृदयावर विश्वसनीय आत्मा उतरला आहे

जेणेकरून तू त्या लोकांत सामील व्हावेस जे (ईश्वराकडून त्याच्या निर्मितीस) सावध करणारे आहेत.

अगदी स्पष्ट अरबी भाषेत"

(क़ुरआन 26:192-195)

"त्याना सांग कि जो कुणी जिबरीलशी वैर करतो त्याला हे समजावयास हवे कि जिबरीलने अल्लाहच्या आज्ञेनेच हा कुरआन तुझ्या हृदयावर अवतरला आहे. जो अगोदर आलेल्या ग्रंथाचे समर्थन करीत आहे. आणि ईमानधारकांसाठी मार्गदर्शन व यशाची शुभवार्ता घेऊन आलेला आहे."
(क़ुरआन 2:97)


2. पहिले प्रकटीकरण, जसे की सर्वज्ञात आहे, जेव्हा प्रेषित (Sallallahu Alaihi Wassallam) "हिरा" च्या गुहेत एकांतात होते. जिब्राईल  (Alaihissalam) त्यांच्याकडे आले आणि त्यांना वाचण्याची आज्ञा दिली. 

आयेशा (आस्तिकांची आई) (Rajiallahu Anhu) यांनी वर्णन केले आहे की,

“अल्लाहचे मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) यांच्याकडे आलेले सर्व प्रथम "वही" (प्रकटीकरण) येणे, हे चांगले खरे स्वप्न पाहण्याच्या स्वरूपात होते; त्यांनी जे काही स्वप्न पाहिले, ते सकाळच्या शुभ्रते सारखे खरे (प्रकट) होत होते. 
मग त्यांना एकांताचे प्रेम बहाल केले गेले. ते "हिरा" च्या गुहेत एकांतात जायचे ’जिथे ते अनेक रात्री सतत अल्लाहची उपासना करत असत, तोपर्यंत ते तिथे असत, जोपर्यंत, अधिक तरतूद (अन्नसामग्री) गोळा करण्यासाठी त्यांना, आपल्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जावे लागण्याची आवश्यकता भासत नसे. ते खादीजा (Rajiallahu Anhu) कडे परत जायचे, आणि त्यांच्यासोबत नेण्यासाठी अशाच प्रकारच्या रात्रीसाठी तरतूद (अन्नसामग्री ची व्यवस्था) करायचे. (हे असेच चालू होते) की, "सत्य" त्यांच्यापर्यंत आले तेव्हा, ते "हिरा"च्या गुहेत होते. 

ईशदूत त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, "वाचा!" 

ते म्हणाले, "मला वाचता येत नाही." 

ते [प्रेषित (Sallallahu Alaihi Wassallam)] म्हणाले: "त्याने मला मिठी मारली आणि मला इतक्या जोरात दाबले की, माझी शक्ती संपली, मग त्याने मला सोडले आणि म्हणाला, "वाचा!" 
मी म्हणालो, "मला वाचता येत नाही." 
'मग त्याने मला दुसऱ्यांदा मिठी मारली आणि मला इतके जोराने दाबले की, मी पूर्णपणे थकून गेलो, मग त्याने मला सोडले आणि म्हणाला, "वाचा!" 
मी म्हणालो, "मला वाचता येत नाही." 
'मग त्याने मला तिसऱ्यांदा मिठी मारली आणि मला इतके जोराने दाबले की, माझी सहनशक्ती संपली, मग त्याने मला सोडले आणि म्हणाला," वाचा !"

वाचा, (हे पैगंबर (स.)) आपल्या पालनकर्त्याच्या नामासहित ज्याने

निर्माण केले, गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली.

वाचा, आणि तुमचा पालनकर्ता मोठा उदार आहे,
ज्याने लेखणीद्वारे ज्ञान शिकविले,

मानवाला ते ज्ञान दिले जे तो जाणत नव्हता.

(क़ुरआन  96: 1-5) 

मग अल्लाहचे दूत (Sallallahu Alaihi Wassallam) (प्रकटीकरण) घेऊन परत आले आणि त्यांचे हृदय धडधडत होते. ” 

(सहीह बुखारी 3; मुसलमान, 231)

4. आयेशा (Rajiallahu Anhu) यांनी असे सांगितले  की, अल-हारिस बिन हिशाम ने प्रेषित (Sallallahu Alaihi Wassallam) यांना विचारले, "हे अल्लाहचे मेसेंजर अल्लाह, प्रकटीकरण तुमच्याकडे कसे येते? ” 

मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) म्हणाले: “कधीकधी माझ्याकडे घंटा वाजवण्यासारखे येते, जे सर्वांत कठीण आहे, नंतर, त्यांनी जे काही सांगितले, ते मला समजल्यानंतर ही स्थिती समाप्त होते आणि कधीकधी ईशदूत माझ्याकडे माणसाच्या रूपात येतो आणि माझ्याशी बोलतो आणि तो काय म्हणतो ते मी लक्षात ठेवतो”
(सहीह बुखारी 2).

4. जिब्राईल (Alaihissalam)  बद्दल एक मोठी हदीस, 
जेव्हा ते एक परदेशी माणूस, एक अनोळखी व्यक्ती बनले आणि प्रेषित (Sallallahu Alaihi Wassallam) सोबत बसले आणि त्यांना  इस्लाम, ईमान (विश्वास) आणि एहसान ( चांगुलपणा, परिपूर्णता) बद्दल विचारले. मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) यांनी जिब्राईल आहे हे जाणून, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. 
जेव्हा त्यांनी आपले प्रश्न विचारणे संपवले आणि ते निघून गेले, तेव्हा प्रेषित (Sallallahu alaihi wasallam) यांनी आपल्या सहाबींना सांगितले की, हे जिब्राईल (Alaihissalam) होते, जे त्यांना त्यांचा धर्म शिकवण्यासाठी आले  होते. 

 सहीह बुखारी 48, सहीह मुस्लिम, 9.


5. इस्रा आणि मेराज (मक्का पासून जेरुसलेम पर्यंत पैगंबरांचा रात्रीचा प्रवास आणि जेरुसलेमपासून सात आकाशात चढणे) बद्दल अहवाल. यामध्ये वर्णन केले गेले आहे की,
पैगंबर (Sallallahu Alaihi Wassallam) यांनी जिब्राईल ला प्रश्न विचारले आणि जिब्राईल यांनी त्यांना उत्तर दिले. 

सहीह बुखारी 2968, सहीह मुस्लिम 238, आणि इस्रा आणि मेराजची कथा सांगणारी अहदीस.

6.अनेक हदीस देखील आहेत ज्यात प्रेषित (Sallallahu Alaihi Wassallam) हे म्हणतात, "जिब्राईल (Alaihissalam) माझ्याकडे आले आणि म्हणाले ..." 

जसे एक वेळेस 

म्हणाले: “जिब्राईल  (Alaihissalam) माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'तुमच्या उम्मा (अनुयायांमध्ये/ (राष्ट्रात) जो कोणी अल्लाहच्या समकक्ष कुणाला ठरवत नसेल आणि  तो मरण पावला तो स्वर्गात जाईल.
मी विचारले, "जर त्याने ' असे असे ' केले असेल तरी"
त्यांनी उत्तर दिले,  "होय. "

जेव्हा अल्लाहचे मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) खंदकच्या युद्धातून परत आले, तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या सहाबांनी शस्त्रे खाली ठेवली आणि स्नान करू लागले. जिब्राईल (Alaihissalam) त्यांच्याकडे आले, त्यांच्या डोक्यावर धूळ होती. म्हणाले की, “तुम्ही आपली शस्त्रे खाली ठेवली आहेत! अल्लाहची शपथ, मी माझे शस्त्र खाली ठेवले नाही.” 
अल्लाहचे मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) त्यांना म्हणाले, "कुठे जाणार आहात?" 
ते म्हणाले, "तिथे" - आणि बनी कुरैजाकडे निर्देश केला. म्हणून अल्लाहचे मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) त्यांच्या कडे [मोहीम पुन्हा सुरू करण्यासाठी] निघाले. 

(सहीह बुखारी 2602, सहीह मुस्लिम 3315) 

आणि आणखी, समान, पुरावे आहेत आणि अल्लाह उत्तम जाणतो.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

ताबूत सकीना

🌐📗मृत्यू ला घाबरून पलायन

"बनी इस्राइलचे लोक", जे प्रोफेट मूसा अ. यांचे अनुयायी होते, इजिप्त (मिस्र) या देशाला सोडून, खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले.

हे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे वचन दिले गेले होते, त्याच्याजवळच होते. [आधीचे "कानान" (canaan) फिलिस्तीन, palestine] 
मूसा अ. यांनी त्यांना म्हंटले की, त्यांच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा,
मूसा अ. यांनी म्हंटले, की धैर्याने, आणि अल्लाह वरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा. जर असे कराल तर, विजय त्यांचाच होईल, असे आश्वासन दिले…

त्यांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला…मूसा अ. यांनी बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले…

जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून, बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी, भयानक कहाण्या सांगितल्या. लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला.

"आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मूसा. तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो", ते म्हणाले.

मूसा अ. काहीच मदत करू शकत नव्हते.
मूसा अ. त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेले होते…त्यांनी त्याचे उरलेले आयुष्य, त्या लोकांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले… स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात त्यांचे बाकी आयुष्य गेले.

🍂🏵️शिस्य🏵️🍂
मूसाच्या मृत्युनंतर त्यांचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले…मूसा अ. यांनी आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले…आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले…त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले…आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला…जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत…

शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाह ने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की, "शहरात विनम्रतेने, अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा."

त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला. त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही. त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली. हे त्यांच्या मर्यादापेक्षा अती झाले होते…अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला…

💖हरझाकील💖
मूसा अ. यांचा दुसरा अनुयायी हरझाकील ने सुद्धा बनी इस्राइलच्या लोकांना, अल्लाहने दिलेल्या संदेशाच्या मार्गावर लढत राहण्यास वारंवार प्रेरित केले.

एकदा त्याने खूप अडचणीने आणि एक पूर्ण फौज जमा केली. तो शत्रूवर एक खास आक्रमण करण्याची योजना करून होता. तेव्हा हजारो लोकांनी त्याला एकटे सोडले. ते पळून गेले आणि मरणापासून सुटका करण्यासाठी, एका दरीत लपून बसले. हरझाकिल, या भित्रेपणा आणि त्याला एकटे सोडून जाण्याची कृतीवर, इतका निराश झाला आणि दुखावला की, त्याने अल्लाहला प्रार्थना केली, अल्लाहने त्या पळून गेलेल्या लोकांना कठोर शिक्षा केली.
त्याच दरीत जेथे त्यांनी आश्रय घेतला होता, त्यांच्यावर मृत्यू आला. ते मृत झाले, जेथे ते जिवंत राहण्यासाठी आले होते…
काही दिवसांनंतर जेव्हा हरझाकिल त्या दरीतून गेला आणि त्याने त्या युद्धातून पळून गेलेल्यांचे भाग्य (विधिलिखित) पाहिले, त्याला खूप वाईट वाटले. त्याने पुन्हा अल्लाहची प्रार्थना केली, या वेळेस दयेसाठी प्रार्थना केली आणि अल्लाहने, जो सर्वांत मोठा क्षमा करणारा आहे, त्यांना त्यांचे जीवन पुन्हा वापस दिले, की ते पुन्हा अल्लाहकडे वळतील आणि कृतज्ञ राहतील आणि असा गुन्हा, पुन्हा करणार नाही…

🌷शामोल (samuel)

शामोल हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनीही "बनी इस्राइल" च्या लोकांचे , शत्रूविरूध्द मार्गदर्शन आणि नेतृत्व केले. अल्लाहने त्यांना संदेशवाहक बनविले.
जेव्हा शामोल वृद्ध झाले, बनी इस्राइल त्याला म्हणाले,

"आम्हाला वाटते तू आम्हाला एक राजा निश्चित करून द्यावा, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि लढाईत आमचे नेतृत्व करण्यासाठी"
शामोल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून म्हणाला, की ते सर्व खूप ज्ञानी नाहीत पण त्यांनी आग्रह धरला…

❤️💚💕ताबूत सकीना
ताबूत सकीना म्हणजेच The ark of the Covenant.
यामध्ये (पेटीत) मूसा (अ) आणि आणखी दुसऱ्या प्रेषितांचे (संदेश वाहकांचे) काही पवित्र अवशेष आहेत. सध्या ती पेटी अज्ञात जागी आहे.

लढाई करता वेळेस, बनी इस्राइलचे लोक या पेटीला स्वतःच्या सैन्यासमोर समोर, पुढच्या रांगेत ठेवायचे…आणि अल्लाह, त्यांना त्या पेटीच्या उज्ज्वल भविष्यसूचकतेच्या गुणांमुळे, विजय देत असे…

त्या प्रेषितांच्या अवशेषामुळे, ज्या प्रेषितांनी, अल्लाहच्या इच्छेने लोकांसमोर संदेशवाहक म्हणून स्वतःला प्रस्तुत केले, पुढे न पाहिलेल्या मदतीचे आश्वासन मिळायचे….

"ताबूत सकीना" मध्ये अल्लाहने मूसा अ. यांना "तूर" पर्वतावर जो ग्रंथ दिला, तो, एका शुभदगडाच्या (scripture) दोन भागावर अंतर्लिखित आहे, त्यात मूसा अ. यांना दिलेला कायदा म्हणजे नीतिशास्त्र आणि आराधना अंतर्लिखित केला गेला आहे, ज्याला "टेन कमांडमेंटस" असे म्हणतात, जे "तोराह" या ग्रंथात आहे. आणि मूसा अ. यांची पवित्र काठी आहे…

हा "ताबूत सकीना", शुभ मानला जातो 

🌿🌿तलुत 🌿🌿

शामोल यांनी अल्लाह ला प्रार्थना केली आणि अल्लाहच्या आज्ञेने, बनी अमीनच्या जमातीतल्या "तलुत" ला, एक शक्तिशाली आणि देखण्या तरुण व्यक्तीला, त्यांचा शासक म्हणून नियुक्त केले…
बनी इस्राइलच्या लोकांना हे आवडले नाही कारण तलुत एक गरीब माणूस होता आणि तो त्यांच्या जमातितील नव्हता. त्यांनी त्याचा आदेश पाळण्यास नकार दिला.
शामोल यांनी, त्या लोकांना म्हंटले की, एक शासकाला त्याच्या कुटुंबावरून किंवा जन्मावरून नाही तर, वैयक्तिक गुणांवरून प्रशंसित करायला हवे. तलुत कडे एका चांगल्या राजाचे सर्व गुण आणि ज्ञान आहे, जे त्याला अल्लाह ने दिलेले आहे.

बनी इस्राइलच्या लोकांनी त्यांचा वाद चालू ठेवला. त्यांना काही तरी सत्याचा पुरावा पाहिजे होता की, तलुतला अल्लाह ने नियुक्त केले आहे.

शामोल यांनी त्यांना म्हंटले, की एक पुरावा म्हणून, ते "ताबूत सकीना" ची पेटी पुन्हा वापस मिळवतील. ज्यात मूसा अ. आणि हारून अ. यांचे अवशेष आहेत. जे ते गमावून बसले होते. ते म्हणाल की, फरिश्ते (स्वर्गदूत) त्या पेटीला वापस घेऊन येतील.

पॅलेस्टाईन (फिलिस्तिन) च्या लोकांनी ती पेटी असा विचार करून घेतली होती की, त्या पेटीला व्यवस्थित ठेवतील, हे त्यांच्यासाठी दुर्भाग्य ठरले. त्यांनी त्या पेटीपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला. यासाठी ते दोन गायींच्या मागे गेले, ज्या त्यांना बनी इस्राइल च्या लोकांपर्यंत घेऊन आल्या आणि ते तेथे त्या पेटीला सोडून गेले.

त्यामुळे बनी इस्राइल च्या लोकांना त्यांची पेटी शाबूत वापस मिळाली. या पुरव्यानंतर त्यांना तलुत ला राजा म्हणून स्वीकार करावे लागले…

मंगळवार, १३ जुलै, २०२१

युनूसचाकुराणमध्येसंदर्भ

 

युनूसचाकुराणमध्येसंदर्भ

🐠🐟युनूस माशाच्या पोटात🦈🐬🐋🐳
98💙मग (मानवाच्या इतिहासात असे) कधीही घडले नाही की, एखाद्या जनसमुहाने (अल्लाहच्या) प्रकोपाला पाहून श्रद्धा धारण केली आणि त्यांची श्रद्धा त्यांच्यासाठी फायद्याची ठरली. याला अपवाद फक्त युनूसचा जनसमूह आहे. जेव्हा त्यांनी (अल्लाह च्या प्रकोपाला ओळखून) श्रद्धा धारण केली, तेव्हा आम्ही या जगात (त्यांच्यावर कोसळणारी) अवहेलनेची शिक्षा (त्यांच्यापासून) दूर केली.आणि आम्ही त्यांना एका कालावधीपर्यंत जीवनाचा उपभोग करण्याची संधी दिली.

[कुराण 10:98]


87💙आणि माशाने ज्याला गिळून घेतले होते त्या (युनुसची) आठवण करा, जेव्हा तो आपल्या लोकांशी क्रोधित होऊन त्यांच्यापासून निघून गेला. त्याला वाटले होते की, (याविषयी) त्याची आमच्याकडून पकड केली जाणार नाही. मग ( त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली) त्याने त्या अंधकारातून आम्हाला हाक दिली. '(हे अल्लाह!) तुझ्याशिवाय कोणीच पूजनीय नाही, असीम आहे तुझी महिमा, खरोखर मीच अत्याचारी कृत्य केले आहे!' 88💙 तेव्हा आम्ही त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याची दुःखातून मुक्तता केली.अशाच प्रकारे आम्ही सच्च्या श्रध्दा वंतांना वाचवित असतो.

[कुराण 21:87-88]

139💙तसेच युनूस हा देखील पैगंबरांपैकी एक होता.140💙जेव्हा तो (आपल्या लोकांपासून) धावत जावून भरलेल्या नौकेवर पोहोचला.141💙मग नौकेंवाल्यांनी चिठ्ठ्या टाकल्या (तेव्हा त्यात पुन्हा - पुन्हा त्याचेच नाव निघाले ) तर त्यांनी त्याला (समुद्रात) फेकून दिले.142💙 मग (एका) माशाने त्याला गिळून टाकले. तेव्हा तो स्वतःला दोष देऊ लागला. (तेव्हा त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली.)143💙जर तो (अल्लाहचे) स्तुतिगान करणाऱ्यांपैकी नसता 144💙तर तो पुनरूत्थानच्या दिवसांपर्यंत माशाच्याच पोटात राहिला असता. 145💙मग आम्ही (त्याला माशाच्या पोटातून काढून समुद्रकिनाऱ्यावर) खुल्या मैदानात टाकून दिले.तेव्हा तो अगदी कासावीस होऊन गेला होता.146💙मग आम्ही (तिथे) त्याच्यापाशी एक वेलीचे झाड उगवले.147💙आणि नंतर आम्ही त्याला (पुन्हा एकदा) एक लाख किंवा त्यापेक्षा काही जास्तच लोकांकडे (पैगंबर म्हणून) पाठविले.148💙तेव्हा त्या लोकांनी श्रध्दा धारण केली. म्हणून आम्ही त्यांना काही काळ (या जीवनाचे) लाभ उपभोगू दिले.
[कुराण 37:139-148]

शुक्रवार, १४ मे, २०२१

दाऊद सुलेमान अ. भाग 5

🌴🌴🌴पॅलेस्टाईन (फलस्तीन) आणि इस्राईल मधील इतिहास...कुरआनमधील सत्य बोधकथांच्या च्या आधारे...🌴🌴🌴

ही सत्य कथा इस्राइल या देशातली 3000 वर्षांपूर्वीची म्हणजेच 1000 BC ची आहे..

प्रोफेट मूसा (Moses) यांच्यानंतर

मूसा अ. यांचे अनुयायी आणि बनी इस्राईल चे लोक, यांनी त्यांचा एक राजा असावा अशी इच्छा केली. आणि त्यावेळच्या संदेशकर्ताच्या द्वारे  " तालुत " यास राजा बनविले गेले.

बनी इस्राइलचा राजा, “तालुत”, शत्रूंसमोर जाण्याआधी, हे माहीत करू इच्छित होता की, त्याच्या लोकांची अचूक कुवत (सामर्थ्य) किती आहे…त्याला हे माहीत करायचे होते की, त्यांच्यातले किती जन शौर्याने लढणारे आहेत…म्हणून जेव्हा, ते एका झऱ्याजवळ एकत्र आले, तो लोकांना म्हणाला, “तुमची परीक्षा घ्यायची, अल्लाहची इच्छा आहे…

"जो कोणी, त्याची पूर्ण तहान भागविण्यासाठी पाणी पियील, तो आमच्यापैकी नाही…जर तुम्ही खूप तहानलेले असाल, तर फक्त एक घोट घेऊन घसा ओलसर करू शकता…”

जवळ जवळ, सर्व बनी इस्राईलच्या

लोकांनी पूर्ण तहान भागविली आणि म्हणाले, "आमच्यात जालुत सारख्या (शत्रू) मोठ्या शक्तीशाली सैनिकाशी लढण्याचे सामर्थ्य नाही…आम्ही मागे राहू…"

म्हणून काही थोड्याच लोकांनी तालुत चे लक्षपूर्वक ऐकले आणि त्यांनी, त्या वाहत्या झऱ्यातून जास्त पाणी पिले नाही, ते तयार होते आणि तेच लढाईसाठी योग्य होते…

ज्यांनी स्वतःचे धैर्य हरवले होते, त्यांना,

जे अल्लाहचे नाव घेऊन लढण्यासाठी तयार होते, त्यांनी म्हटले,

"तुम्ही का घाबरत आहात? जरी आपण थोडे असलो आणि शत्रू आपल्या संख्येपेक्षा खूप पटीने आणि जास्त मजबूत असला, तरी आपण लढू…

अल्लाहच्या मदतीने, खूप कमकुवत आणि कमी लोकांनी मजबूत शत्रूंविरूध्दची लढाई जिंकली आहे…”

जेव्हा ह्या संख्येने कमी असलेल्या तालुतच्या सैन्याचा, पॅलेस्टाईनच्या              (फिलिस्तीन) सैन्याशी सामना झाला…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांना कणखर आणि शूर राहण्यासाठी मदत कर…

लढाई सुरू झाली…आणि शक्तीशाली पॅलेस्टिनी सैनिक जालुत पुढे आला…त्याने बनी इस्राइल मधील प्रत्येकाला त्याच्याशी लढण्याचे आव्हान केले…तो इतका बलवान होता की, कोणीही पुढे येण्याचे साहस केले नाही..

बनी इस्राइल मध्ये एक दुबळा तरुण होता “दाऊद अ.” जे पुढे चालून संदेश कर्ते बनविले गेले.

जालुत ने केलेला अपमान ते सहन करू शकले नाही..

ते त्यांच्या सैन्यातून, बाहेर आले आणि म्हणाले, ” मी तुझे आव्हान स्वीकारतो..मी तुझ्याशी लढेन…”

जालुत हसला आणि त्याने दाऊद अ. यांची  थट्टा उडविली…पण ते कणखररित्या उभे राहीले…त्यांचा निशाणा खूप चांगला होता…जेव्हा त्यांनी त्यांचा गुल्लेर (गलोल) उचलला आणि तीन दगड जालुतच्या दिशेने भिरकावले…तीन ही दगड, त्या बलवान व्यक्तीला, त्याच्या कपाळावर लागले आणि तो खाली पडला आणि मृत झाला…

यामुळे शत्रुची बाजी त्यांच्यावरच उलटली..जेव्हा पॅलेस्टिनीनी पाहीले, त्यांचा शक्तीशाली माणूस, एका तरुणाकडून मारला गेला…त्या तरुणाची बहादुरी पाहून, शत्रूने धास्ती घेतली आणि त्यांनी धैर्य गमावले आणि पळाले.

कमी संख्या असलेल्या, अल्लाहला घाबरणाऱ्या सैन्याकडून, ज्यांनी अल्लाह (ईश्वर) ची मदत आणि धैर्य मागितले होते, त्यांच्या पेक्षा जास्त पटीने (संख्येने) असणारे शत्रू पराभूत झाले…

बनी इस्राइल विजयी झाले… तेव्हापासून ते लोक तरुण दाऊद अ. यांची, त्यांच्या बहादुरी आणि धैर्यासाठी प्रशंसा करू लागले, त्यांच्यावर प्रेम करू लागले 

आणि त्याचा सन्मान करू लागले…

तालुतचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांनी दाऊद अ. यांना राजा बनविले…

हे थोडे असाधारण होते कारण, बनी इस्राइलच्या जमातीतून साधारणतः संदेशवाहक आणि पवित्र व्यक्ती असायच्या आणि राजा दुसऱ्या जमातीतील असायचा…पण दाऊद अ. हे त्यांच्याच जमातीतील होते….

नंतर अल्लाह (ईश्वर) ने त्यांना एक संदेशकर्ता ही बनविले…त्यामुळे दाऊद अ. दोन्ही होते, एक संदेशकर्ताही आणि राजाही …पण ते असे राजा नव्हते, जे त्यांच्या लोकांच्या (प्रजेच्या, जनतेच्या) पैश्यांवर जीवन जगतात…दाऊद अ. हे एक सदाचारी आणि प्रामाणिक व्यक्ती होते. ते जरी एका अफाट साम्राज्याचे बादशाह होते, तरी त्यांनी राजवाड्याची शाही संपत्ती (खजिना) ला, त्यांच्या वैयक्तिक उपयोग करण्यासाठी कधीच स्पर्श केला नाही.

त्यांनी, लोखंड आणि पोलाद यांपासून विविध वस्तू बनविल्या…आणि त्यावर उदर निर्वाह करून जगले…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांचे श्रम त्यांच्यासाठी सोपे व्हावे…

अल्लाह (ईश्वर) ने, त्याच्या संदेशवाहकाची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्या

हातात (तळहातात) लोखंड नरम होण्याचे सामर्थ्य ,बक्षिसाच्या रुपात दिले…जेणेकरून ते त्यांना आवडेल त्या साच्यात लोखंड बसवू शकतील. म्हणून ते 

त्यांचे चिलखत (लढाईत शरीर रक्षणासाठी घालावयाचे धातूचे कवच) बनवू शकले… लोखंडापासून त्याच्या स्वतःच्या हातांनी, चिलखताचे कवच बनवून ते त्यांचा  उदरनिर्वाह पूर्ण करायचे.

ते चिलखत मजबूत करण्यासाठी, लोखंडाच्या किचकट साखळ्या विणायचे.

हे विकून, अल्लाह (ईश्वर) चा संदेशवाहक आणि बनी इस्राइलचा राजा, दाऊद अ., त्यांच्या उपजिविकेसाठी कमवायचे…
अल्लाह (ईश्वर)ने दाऊद अ. यांना

महान ज्ञान दिले होते आणि निर्णय घेण्याची शक्ती दिली होती. धार्मिकता दिली होती…

त्यांनी त्यांच्या लोकांवर चांगले 

आणि न्यायाने राज्य केले…..

अल्लाह (ईश्वर) ने दाऊद अ. यांना 

त्याचा ग्रंथ दिला “जबुर”.

दाऊद अ. यांचा आवाज खूप सुंदर आणि गोड होता..प्रत्येक सकाळी जेव्हा ते “जबुर” मधून अल्लाह (ईश्वर) च्या प्रशंसेचे वाचन करायचे… त्यांचा गोड आवाज पर्वतांत घुमायचा…पर्वत त्या प्रशंसेच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटवायचे…आणि सर्व पक्षी, त्याच्यासोबत अल्लाह (ईश्वर) ची प्रशंसा करण्यासाठी, त्याच्याभोवती घोळक्याने जमा व्हायचे….त्याचा आवाज इतका नियंत्रित, ओघवता आणि स्पष्ट की, ते त्यांच्या घोड्यावर, खोगीर (saddle)
बसवतांनाा, पूर्ण “जबूर” ग्रंथ 

वाचू शकत होते. (बोलून, पाठांतर करून) 

ज्यात अल्लाह ने वर्णन केलेल्या बोधकथा आणि प्रशंसा होत्या.

पक्ष्यांची भाषा दाऊद अ. यांना समजत होती आणि ते त्यांच्यासोबत बोलू शकत होते…जसे माणसे एकमेकांशी बोलतात….

ते मानायचे की, सगळी पृथ्वी एक अल्लाह (ईश्वर) च्या मालकीची आहे.आणि सदाचारी लोक, हे या जमिनीचे खरे वारसदार आहेत.

एक दिवस दोन माणसे राजा दाऊद अ. कडे आली आणि त्यांनी त्यांच्या

आपसातील वादाचा निर्णय करण्यास 

सांगितले.


एक म्हणाला, "ह्या माणसाने त्याच्या मेंढ्यांच्या कळपाला माझ्या शेतात चरण्यासाठी आणि पीक खाण्यासाठी सोडले, जे पीक कापणीसाठी तयार होते. मी काय केले पाहिजे? मी त्याला न्यायासाठी तुमच्याकडे घेऊन आलो आहे."

दाऊद अ. यांनी सर्व काळजीपूर्वक ऐकले. मग त्यांनी निर्णय घेतला की, पूर्ण वाढ झालेल्या पिकाची किंमत तेवढीच असते जेवढी एका मेढ्यांच्या कळपाची असते. त्यामुळे तो माणूस, ज्याच्या मेंढ्यांनी 

पीक खाल्ले आहे 

त्याने त्याच्या मेंढ्यांचा कळप, शेताच्या मालकाला द्यावा.

दाऊद अ. यांंचा पुत्र सुलेमान अ.

 (जे नंतर संदेश कर्ता बनविले गेले)

 हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होते, ते म्हणाले, “माझ्या पित्याने जे काही म्हंटले आहे, ते बरोबर आहे. पण येथे एक चांगला उपाय असू शकतो. मेंढ्यांच्या मालकाने , त्याच्या मेंढ्या त्या माणसाला द्यायचा, जो शेताचा मालक आहे ,आणि जो मेंढ्याचा मालक होता, तो त्याच्या शेताकडे लक्ष ठेवेल.

शेताचा मालक, मेंढ्यांना ठेऊन घेऊ शकतो आणि त्यांचे दूध आणि लोकर उपयोगात आणू शकतो, जोपर्यंत शेतात पुन्हा पीक परिपक्व होत नाही. त्यानंतर त्याने त्या मेंढ्या, त्याच्या मालकाला परत करायच्या आणि त्याचे शेत वापस घ्यायचे.

दाऊद अ., त्यांचा तरुण पुत्र , त्या वादावर, इतक्या हुशारीने उपायाचा निर्णय घेऊ शकला , म्हणून खूप आनंदी झाले.
सुलेमान अ. मोठा होऊन, त्यांच्या पित्यासारखे उत्तम एक राजा आणि एक संदेश वाहक बनले.

सुलेमान अ. यांना ही पक्ष्यांची भाषा समजत होती आणि ते ही त्याच्या पित्यासारखे ज्ञानी होते.

प्रेषित दाऊद यांचे एक भव्य साम्राज्य होते. त्यांच्या मुलाला ते साम्राज्य , वंश परंपरेने मिळाले होते.


सुलेमान अ. एक  खूप हुशार आणि बुद्धिमान युवक होते. 

आणि ते नेहमी त्यांच्या वडिलांना, त्यांच्या चांगल्या तार्किक बुध्दी आणि ज्ञानाने चकीत करायचे. ते ही त्यांच्या पित्यासारखे खूप धार्मिक वृत्ती, कर्तव्यनिष्ठतेने मोठे झाले होते.आणि अल्लाह (ईश्वर) कडून संदेशकर्ता बनविले गेले होते…

अल्लाहने त्यांना पक्षी आणि प्राणी यांची भाषा समजण्याची प्रतिभा “बक्षीस” म्हणून दिली होती. 

अल्लाहने त्यांना वाऱ्याच्या हालचालीवरचे नियंत्रण ही दिले होते. सुलेमान अ. यांचे साम्राज्य जगातील एक भव्य, संपन्न आणि खूप उत्कृष्ट साम्राज्य होते. जे आधी कुणीही पाहिले नव्हते. त्याच्या प्रजाजनमध्ये फक्त माणसेच नव्हती तर जिन्न (आगीने बनलेले जीव), प्राणी आणि पक्षी ही होते.

सुलेमान अ. वारा नियंत्रित करू शकत होते., त्यामुळे ते स्वतःला त्यांच्या इच्छेप्रमाणे, दूर अंतरावर हवेवर स्वार होवून घेऊ जावू शकत होते.

त्यांच्या पक्षी आणि प्राण्याच्या भाषेच्या ज्ञानामुळे त्यांना खूप दूरच्या आणि विस्तृत जागे विषयी बातमी मिळण्यास मदत मिळायची.

जिन्न हे खूप शक्तीशाली जीव होते.

ते जमिनीत आणि समुद्राच्या, महासागराच्या तळाशी लपलेले अमूल्य खजिने सुलेमान अ. साठी आणायचे आणि त्यांच्या राज्यात, खूप मोठ्या आणि उत्कृष्ट इमारती, बनवायचे.
पवित्र क़ुरआन मध्ये म्हटले गेले आहे की, 

सुलेमान अ. जिन्नांचा श्रमिक म्हणून, मोठ्या इमारती, किल्ले आणि तलाव बांधण्यासाठी, वापर करायचे. शक्तीशाली आणि सहसा कुणाच्या ताब्यात न राहणारे जिन्न, सुलेमान अ. साठी न थकता काम करायचे. 

सुलेमान अ. इमारतींना, किल्ल्यांना सुंदर किमती दगडांनी आणि रत्नांनी सजवायचे. हे सगळे शक्य होते कारण सुलेमान अ. यांनी अल्लाह (ईश्वर, यहोवा) ला प्रार्थना केली होती की, त्यांना एक भव्य साम्राज्य द्यावे आणि म्हणून अल्लाहने अशा धन्यतेची कृपा केली होती.

जेव्हा सुलेमान त्यांच्या राजवाड्यात दरबार 

भरवत होते, तेव्हा जिन्न, प्राणी आणि पक्षी आज्ञाधारक पणे, त्यांच्यासमोर रांगेत उभे राहायचे. जसे दुसरे प्रजाजन उभे राहायचे.अशा प्रकारे अल्लाहने त्याच्या सद्गुणी प्रेषिताला पारितोषिक दिले होते.

एकदा जेव्हा सुलेमान अ. आणि त्यांचे सैन्य प्रवासात होते, 

ते एका दरीत आले, जी पूर्ण मुंग्यांनी भरली होती. जसे ते मुंग्यांच्या जवळ गेले, सुलेमान अ. यांनी ऐकले की, मुंग्यांच्या राजाने त्यांना लवकर त्यांच्या वारुळांत जाण्यास सांगितले, जेणेकरून ते, सुलेमानच्या सैन्याने चिरडले जावू नये. (सुलेमान यांना प्राण्यांची भाषा समजत होती. त्यांना ही समज अल्लाह म्हणजेच ईश्वराकडून देण्यात आली होती.)

सुलेमान अ. हसले., जेव्हा त्यांनी हे ऐकले आणि शक्तिशाली अल्लाहचे आभार मानले, ज्याने त्यांना छोट्या जीवांना समजण्याच्या प्रतिभेचे “बक्षीस” दिले होते, 

ज्यामुळे सुलेमान अ. त्यांच्यावर दया करू शकत होते.

’ताबूत सकीना’ त्यांनी व्यवस्थित राजवाड्यात ठेवला होता.

बादशाह_सुलेमान

🌹🌹🌹सबा ची राणी 🌹🌹🌹
एक दिवस जेव्हा राजा सुलेमान अ. यांनी दरबार भरवला होता, त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या दरबारातील हुदहुुद (हुपू; hoopoe) पक्षी गायब होता.

सुलेमान अ. त्याच्या अनुपस्थितीने नाराज झाले आणि म्हणाले, " हुदहुद कोठे आहे? मला तो तुमच्यामध्ये दिसत नाही. जर अनुपस्थित राहण्याचे एक चांगले कारण नसेल तर, मी त्याला नक्कीच शिक्षा करेन."

ते असे म्हणत असतानाच, हुदहुद उडत आत आला आणि विलंब झाल्याने दिलगिरी व्यक्त केली.

"मी एका शक्तीशाली राज्य "सबा" ची बातमी आणली आहे. त्या राज्यावर एक राणी राज्य करते , जी एका उत्कृष्ट सिंहासनावर विराजमान होते. सबा येथील लोक, खऱ्या अल्लाह (एक ईश्वर) ची उपासना सोडून, सूर्याची उपासना करतात." त्याने राजाला सांगितले.

"तू आमच्याशी खरे बोलत आहे का, हे आम्ही लवकरच माहीत करू," सुलेमान अ. म्हंटले. 

"हे घे, हे पत्र घेऊन सबा ला जा, तेथे ते पोहोचव आणि मग काय घडते ते पाहायची वाट पाहा.
हुदहुद ने सुलेमान अ. यांचे पत्र घेतले आणि सबा ला जाण्यासाठी निघाला. तेथे त्याने राणीच्या समोर ते टाकले आणि शांतपणे काय घडते , ते पाहण्याची वाट पाहू लागला.

राणीने जेव्हा ते पत्र वाचले, तिच्या सल्लागाराला काय करावे असे विचारले. "हे राजा सुलेमान कडून एक पत्र आहे. अल्लाह (ईश्वर) चा योग्य सन्मान करून आणि अल्लाहच्या नावाने सुरू केलेले आहे. त्याने अल्लाह च्या सत्यनिष्ठेला विरोध न करता,  समर्पण करण्यासाठी मला त्याच्याकडे बोलावले आहे."
मग राणीने थोडा वेळ विचार केला आणि सुलेमान अ. साठी काही मौल्यवान भेटवस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला.

पण सुलेमान अ. काही साधारण राजा नव्हते. ते अल्लाहचे (एक ईश्वराचे) संदेश कर्ता (प्रेषित) होते. ते क्रोधित झाले, जेव्हा त्यांनी पाहिले की, राणीने त्यांच्या संदेशाचा कसा अर्थ लावला. 

त्यांनी तिच्या संदेश देणाऱ्याला भेटवस्तू सहित वापस पाठविले आणि त्याला म्हंटले की, "राणीला सांग की, जर अल्लाह (ईश्वर) च्या सत्य निष्ठेकडे बोलवण्याचे उत्तर भेटवस्तू असतील, तर तो सबा ला सैन्यासह येईन."

आता राणी खरच घाबरली आणि तिने तत्काळ स्वतः सुलेमान अ.कडे जाण्याचा निर्णय घेतला.जेव्हा सुलेमान अ. यांना  तिच्या येण्याचा हेतू कळला, 

त्यांनी त्यांच्या दरबाऱ्यांना विचारले, "येथे कोणी आहे का, जो तिचे सिंहासन, ती इथे येण्याआधी आणू शकेल ."

एका जिन्नने उत्तर दिले की, "डोळ्यांची पापणी लवण्याआधी तो ते आणू शकेल." सिंहासन आणण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा तो आणला गेला, सुलेमान अ. यांनी त्याच्यात थोडा बदल केला.

जेव्हा राणी आली, तिला तो सिंहासन दाखविण्यात आला आणि विचारले, "हे तुझे सिंहासन आहे का?" तिने लगेच त्या सिंहासनाला ओळखले, कारण ती खरोखर बुद्धिमान होती, पण तिने तिचे आश्चर्य लपविले आणि म्हणाली, "हे तसेच दिसत आहे".
सुलेमान अ. यांनी तिला त्यानंतर एका सुंदर राजवाड्यात नेले, ज्याची फरशी चकाकणारी होती. तिने फरशीवर पाय ठेवण्यासाठी तिचा घागरावर उचलला. कारण तिला वाटले की, ते पाण्याचे तळे आहे. पण ती खरंच राजवाड्याची फरशी होती ज्याची पारदर्शक (विशेष मौल्यवान काचेने) फरस बंदी केली होती.(आच्छादली होती.) 

अशी त्या राजवाड्याची भव्यता होती.
जे अल्लाह ने सुलेमान अ. यांना बहाल केले होतेे. राणी इतकी प्रभावित झाली की, ती अल्लाह (ईश्वर) च्या सत्यनिष्ठेला शरण गेली.

"मी स्वतःशी चूक केली आहे. आता सुलेमान अ. सह मी या जगाच्या प्रभुला शरण जात आहे."
अशाप्रकारे सुलेमान अ. त्या सुंदर राणीला अल्लाहची शक्ती पटविण्यास सक्षम झाले.

सुलेमान अ. यांच्या पायाशी सर्व मौल्यवान सांसारिक (ऐहिक) खजिने होते. तरीही त्यांची अल्लाहवर असलेल्या श्रध्देत कमी झाली नाही. ही सुद्धा अल्लाह चीच कृपा होती.

ते नेहमी, इतके जास्त देण्यासाठी अल्लाहला आभार मानत राहिले आणि गर्विष्ठ झाले नाही. 

एकदा जेव्हा सुलेमान अ. एका उत्कृष्ट मशिदीच्या बांधकामाची देखरेख करत होते. त्यांच्या मृत्यूची वेळ आली. जेव्हा त्यांना याची जाणीव झाली की, ते मरणार आहे, ते उरलेल्या बांधकामाच्या देखरेखी विषयी चिंताग्रस्त झाले. त्यांना भीती होती की अडेल (बेलगाम, ताब्यात न राहणारे) जिन्न अर्धवट काम सोडून, मोकळे सुटतील.

अल्लाह ने याची काळजी घेतली. जेव्हा बांधकाम पूर्ण केले जात होते, सुलेमान अ. त्यांच्या चालण्याच्या काठीचा आधार घेऊन उभे राहिले. 

त्याच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा

किड्यांनी त्यांची काठी आतून पोखरून खाल्ली आणि ते कोसळले, फक्त तेव्हाच सुलेमानच्या मृत्यूचे गुपित जिन्नांसमोर प्रकट झाले. तोपर्यंत ते काम करत राहिले. कारण सुलेमान अ. यांना एकाच अवस्थेत काठीच्या मदतीने उभे राहण्याची सवय होती.

जिन्नांनी, ते सर्व , अल्लाह (ईश्वर) चे रहस्य न समजण्यालायक असल्यामुळे एकमेकांना शाप दिला. " जर आम्हाला याविषयी आधीच माहीत असते तर आम्ही या परिश्रमापासून खूप लवकर सुटका करून घेतली असती." ते म्हणाले.

ही बोध कथा आणि सत्य कथा पवित्र कुरआन मध्ये वर्णन केली आहे. कृपया मराठी कुरआन वाचा आणि ईश्वराची संकेत वचने जाणून घ्या.


सत्यकथा🍁यशायाह (Isaiah)🍁🍁राजा "हजकिया" (Hezekiah) (700BC) (साधारणतः 2700वर्षांपूर्वी) जेरुसलेम (जुडा) राज्यावर राज्य करीत होता. 

अल्लाह (ईश्वर, यहोवा,God) चा चांगला सेवक आणि राजा होता. त्यावेळी 'यशायाह' अ. हे अल्लाहचे संदेशकर्ता म्हणजेच प्रोफेट होते. 

राजा हजकीया, राज्याच्या चांगल्यासाठी, यशायाह अ. ,जे काही करण्याचा सल्ला देत होते आणि ज्यावर प्रतिबंध लावत होते, राजा ऐकत होता आणि त्यांचा आज्ञाकारी होता आणि त्यांना सल्ला मागत होता. इस्रायली लोकांमध्ये घडामोडी होत गेल्या आणि प्रकरणांना वेग आला. राज्य एका योग्य राजाच्या हातात होते आणि राज्याची प्रजा त्याला पसंत करत होती. एक दिवस राजाला एक आजार झाला. त्याच्या पायाला संसर्गित जखम झाली. 

याच काळात त्याने एक भयानक बातमी ऐकली. त्याचा एक सेवक राजवाड्यात पळत आला आणि त्याने ओरडून सांगितले, " 'बेबिलोन' चा राजा 'सनहेरीब ' (sennacherib) आपल्यावर आक्रमण करण्यास येत आहेत." 

आणि हे खरे होते. क्रूर आश्शुरी राजा साठ हजार सैन्यासह इस्राइल (जेरुसलेम) कडे येत होता.

बेबिलोन (बाबिली) हे मेसोपोटेमिया मधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते. या शहराची स्थापना 1894 BC मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली होती.(हल्लीच्या इराक, इराण, तुर्कस्तान व सीरिया या देशांचा काही भूभाग प्राचीन काळी ' मेसोपोटेमिया' भूप्रदेश नावाने ओळखला जायचा.)
{बेबिलोन चे अवशेष इराकच्या बेबीलोन प्रांतातील "अलहिल्लाह" या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात.}

लोक खूप भयभीत झाले. बातमी ऐकून राजा चिंताग्रस्त झाला आणि त्याने 

यशायाह अ. यांना विचारले, "अल्लाह ने सनहेरीब आणि त्याच्या सैन्याविषयी तुमच्यावर काय प्रकट केले (सांगितले) आहे".

"अल्लाहने आतापर्यंत मला काहीही नाही सांगितले", त्यांनी उत्तर दिले.
राजा दुःखी होता. कारण तो त्याच्या पायाच्या आजारमुळे लढाई करू शकत नव्हता.
यशायाह अ.प्रार्थना करत होते, तेव्हा अल्लाहने त्यांना एक गुप्त गोष्ट सांगितली. (प्रकट केली)

दुसऱ्या दिवशी यशायाह संदेश घेऊन राजाला भेटावयास आले.
"तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या उत्तराधिकारीची नेमणूक करा .कारण तुमची शेवटची वेळ आलेली आहे."


जेव्हा यशायाह अ. यांनी हे सांगितले, 

राजा प्रार्थना स्थळाकडे तोंड करून प्रार्थना करू लागला. त्याने गौरवशाली अल्लाहला प्रार्थना केली आणि विनंती केली, रडला.

प्रामाणिक मन, विश्वास आणि संयम ठेवून, सर्वशक्तीशाली आणि उदात्त अल्लाहला रडत आणि विनंती करत, तो म्हणाला, "हे प्रभू, माझ्या कर्मांची आठवण ठेव, इस्राइलच्या लोकांसाठी असलेले निर्णय,  सगळे तुझ्याकडूनच होते. मी जे करतो, ते तू चांगले जाणतो. माझे सर्व काम आणि माझे खुले आणि गुप्त कार्य तुझ्या समोर आहेत."

जेव्हा अल्लाहने हिजकियाची मनापासून केलेला प्रार्थना ऐकली, तेव्हा अल्लाहला त्याच्यावर दया आली.


त्या रात्री जेव्हा यशायाह प्रार्थना करत होते, अल्लाहने त्यांना राजाला आनंददायक बातमी देण्यास सांगितले की, त्याच्यावर दया झाली आहे. अल्लाह आणखी पंधरा वर्षांसाठी हिजकीयाचे वय वाढवणार आहे. आणि त्यांचा आजार बरा होणार आहे. आणि शत्रू सनहेरीब पासून वाचवणर आहे.

लगेच दुसऱ्या दिवशी यशायह अ. यांनी राजाला ही चांगली बातमी दिली. जेव्हा राजाने हे ऐकले, तो आनंदी झाला.

दुःख आणि वाईट विचार दूर झाले. त्याने वाकून प्रणाम करून प्रार्थना केली, "हे प्रभू, तू ज्याला इच्छितो त्याला राजा बनवतो आणि ज्याला इच्छितो त्याला सत्तेवरून काढून टाकतो. ज्याला इच्छितो त्याला उन्नत करतो आणि ज्याला इच्छितो त्याची अधोगती करतो. अदृश्य जाणणारा आणि स्पष्ट असणारा. सगळ्यात पहिला आणि शेवटचा. अभिव्यक्त आणि ज्ञात असणारा. तू दया दाखविली आणि अस्वस्थ लोकांच्या प्रार्थनांना उत्तर दिले."


जेव्हा राजाने त्याचे डोके वर केले, अल्लाहने यशायाह अ. यांना, राजाला आदेश देण्यास सांगितले की, अंजिराचे पाणी काढून त्याच्या जखमेवर लावावे आणि तो बरे होईल.

राजाने अल्लाहच्या आदेशाप्रमाणे पाणी लावले. हा एक चमत्कार होता. त्याचे जखम लगेच भरले. राजा आनंदी होता. त्याने म्हंटले की, "अल्लाह दया करतो आणि दुःखी लोकांच्या वेदना कमी करतो."

अल्लाहने सनहेरीब च्या सैन्याकडे मृत्यूच्या स्वर्गदूताला पाठविले. सकाळी राजा सनहेरीब ने त्याच्या सैन्याला मृत झालेले पाहिले. अल्लाहने जे वचन दिले होते ते पूर्ण केले.

शत्रूच्या सैन्यातील राजा आणि त्याचे पाच 

सहकारी सोडून कोणीच जिवंत नव्हते. या पाच सहकाऱ्यांमध्ये नबूकदनेस्सर (बूख्तनसर) ही होता.


राजा हजकिया ने त्यांना बेड्या घातल्या आणि त्याच्या राज्यात वापस नेले. 

राजाने, सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, सर्वांना दिसण्यासाठी, दरबाराच्या शिक्षा देण्याच्या जागी ठेवले आणि सत्तर दिवसापर्यंत, द्वेष आणि अपमानित करण्यासाठी कैदेत ठेवले. 

रोज प्रत्येकाला खाण्यासाठी "बारले" ची भाकरी देण्यात यायची. सत्तर दिवसानंतर त्यांना, राजाने तुरुंगात टाकले.

सत्तर दिवसानंतर अल्लाहने, यशायाह अ. यांना, सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, त्याच्या राज्यात वापस पाठवण्यास सांगितले. 

जेणेकरून ते त्याच्या प्रजेला, म्हणजेच त्याच्या राज्यातील लोकांना सावध करतील, की, त्यांच्यासोबत काय घडले. 

जेव्हा यशायाह अ. यांनी, राजा हजकिया ला, या बाबतीत संदेश दिला, तेव्हा राजाने तुरंत त्यांना मुक्त केले.
जेव्हा सनहेरीब त्याच्या लोकांत वापस गेला, त्याने त्याच्या वाजिरांना आणि सल्लागारांना जमा केले आणि सांगितले, की, त्याच्या सैन्याला कसे मारण्यात आले आणि सत्तर दिवस त्यांना किती त्रास दिला.
तेव्हा धार्मिक लोक आणि जादूगार लोक पुढे आले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला अल्लाह आणि त्यांच्या संदेशकर्त्याविषयी सूचना दिली होती.पण तुम्ही ऐकले नाही. दुसऱ्याने असे म्हंटले, तो एक असा देश आहे, ज्याला कोणी मिटवू शकत नाही. त्या देशाला कोणी जिंकू शकत नाही. सनहेरीब आता अल्लाह (ईश्वर) ला घाबरला होता. त्याने पुन्हा कधी इस्राइलवर आक्रमण करण्याचा विचार केला नाही. त्यानंतर सात वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला.

कुरआन मध्ये यशायाह अ. यांचे नाव आहे.
यहुदी (ज्यू,हिब्रू) लोक एक अल्लाहला (ईश्वराला) यहोवा म्हणतात.आणि ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात. तिन्ही ग्रंथात 

कुरआन, बायबल (इंजील) आणि तोराह (तौरेत) मध्ये जवळजवळ सारख्याच

सत्यकथा आहेत. संदेशकर्ता ही सारखेच आहेत.

पण कुरआन च्या आधीच्या ग्रंथांत, लोकांकडून बदल झाला. त्यामुळे ते मूळ ग्रंथ नाही.


अरमाया (जेरमाया) अ. 

(655BC)(2675वर्षांपूर्वी )
जेरुसलेमच्या लोकांनी फक्त एक अल्लाह

म्हणजेच ईश्वर ची (अल्लाहला ते "यहोवा" म्हणत होते.) उपासना करणे सोडून, दगडांच्या प्रतिमा बनविल्या आणि त्यांची उपासना सुरू केली.

अरमाया अ. यांनी अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, फक्त एका अल्लाहची  (ईश्वराची) उपासना करा आणि परत या. पश्र्चाताप करा. क्षमा मागा.अल्लाह दयाळू आहे.

अरमाया अ. यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला की, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. नाहीतर ते सर्व लोक नष्ट होतील.


पण त्यांचा उपदेश लोकांनी मानला नाही. त्यांनी अरमाया अ. यांना खोटं बोलणारा समजले. ते लोक गर्विष्ठ झाले. त्यांच्यामध्ये खूप लोक चुकीच्या रस्त्यावर गेले. 

पाप वाढले. लोक कुकर्म करू लागले. त्यांना चमत्कार दाखवूनही (अल्लाहच्या मदतीने) काही फरक पडत नव्हता. ते या गोष्टीवर विश्वासच करू शकत नव्हते की, अल्लाह, त्या दगडाच्या गुंबद (हैकले सुलेमानी) ला, जे जेरुसलेममध्ये सुलेमान अ. यांनी बांधले होते आणि ज्यावर अल्लाहची कृपा होती, नष्टही करू शकतो.

लोकांनी अरमाया अ. यांच्या, संदेशातील धमकी आणि चेतावणी ऐकली, ते म्हणाले,  "तू खोटे बोलत आहेस, तू असे म्हणत आहे की, अल्लाह या जमिनीला, प्रार्थना स्थळाला, [जे आधी, फक्त एका अल्लाह (यहोवा, ईश्वर)ची उपासना करण्यासाठी होते, आणि आता] जेथे दगडाच्या प्रतिमा ठेवल्या गेल्या होत्या, ग्रंथाला (ज्यामध्ये बदल केला गेला होता) नष्ट करेल?"

जेरुसलेमचा राजा खूप गर्विष्ठ होता. त्याने आदेश दिला की, "अरमायाला कैद करा आणि तुरुंगात टाका. त्यांनी अरमाया अ. यांना, जकडून तुरुंगात टाकले. ही खूप मोठी चूक होती.

अल्लाहने (ईश्वराने) नबूकदनेस्सर (nebuchadnezzar) या 

बेबीलोन (इराकचे प्राचीन शहर) च्या राजाला जेरुसलेम वर, आक्रमण करण्यास पाठवले. 

त्याने, त्याच्या सैन्यासह देशात प्रवेश केला आणि शहराला घेरले . जेव्हा हा सैन्याचा वेढा प्रदीर्घ कालावधी पर्यंत राहिला. जेरुसलेमच्या सैन्याने शरणागती पत्करली, त्यांनी त्यांच्या शहराचे दरवाजे उघडले आणि राजाच्या सैन्याने शहरात प्रवेश केला आणि ते खूप क्रूर होते. राजाने क्रूरतेने त्यांच्यावर, त्याचा कायदा लागू केला आणि त्यांना निर्दयीपणे शिक्षा केली.

राजाने, एक तृतीयांश लोकांचा वध केला आणि एक तृतीयांश लोकांना पकडले. बेबिलोनच्या सैन्याने फक्त अपंग आणि वृद्ध लोकांना जाऊ दिले. त्यांनी जेरुसलेमच्या लोकांच्या सर्व घरांना नष्ट केले. त्या सैन्याने हैकले सुलेमानीच्या इमारतीला  (प्रार्थनास्थळाला) नष्ट केले. बेबोलोनच्या सैन्याने, तेथील लोकांचे, सर्व पुस्तके आणि ग्रंथ जाळून टाकले. त्यांनी मुलांशी आणि स्त्रियांशी ही वाईट वागणूक केली. हा तेथील लोकांसाठी खूप भयावह दिवस होता.
मग त्यांनी, त्यांना घोड्यांवर स्वार होऊन पायदळी तुडविले. तरुणांना वेगळे करून स्त्रियांना बाजाराच्या ठिकाणी रक्षक म्हणून उभे केले. त्यांनी सैन्यात दहशत पसरवली आणि राजाने जेरुसलेमच्या वंशाला पूर्णपणे संपुष्टात आणले. 

हे इस्राइल अ.  (याकूब अ.) च्या वंशाच्या लोकांसाठी, जे जेरुसलेम मध्ये राहत होते, खूप भयानक दृश्य होते. ती जागा लोकांच्या रक्ताने भरली. सगळी कडे मृतदेह होते.

बेबोलोनच्या राजाला माहीत झाले की, इस्राइल च्या लोकांचा एक संदेशकर्ता आहे, ज्याला आधी पासूनच या विनाशा विषयी माहीत होते आणि त्याचे नाव अरमाया आहे. राजाने आदेश दिला की, त्या संदेश कर्त्याला तुरुंगातून बाहेर आणले जावे. अरमाया अ.शी बोलल्यानंतर राजाला जाणीव झाली, की ते खरच अल्लाह (ईश्वर) चे  खरे संदेशकर्ता (पैगंबर) होते. राजा ने त्यांची सुटका केली.
त्या पूर्ण शहराला नष्ट करून बेबिलोनचा राजा पुन्हा त्याच्या राज्यात निघाला. राजा बेबिलोनला, सर्व लूट घेऊन निघाला, ज्यामध्ये संपत्ती, सोने, हिरे, मौल्यवान खजिने होते आणि पुरुष, स्त्रिया, मुले होती, त्यांच्यात तरुणी होत्या आणि धर्मोपदेशकांची मुले होती, सर्व मिळून सत्तरहजार पर्यंत होते. अंदाजे सत्तर हजार पुरुष आणि स्त्रियांना त्याने सेवक बनविले.

इस्राइलची जमात ही अल्लाहची जमात होती. त्या लोकांकडे खूप संदेश देणारे (पैगंबर) आले. अल्लाहने त्यांना खूप संधी दिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांनी अल्लाह चा प्रत्येक आदेश तोडला. इतकेच नाही तर त्यांनी अल्लाहचा संदेश देणाऱ्यांची हत्या केली आणि दगडाच्या प्रतिमांची उपासना करणे चालू ठेवले. याच कारणाने अल्लाह (ईश्वर) त्यांच्यावर खूप क्रोधित झाला आणि पूर्ण जमातीला ध्वस्त आणि नष्ट केले.

या विध्वंसानंतर इस्राइल मध्ये नवीन युग सुरू झाले. अरमाया अ. यांनी लोकांना म्हंटले की, जे इस्राइल मध्ये हजर आहेत, त्यांनी स्वतःच्या अपराधावर पश्चाताप करून अल्लाह (ईश्वर) ला क्षमा मागावी आणि हे ही सांगितले की, अल्लाह पुन्हा एकदा त्या लोकांची भरभराट करेल. पण खूप लोक, त्या विध्वंस झालेल्या शहरात राहण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा अरमाया अ. यांचा आदेश मानण्यास नकार दिला. आणि ते सगळे लोक जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाले. त्यातील काही इजिप्त (मिस्र), स्पेन (हिजर) आणि सौदी अरेबिया (तैफ) मध्ये गेले. पण अरमाया अ. यांनी इस्राइल ची पुन्हा भरभराट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

ही सत्य घटना आहे. बायबलमध्ये पूर्ण एक chapter यावर आधारित आहे. जेरुसलेमचे लोक ( इस्राइलचे वंशज) दोन वेळा उपद्रव माजवतील व दोन वेळा जेरुसलेम नष्ट केले जाईल, अशी चेतावणी अल्लाह (यहोवा) कडून देण्यात आली होती.

कुरआन मध्ये हा संदर्भ आहे.
#कुरआनचा_काही_अंश

"4 आणि आम्ही इस्राईलच्या मुलांना, ग्रंथाद्वारे हे आधीच कळविले होते की, तुम्ही जमिनीवर दोन वेळा उपद्रव माजवाल आणि मोठ्या विद्रोहाचे प्रदर्शन कराल. 5 मग ज्या दोन घटनेच्या बाबतीत आधीच इशारा दिलेला होता, त्यांपैकी जेव्हा पहिल्या घटनेची वेळ आली, तेव्हा आम्ही आमच्या भक्तांपैकी अशा काही भक्तांना तुमच्या विरुद्ध पाठवले. जे युद्धाच्या बाबतीत फार शक्तीशाली असे होते, जे तुमच्या घरांत (घुसले व) त्यांचे वाटोळे केले. अशाप्रकारे आधीपासून वर्तवलेले भाकीत पूर्णत्वास पोहोचले.
[कुरआन 17:4-6]

________________________________


[इस्रायली लोकांच्या ग्रंथात ' तोराह ' मध्ये हे भाकीत अल्लाह (यहोवा) ने वर्तविले आहे, जो अल्लाहचाच ग्रंथ आहे , पण लोकांनी त्यात फेरबदल केले आहे. अरमाया अ. यांना त्या इस्राइलच्या वंशजाकडे, चेतावणी देण्यासाठी पाठवले होते. ही पहिली घटना होती. दुसरी घटना, जी ईसा (येशू) अ. यांच्या काळातील आहे. जेव्हा दुसऱ्या वेळेस इस्राइल च्या वंशजाने उपद्रव माजवला होता आणि विद्रोह केला होता.]

 

🐳माशाच्या पोटात 🐳
युनूस अ. हे एक ईश्वरनिष्ठ तरुण होते.

ते "निनेवेह" (सध्याच्या "मोसुल" च्या बाहेरील भागात असणारे एक प्राचीन शहर, इराक) येथे राहत होते. 

या ठिकाणचे लोक फक्त एक खऱ्या अल्लाहवर (ईश्र्वरावर) विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे अल्लाहने त्या लोकांसाठी युनूस अ. यांना, त्याचा संदेशकर्ता म्हणून निवडला. 

युनूस अ. यांनी अल्लाहच्या संदेशाचा उपदेश त्या लोकांना दिला. पण त्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने अविचारीपने त्याचा उपदेश लक्षपूर्वक ऐकला, आणि जेव्हा तो म्हणाला एकच अल्लाह (ईश्वर, पालनकर्ता) आणि तो, अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांनी त्याची थट्टा केली.
युनूस अ. यांनी त्यांना विनवणी केली, अल्लाहच्या क्रोधाविषयी आणि दंडाविषयी (शिक्षा) चेतावणी दिली. पण काहीच अर्थ नव्हता. ते त्याला पाहून अजून हसले आणि विश्वास केला नाही. 

यामुळे युनूस अ. यांची त्यांच्याकडून निराशा झाली. त्यांनी रागावून आणि अल्लाहच्या शिक्षेबद्दल चेतावणी देत, अल्लाहचा आदेश येण्याची वाट न पाहताच, निनेवेह च्या लोकांना सोडले.

यावर निनेवेह च्या लोकांना काहितरी गंभीरपने चूक झाली आहे, याची जाणीव झाली. त्यांना त्यानंतर भीती वाटली आणि वाटले की, "युनूस अ. हा अल्लाहचा खरा संदेशकर्ता होता. त्याला त्रास देऊन, त्यांनी अल्लाहला नाराज केले आहे आणि आता अल्लाहची दिलेली शिक्षा नक्कीच त्यांना नष्ट करू शकते.."

ज्या क्षणी त्यांना याची जाणीव झाली, ते पश्र्चाताप करण्यासाठी खुल्या जागेत आले, वाकून आणि अल्लाहकडे याचना करत, नमन करू लागले. त्यांनी क्षमा याचना केली आणि सत्य निष्ठा स्वीकार केली. त्यांनी इतक्या प्रामाणिकपणेे क्षमा मागितली की, अल्लाहने त्यांना क्षमा केली आणि त्यांच्यावर ती शिक्षा (दंड, आपदा) केली नाही, ज्या विषयी, युनूस अ. त्यांना चेतावणी देऊन गेले होते.

या काळात, युनूस अ. यांनी, त्यांच्या लोकांना आणि "निनेवेह" ला रागाच्या भरात सोडल्यानंतर , ते दूर जावून, एका नौकावर चढले जी, त्या क्षणी समुद्रात प्रवासासाठी निघणार होती.
ती नौका, जी लोकांनी भरली होती समुद्रात निघाली, पण रस्त्यात, एक मोठे वादळ नौकेवर आदळले आणि नौका लहरींवर हेलकावे देऊ लागली.

त्याकाळी असे मानले जायचे की, जर एखादा पळपुटा गुलाम (विकत घेतलेला नोकर, जशी त्या काळी माणसांना विकत घेऊन काम करवून घेण्यासाठी, "गुलाम" बनविण्याची पद्धत होती.), नौकेवर किंवा जहाजावर चढला तर, ते जहाज किंवा बोट बुडते.

या कारणामुळे लोकांनी संशय केला की, या बोटीवर, एक पळून आलेला गुलाम आहे. तो कोण आहे हे माहीत करण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकून, ज्या माणसाचे नाव येईल त्याला, नावेच्या बाहेर समुद्रात फेकण्याचा निर्णय घेतला..जेव्हा सगळ्या चिठ्ठ्यामधून, एका नावाची चिठ्ठी उचलण्यात आली, ते युनूस अ. यांचे नाव होते. 

कोणीच युनूस अ. यांच्यावर विश्वास करण्यास तयार नव्हता की, "युनूस पळून आलेला गुलाम नाहीं", कारण ते खूप सभ्य आणि धार्मिक वाटत होते.
तीन वेळा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि प्रत्येक वेळेस युनूस अ. यांचे नाव आले.
आता युनूस अ. यांना खात्री झाली की, 

त्यांनी अल्लाह (ईश्वर) चा आदेश येईपर्यंत वाट पाहिली नाही आणि रागाच्या भरात, निनेवेह आणि त्यांच्या लोकांना सोडून, अल्लाह (ईश्वर) ला नाराज केले आहे.

"हो, मी पळून आलेला गुलाम आहे" ते म्हणाले, मी माझ्या प्रभू आणि मालकाला (ईश्वराला) सोडून पळालो, जर तुम्हाला पुढे सुरक्षित जायचे आहे तर, मला नौकेच्या बाहेर फेका."

खूप अनिच्छिने नावेच्या लोकांनी, जे युनूस अ. यांच्याकडून सांगण्यात आले होते, ते केले आणि त्यांचा पुढचा प्रवास चालू ठेवला.
जसे युनूस अ. खोल पाण्यात पडले, 

एक मोठा मासा पोहत आला आणि त्या मास्याने त्यांना गिळले. युनूस अ. यांनी स्वतःला माश्याच्या पोटात असलेले पाहिले, जेथे अंधकार आणि खूप जास्त खोली होती. ते भयभीत आणि असहाय्य होते. जेव्हा मासा पोहायचा, युनूस अ. आतल्या आत फेकले जायचे आणि त्यांना खूप अस्वस्थ वाटायचे आणि भिती वाटायची.    "मी पुन्हा कधी दिवसाचा प्रकाश पाहू शकेन का? मी अशा दयनीय पिंजऱ्यात मरून जाईल का?"  असे विचार त्यांना यायचे.

" मी निनेवेहच्या लोकांना का सोडले?" त्यांनी त्यांच्या चुकीचा पश्र्चाताप केला आणि अल्लाहकडे क्षमा याचना केली. त्यांनी, त्यांच्या मालकाला (अल्लाहला) दया करण्याची विनंती केली आणि या दुःखातून मुक्त करण्यास प्रार्थना केली.

"हे अल्लाह, तुझ्या शिवाय कुणीच अल्लाह (ईश्वर) नाही. फक्त तूच आहेस. सगळा गौरव तुझाच आहे. मी खरंच चूक होतो." 

ते म्हणाले. त्यांचा पश्र्चाताप पाहून अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्यावर दया केली. मासा पोहत वर किनाऱ्यावर आला आणि युनूस अ. यांना बाहेर किनाऱ्यावरील रेतीवर (तोंडातून) बाहेर फेकले.
जेथे ते पडले, अस्वस्थ, खूप अशक्त आणि असहाय्य होते, जसा नवीन जन्म झालेला बालक असतो.

एक वेल, त्याच्या जवळ वाढला आणि त्यांना सावली दिली, जोपर्यंत त्यांना इतके बळ येत नाही, की ते स्वतः उठतील आणि त्यांच्या लोकांपर्यंत जातील, तोपर्यंत. आतापर्यंत त्यांच्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा शोध घेतला होता. 

जेव्हा युनूस अ. शेवटी त्यांना दिसले ते लोक त्यांना पाहून खूप आनंदित झाले. युनूस अ. यांना कळले की, लोकांनी शेवटी खरी श्रध्दा स्वीकार केली आहे. जो संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविला होता, की फक्त एका पालन कर्त्याची उपासना करा, लोकांनी त्याचे अनुसरण केले होते आणि त्या एका प्रभूची क्षमा मागितली होती.

अल्लाह, जे पश्र्चाताप करतात आणि नम्रतेते क्षमा मागतात, त्यांना क्षमा करतो.

युनूस अ. यांचे नाव पवित्र कुरआन मध्ये आहे आणि त्यांनी जी प्रार्थना माश्याच्या पोटातून केली होती, ती प्रार्थना ही पवित्र क़ुरआन मध्ये आहे..कृपया स्वतःच्या मातृभाषेत कुर आन समजून वाचा आणि जाणून घ्या की, फक्त एक अल्लाह (ईश्वर, God, यहोवा)  चा आदेश आणि संदेश काय आहे, कशामुळे खरे यश मिळते आणि सत्य काय आहे...

💞💞अय्युब चा संयम 💞💞
दीर्घकाळाच्या आणि वेदनादायक आजाराने अय्युब अ. यांना अशक्त आणि अवतीभोवती फिरण्यास असमर्थ बनविले 

होते. ते वर्षांपासून एक असहाय्य आजारी बनून राहिले होते. त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती असता तर, त्याचे धैर्य खचले असते आणि अल्लाहची निष्ठा हरवली असती आणि वेदनेने तो ओरडला असता. त्याने अल्लाहला असे दुःख आणि अस्वस्थता देण्याविषयी, ज्यात त्याचा स्वतःचा काही दोष नाही, तक्रार केली असती. 

पण अय्युब अ. यांनी संयमानेे आणि अल्लाहच्या निष्ठेत कणखर राहून त्रास सहन केला. त्यांनी त्यांच्या दुःखाविषयी कधीही तक्रार केली नाही.

लोकांनी त्यांना भेटण्यास येणे बंद केले 

आणि त्यांना मरण्यासाठी एकटे सोडून दिले. फक्त त्यांच्या पत्नीने त्याची सेवा केली आणि त्यांना प्रवृत्त केले आणि एकदा तीही एका क्षणासाठी खूप त्रासाने आणि खिन्नतेने, असंयमित झाली आणि तिने अल्लाहला तक्रार केली. 

यामुळे अय्युब अ. खूप दुखवले. ते, ज्यांनी एक शब्द ही न उच्चारता, इतक्या दिवसापासून इतका जास्त त्रास सहन केला होता, अल्लाहचे आभार न मानण्याची पत्नीची वृत्ती सहन करू शकले नाही.

त्यांनी, ते जेव्हा बरे होतील, तेव्हा त्यांच्या पत्नीला शंभर वेळा मारण्याची शपथ (वचन) घेतली. ते हे कदाचित अशामुळे ही बोलले असतील, कारण ते त्यावेळी, इतके असहाय्य होते की, ते किंचाळू शकत नव्हते. त्यांचा राग कोणत्याही तऱ्हेने व्यक्त करू शकत नव्हते.

एक पूर्ण असहाय्यतेच्या दशेत, अय्युब अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्याच्यावर दया होवू दे आणि या वेदनेतून त्यांची सुटका कर. 

अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्यावर कृपा केली. अल्लाहने आदेश दिला की, जेथे ते झोपलेले आहे, तेथे पाय जमिनीवर आपट. 

अय्युब अ. यांनी आदेश पाळला आणि जेव्हा त्यांनी असे केले, ताजे पाणी तेथपासून उसळून वाहू लागले.अल्लाहने त्याला म्हंटले की, पाणी पी आणि त्यात स्नान कर. एक वेल त्यात वाढला आणि जेथे ते आराम करत होते तेथे त्यांना सावली दिली.

अय्युब अ. अल्लाहच्या कृपेने बरे झाले, पण जेव्हा त्यांना आठवले की, त्यांनी बरे झाल्यानंतर, त्यांच्या पत्नीला मारण्याची शपथ घेतली होती, ते अस्वस्थ आणि दुःखी झाले.

एकीकडे त्यांनी अल्लाहचे नाव घेऊन केलेले वचन होते आणि दुसरीकडे त्यांची पत्नी होती, जिला ते प्रेम करत होते. ते त्यांचे वचन तोडू शकत नव्हते, पण त्यांच्या पत्नीला मारहाण करण्याचा विचार, त्यांना नाखूष करत होता. या अवघड प्रसंगातून बाहेर येण्यासाठी अल्लाहने त्याच्या सद्गुणी संदेशवाहकाची मदत केली. अल्लाहने ( ईश्वराने) आज्ञा केली की, शंभर गवताच्या काड्या जमा कर आणि त्याने त्याच्या पत्नीला एकदाच मार. अशाप्रकारे ते, त्यांचे वचन ठेऊ शकले आणि त्यांच्या पत्नीला वेदना झाली नाही.

अल्लाहने त्याच्या कृपेने अय्युब अ. यांना बरे केले, त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्यांना एकत्र केले आणि त्यांना पुष्कळ संपत्ती आणि सुख दिले.

अय्युब अ. यांनी अल्लाह ला (ईश्वर ला ) केलेली प्रार्थना (दुआ) पवित्र क़ुरआन मध्ये, अल्लाह ने प्रकट केली आहे. 

या प्रार्थनेने खूप व्यक्तींना समाधान मिळते, जेव्हा व्यक्ती निराशेच्या काळात ती प्रार्थना करतो.

स्वतःच्या मातृभाषेत पवित्र क़ुरआन वाचा आणि जीवनाचा योग्य मार्ग निवडा...

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

namaz

 अजान अर्थ 

"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर"

अर्थ- अल्लाह (परमेश्वर) सर्वांत महान आहे, अल्लाह (परमेश्वर) सर्वांत  महान आहे,

"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर" 

अर्थ- अल्लाह (परमेश्वर) सर्वांत  महान आहे, अल्लाह (परमेश्वर) सर्वांत महान आहे,

"अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह."

अर्थ- मी ग्वाही देतो की अल्लाहशिवाय(एक परमेश्वर शिवाय) कोणीही 'इलाह' (उपास्य, अल्लाह, स्वामी की ज्याची गुलामी केली जावी) नाही. मी ग्वाही देतो कि अल्लाहशिवाय कोणीही 'इलाह ' नाही.  

"अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह."

अर्थ- मी ग्वाही देतो की अल्लाहशिवाय(एक परमेश्वर शिवाय) कोणीही 'इलाह' (उपास्य, अल्लाह, स्वामी की ज्याची गुलामी केली जावी) नाही. मी ग्वाही देतो कि अल्लाहशिवाय कोणीही 'इलाह ' नाही.

अशहदु अन्न मुहम्मदर्रसूलुल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर्रसूलुल्लाह,

अर्थ - मी ग्वाही देतो की ( आदरणीय ) मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत. मी ग्वाही देतो की (आदरणीय) मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत. 

यानंतर उजवीकडे तोंड वळवून "हय्या अलस्सलाह -हय्या अलस्सलाह"

अर्थ - या नमाजकडे (प्रार्थनेकडे)-या नमाजकडे (प्रार्थनेकडे)

मग डावीकडे तोंड वळवून "हय्या अलल फलाह - हय्या अलल फलाह"

अर्थ - या यशाकडे - या यशाकडे 

यानंतर काबागृहाकडे तोंड करून 

"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर"

अर्थ- अल्लाह (परमेश्वर) सर्वांत महान आहे, अल्लाह (परमेश्वर) सर्वांत  महान आहे,

" ला इलाहा इल्लल्लाह ."

अर्थ - अल्लाहशिवाय कोणी इलाह नाही . 


* फक्त पहाटेच्या अजानमध्ये "हय्या अलल फलाह" नंतर 

"अस्सलातु खैरुममिन्ननौम -अस्सलातु खैरुममिन्ननौम"

अर्थ - नमाज झोपेपेक्षा श्रेष्ठतर आहे -नमाज झोपेपेक्षा श्रेष्ठतर आहे. 


नियत - काबागृहाकडे तोंड करून.. 

अर्थ -"हे अल्लाह मी नियत करतो की, -----रकात ----ची नमाज (प्रार्थना), खास अल्लाह तआला ( परमेश्वर) साठी, तोंड माझे 'काबा -ए- शरीफ' कडे. 

अशी नियत केल्यानंतर 'अल्लाहु अकबर " म्हणत दोन्ही हात कानांच्या पाळ्यांपर्यंत उचला (महिला खांद्यांपर्यंत) आणि त्यानंतर उजवा हात डाव्यावर बांधा. दोन्ही हात पुरुष नाभीवर ( आणि महिला छातीवर) ठेवून सना म्हणतात . 

सना - "सुब हान कल्ला हु  म्मा व बि हम दिका व तबारकस्मुका व त आला ज द्दु का वला इलाहा गैरुका. "

अर्थ - हे अल्लाह ! तू पवित्र आहेस. कृतज्ञता व सना ( प्रशंसा) तुझ्यासाठीच आहेत. तुझे नाव बरकत चे (भरभराटीचे) आहे. तुझे वैभव सर्वोच्च आहे. तुझ्याशिवाय कोणीही इलाह नाही. 
















रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

अरमाया (जरमाया)

 जेरुसलेम च्या लोकांनी फक्त एक अल्लाह (अल्लाह ला ते लोक ' यहोवा ' म्हणत होते.) (परमेश्वर) ची उपासना करणे सोडून, दगडांच्या प्रतिमा बनविल्या आणि त्यांची उपासना सुरू केली.


अर्माया यांनी अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, फक्त एका अल्लाह ची ( ईश्वराची) उपासना करा. आणि परत या.
अर्माया यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला की, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. नाहीतर ते सर्व लोक नष्ट होतील. पण त्यांचा उपदेश लोकांनी मानला नाही. त्यांनी अरमाया यांना खोटं बोलणारा समजले. ते लोक गर्विष्ठ झाले. त्यांना चमत्कार दाखवूनही ( अल्लाह च्या मदतीने) काही फरक पडत नव्हता. ते या गोष्टीवर विश्वासच करू शकत नव्हते की, अल्लाह त्या दगडाच्या गुंबद ला  (हैकले सुलेमानी ) ला, जे जेरुसलेम मध्ये सुलेमान ने बांधले होते आणि ज्यावर अल्लाह ची कृपा होती, नष्ट ही करू शकतो.

आणि लोकांनी त्या संदेशातील धमकी आणि चेतावणी ऐकली, ते म्हणाले, तू खोटे बोलत आहेस, जर तू असे म्हणत आहे की, अल्लाह या जमिनीला, त्याचा प्रार्थना स्थळाला, त्याच्या ग्रंथाला  नष्ट करेल.
त्यांचा राजा खूप गर्विष्ठ होता.त्याने आदेश दिला की, अर्माया ला कैद करा आणि तुरुंगात टाका. त्यांनी अरमाया ला जकडून तुरुंगात टाकले. ही खूप मोठी चूक होती. 

अल्लाह नबूकदनेस्सर (nebuchadnezzar) या बेबीलोन (इराकचे प्राचीन शहर) च्या राजाला त्यांच्यावर आक्रमण करण्यास पाठवले. त्याने त्याच्या सैन्यासह देशात प्रवेश केला आणि शहराला घेरले . जेव्हा हा सैन्याचा वेढा प्रदीर्घ कालावधी पर्यंत राहिला. इस्रायल च्या सैन्याने, त्या राजाशी शरणागती पत्करली, त्यांनी त्यांचे शहराचे दरवाजे उघडले आणि राजाच्या सैन्याने शहरात प्रवेश केला आणि ते खूप क्रूर होते.  राजाने क्रूरतेने त्यांच्यावर त्याचा कायदा लागू केला आणि त्यांना निर्दयीपणे शिक्षा केली. राजाने एक तृतीयांश लोकांचा वध केला आणि एक तृतीयांश लोकांना पकडले आणि वृद्धांना आणि अपंगाना सोडले.
मग त्यांनी, त्यांना घोड्यांवर स्वार होऊन पायदळी तुडविले. त्यांची घरे पाडली. तरुणांना वेगळे करून स्त्रियांना बाजाराच्या ठिकाणी रक्षक म्हणून उभे केले. त्यांनी सैन्यात दहशत पसरवली आणि त्या किल्ल्याला आणि प्रार्थना स्थळाला (हैकले सुलेमानी) नष्ट केले. राजाने इस्राइलच्या वंशाला पूर्णपणे संपुष्टात आणले. राजा बेबिलोन ला, सर्व लूट घेऊन निघाला ज्यामध्ये संपत्ती होती आणि लोक होते, त्यांच्यात तरुणी होत्या आणि धर्मोपदेशकांची मुले होती सर्व मिळून सत्तरहजार पर्यंत होते. हे इस्राइल च्या लोकांसाठी खूप भयानक दृश्य होते. ती जागा लोकांच्या रक्ताने भरली.सगळी कडे मृतदेह होते. बेबिलोन च्या सैन्याने फक्त अपंग आणि वृद्ध लोकांना जाऊ दिले. त्यांनी जेरुसलेमच्या लोकांच्या सर्व घरांना नष्ट केले. त्या सैन्याने हैकले सुलेमानी च्या इमारतीला नष्ट केले. बेबोलोन च्या सैन्याने , तेथील लोकांचे सर्व पुस्तके आणि ग्रंथ जाळून टाकले. त्यांनी मुलांशी आणि स्त्रियांशी ही वाईट वागणूक केली. हा तेथील लोकांसाठी खूप भयावह दिवस होता.
इस्राइल ची जमात ही अल्लाह ची जमात होती. त्या लोकांकडे खूप संदेश देणारे (पैगंबर ) आले. अल्लाहने त्यांना खूप संधी दिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांनी अल्लाह चा प्रत्येक आदेश तोडला. इतकेच नाही तर त्यांनी अल्लाह चा संदेश देणाऱ्यांचा वध केला. आणि दगडाच्या प्रतिमांची उपासना करणे चालू ठेवले. याच कारणाने अल्लाह त्यांच्यावर खूप क्रोधित झाला आणि पूर्ण जमातीला ध्वस्त आणि नष्ट केले. 
एक दिवस बेबोलोन च्या राजाला माहीत झाले की, इस्राइल च्या लोकांचा एक संदेशकर्ता आहे, ज्याला आधी पासूनच या विनाशा विषयी माहीत होते आणि त्याचे नाव अर्माया आहे. राजा ने आदेश दिला की, त्या संदेश कर्त्याला तुरुंगातून बाहेर आणले जावे. अरमाया शी बोलल्यानंतर राजा ला जाणीव झाली, की ते खरच अल्लाहचे  खरे संदेश कर्ता (पैगंबर) होते. राजा ने त्यांची सुटका केली.
त्या पूर्ण शहराला नष्ट करून बेबिलोन चा राजा पुन्हा त्याच्या राज्यात गेला.आणि त्याच्या सोबत खूप मूल्यवान खजिने, पुरुष आणि स्त्रिया आणि मुले सोबत घेऊन गेला.काही जण म्हणतात त्याने अंदाजे सत्तर हजार पुरुष आणि स्त्रियांना सेवक बनविले.
या विध्वं सा नंतर इस्राइल मध्ये नवीन युग. सुरू झाले. अरमाया ने लोकांना म्हंटले की, जे इस्राइल मध्ये हजर आहेत, त्यांनी स्वतःच्या अपराधावर. पश्चाताप करून आणि अल्लाह ला  क्षमा मागावी. त्यांनी हे ही सांगितले की, अल्लाह पुन्हा एकदा त्या लोकांची भरभराट करेल. पण खूप लोक त्या विध्वंस झालेल्या शहरात राहण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा अरमाया यांचा आदेश मानण्यास नकार दिला. आणि ते सगळे लोक जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाले. त्यातील काही इजिप्त (मिसर), स्पेन(हिजर) आणि सौदी अरेबिया(तैफ) मध्ये गेले. पण अरमाया अ. यांनी इस्राइल ची पुन्हा भरभराट करण्याचा पूर्ण केला. 

ही सत्य घटना आहे. बायबल मध्ये पूर्ण एक chapter यावर आधारित आहे. जेरुसलेम च्या लोक दोन वेळा उपद्रव माजवतील व दोन वेळा नष्ट जेरुसलेम नष्ट केले जाईल, अशी चेतावणी अल्लाह  (यहोवा) कडून देण्यात आली होती. कुराण मध्ये हा संदर्भ आहे.( कुराण 17:2-8)

मरियम आणि स्वर्ग दूत

 मरियम एका पवित्र वातावरणात मोठी झाली. सदाचारी लोकांत, ती एक खूप धार्मिक ( ईश्वर निष्ठ) तरुण मुलगी झाली.तिने तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीत प्रार्थना करण्यात खर्च केला.आणि स्वतःला अल्लाह च्या सेवेसाठी अर्पण केले. तिची धर्म निष्ठा इतकी चांगली होती की, तिच्यापेक्षा मोठे लोक ही तिचा सन्मान करायचे.आणि तिच्याकडून प्रेरणा घ्यायचे. 

तिची ईश्वर निष्ठा  आणि पावित्र्य असाधारण होते. जे तिला ओळखत होते, त्या प्रत्येकाकडून तिने  तिची प्रतिष्ठा जिंकली होती.

एक दिवस जेव्हा मरियम तिच्या खोलीतून, एका वेगळ्या जागेत जिथे पडदे टाकून आच्छादन केले होते, गेली तेव्हा तिने एक तरुण व्यक्ती तिच्यासमोर उभा राहिलेला पाहिले. मरियम घाबरली होती.' कोण आहे तू? ' तिने विचारले. ' ईश्र्वरासाठी जवळ येऊ नकोस. ' मी अल्लाह चा आश्रय मागते तुझ्यापासून '
तो व्यक्ती उत्तर ला,' घाबरु नको, मी अल्लाह चा दूत (स्वर्ग दूत ) आहे आणि अल्लाह कडून फक्त संदेश देणारा म्हणून  पाठविण्यात आलो आहे. तुला हे सांगण्यासाठी की, तुला एक पवित्र मुलगा होईल.'
पण जर मला कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नाही (मी विवाहित नाही), तर मला एक पुत्र कसा होईल.'  ' मी शील भ्रष्ट (वाईट स्त्री) नाही ? , ती म्हणाली.
' ती अल्लाह ची इच्छा आहे. ते त्याच्यासाठी खूप कठीण नाही. जेव्हा तो काही निर्माण करण्याची इच्छा करतो, म्हणतो , होऊन जा आणि ती असते. तुझा पुत्र एक खूप पवित्र मुलगा असेल. असे म्हणून स्वर्ग दूत दिसेनासा झाला आणि मरियम ला एका विस्मित (स्तंभित) करून गेला. 
नंतर जेव्हा तिचा पुत्र जन्मायची वेळ जवळ आली, मरियम, लोकांपासून बाजूला, एका दूरच्या ठिकाणी गेली. तेथे एकटी, घाबरलेली आणि भुकेने आणि तहानेने अशक्त झालेला एका पाम (ताडाच्या जातीचे झाड) झाडाच्या खाली झोपली आणि वेदनेने ओरडू लागली, ' मी इच्छा करते, हे होण्याआधी मी मरून गेलेली असावी आणि सर्व मला विसरून गेलेले असावे.
एक सुखद आवाज तिच्याशी बोलला, ' दुःखी होऊ नको मरियम. तुझ्या प्रभूने एक पाण्याचा झरा तुझ्याखालून (जवळून) प्रदान (प्रवाहित) केला आहे. आणि जर तू झाडाचे खोड हलवशील तर पुष्कळ ताज्या आणि पिकलेल्या खजुरी तुझ्यावर पडतील.तू खा आणि पी आणि तुझ्या पुत्राला पाहून आनंद घे.
तिचा पुत्र ईसा या लोकांपासून दूर अशा जागी जन्मला. मरियम ने जरी, तिच्या लहान बाळाला कुशीत घेतले, तरी तिच्यात त्या बाळाला घेऊन तिच्या लोकांकडे जाण्याचे साहस नव्हते. ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकेलं? ते काय म्हणतील? तिच्या बाळाचा जन्म, ती कसे समजावून सांगू शकेल? ती दयनीय अवस्थेत होती आणि काय करावे तिला समजत नव्हते. पण अल्लाह ने तिला दिलासा दिला.' लोकांना काहीही सांगू नको, कोणत्याही प्रश्ना चे उत्तर देऊ नको, फक्त संकेत करून सांग की तू उपवास करीत आहे आणि त्या दिवशी, काहीही न बोलण्याची शपथ घेतली आहे.' तिला आदेश दिला गेला.
अल्लाह च्या मदतीने बळकट होऊन, निरागस तरुण मरियम ने तिच्या बाळाला उचलले आणि तिच्या लोकांकडे परत गेली. जेव्हा त्यांनी तिला तिच्या हातात असलेल्या, एका बाळा सोबत येतांना पाहिले, ते तिच्या भोवती जमा झाले.' मरियम, किती लाजेची गोष्ट आहे! तुझे मातापिता ईश्र्वरनिष्ठ लोक होते, तू हे काय केले? '  आणि ते त्या मुला विषयी जाणण्यास इच्छुक होते.
मरियम ने त्यांना उत्तर दिले नाही.तिने फक्त त्या मुला कडे इशारा केला. ' तू वेडी आहे का? आम्ही एका नवजात बाळासोबत कसे बोलू शकतो, मरियम ?'  त्यानंतर लगेच प्रत्येकाला पूर्ण आश्चर्य देऊन, मरियम च्या हातातील बाळाने बोलावयास सुरुवात केली. ' मी अल्लाह चा संदेश पोहोचविणारा आहे, ' ते बाळ म्हणाले, ' त्याने मला एक ग्रंथ ( इंजील, बायबल) दिला आहे आणि मला एक प्रेषित (संदे श कर्ता, पैगंबर) बनविले आहे. त्याने मला आज्ञा दिली की, माझ्या (अल्लाह च्या) प्रार्थना म्हण आणि दानशूर बन आणि माझ्यावर आशीर्वाद दिला की,  जिथे मी असेल, तो मला माझ्या आईशी दयाळू असणारा बनवेल आणि माझ्यावर ज्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या दिवशी मी मृत्यू पावेन, ज्या दिवशी मला पुन्हा वर उचलण्यात येईल, त्या दिवशी शांती देईल.
प्रत्येक जनाने, डोळे विस्फारून आश्चर्याने( चमत्कार) आणि अविश्र्वासाने लक्ष देऊन ऐकले. हे ईसा ( येशू) होते. अल्लाह चे सं देशकर्ता. जे  मरियम ची जी पवित्र आणि निरागस होती, निंदा करण्यास आले होते,  ते सगळे नवजात बालकाचे बोलणे ऐकून शांत झाले. मरियम च्या विषयी पवित्र कुराण म्हणते, ' अल्लाह ने मरियम ला , त्या सर्व देशांच्या, सर्व स्त्रियांमधून वरचा दर्जा देऊन निवडले. '

कुरआनचा काही अंश

 काही chapters   

75 अल कियामह 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व  कृपाळू आहे.
1 मी पुनरुत्थानाच्या दिवसाला साक्षी ठेवून सांगतो. 2 तसेच (मानवाचे ) मन , जे (वाईट कामांविषयी ) त्याला दोष देत असते, त्यास साक्ष ठेवून सांगतो. 3 मानवाला असे वाटते कि काय, आम्ही त्याची हाडे पुन्हा एकत्र करून त्याचे (पुनरुत्थान ) करू शकत नाही ? 4 अर्थातच, आम्हाला त्याच्या बोटांची पेर अन पेर (जशाचे तसे) बसवण्याचे सामर्थ्य प्राप्त आहे. 5 पण माणूस त्याच्यापुढे, जे येणार आहे त्यास नाकारू इच्छितो (म्हणजेच पुनरुत्थानास, कारण त्याला निर्भयपणे दुष्कृत्ये करता यावीत ). 6 (चेष्टा करत) तो विचारतो, ' तो पुनरूत्थानाचा दिवस येणार तरी केव्हा ? 7 जेव्हा (दहशतीने) डोळे दिपून जातील. 8 आणि चंद्राला ग्रहण लागेल. 9 जेव्हा सूर्य व चंद्र एकत्र आणले जातील.10 त्या दिवशी मनुष्य म्हणेल, ' आता कुठे पळून जाऊ ?' 11 नाही, ( हे मानवा !) तुझ्यासाठी आता कुठेही आश्रय नाही! 12 त्या दिवशी केवळ तुझ्या पालनकर्त्यापाशीच आश्रयस्थान आहे ! 13 त्या दिवशी मनुष्यासमोर त्याने जे काही आपल्यापुढे पाठविलेले असेल , आणि जे काही मागे सोडलेले असेल , ते सर्व उघड केले जाईल. 14 वस्तुस्थिती ही आहे की, मनुष्य स्वतः आपल्याविरुद्ध साक्ष आहे.15 मग तो कितीका सबबी पुढे ठेवत नाही ?
16 ( पैगंबर !) तुम्ही (हे कुराण) तुम्हाला लवकर पाठ होऊन जावे म्हणून घाईघाईने आपल्या जिभेला चालना देऊन नका. 17 कारण त्यास (तुमच्या मनात) संकलित करण्याची व पठण करवण्याची जबाबदारी निश्चितपणे आमच्यावर आहे. 18 जेव्हा आम्ही तुम्हाला वाचून ऐकवू, तेव्हा तुम्ही त्याच्या शब्दांचे लक्षपूर्वक अनुसरण करा. 19 त्याचे अर्थ स्पष्ट करणे आमचेच काम आहे.
20  नाही , पण तुमच्यापैकी (अनेकांना) ताबडतोब होणार फायदाच प्रिय असतो (म्हणजेच याच जगात सर्व काही मिळावे.) 21 आणि यानंतरच्या जीवनाकडे दुर्लक्ष करता. 22 काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लित असतील. 23 आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील. 24 आणि त्या दिवशी काही चेहऱ्यांवर उदासीनता पसरलेली असेल. 25 या विचारात असतील की, त्यांच्यावर फार मोठं दुःखाचे संकट लवकरच कोसळणार आहे. 26 पण जेव्हा (मरणाऱ्या ) माणसाचा (शेवटचा श्वास) कंठाशी येतो. आणि (त्याच्या आसपासचे) लोक म्हणतात, ' कोणी मांत्रिक आहे का, जो त्याला वाचवू शकतो ? 28 आणि त्याला खात्री होते की, हीच या जगाला निरोप देण्याची वेळ आहे. 29 मृत्यू होताना होणाऱ्या तीव्र वेदनेमुळे, एक पाय दुसऱ्या पायावर घासू लागेल. (हे मानवा !) हा दिवस असेल तुझ्या पालनकर्त्याकडे प्रयाण करण्याचा !
31 (जोपर्यंत तो जिवंत होता) ना त्याने सत्याचा स्वीकार केला, ना त्याने नमाजरुपी प्रार्थना केली. 32 या उलट, त्याने सत्यास खोटे  ठरविले आणि त्याकडे पाठ दाखविली. 33 मग तो (उपदेशगृहातून) उठून मोठ्या ऐटीने आपल्या कुटुंबीयांकडे निघून जायचा. 34 (हे मानवा ! ) खेद आहे तुझ्याबद्दल , फक्त खेद ! 36 मनुष्याला असे वाटते की काय, त्यास (वाटेल ते करण्यासाठी) असेच सोडून देण्यात येईल ? (म्हणजे त्याच्याशी जाब विचारला जाणार नाही ?) 37 प्रथमतः तो गर्भाशयात टाकला गेलेला वीर्याचा एक बिंदू नव्हता का ? 38 वीर्यापासून पुढे तो गुठळी झाला, मग अल्लाहने त्यास घडविले व पूर्ण संतुलनासह त्याच्या अवयवांची रचना केली. 39 आणि त्याचे दोन प्रकार बनविले, म्हणजे नर व नारी. त्याचा (निर्माता असलेला अल्लाह) मृताला जिवंत करण्यास समर्थ नसेल का ? 

-----------------------------------------------------------------

chapter 61 अस-सफ्फ 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीवर आहे, हे सर्व अल्लाहचेच स्तुतिगान करीत असतात, तोच सर्वांवर नियंत्रण ठेवणारा आहे, अस्सल बुद्धीवान आहे. 2 श्रद्धावंतांनो ! तुम्ही बोलता एक आणि करता दुसरेच असे का ? (तुम्ही आपल्या आचार व विचारात फरक का करता ?) 3 अल्लाहच्या नजरेत तुमचे असे कृत्य अत्यंत अप्रिय आहे की , बोलायचे एक आणि करायचे दुसरेच. 4 अल्लाहला तर ते लोक प्रिय आहेत. जे त्याच्या कार्यासाठी पंक्तिबद्ध  होऊन लढतात, जणू ते सर्व एक मजबूत अशी भिंत आहेत. 
5 (आणि ती वेळ आठवा) जेव्हा मुसाने आपल्या लोकांना म्हटले, 'माझ्या बांधवांनो ! तुम्ही मला त्रास का देता, जेव्हा तुम्ही हे जाणून आहात की, मी तुमच्याकडे पाठविण्यात आलेला पैगंबर आहे ; मग जेव्हा त्यांनी सन्मार्गापासून दूर जाणे पसंत केले. तेव्हा अल्लाहनेही त्यांच्या हृदयांना सत्यापासून दूर करून टाकले. कारण अल्लाह आज्ञाभंग करणाऱ्या लोकांना सन्मार्ग दाखवीत नसतो.
6 (असेच तेव्हाही घडले) जेव्हा मरियमपुत्र येशू मसीहने म्हटले, 'इस्राईलच्या मुलांनो ! मी तुमच्याकडे अल्लाहकडून पाठविलेला पैगंबर आहे;  माझ्यापूर्वीच्या तौरात या ग्रंथांपैकी जे सत्य बाकी राहिलेले आहे, त्यास प्रमाणित करणारा (मी) आहे. तसेच तुम्हाला एका पैगंबराविषयी शुभवार्ता देतो आहे, जो माझ्यानंतर येईल. ज्याचे नाव अहमद असेल.' आणि जेव्हा तो त्यांच्याकडे सत्याचे सर्व स्पष्ट प्रमाण घेऊन आला, तेव्हा ते म्हणाले, 'ही केवळ जादू आहे.' 7 आणि त्याच्यापेक्षा अधिक दुष्ट माणूस कोण असू शकतो, ज्याला, अल्लाहला समर्पित अशी जीवनपद्धती (म्हणजेच इस्लाम) कडे येण्याचे आवाहन केले जात असतानाही, तो अल्लाहविषयी खोट्या गोष्टी रचत असतो. पण अल्लाह अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवीत नसतो. 8 जे आपल्या तोंडाच्या फुंकरेने अल्लाहचा प्रकाश विझवून टाकू इच्छितात. पण अल्लाह आपला प्रकाश पूर्णपणे सर्वत्र पसरविल्याशिवाय राहणार नाही. मग सत्य नाकारणाऱ्यांना याबद्दल कितीका वाईट वाटेना. 9 त्यानेच आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्यधर्म यांच्यासह पाठविले आहे, या उद्देशाने की, सत्यधर्माला इतर सर्व धर्मांवर (वैचारिक) प्रभुत्व करून द्यावे, मग ते अनेकेश्वरवाद्यांना कितीका अप्रिय वाटत नाही. 
10 (पैगंबर ! लोकांना सांगा,) श्रद्धावंतांनो ! मी तुम्हाला अशा फायद्याच्या सौद्याविषयी मार्गदर्शन करू का, जो तुम्हाला दुःखदायी शिक्षेपासून वाचवू शकतो ? 11 (तो हा की,) तुम्ही अल्लाह व त्याच्या पैगंबरावर विश्वास ठेवणारे बना आणि अल्लाहच्या मार्गात आपले धन व प्राण यांच्यासह प्रयत्नांची पराकाष्ठा (म्हणजेच जिहाद) करा. तुम्हाला हे समजत असेल , तर यात तुमचे (निश्चितपणे) भले आहे. 12 (तुम्ही असे केल्यास) अल्लाह तुमच्या चुका माफ करून टाकेल. आणि तुम्हाला अशा बागांमध्ये प्रवेश देईल. ज्यातून पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह (नेहमी) वाहत असतील. तसेच राहण्यासाठी सुंदर घरे तो देईल, जे (घरे) शाश्वत  व सुखदायी बागांमध्ये असतील. हेच सर्वश्रेष्ठ यश आहे. 13 (त्या सर्वांसह) तुमच्यावर (या जगातही) आणखी एक कृपा तो करेल, ज्याची तुम्ही अभिलाषा बाळगून आहात.- अल्लाहकडून मिळणारे साहाय्य आणि लवकरच विजयाची प्राप्ती. (पैगंबर ! याविषयी ) श्रद्धावंतांना शुभवार्ता देऊन टाका.
14 श्रद्धावंतांनो ! तुम्ही (त्याप्रमाणे) अल्लाहची मदत करणारे बना, ज्याप्रमाणे मरियमपुत्र येशू मसीहने आपल्या अनुयायांना म्हटले होते,' अल्लाहकडे (लोकांना  बोलावण्याच्या) कार्यात कोण माझी मदत करेल?' त्याच्या अनुयायांनी उत्तर दिले होते, ' आम्ही अल्लाहची मदत करण्यासाठी तयार आहोत.' तेव्हा इस्राईलच्या मुलांपैकी (म्हणजे ज्यू लोकांपैकी) काहींनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि काहींनी नकार दिला. मग आम्ही श्रद्धा धारण केलेल्या लोकांची त्याच्या शत्रूंच्या विरुद्ध मदत केली, परिणामी ते विजयी झाले.

-----------------------------------------------------------------

chapter 62 अल - जुमुआ

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आहे आणि जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व अल्लाहचे स्तुतीगान करीत असतात. तो अस्सल सम्राट आहे, सर्व उणिवांपासून मुक्त असा, सर्वशक्तिमान आहे, बुद्धिमान आहे. 2 त्यानेच निरक्षर (उम्मी) लोकांमध्ये त्यांच्यामधूनच एक पैगंबर उभा केला, जो त्यांना त्याचे  (म्हणजे अल्लाहचे) संदेश ऐकवीत असतो. आणि (मानसिकदृष्टया) त्यांचे शुद्धीकरण करतो. आणि त्यांना  ग्रंथ व शहाणपणाचे धडे देत असतो. ते या यापूर्वी स्पष्टरित्या वाट चुकलेले होते. 3 (मक्केतील निरक्षरांव्यतिरिक्त) इतर लोकांकडेही (हा संदेश पोचविण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे), ते लोक ज्यांचा (या मक्कावासीयांशी) अद्याप संबंध आलेला नाही. तोच सर्वशक्तिमान आहे आणि अस्सल बुद्धिवान आहे. 4 ही (पैगंबरी) अल्लाहची कृपा होय, तो इच्छितो त्यास, ती प्रदान करतो. अल्लाह असीम कृपावंत आहे.
5 ज्या लोकांच्या (शिरावर) तौरात (या अल्लाहच्या) ग्रंथाची जबाबदारी सोपवण्यात आली होती , पण त्यांनी ती जबाबदारी (गंभीरतापूर्वक) पेलली नाही. त्यांची तुलना त्या गाढवाशी केली जाऊ शकते, जो पुस्तकांचे ओझे वाहून नेत आहे. (खरोखर,) किती वाईट उपमा आहे, त्या लोकांसाठी ज्यांनी अल्लाहच्या संदेशांना खोटे ठरविले (त्याकडे वाईटरित्या दुर्लक्ष केले) ! अल्लाह अशा अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवत नसतो. 6 (पैगंबर ! ज्यू लोकांना) सांगा, 'हे ज्यू लोकांनो ! तुम्हाला वाटत असेल की , तुम्ही इतरांपेक्षा अल्लाहला सर्वाधिक प्रिय आहात , आणि तुमच्या या वाटण्यात काही सत्यता असेल तर तुम्ही (लवकरात लवकर) मरण्याची अभिलाषा बाळगायला हवी. 7 ' पण (पैगंबर !) त्यांच्या हातांनी जी (दुष्) कृत्ये आपल्या पुढे पाठवलेली आहेत , त्या कारणामुळे ते कधीही अशी अभिलाषा बाळगणार नाहीत. अल्लाह अपराध्यांना चांगले ओळखून आहे. 8 त्यांना सांगा,' ज्या मृत्यूपासून तुम्ही दूर पळत आहेत, तो तुमच्यावर अटळरित्या येणार आहे. तेव्हा तुम्हाला त्या (अल्लाह) समोर हजार केले जाईल, जो ते सर्व जाणतो जिथपर्यंत कोणाचीही बुद्धी पोचू शकत नाही आणि तेही, जे सर्व जाणतात. तेव्हा तो तुम्हाला त्या कामांशी अवगत करेल , जी तुम्ही करीत होता.'
9 इमानधारकांनो ! जेव्हा तुम्हाला (साप्ताहिक प्रार्थनेकरिता) जमा होण्याच्या दिवशी (म्हणजे शुक्रवारी) नमाजासाठी  येण्याचे आवाहन केले जाईल, तेव्हा अल्लाहचे (नमाजरुपी) स्मरण करण्यासाठी सर्व खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करून (प्रार्थनागृहाकडे) निघा. तुम्हाला हे समजणार असेल, तर यात तुमचे स्वतःचे भले आहे. 10 मग जेव्हा नमाज पूर्ण होईल, तेव्हा अल्लाहच्या कृपेच्या शोधार्थ (त्याच्या जमिनीवर) (पाहिजे तिकडे) पसरून जा. पण अल्लाहची प्रत्येक प्रसंगी आठवण करीत राहा. यासाठी कि, तुम्ही यशस्वी व्हावे.
11 (पण पैगंबर !) (काही लोकांच्या बाबतीत घटते मात्र याच्या उलट ) जेव्हा त्यांना काही खरेदी-विक्रीचा प्रकार किंवा करमणुकीचा प्रकार होत असल्याचे आढळते तर तुम्ही (प्रवचन करीत असताना) तुम्हाला उभे सोडून त्याकडे पळत सुटतात. त्यांना सांगा, 'जे अल्लाहपाशी आहे, ते कोणत्याही खरेदी-विक्रीच्या वस्तूपेक्षा व करमणुकीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि अल्लाह सर्वोत्कृष्ट उपजीविका प्रदान करणारा आहे.'
-----------------------------------------------------------------

chapter 63 अल -मुनाफिकून 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर !) जेव्हा दांभिक लोक तुमच्याकडे येतात, तेव्हा ते म्हणतात, 'आम्ही अशी साक्ष देतो की, तुम्ही निःसंदेह अल्लाहचे पैगंबर आहात.' अल्लाह जाणतो की, तुम्ही निःसंदेह त्याचे पैगंबर आहात. आणि अल्लाह या गोष्टीची साक्ष देतो की , हे दांभिक खोटे बोलणारे आहे. 2 त्यांनी (खोटे बोलण्याचा उद्योग करण्यासाठी) आपल्या शपथांना ढाल बनविलेले आहे. आणि ते (त्याद्वारे) लोकांना अल्लाहच्या मार्गापासून परावृत्त करीत असतात. जे ते करीत आहे, खरोखर फार वाईट आहे.  3 (ते दांभिक) अशाप्रकारे बनले की , त्यांनी सुरुवातीला (वरवर ) श्राद्ध धारण केली , पण (मनोमनी) ते सत्य नाकारतात (व ते त्यांच्या कृत्यांतूनही दिसून येते), (परिणामी अल्लाहने ) त्यांची मने (सत्याच्या प्रवेशासाठी) सीलबंद करून टाकली. आता त्यांना सत्य उमजतच नाही. 
4 आता जेव्हा तुम्ही त्यांना पाहता, त्यांचे दर्शनी रूप तुम्हाला चांगले वाटू शकते. आणि जेव्हा ते बोलतात, तेव्हा तुम्ही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकता. (पण ते तुमच्यासमोर असे बसतात) जणू भिंतीला टेकवून उभे केलेले लाकडाचे ओंडके आहेत , प्रत्येक जोराची आवाज त्यांच्याचविरुद्ध (काहीतरी) असल्याचे त्यांना वाटते. हे (धर्माचे खरे)शत्रू आहेत, तर यांच्यापासून (नेहमी) सावध राहा. त्यांच्यावर अल्लाहचा प्रकोप होवो ! ते कुठे भलतीकडे जात आहेत ! 5 कारण जेव्हा त्यांना म्हटले जाते, 'या, पैगंबर तुमच्यासाठी अल्लाहकडे क्षमायाचना करेल.' तेव्हा ते (नकार दर्शवीत) आपली डोकी हालवतात. आणि तुम्ही त्यांना पाहाल, मगरूरीचे प्रदर्शन करीत तिथून निघून जातात. 6  तुम्ही त्यांच्यासाठी (अल्लाहकडे) क्षमायाचना करा किंवा करू नका, दोन्ही गोष्ट सारख्या आहेत. (कारण परिणाम शून्यच असेल). अल्लाह त्यांना कदापि क्षमा करणार नाही. कारण अल्लाह विद्रोही लोकांना सन्मार्ग दाखवत नसतो.
7 हेच ते आहेत, जे (आपल्या साथीदारांना) म्हणतात, 'जे लोक अल्लाहच्या पैगंबरांसोबत आहेत, त्या लोकांवर (आपले धन) खर्च करू नका, (परिणामी) त्यांची गोची होऊन ते (पैगंबराची) साथ सोडून देतील.'  पण या दांभिक लोकांना हे माहीत  नाही की, आकाश व पृथ्वीचे सर्व खजिने, अल्लाहच्या मालकीचे आहेत. 8 आणि ते म्हणतात,' आम्ही मदिनेला परतल्यानंतर, (आम्ही) तेथील सर्वाधिक सन्माननीय लोक, तेथून त्या सर्वात तुच्छ अशा लोकांना निश्चितपणे हाकलून लावू.' पण या दांभिक लोकांना या गोष्टीची जाण नाही की, सर्व प्रकारचे मन-सन्मान अल्लाहसाठी  आहे, त्याच्या पैगंबरासाठी आहे व श्रद्धावंतांसाठी आहे. 
9 श्रद्धावंतांनो ! तुमची धनसंपत्तीं व तुमची मुले तुम्हाला अल्लाहच्या आठवणीपासून ढळण्यास कारणीभूत ठरायला नको. आणि ज्याला या गोष्टी (अल्लाहच्या स्मरणापासून विचलित करतील) तर असेच लोक (शेवटी) नाश पावणारे असतींल. 10 आणि तुम्हाला जे काही दिलेले आहे, त्यातून तुमच्यापैकी एखाद्याला मृत्यू येण्यापूर्वी त्याने खर्च करावे. मग तो म्हणू लागेल, ' हे माझ्या पालनकर्त्या ! तू मला आणखी काही काळ उसंत का नाही दिलीस? की , मी दानकार्य केले असते आणि सदाचारी लोकांपैकी झालो असतो.' 11 पण अल्लाह कोणालाही त्याची नियत वेळ येऊन ठेपल्यावर उसंत देत नसतो. आणि तुम्ही जे काही करता, अल्लाह त सर्व जाणतो. 
-----------------------------------------------------------------

chapter 64 अत तगाबुन

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आणि जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व अल्लाहचे स्तुतिगान करीत असतात. सर्वत्र त्याचीच सत्ता आहे व सर्वत्र त्याचीच स्तुती आहे. आणि सर्व वस्तुमात्रांवर त्यालाच पूर्ण 
नियंत्रण प्राप्त आहे. 2 त्यानेच तुम्हा (सर्वांना) निर्माण केले, मग तुमच्यात काही सत्य 
नाकारणारे तर काही सत्य स्वीकारणारे 
(श्रद्धावंत) आहेत. तुम्ही जे काही करता, त्यावर अल्लाह (नेहमी) नजर ठेवून असतो. 3 त्यानेच आकाश व पृथ्वी यांना उचित उद्देशासहित 
निर्माण केलेले आहे. आणि त्याने तुम्हाला 
आकार दिला, उत्तम आकार दिला. आणि त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परत जायचे आहे. 
4 जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व तो जाणतो. तसेच तो तुम्ही जे 
लपवता व जे प्रकट करता तेही जाणतो. कारण 
अल्लाहलाच (लोकांच्या) मनात काय काय आहे, याचे पूर्ण ज्ञान आहे. 5 तुम्हाला त्या लोकांची जाणीव झाली नाही का, ज्यांनी यापूर्वी सत्य नाकारण्याचे (अपकृत्य) केले ? मग आपल्या कर्मांची फळे चाखली . आणि (यानंतरच्या जीवनात) तर त्यांच्यासाठी (याहूनही) कठोर 
शिक्षा आहे. 6 असे (पुन्हा-पुन्हा) यासाठी 
(घडले), कारण त्यांच्याकडे त्यांचे पैगंबर सत्याचे सर्व स्पष्ट प्रमाण घेऊन आले. पण  (पैगंबराप्रतिनेहमी) त्यांचा प्रतिसाद असाच होता की, ही (आमच्यासारखी असलेली) माणसे आम्हाला मार्दर्शन करणार आहेत ? अशाप्रकारे त्यांनी सत्यास नकार दिला आणि त्याकडे  
पाठ फिरवली. आणि अल्लाहला अशा लोकांची गरज नाही. तो (खराखुरा) आत्मनिर्भर आहे. सर्व प्रकारच्या स्तुतीस (सदैव) पात्र असा 7 सत्य नाकारणारे असा दावा करतात की, त्यांना पुन्हा जिवंत करून उठविले जाणे शक्यच नाही.
(पैगंबर!) त्यांना सांगा, ' माझ्या पालनकर्त्याची शपथ, तुम्हाला पुन्हा जिवंत करून 
अवश्य उठविलेजाईल, मग तुम्हाला तुम्ही जे जे करत होता, त्याचे दर्शन घडविले जाईल. ही अल्लाहसाठी अगदी सोपी गोष्ट आहे. 8 म्हणून (लोकांनो!) अल्लाहवर व त्याच्या पैगंबरावर 
आणि जो सन्मार्ग दाखवणारा प्रकाश 
आम्ही प्रकट केला आहे. त्यावर विश्वास 
ठेवणारे बना. आणि तुम्ही जे काही करता, त्याची अल्लाहला पूर्ण जाणीव आहे.   
9 जेव्हा तो तुम्हाला त्या एकत्र करण्याच्या 
दिवशी एकत्रित करेल. हाचदिवस (खऱ्याअर्थाने) जय व पराजयाचा दिवस असेल. 
जो कोणी श्रद्धा धारण करून सत्कर्मे केलेला 
असेल, अल्लाह अशा माणसाची वाईट कृत्ये 
माफ करून टाकेल.आणि त्यास अशा बागांत 
प्रवेश देईल, जिथे पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह (नेहमी) वाहत असतील(असे लोक) तिथे 
कायम वास्तव्य करतील. हेच आहे अस्सल यश. 
10 ज्या लोकांनी सत्य स्वीकारण्यास नकार दिला 
आणि आमच्या संदेशांना खोटे ठरविले, 
असेच लोकनरकवासी असतील. ते तिथे 
कायम वास्तव्य करतील. हेच सर्वात 
वाईट ठिकाण आहे (राहण्याचे !)
11 (लोकांनो!) तुमच्यावर कोणतीही आपत्ती 
अल्लाहच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. 
आणि जो कोणी अल्लाहवर दृढ विश्वास ठेवतो, 
अल्लाह त्याच्या अंतःकरणास योग्य मार्ग 
दाखवतो. अल्लाहला प्रत्येक गोष्टीचे 
परिपूर्ण ज्ञान आहे. 12 तुम्ही अल्लाहचे 
आज्ञापालन करा व पैगंबराचे 
आज्ञापालन करा. मग जर तुम्ही (या संदेशाकडे) दुर्लक्ष कराल तर आमच्या 
पैगंबरावर(संदेश) स्पष्टपणे पोहोचविण्यापलीकडे 
अन्य जबाबदारी नाही. 
13 अल्लाह त्याच्याशिवाय दुसरा कोणीच
उपासनेयोग्य नाही. आणि विश्वास 
ठेवणाऱ्यांना त्याच्यावरच विश्वास ठेवायला हवा.
14श्रद्धावंतांनो! तुमच्या पत्नी व तुमची मुले 
यांच्यापैकी काही (धर्माच्या बाबतीत) 
तुमचे शत्रू आहेत. तरतुम्ही त्यांच्यापासून 
सावध राहा. पण जर तुम्ही त्यांच्या 
चुकांकडे दुर्लक्ष कराल  आणि 
त्यांच्याप्रति दया दाखवाल व त्यांना माफ 
कराल, तर अल्लाह (देखील) फार क्षमा करणारा व दया करणारा आहे.15 (लोकांनो!) तुमची धनसंपत्ती व तुमची 
अपत्ये या गोष्टी तुमची कसोटी 
पाहण्याचे साधन आहे आणि (माणसाला जे जे हवे, ते खऱ्या अर्थाने) अल्लाहकडेच प्राप्त 
होणार आहे. 16 तर (श्रद्धावंतांनो!) नेहमी 
अल्लाहचा जाण  ठेवून (जीवन व्यतीत 
करण्यासाठी) प्रयत्नशील राहा. (जे सांगितले जाते ते) ऐका व आग्येचे 
पालन करा. व (त्याच्या कार्यासाठी) खर्च करा. 
यात तुमचे स्वतःचे भले आहे. जे लोक 
कृपनतेच्या (लालसेच्या) आहारी जाण्यापासून 
सुरक्षित राहिले. तर असेच लोक यशस्वी 
ठरणारे आहेत. 17 जर तुम्ही अल्लाहला उदारतापूर्ण कर्ज द्याल तर तो त्यात तुमच्यासाठी कित्येक पटीने वाढ करेल.आणि तो तुमच्या 
चुका माफ करेल. कारण अल्लाह  हा (आपल्या दासांप्रति) फार गुणग्राहक आहे व फार 
सहिष्णू आहे.18तो ते सर्व जाणतो, जिथपर्यंत कोणाचीही बुद्धी पोचू शकत नाही आणि तेही, जे सर्व 
जाणतात. तोच सर्वशक्तीमान व खरा  बुद्धिवान आहे.

-----------------------------------------------------------------

chapter 65 अत - तलाक

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.1 पैगंबर !  जेव्हा तुमच्यापैकी कोणीही आपल्या पत्नींना घटस्फोट (तलाक) देईल तर (त्याने ) त्यांना त्यांच्या स्वच्छतेच्या (म्हणजे मासिक पाळी नसलेल्या) काळात तलाक द्यावा. आणि त्या काळाची गणना काळजीपूर्वक करा. आणि आपला पालनकर्ता असलेल्या अल्लाहसमोर (जाब देण्याची सदैव) जाण  ठेवा. (तलाकची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत) त्यांना त्यांच्या घरातून काढू नका. तसेच त्यांनीही घर सोडून जाऊ नये. पण फक्त त्यांनी जर उघड-उघड काही निर्लज्जपणाचे कृत्य केलेले असेल (तर त्यांना घराबाहेर घालवू शकता). या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत आणि जो कोणी अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा भंग करेल, तर तो स्वतःवरच अन्याय करणारा आहे. 
(हे माणसा !) तू जाणत नाहीस की, अल्लाह त्यानंतर कदाचित काही नवीन (कल्याणकारी ) स्थिती निर्माण करेल. 2 मग त्यांच्या प्रतीक्षेची मुदत पूर्ण झाल्यांनंतर, त्यांना सन्मानाने ठेवून घ्या किंवा सन्मानाने सोडून द्या. आणि आपल्या 
(नातेवाईकांपैकी) दोन विश्वसनीय लोकांना साक्ष म्हणून बोलावून घ्या. (आणि साक्ष देणाऱ्यांनी गरज असेल तेव्हा) अल्लाहची जाण ठेवून, योग्य तीच साक्ष द्यावी. हे उपदेश त्या माणसाला दिले जात आहेत, जो अल्लाहवर व न्यायाच्या दिवसावर विश्वास ठेवणारा आहे. आणि जो कोणी अल्लाहकडे (जाब देण्याची) जाण ठेवेल, अल्लाह त्याच्यासाठी (अडचणीतून) बाहेर पाडण्याचा मार्ग काढेल. 3 आणि तो त्याला अशा ठिकाणाहून उपजीविका पुरवेल, ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसेल. जो कोणी अल्लाहवर विश्वास ठेवतो, अल्लाह त्याच्यासाठी पर्याप्त आहे. अल्लाह नेहमी आपली योजना तडीस नेतोच. (आणि) अल्लाहने प्रत्येक गोष्टीसाठी एक (अवधी व) प्रमाण ठरवून दिलेले आहे.4 आणि तुमच्या स्त्रियांपैकी वय झाल्यामुळे ज्यांना मासिक पाळी येण्याविषयी शंका आहे. तर अशा स्त्रियांसाठी प्रतिक्षेची अवधी तीन महिने आहे आणि हाच नियम त्यांनाही लागू होईल ज्यांना मासिक पाळी आलेलीच नाही. आणि गर्भवती असलेल्या स्त्रियांसाठी प्रतिक्षेचा काळ प्रसूती होईपर्यंत आहे. आणि जो कोणी अल्लाहकडे (जाब देण्याची) जाण ठेवेल, अल्लाह त्याचे काम सोपे करून टाकेल. हा आहे अल्लाहचा आदेश, जो त्याने तुमच्याकडे प्रकट केलेला आहे. जो कोणी अल्लाहची जाण बाळगून (जीवन जगेल), अल्लाह त्याच्या चुका माफ करून टाकेल आणि त्यास फार मोठे बक्षीस प्रदान करेल.6 ज्या स्त्रिया (प्रतिक्षेच्या काळात) आहेत. त्यांना आपल्या ऐपतीनुसार जसे तुम्ही राहत  आहात, तसेच त्यांनाही तिथेच राहू द्या. आणि त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांचा छळ करू नका. आणि त्या जर गर्भवती असतील, तर बाळ जन्माला येईपर्यन्त खर्च करा. मग जर (तलाक झाल्यानंतरही) त्या तुमच्या (बाळाला) स्तनपान देत असतील, तर त्यांना त्याबद्दल योग्य तो मोबदला द्या. (मुलाच्या भविष्याविषयी) आपसात सामंजस्यपूर्वक विचारविमर्श करा. आणि जर तुम्ही आपसात असहमत असाल, तर मग इतर एखादी स्त्री तुमच्या बाळाला दूध पाजील. (या सर्व बाबतीत) ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती आहे, त्याने त्यानुसार खर्च करावा. आणि ज्याच्याकडे निर्वाहाची साधने कमी प्रमाणात आहेत त्याने, अल्लाहने त्याला जे काही दिलेले आहे त्यानुसार त्यातून खर्च करावा. अल्लाहने ज्याला जितके दिलेले आहे, त्यापेक्षा अधिक भार तो कोणावरही टाकत नसतो. अल्लाह हलाखीच्या (दिवसांनंतर)लवकरच चांगले दिवसही आणेल. 8 कित्येक अशा वस्त्या होत्या, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या व त्याच्या पैगंबराच्या आग्यांचे उल्लंघन केले, तेव्हा आम्ही त्यांना कठोरपणे फैलावर घेतले. आणि आम्ही त्यांना कठोर शिक्षा केली. 9 अशाप्रकारे त्यांनी आपल्या (कर्मरूपी) कमाईची फळे चाखली आणि शेवटी विनाशाशिवाय त्यांच्या वाट्याला काहीच आले नाही. 10 (यापलीकडेही ) अल्लाहने त्यांच्यासाठी (याहूनही) मोठी शिक्षा तयार ठेवलेली आहे. हे बुद्धी बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनो! अल्लाहची जाण बाळगून असा. अल्लाहने तुमच्याकडे एक बोधग्रंथ प्रकट केलेला आहे. 11 (आणि) एक पैगंबर (पाठविला आहे), जो तुम्हाला अल्लाहचे सुस्पष्ट संदेश  ऐकवीत आहे. यासाठी की, जे श्रद्धा धारण करून सत्कर्मे करीत आहेत, अशा लोकांना अंधकारातून काढून प्रकाशात आणावे. आणि जो कोणी अल्लाहवर श्रद्धा धारण करून सत्कर्मे करतो, तो त्यास अशा बागांत प्रवेश देईल, ज्यातून पाण्याचे   (नयनरम्य) प्रवाह (कायम) वाहत असतील. ते तिथे कायम वास्तव्य करतील. ही  अल्लाहने त्याला प्रदान केलेली उत्कृष्ट उपजीविका असेल. तो अल्लाह आहे, ज्याने सात आकाशांना निर्माण केले व तशाच पृथ्वी देखील. त्यांच्यामध्ये त्याचे आदेश प्रकट होत असतात (आणि त्या आदेशांनुसार हा प्रचंड कारखाना काम करीत असतो) ते यासाठी की, तुम्हाला कळून यावे की, प्रत्येक गोष्टीवर अल्लाहचे पूर्ण नियंत्रण आहे. आणि अल्लाहने आपल्या ज्ञानाने प्रत्येक गोष्टीस वेढून ठेवलेले आहे.
___________________________________

66  आत-तहरीम 

1 पैगंबर ! तुम्ही आपल्या पत्नींच्या  प्रसन्नतेखातर  त्या गोष्टीला (स्वतःसाठी) का अवैध ठरवता, जी अल्लाहने तुमच्यासाठी वैध ठरविलेली आहे. पण अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे.
2 अल्लाहने तुम्हाला आपल्या शपथांमधून मुक्त होण्याचे (नियमासहित) आधीच बजावलेले आहे, कारण अल्लाह तुमचा साम्भाळकर्ता आहे. आणि तोच सर्व काही जाणणारा व बुद्धिमान आहे.
3 आणि (एकदा असे घडले की,) पैगंबराने आपल्या पत्नींपैकी एकीला एखादी गोपनीय गोष्ट सांगितली. पण तिने ती गोष्ट गुप्त ठेवली नाही. आणि अल्लाहने पैगंबराला याबद्दल सूचित केले. तेव्हा पैगंबराने तिला त्यांपैकी काही भाग सांगितला आणि काही भाग सांगायचे टाळले. मग जेव्हा पैगंबराने आपल्या पत्नीस हे सांगितले, (जे त्यास अल्लाहद्वारे कळविण्यात आले होते ), तेव्हा तिने विचारले,
' तुम्हाला याविषयी कोणी सांगितले?
पैगंबराने उत्तर दिले, ' मला त्याने हे सांगितले जो सर्व काही जाणणारा आहे व प्रत्येक गोष्टीविषयी जागरूक आहे. 4 (पैगंबराच्या पत्नींनो !) जर तुम्ही दोघी पश्चातापदग्ध होऊन अल्लाहकडे वळाल, तर (ते तुमच्या हिताचे असेल) (कारण) तुमची मने आधीच (जे योग्य आहे) त्यापासून दूर गेलेली आहेत. पण जर तुम्ही दोघी पैगंबराच्या विरुद्ध एकमेकींना मदत कराल, तर (लक्षात ठेवा) पैगंबरांचा साहाय्यकरता अल्लाह आहे आणि  जिब्रील (हा स्वर्गदूत) आणि सत्कृत्ये करणारे श्रद्धावंत आणि याव्यतिरिक्त (सर्व इतर) स्वर्गदूत त्याला साहाय्य करणारे आहेत. 5 (पैगंबराच्या पत्नींनो !) जर पैगंबराने तुम्हाला घटस्फोट दिला, 
तर त्याचा पालनकर्ता तुमच्याजागी तुमच्याहून अधिक चांगल्या पत्नी त्याला देऊ शकतो. ज्या, अल्लाहप्रति समर्पित अशा, श्रद्धावंत, आज्ञाधारक, नेहमी अल्लाहसमोर लीन असलेल्या, निष्ठावंत उपासक, उपवास करणाऱ्या, ज्या विधवा व कुमारिकाही असतील. 
6  श्रद्धावंतांनो  ! तुम्ही स्वतःला व तुमच्या कुटुंबियांना त्या (नरकाच्या) आगीपासून वाचवा जिचे इंधन माणसे व दगड असतील. जिचे (रखवालदार म्हणून ) कठोर व प्रचंड शक्तिशाली (अल्लाहचे ) दूत नियुक्त आहेत. अल्लाहने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत ते जराशीदेखील कुचराई करीत नाहीत. ते अगदी तेच करतात, जे करण्याचा त्यांना आदेश दिला जातो. 7 सत्य नाकारण्यावर आग्रही राहिलेल्या लोकांनो ! आज कोणत्याही सबबी प्रस्तुत करू नका. तुम्हाला त्याचाच मोबदला देण्यात येत आहे, जे तुम्ही करीत होता.
8 श्रद्धावंतांनो! प्रामाणिकपणे पश्चाताप करून अल्लाहकडे वळा, नवल नव्हे, तुमचा पालनकर्ता तुमची वाईट कृत्ये माफ करून टाकेल आणि तुम्हाला अशा बागांमध्ये प्रवेश देईल, ज्यांमधून पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह (सदैव) वाहत असतील. त्या दिवशी (म्हणजे न्यायाच्या दिवशी), अल्लाह पैगंबरास व त्याचे अनुसरण करणाऱ्या श्रद्धावंतांना अपमानित करणार नाही. त्यांच्या (सद्गुणांचा) प्रकाश त्यांच्यासमोर व त्याच्या उजव्या बाजूस धावत असेल. आणि ते म्हणतील, ' हे प्रभू ! आमच्यासाठी आमच्या या प्रकाशास सदैव तळपत ठेव. आणि आम्हाला क्षमा कर. खरोखर, तुला प्रत्येक गोष्टीवर पूर्ण नियंत्रण प्राप्त आहे.'
9 पैगंबर ! (अल्लाहचे शत्रू असलेल्या) सत्य नाकारणाऱ्या लोकांशी व दांभिक लोकांशी जिहाद करा. आणि त्यांच्याप्रति दयामाया दाखवू नका. त्यांचे अंतिम स्थान नरक आहे आणि ते खरोखर फार वाईट स्थान आहे.
अल्लाह सत्य नाकारणाऱ्या लोकांसाठी नूहची पत्नी व लूतची पत्नी यांचे उदाहरण सादर करीत आहे. ज्या आमच्या दोन सदाचारी भक्तांशी विवाहबद्ध होत्या. मग त्यांनी त्यांच्याशी (म्हणजे आपल्या पतींशी) विश्वासघात केला. त्यामुळे (न्यायाच्या दिवशी) अल्लाहच्या मर्जीच्या विरुद्ध , ते त्यांच्या कोणत्याही प्रकारे कामी येऊ शकणार नाहीत. आणि त्या दोघींना सांगितले जाईल, ' नरकाच्या आगीत प्रवेश करा, इतर प्रवेश करणाऱ्यांबरोबर.'
11 आणि इमान धारण केलेल्या लोकांसाठी अल्लाह फिरऔनच्या पत्नीचे उदाहरण समोर ठेवत आहे. तिने ( अल्लाहशी प्रार्थना केली ) म्हणाली, ' हे प्रभू ! माझ्यासाठी स्वर्गात तुझ्या सान्निध्यात एक घर बनव, आणि मला फिरऔन व त्याच्या कुकृत्यांपासून वाचव  आणि मला अत्याचारी लोकांपासून मुक्ती दे.' असेच (दुसरे उदाहरण) इमरानची मुलगी मरियम  हिचे आहे, जिने आपले शील सुरक्षित ठेवले. मग आम्ही तिच्यात आमचा आत्मा फुंकला. आणि तिने आपल्या पालनकर्त्याच्या वचनांचे व त्याच्या ग्रंथाचे (पूर्ण) समर्थन केले. आणि ती आज्ञाधारक (भक्तांपैकी) होती.

-----------------------------------------------------------------

67 अल - मुल्क

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत 
दयाळू व कृपाळू आहे.

1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, 
(हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने 
एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. 
(एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की, तुम्हाला आढळतो का 
कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा पुन्हा 
पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) 
नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही 
आढळणार नाही).
5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) 
सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन 
बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या 
आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 
6  ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याला 
मानण्यास नकार दिला त्यांच्यासाठी नरकाची (भयंकर) आग तयार ठेवलेली आहे. (खरोखर) ते फारच वाईट ठिकाण आहे. 
7 जेव्हा त्यांना तिच्यात टाकले जाईल, तेव्हा तिची (भयंकर) गर्जना ते ऐकतील आणि ती उसळी घेत असेल. 8 जणू तिच्या क्रोधाचा स्फोटच होत आहे. प्रत्येक समूह जेव्हा तिच्यात टाकला 
जाईल, तिचे रखवालदार (प्रत्येक समूहाला) 
विचारतील, ' तुमच्याकडे कोणी सावध 
करणारा आला नव्हता का ?' 9 ते उत्तर देतील, ' अर्थातच, सावध करणारा आमच्याकडे 
आला होता, पण आम्ही त्यास खोटे ठरविले होते 
आणि आम्ही त्यास म्हटले होते, 'अल्लाहने 
काहीही प्रकट वगैरे केलेले नाही.
' तुम्ही (स्वयंनियुक्त पैगंबर अल्लाह च्या 
संदेशा चे नाटक करून) चुकीच्या मार्गी 
लागलेले आहात ' 10  आणि ते म्हणतील, ' जर आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले असते आणि        ( निदान) आमच्या बुद्धीचा वापर केला 
असता, तर आता आम्ही नरकवासीयांपैकी 
 झालो नसतो.' 11  आणि अशाप्रकारे ते 
आपल्या अपराधाची कबुली देतील.
तर नारकवासीयांवर सर्वप्रकारे अल्लाहची 
अवकृपा होवो!

12  (या उलट) जे लोक आपल्या 
पालनकर्त्याला  न पाहताही त्याच्याप्रति 
भीतीयुक्त आदर बाळगतात. त्यांना
(अल्लाहकडून) क्षमा व फार मोठे 
बक्षीस प्राप्त होईल.

13( लोकांनो!) तुम्ही काहीही गुपचुपरित्या बोला किंवा मोठ्याने बोला प्रत्येकाच्या मनात जे- जे आहे, ते सर्व त्याला माहीत आहे. 14 
ज्याने तुम्हाला निर्माण केले, त्यालाच ( तुमच्याविषयी) प्रत्येक गोष्ट माहीत नसणार का? 
त्याची बौद्धिक शक्ती अगाध आहे, ( कोणासाठीही) अनाकलनीय अशी आहे. 
तोच प्रत्येक गोष्टीची जाणीव असणारा आहे. 

15 त्यानेच पृथ्वीला तुमच्या अधीन करून टाकले. तर तुम्ही तिच्या भूभांगावर  संचार करा. आणि त्याने दिलेल्या उपजिविकेतून खा, आणि (हे नेहमी लक्षात ठेवा की, शेवटी) पुनरुत्थान 
होऊन त्याच्याकडेच परत जायचे आहे. 16
तुम्ही त्याच्यापासून स्वतःला सुरक्षित समजता
 का, जो आकाशात आहे. (म्हणजेच 
अल्लाहपासून ) ? की , तो तुम्हाला जमिनीत 
गाडून टाकू शकत नाही ? पाहा जेव्हा 
ती कंपित होते (तेव्हा काय होऊ शकते?) 
17  किंवा जो आकाशात आहे,
त्याच्यापासून तुम्ही निर्भय झाला आहेत 
का ? की, तो तुमच्यावर दगडांचा 
वर्षाव करणारे तुफानी वादळ पाठवू
शकत नाही? पण तेव्हाच तुम्हाला 
कळून चुकेल की , किती (खरा) होता माझा 
इशारा. 18 आणि त्यांच्या पूर्वीच्या अनेकांनी (माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून त्यास) 
खोटे ठरविले. तर कशी होती माझी नाराजी (जी त्यांच्यावर प्रकट झाली )!

19 ते त्यांच्यावर उडणाऱ्या पक्ष्यांचे कधी (चिंतनपूर्वक ) अवलोकन कारण नाहीत का, 
जे आपले पंख पसरवितात आणि (गरजेनुसार) ते आत मिटून घेत असतात. त्यांना 
थांबवून ठेवणारा कृपावंत (अल्लाहशिवाय)
दुसरा कोणीच नाही. कारण तो सर्व गोष्टींवर नजर ठेवून असतो. 20  अशी कोणती सेना आहे, जी कृपावंत अल्लाहच्या विरुद्ध तुम्हाला 
साहाय्य करू शकेल? सत्य नाकारणारे 
केवळ स्वतःची फसवणूक करीत आहेत ! 21 (अशाप्रकारे) अल्लाहने तुम्हाला उपजीविका 
प्रदान करणे बंद केले, तर (त्याच्याशिवाय) दुसरा कोण आहे जो 
तुम्हाला उपजीविका देऊ शकतो ? (हे सत्य उघड असतानाही,) हे केवळ हट्टापोटी 
विद्रोहाची आणि सत्यापासून दूर जाण्याची भूमिका घेत आहेत.

22 जो माणूस आपल्या चाऱ्यावर लोटांगण घालून चालतो, तो सन्मार्गावर असू  शकतो की, जो सरळ मार्गावर, सरळ ताठ मान ठेवून चालतो तो? 
23 त्यांना सांगा, 'तोच आहे (अल्लाह) 
ज्याने तुम्हा सर्वांना निर्माण केले आणि 
तुमच्यासाठी कान, डोळे व हृदये बनविली, पण 
(अल्लाहप्रति) फारच थोडी कृतज्ञता
दाखवता.' 24  त्यांना सांगा कि, तोच आहे (अल्लाह) ज्याने तुम्हाला पृथ्वीवर सर्वत्र पसरवून टाकले. आणि शेवटी (पुनरुत्थानाच्या दिवशी) 
तुम्हाला त्याच्याकडेच एकत्रित आणले जाणार 
आहे.

25  पण ते विचारतात, ' या (पुनरुत्थानाच्या) 
वचनाची पूर्तता होणार तरी केव्हा? तुमच्या 
म्हणण्यात काही सत्य असेल, तर (आम्हाला उत्तर द्या). ' 26 (पैगंबर !) त्यांना सांगा, ' याचे ज्ञान केवळ अल्लाहला आहे आणि मी तर 
फक्त त्यापासून स्पष्टरित्या सावध करणारा आहे.' 
27  पण जेव्हा ते वचन पूर्ण होण्यासाठी जवळ 
येत असल्याचे पाहतील, तेव्हा सत्य नाकारणाऱ्या लोकांचे चेहरे (दहशतीने) अगदी खिन्न 
होऊन जातील. आणि (तेव्हा) त्यांना 
सांगितले जाईल, ' हीच ती गोष्ट आहे, जिची (खिल्ली उडवत तिला आणण्याची) तुम्ही मागणी करीत असत.' 28 (पैगंबर !) त्यांना सांगा     '(या जगात) अल्लाह मला व माझ्याबरोबर 
असलेल्या लोकांना नष्ट करेल
 किंवा आमच्यावर दया करेल. पण (यानंतरच्या जगात) सत्य नाकारणाऱ्यांना त्या (कायमस्वरूपी) दुःखदायी  शिक्षेपासून कोण 
वाचवू शकतो? याविषयी तुम्ही कधी विचार 
केलात का ?' 29 त्यांना सांगा, ' तो कृपावंत अल्लाह आहे, आम्ही त्याच्यावरच 
श्रद्धा ठेवतो व त्याच्यावरच भरवसा ठेवतो. आणि 
तुम्हाला लवकरच कळून चुकेल की , कोण 
उघडउघड वाट चुकलेला आहे.' 30 ( सत्य नाकारणाऱ्यांना) सांगा, ' तुम्ही यावर कधी विचार केला आहात का की, जर तुमचे सर्व पाण्याचे साठे जमिनीत अचानक 
लुप्त झाले तर (अल्लाहशिवाय दुसरा) कोण आहे, जो 
तुमच्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करू  शकतो ?'

-----------------------------------------------------------------

चॅप्टर 109 अल काफ़िरून 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 सांगा, ' हे सत्य नाकारणाऱ्या लोकांनो ! 2 मी त्यांची उपासना करीत नाही, ज्यांची उपासना तुम्ही करता. 3  तसेच तुम्ही त्याची उपासना करीत नाही, ज्याची उपासना मी करतो. 4 मी त्यांची कदापि उपासना कदापि करू शकत नाही, ज्यांची उपासना करू शकत नाही, ज्यांची उपासना तुम्ही करता. 5 तसेच ना तुम्ही त्याची उपासना कधी कराल, ज्याची उपासना मी करतो. 6 तुमचा धर्म तुम्हाला लखलाभ आणि माझा धर्म मला.' [ कुराण 109 : 1 - 6 ]
-----------------------------------------------------------------

चॅप्टर 112 अल इखलास 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू  व कृपाळू आहे.
1 ( पैगंबर ! हे लोक अल्लाहविषयीं विचारतात ), तुम्ही त्यांना सांगा, 'अल्लाह एकच  आहे, 2 तो आत्मनिर्भर ( व स्वयंपूर्ण ) आहे. 3 ना तो कोणाला ( अपत्यरूपी )जन्म देतो. ना तो कोणापासून जन्माला आलेला आहे ( असा आहे अल्लाह ).4  आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही.' [कुराण 112 :1 -4 ]
-----------------------------------------------------------------

चॅप्टर ११३ अल फ़लक 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 ( पैगंबर !) सांगा, 'सकाळ निर्माण करणाऱ्या पालनकर्त्याचे मी शरण प्राप्त करू इच्छितो. 2 त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अपायापासून ( स्वतःला वाचविण्यासाठी ).3  आणि रात्रीच्या अपायापासून , जेव्हा ती सर्वत्र (अंधार ) पसरवते. 4 तसेच त्यांच्या अपायापासून जे काही गूढ प्रयास करून फुंकर मारतात. 5 तसेच मत्सर बाळगणारा जेव्हा मत्सर बाळगतो, त्याच्या अपायापासून वाचवण्यासाठी ( त्याचे शरण अवश्य आहे).' [कुराण 113 : 1 -5 ]
-----------------------------------------------------------------


चॅप्टर 114 अन नास 

* आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर!) सांगा, 'मी लोंकाच्या पालनकर्त्याचे शरण प्राप्त करू इच्छितो, 2 जो लोकांचा सर्वाधिपती 3 (व) लोकांचा ईश्वर आहे, 4 जो लपून बहकाविण्याचे काम करतो अशा (सैतानाच्या) अपायापासून  (स्वतःला वाचविण्यासाठी मला त्याचे शरण हवे आहे.) 5 जो लोकांच्या मनात वाईट विचार भरतो, 6 मग तो जिन्नांपैकी असो वा  मनुष्यांपैकी.'  [कुराण 114 : 1 -6 ]
----------------------------------------------------------------


कुरआन

2 हा अल्लाहचा ग्रंथ आहे, यात मुळीच शंका नाही. मार्गदर्शन आहे अल्लाहची जाण  असणाऱ्यांसाठी. 3 जे श्रध्दा ठेवतात (मानवी आकलनापलीकडील) अदृश्यावर, आणि अढळपणे प्रार्थना करीत असतात, आणि जे काही आम्ही त्यांना दिले आहे, त्यातून (इतरांवर ) खर्च करीत असतात. 4 आणि  (पैगंबर!) जो ग्रंथ तुम्हाला प्रदान करण्यात आला व जे ग्रंथ तु मच्यापूर्वी ((इतर पैगंबरांना ) प्रदान करण्यात आले, सर्वांवर दृढ विश्वास ठेवतात आणि मरणोत्तर जीवनावरही आढळ श्रद्धा ठेवतात.5  हे लोक आपल्या प्लांकर्त्याने दाखवलेल्या सरळ मार्गावर आहे. हेच लोक यशस्वी होणार आहेत.[कुराण 2 :2 -5 ]

-------------------------------------------------

75 तर मी ताऱ्यांच्या स्थानांची शपथ घेऊन सांगतो. 76 जर तुम्ही चिंतन कराल तर ( कळून येईल ) ही खरोखर फारच मोठी शपथ आहे. 77 यात शंकाच नाही की , हे कुराण फार थोर ( असा ग्रंथ )आहे. 78 एका सुरक्षित ग्रंथात जतन करून ठेवलेला आहे. 79 त्यास तेच स्पर्श करतात. जे ( मनाने पवित्र) आहेत. 80 प्रकट करण्यात आलेला आहे सर्व जगांच्या मालकाकडून.     [कुराण 56 : 75 -79 ]

---------------------------------------------------

4 (पण ) पूर्वीच्या ग्रंथधारकांकडे स्पष्ट प्रमाण येऊन पोचल्यानंतरच त्यांच्यात फाटाफूट झाली.[कुराण 98:4 ]

-------------------------------------------------

23  अल्लाहने सर्वोत्तम संदेशग्रन्थ प्रकट केलेला आहे, ज्यातील संदेशवचने एकमेकास  (मिळतीजुळती व ) पूरक आहेत आणि पुन्हा-पुन्हा आलेली आहे. ( हे ऐकून किंवा वाचून ) त्या लोकांच्या अंगावर शहारे उभे राहतात, जे आपल्या पालनकर्त्याची जाण बाळगून आहे. मग त्यांचे तन व मन मृदू होऊन, अल्लाहच्या स्मरणासाठी प्रवृत्त होतात. हे कुराण अल्लाहचे मार्गदर्शन आहे. याद्वारे तो इच्छितो त्यास मार्गदर्शन प्रदान करतो ( अर्थातच सत्याचा शोधकाला ) आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करतो, त्यास कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही. [कुराण 39 :23 ] 

----------------------------------------------

1 हा. मीम . 2  या सुबोध अशा ग्रंथाची शपथ. 3 आम्ही या (ग्रंथास) अरबी भाषेत (प्रकट केले आहे), म्हणजे तुम्हा लोकांना ( त्यातील संदेश ) ग्रहण करता यावे.

4 आणि या ( कुराणाचा ) मूळ स्रोत आमच्याकडे असलेल्या महाग्रंथात आहे. खरोखर हे उदात्त व ज्ञानाने परिपूर्ण आहे.          [कुराण 43 : 2 -4 ]

------------------------------------------------------

89 आम्ही या कुराणात लोकांसाठी, सर्व प्रकारची उदाहरणे विविध प्रकारे प्रस्तुत केलेली आहेत. तरीसुद्धा बहुसंख्य लोकांनी सत्य नाकारण्याचीच भूमिका आग्रहपूर्वक स्वीकारलेली आहे.
[कुराण 17 : 89]

-----------------------------------------------------

 

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...