रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

अरमाया (जरमाया)

 जेरुसलेम च्या लोकांनी फक्त एक अल्लाह (अल्लाह ला ते लोक ' यहोवा ' म्हणत होते.) (परमेश्वर) ची उपासना करणे सोडून, दगडांच्या प्रतिमा बनविल्या आणि त्यांची उपासना सुरू केली.


अर्माया यांनी अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, फक्त एका अल्लाह ची ( ईश्वराची) उपासना करा. आणि परत या.
अर्माया यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला की, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. नाहीतर ते सर्व लोक नष्ट होतील. पण त्यांचा उपदेश लोकांनी मानला नाही. त्यांनी अरमाया यांना खोटं बोलणारा समजले. ते लोक गर्विष्ठ झाले. त्यांना चमत्कार दाखवूनही ( अल्लाह च्या मदतीने) काही फरक पडत नव्हता. ते या गोष्टीवर विश्वासच करू शकत नव्हते की, अल्लाह त्या दगडाच्या गुंबद ला  (हैकले सुलेमानी ) ला, जे जेरुसलेम मध्ये सुलेमान ने बांधले होते आणि ज्यावर अल्लाह ची कृपा होती, नष्ट ही करू शकतो.

आणि लोकांनी त्या संदेशातील धमकी आणि चेतावणी ऐकली, ते म्हणाले, तू खोटे बोलत आहेस, जर तू असे म्हणत आहे की, अल्लाह या जमिनीला, त्याचा प्रार्थना स्थळाला, त्याच्या ग्रंथाला  नष्ट करेल.
त्यांचा राजा खूप गर्विष्ठ होता.त्याने आदेश दिला की, अर्माया ला कैद करा आणि तुरुंगात टाका. त्यांनी अरमाया ला जकडून तुरुंगात टाकले. ही खूप मोठी चूक होती. 

अल्लाह नबूकदनेस्सर (nebuchadnezzar) या बेबीलोन (इराकचे प्राचीन शहर) च्या राजाला त्यांच्यावर आक्रमण करण्यास पाठवले. त्याने त्याच्या सैन्यासह देशात प्रवेश केला आणि शहराला घेरले . जेव्हा हा सैन्याचा वेढा प्रदीर्घ कालावधी पर्यंत राहिला. इस्रायल च्या सैन्याने, त्या राजाशी शरणागती पत्करली, त्यांनी त्यांचे शहराचे दरवाजे उघडले आणि राजाच्या सैन्याने शहरात प्रवेश केला आणि ते खूप क्रूर होते.  राजाने क्रूरतेने त्यांच्यावर त्याचा कायदा लागू केला आणि त्यांना निर्दयीपणे शिक्षा केली. राजाने एक तृतीयांश लोकांचा वध केला आणि एक तृतीयांश लोकांना पकडले आणि वृद्धांना आणि अपंगाना सोडले.
मग त्यांनी, त्यांना घोड्यांवर स्वार होऊन पायदळी तुडविले. त्यांची घरे पाडली. तरुणांना वेगळे करून स्त्रियांना बाजाराच्या ठिकाणी रक्षक म्हणून उभे केले. त्यांनी सैन्यात दहशत पसरवली आणि त्या किल्ल्याला आणि प्रार्थना स्थळाला (हैकले सुलेमानी) नष्ट केले. राजाने इस्राइलच्या वंशाला पूर्णपणे संपुष्टात आणले. राजा बेबिलोन ला, सर्व लूट घेऊन निघाला ज्यामध्ये संपत्ती होती आणि लोक होते, त्यांच्यात तरुणी होत्या आणि धर्मोपदेशकांची मुले होती सर्व मिळून सत्तरहजार पर्यंत होते. हे इस्राइल च्या लोकांसाठी खूप भयानक दृश्य होते. ती जागा लोकांच्या रक्ताने भरली.सगळी कडे मृतदेह होते. बेबिलोन च्या सैन्याने फक्त अपंग आणि वृद्ध लोकांना जाऊ दिले. त्यांनी जेरुसलेमच्या लोकांच्या सर्व घरांना नष्ट केले. त्या सैन्याने हैकले सुलेमानी च्या इमारतीला नष्ट केले. बेबोलोन च्या सैन्याने , तेथील लोकांचे सर्व पुस्तके आणि ग्रंथ जाळून टाकले. त्यांनी मुलांशी आणि स्त्रियांशी ही वाईट वागणूक केली. हा तेथील लोकांसाठी खूप भयावह दिवस होता.
इस्राइल ची जमात ही अल्लाह ची जमात होती. त्या लोकांकडे खूप संदेश देणारे (पैगंबर ) आले. अल्लाहने त्यांना खूप संधी दिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांनी अल्लाह चा प्रत्येक आदेश तोडला. इतकेच नाही तर त्यांनी अल्लाह चा संदेश देणाऱ्यांचा वध केला. आणि दगडाच्या प्रतिमांची उपासना करणे चालू ठेवले. याच कारणाने अल्लाह त्यांच्यावर खूप क्रोधित झाला आणि पूर्ण जमातीला ध्वस्त आणि नष्ट केले. 
एक दिवस बेबोलोन च्या राजाला माहीत झाले की, इस्राइल च्या लोकांचा एक संदेशकर्ता आहे, ज्याला आधी पासूनच या विनाशा विषयी माहीत होते आणि त्याचे नाव अर्माया आहे. राजा ने आदेश दिला की, त्या संदेश कर्त्याला तुरुंगातून बाहेर आणले जावे. अरमाया शी बोलल्यानंतर राजा ला जाणीव झाली, की ते खरच अल्लाहचे  खरे संदेश कर्ता (पैगंबर) होते. राजा ने त्यांची सुटका केली.
त्या पूर्ण शहराला नष्ट करून बेबिलोन चा राजा पुन्हा त्याच्या राज्यात गेला.आणि त्याच्या सोबत खूप मूल्यवान खजिने, पुरुष आणि स्त्रिया आणि मुले सोबत घेऊन गेला.काही जण म्हणतात त्याने अंदाजे सत्तर हजार पुरुष आणि स्त्रियांना सेवक बनविले.
या विध्वं सा नंतर इस्राइल मध्ये नवीन युग. सुरू झाले. अरमाया ने लोकांना म्हंटले की, जे इस्राइल मध्ये हजर आहेत, त्यांनी स्वतःच्या अपराधावर. पश्चाताप करून आणि अल्लाह ला  क्षमा मागावी. त्यांनी हे ही सांगितले की, अल्लाह पुन्हा एकदा त्या लोकांची भरभराट करेल. पण खूप लोक त्या विध्वंस झालेल्या शहरात राहण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा अरमाया यांचा आदेश मानण्यास नकार दिला. आणि ते सगळे लोक जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाले. त्यातील काही इजिप्त (मिसर), स्पेन(हिजर) आणि सौदी अरेबिया(तैफ) मध्ये गेले. पण अरमाया अ. यांनी इस्राइल ची पुन्हा भरभराट करण्याचा पूर्ण केला. 

ही सत्य घटना आहे. बायबल मध्ये पूर्ण एक chapter यावर आधारित आहे. जेरुसलेम च्या लोक दोन वेळा उपद्रव माजवतील व दोन वेळा नष्ट जेरुसलेम नष्ट केले जाईल, अशी चेतावणी अल्लाह  (यहोवा) कडून देण्यात आली होती. कुराण मध्ये हा संदर्भ आहे.( कुराण 17:2-8)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...