शनिवार, २४ एप्रिल, २०२१

namaz

 अजान अर्थ 

"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर"

अर्थ- अल्लाह (परमेश्वर) सर्वांत महान आहे, अल्लाह (परमेश्वर) सर्वांत  महान आहे,

"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर" 

अर्थ- अल्लाह (परमेश्वर) सर्वांत  महान आहे, अल्लाह (परमेश्वर) सर्वांत महान आहे,

"अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह."

अर्थ- मी ग्वाही देतो की अल्लाहशिवाय(एक परमेश्वर शिवाय) कोणीही 'इलाह' (उपास्य, अल्लाह, स्वामी की ज्याची गुलामी केली जावी) नाही. मी ग्वाही देतो कि अल्लाहशिवाय कोणीही 'इलाह ' नाही.  

"अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह."

अर्थ- मी ग्वाही देतो की अल्लाहशिवाय(एक परमेश्वर शिवाय) कोणीही 'इलाह' (उपास्य, अल्लाह, स्वामी की ज्याची गुलामी केली जावी) नाही. मी ग्वाही देतो कि अल्लाहशिवाय कोणीही 'इलाह ' नाही.

अशहदु अन्न मुहम्मदर्रसूलुल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर्रसूलुल्लाह,

अर्थ - मी ग्वाही देतो की ( आदरणीय ) मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत. मी ग्वाही देतो की (आदरणीय) मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत. 

यानंतर उजवीकडे तोंड वळवून "हय्या अलस्सलाह -हय्या अलस्सलाह"

अर्थ - या नमाजकडे (प्रार्थनेकडे)-या नमाजकडे (प्रार्थनेकडे)

मग डावीकडे तोंड वळवून "हय्या अलल फलाह - हय्या अलल फलाह"

अर्थ - या यशाकडे - या यशाकडे 

यानंतर काबागृहाकडे तोंड करून 

"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर"

अर्थ- अल्लाह (परमेश्वर) सर्वांत महान आहे, अल्लाह (परमेश्वर) सर्वांत  महान आहे,

" ला इलाहा इल्लल्लाह ."

अर्थ - अल्लाहशिवाय कोणी इलाह नाही . 


* फक्त पहाटेच्या अजानमध्ये "हय्या अलल फलाह" नंतर 

"अस्सलातु खैरुममिन्ननौम -अस्सलातु खैरुममिन्ननौम"

अर्थ - नमाज झोपेपेक्षा श्रेष्ठतर आहे -नमाज झोपेपेक्षा श्रेष्ठतर आहे. 


नियत - काबागृहाकडे तोंड करून.. 

अर्थ -"हे अल्लाह मी नियत करतो की, -----रकात ----ची नमाज (प्रार्थना), खास अल्लाह तआला ( परमेश्वर) साठी, तोंड माझे 'काबा -ए- शरीफ' कडे. 

अशी नियत केल्यानंतर 'अल्लाहु अकबर " म्हणत दोन्ही हात कानांच्या पाळ्यांपर्यंत उचला (महिला खांद्यांपर्यंत) आणि त्यानंतर उजवा हात डाव्यावर बांधा. दोन्ही हात पुरुष नाभीवर ( आणि महिला छातीवर) ठेवून सना म्हणतात . 

सना - "सुब हान कल्ला हु  म्मा व बि हम दिका व तबारकस्मुका व त आला ज द्दु का वला इलाहा गैरुका. "

अर्थ - हे अल्लाह ! तू पवित्र आहेस. कृतज्ञता व सना ( प्रशंसा) तुझ्यासाठीच आहेत. तुझे नाव बरकत चे (भरभराटीचे) आहे. तुझे वैभव सर्वोच्च आहे. तुझ्याशिवाय कोणीही इलाह नाही. 
















रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

अरमाया (जरमाया)

 जेरुसलेम च्या लोकांनी फक्त एक अल्लाह (अल्लाह ला ते लोक ' यहोवा ' म्हणत होते.) (परमेश्वर) ची उपासना करणे सोडून, दगडांच्या प्रतिमा बनविल्या आणि त्यांची उपासना सुरू केली.


अर्माया यांनी अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, फक्त एका अल्लाह ची ( ईश्वराची) उपासना करा. आणि परत या.
अर्माया यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला की, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. नाहीतर ते सर्व लोक नष्ट होतील. पण त्यांचा उपदेश लोकांनी मानला नाही. त्यांनी अरमाया यांना खोटं बोलणारा समजले. ते लोक गर्विष्ठ झाले. त्यांना चमत्कार दाखवूनही ( अल्लाह च्या मदतीने) काही फरक पडत नव्हता. ते या गोष्टीवर विश्वासच करू शकत नव्हते की, अल्लाह त्या दगडाच्या गुंबद ला  (हैकले सुलेमानी ) ला, जे जेरुसलेम मध्ये सुलेमान ने बांधले होते आणि ज्यावर अल्लाह ची कृपा होती, नष्ट ही करू शकतो.

आणि लोकांनी त्या संदेशातील धमकी आणि चेतावणी ऐकली, ते म्हणाले, तू खोटे बोलत आहेस, जर तू असे म्हणत आहे की, अल्लाह या जमिनीला, त्याचा प्रार्थना स्थळाला, त्याच्या ग्रंथाला  नष्ट करेल.
त्यांचा राजा खूप गर्विष्ठ होता.त्याने आदेश दिला की, अर्माया ला कैद करा आणि तुरुंगात टाका. त्यांनी अरमाया ला जकडून तुरुंगात टाकले. ही खूप मोठी चूक होती. 

अल्लाह नबूकदनेस्सर (nebuchadnezzar) या बेबीलोन (इराकचे प्राचीन शहर) च्या राजाला त्यांच्यावर आक्रमण करण्यास पाठवले. त्याने त्याच्या सैन्यासह देशात प्रवेश केला आणि शहराला घेरले . जेव्हा हा सैन्याचा वेढा प्रदीर्घ कालावधी पर्यंत राहिला. इस्रायल च्या सैन्याने, त्या राजाशी शरणागती पत्करली, त्यांनी त्यांचे शहराचे दरवाजे उघडले आणि राजाच्या सैन्याने शहरात प्रवेश केला आणि ते खूप क्रूर होते.  राजाने क्रूरतेने त्यांच्यावर त्याचा कायदा लागू केला आणि त्यांना निर्दयीपणे शिक्षा केली. राजाने एक तृतीयांश लोकांचा वध केला आणि एक तृतीयांश लोकांना पकडले आणि वृद्धांना आणि अपंगाना सोडले.
मग त्यांनी, त्यांना घोड्यांवर स्वार होऊन पायदळी तुडविले. त्यांची घरे पाडली. तरुणांना वेगळे करून स्त्रियांना बाजाराच्या ठिकाणी रक्षक म्हणून उभे केले. त्यांनी सैन्यात दहशत पसरवली आणि त्या किल्ल्याला आणि प्रार्थना स्थळाला (हैकले सुलेमानी) नष्ट केले. राजाने इस्राइलच्या वंशाला पूर्णपणे संपुष्टात आणले. राजा बेबिलोन ला, सर्व लूट घेऊन निघाला ज्यामध्ये संपत्ती होती आणि लोक होते, त्यांच्यात तरुणी होत्या आणि धर्मोपदेशकांची मुले होती सर्व मिळून सत्तरहजार पर्यंत होते. हे इस्राइल च्या लोकांसाठी खूप भयानक दृश्य होते. ती जागा लोकांच्या रक्ताने भरली.सगळी कडे मृतदेह होते. बेबिलोन च्या सैन्याने फक्त अपंग आणि वृद्ध लोकांना जाऊ दिले. त्यांनी जेरुसलेमच्या लोकांच्या सर्व घरांना नष्ट केले. त्या सैन्याने हैकले सुलेमानी च्या इमारतीला नष्ट केले. बेबोलोन च्या सैन्याने , तेथील लोकांचे सर्व पुस्तके आणि ग्रंथ जाळून टाकले. त्यांनी मुलांशी आणि स्त्रियांशी ही वाईट वागणूक केली. हा तेथील लोकांसाठी खूप भयावह दिवस होता.
इस्राइल ची जमात ही अल्लाह ची जमात होती. त्या लोकांकडे खूप संदेश देणारे (पैगंबर ) आले. अल्लाहने त्यांना खूप संधी दिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांनी अल्लाह चा प्रत्येक आदेश तोडला. इतकेच नाही तर त्यांनी अल्लाह चा संदेश देणाऱ्यांचा वध केला. आणि दगडाच्या प्रतिमांची उपासना करणे चालू ठेवले. याच कारणाने अल्लाह त्यांच्यावर खूप क्रोधित झाला आणि पूर्ण जमातीला ध्वस्त आणि नष्ट केले. 
एक दिवस बेबोलोन च्या राजाला माहीत झाले की, इस्राइल च्या लोकांचा एक संदेशकर्ता आहे, ज्याला आधी पासूनच या विनाशा विषयी माहीत होते आणि त्याचे नाव अर्माया आहे. राजा ने आदेश दिला की, त्या संदेश कर्त्याला तुरुंगातून बाहेर आणले जावे. अरमाया शी बोलल्यानंतर राजा ला जाणीव झाली, की ते खरच अल्लाहचे  खरे संदेश कर्ता (पैगंबर) होते. राजा ने त्यांची सुटका केली.
त्या पूर्ण शहराला नष्ट करून बेबिलोन चा राजा पुन्हा त्याच्या राज्यात गेला.आणि त्याच्या सोबत खूप मूल्यवान खजिने, पुरुष आणि स्त्रिया आणि मुले सोबत घेऊन गेला.काही जण म्हणतात त्याने अंदाजे सत्तर हजार पुरुष आणि स्त्रियांना सेवक बनविले.
या विध्वं सा नंतर इस्राइल मध्ये नवीन युग. सुरू झाले. अरमाया ने लोकांना म्हंटले की, जे इस्राइल मध्ये हजर आहेत, त्यांनी स्वतःच्या अपराधावर. पश्चाताप करून आणि अल्लाह ला  क्षमा मागावी. त्यांनी हे ही सांगितले की, अल्लाह पुन्हा एकदा त्या लोकांची भरभराट करेल. पण खूप लोक त्या विध्वंस झालेल्या शहरात राहण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा अरमाया यांचा आदेश मानण्यास नकार दिला. आणि ते सगळे लोक जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाले. त्यातील काही इजिप्त (मिसर), स्पेन(हिजर) आणि सौदी अरेबिया(तैफ) मध्ये गेले. पण अरमाया अ. यांनी इस्राइल ची पुन्हा भरभराट करण्याचा पूर्ण केला. 

ही सत्य घटना आहे. बायबल मध्ये पूर्ण एक chapter यावर आधारित आहे. जेरुसलेम च्या लोक दोन वेळा उपद्रव माजवतील व दोन वेळा नष्ट जेरुसलेम नष्ट केले जाईल, अशी चेतावणी अल्लाह  (यहोवा) कडून देण्यात आली होती. कुराण मध्ये हा संदर्भ आहे.( कुराण 17:2-8)

मरियम आणि स्वर्ग दूत

 मरियम एका पवित्र वातावरणात मोठी झाली. सदाचारी लोकांत, ती एक खूप धार्मिक ( ईश्वर निष्ठ) तरुण मुलगी झाली.तिने तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीत प्रार्थना करण्यात खर्च केला.आणि स्वतःला अल्लाह च्या सेवेसाठी अर्पण केले. तिची धर्म निष्ठा इतकी चांगली होती की, तिच्यापेक्षा मोठे लोक ही तिचा सन्मान करायचे.आणि तिच्याकडून प्रेरणा घ्यायचे. 

तिची ईश्वर निष्ठा  आणि पावित्र्य असाधारण होते. जे तिला ओळखत होते, त्या प्रत्येकाकडून तिने  तिची प्रतिष्ठा जिंकली होती.

एक दिवस जेव्हा मरियम तिच्या खोलीतून, एका वेगळ्या जागेत जिथे पडदे टाकून आच्छादन केले होते, गेली तेव्हा तिने एक तरुण व्यक्ती तिच्यासमोर उभा राहिलेला पाहिले. मरियम घाबरली होती.' कोण आहे तू? ' तिने विचारले. ' ईश्र्वरासाठी जवळ येऊ नकोस. ' मी अल्लाह चा आश्रय मागते तुझ्यापासून '
तो व्यक्ती उत्तर ला,' घाबरु नको, मी अल्लाह चा दूत (स्वर्ग दूत ) आहे आणि अल्लाह कडून फक्त संदेश देणारा म्हणून  पाठविण्यात आलो आहे. तुला हे सांगण्यासाठी की, तुला एक पवित्र मुलगा होईल.'
पण जर मला कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नाही (मी विवाहित नाही), तर मला एक पुत्र कसा होईल.'  ' मी शील भ्रष्ट (वाईट स्त्री) नाही ? , ती म्हणाली.
' ती अल्लाह ची इच्छा आहे. ते त्याच्यासाठी खूप कठीण नाही. जेव्हा तो काही निर्माण करण्याची इच्छा करतो, म्हणतो , होऊन जा आणि ती असते. तुझा पुत्र एक खूप पवित्र मुलगा असेल. असे म्हणून स्वर्ग दूत दिसेनासा झाला आणि मरियम ला एका विस्मित (स्तंभित) करून गेला. 
नंतर जेव्हा तिचा पुत्र जन्मायची वेळ जवळ आली, मरियम, लोकांपासून बाजूला, एका दूरच्या ठिकाणी गेली. तेथे एकटी, घाबरलेली आणि भुकेने आणि तहानेने अशक्त झालेला एका पाम (ताडाच्या जातीचे झाड) झाडाच्या खाली झोपली आणि वेदनेने ओरडू लागली, ' मी इच्छा करते, हे होण्याआधी मी मरून गेलेली असावी आणि सर्व मला विसरून गेलेले असावे.
एक सुखद आवाज तिच्याशी बोलला, ' दुःखी होऊ नको मरियम. तुझ्या प्रभूने एक पाण्याचा झरा तुझ्याखालून (जवळून) प्रदान (प्रवाहित) केला आहे. आणि जर तू झाडाचे खोड हलवशील तर पुष्कळ ताज्या आणि पिकलेल्या खजुरी तुझ्यावर पडतील.तू खा आणि पी आणि तुझ्या पुत्राला पाहून आनंद घे.
तिचा पुत्र ईसा या लोकांपासून दूर अशा जागी जन्मला. मरियम ने जरी, तिच्या लहान बाळाला कुशीत घेतले, तरी तिच्यात त्या बाळाला घेऊन तिच्या लोकांकडे जाण्याचे साहस नव्हते. ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकेलं? ते काय म्हणतील? तिच्या बाळाचा जन्म, ती कसे समजावून सांगू शकेल? ती दयनीय अवस्थेत होती आणि काय करावे तिला समजत नव्हते. पण अल्लाह ने तिला दिलासा दिला.' लोकांना काहीही सांगू नको, कोणत्याही प्रश्ना चे उत्तर देऊ नको, फक्त संकेत करून सांग की तू उपवास करीत आहे आणि त्या दिवशी, काहीही न बोलण्याची शपथ घेतली आहे.' तिला आदेश दिला गेला.
अल्लाह च्या मदतीने बळकट होऊन, निरागस तरुण मरियम ने तिच्या बाळाला उचलले आणि तिच्या लोकांकडे परत गेली. जेव्हा त्यांनी तिला तिच्या हातात असलेल्या, एका बाळा सोबत येतांना पाहिले, ते तिच्या भोवती जमा झाले.' मरियम, किती लाजेची गोष्ट आहे! तुझे मातापिता ईश्र्वरनिष्ठ लोक होते, तू हे काय केले? '  आणि ते त्या मुला विषयी जाणण्यास इच्छुक होते.
मरियम ने त्यांना उत्तर दिले नाही.तिने फक्त त्या मुला कडे इशारा केला. ' तू वेडी आहे का? आम्ही एका नवजात बाळासोबत कसे बोलू शकतो, मरियम ?'  त्यानंतर लगेच प्रत्येकाला पूर्ण आश्चर्य देऊन, मरियम च्या हातातील बाळाने बोलावयास सुरुवात केली. ' मी अल्लाह चा संदेश पोहोचविणारा आहे, ' ते बाळ म्हणाले, ' त्याने मला एक ग्रंथ ( इंजील, बायबल) दिला आहे आणि मला एक प्रेषित (संदे श कर्ता, पैगंबर) बनविले आहे. त्याने मला आज्ञा दिली की, माझ्या (अल्लाह च्या) प्रार्थना म्हण आणि दानशूर बन आणि माझ्यावर आशीर्वाद दिला की,  जिथे मी असेल, तो मला माझ्या आईशी दयाळू असणारा बनवेल आणि माझ्यावर ज्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या दिवशी मी मृत्यू पावेन, ज्या दिवशी मला पुन्हा वर उचलण्यात येईल, त्या दिवशी शांती देईल.
प्रत्येक जनाने, डोळे विस्फारून आश्चर्याने( चमत्कार) आणि अविश्र्वासाने लक्ष देऊन ऐकले. हे ईसा ( येशू) होते. अल्लाह चे सं देशकर्ता. जे  मरियम ची जी पवित्र आणि निरागस होती, निंदा करण्यास आले होते,  ते सगळे नवजात बालकाचे बोलणे ऐकून शांत झाले. मरियम च्या विषयी पवित्र कुराण म्हणते, ' अल्लाह ने मरियम ला , त्या सर्व देशांच्या, सर्व स्त्रियांमधून वरचा दर्जा देऊन निवडले. '

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...