शुक्रवार, २९ मे, २०२०

04. सालेह अ. आणि अल्लाह ची उंटणी

सौदी अरेबिया मध्ये अल - हिज्र  किंवा मैदाने सलिह, हिजाजी पर्वत भागात

ही सत्यकथा साधारणतः 4540 वर्षांपूर्वीची म्हणजेच 2520 BC मधील सौदी अरब या देशातील आहे...

जे लोकं जिवंत होते, त्यांना 'समूद ' म्हणले जायचे, हे लोक गोरे, उंच आणि देखणे होते...

त्यांनी डोंगरापासून कोरून भव्य घरे बनविली...आणि मैदानातील जमिनीवर सुंदर राजवाडे बनविले...पण ते कृतघ्न लोक होते...आणि त्यांनी अल्लाहची आज्ञा पाळली नाही...
अल्लाहने त्यांच्यामधलाच एक संदेशवाहक पाठविला...त्याचे नाव होते सालेह अ.   

सालेह अ. यांनी समुदच्या लोकांना चांगले वागून, फक्त एकाच अल्लाहवर विश्वास करायला सांगितले...त्या लोकांत गरीब लोकांनी त्याचे ऐकले, पण श्रीमंत लोकांनी ऐकले नाही....
ते पूर्ण गर्विष्ठ होते आणि गरिबांना कमी लेखत होते...ते म्हणाले, "सालेह, तू आमच्या सारखाच आहेस...तुला काय झाले आहे? की तू आम्हाला आमच्या आराध्यची, प्रतिमांची आराधना करण्यास थांबवत आहे..."
सालेह अ. म्हणाले, मी अल्लाहचा संदेशवाहक आहे...अल्लाहने मला तुम्हाला सत्य सांगण्यासाठी पाठविले आहे...अल्लाहने तुम्हाला या धरतीपासून बनविले आहे आणि तुम्हाला धरतीवर जगायची परवानगी दिली आहे...अल्लाहने तुम्हाला बाग, झरे, कुरण (गवतासाठी राखलेले मैदान), स्वादिष्ट आणि मऊ खजूर आणि सुंदर घरे दिली...

तुम्ही जी त्याची अवज्ञा करीत आहात त्यासाठी त्याची क्षमा मागा...
याबदल्यात मला तुमच्याकडून काही नको आहे...मी तुम्हाला फक्त एकाच अल्लाहवर विश्वास ठेवण्यास सांगत आहे...ज्याने तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली...

पण समुदच्या श्रीमंत लोकांनी नाराजी दाखविली...आणि म्हणाले, "ठीक आहे, तुझ्या अल्लाहला सांग की, एक चमत्कार दाखव...मग आम्ही त्या अल्लाहवर विश्वास करू...त्याला मानू...
त्यांनी सालेह अ. यांना, अल्लाहला विनंती करून, एका डोंगरातून एक जिवंत उंट, त्यांच्यासमोर बाहेर आणून दाखविण्यास सांगितले...

सालेह अ. यांनी अल्लाहकडे प्रार्थना केली...आणि अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकून समुदच्या  लोकांना, तो चमत्कार दाखवला जो चमत्कार त्यांनी दाखवायला सांगितला होता...

एक मादा उंट जिच्या पोटात वासरू होते, डोंगरातून, खडक दूर करून, बरोबर त्यांच्या डोळ्यासमोर  बाहेर आली...

सालेह अ. म्हणाले, आता तुम्ही चमत्कार पहिला...तुम्हाला जे पाहिजे ते मिळाले आहे...ही मादा उंट पवित्र आहे...आणि अल्लाहने तुमच्या विनंतीवरून पाठविली  आहे...,ज्यामुळे तुम्हाला अल्लाहची उपस्थिती पटावी...ही अल्लाहची इच्छा आहे की, ती शेतात आणि रानात चरावी...आणि तिने एक दिवस ज्या ठिकाणी पाणी पिले.. तुम्ही दुसऱ्या दिवशी तेथून पाणी काढावे... आळीपाळीने...
तुमच्यापैकी कुणीही त्या मादा उंटची आणि तिच्या बछड्याची पाळी घेणार नाही...सालेह अ. यांनी हे ही सांगितले की, जर त्या मादा उंटीनीला कुणी त्रास दिला, तर अल्लाहकडून शिक्षा दिली जाईल...

प्रथम समुदचे लोक प्रभावित झाले आणि घाबरले...त्यांनी चमत्कार होतांना पाहीला होता आणि विश्वास केला की,  उंटीनी, जी डोंगरातून निर्माण झाली आहे, ती खरंच अल्लाहकडून पाठविण्यात आली आहे, जसे त्यांनी अल्लाहला विनंती करण्यास सांगितले होते...

पण लवकरच त्यांनी, त्या उंटीनीचे आणि तिच्या बछड्याचे, चरण्याचे आणि पाणी पिण्याचे (एक दिवसाआडचे) आणि बिना अडथळ्याचे स्वातंत्र्य, याचा द्वेष करण्यास सुरू केला...

ते , त्यांचे पाणी त्या उंटीनी सोबत वाटण्यास (सहभागी करण्यास) इच्छुक नव्हते...त्यामुळे त्यांनी एक योजना आखलीे..आणि एक दिवस त्यांच्यातील काहींनी तिला  जीवे मारले...


जेव्हा सालेह अ. यांनी, हे ऐकले तेव्हा ते खूप दुःखी झाले...त्यांनी समुदच्या लोकांना म्हंटले, "तुम्ही अल्लाहची आज्ञा न पाळून, पाप केले आहे...तुमच्यामुळे अल्लाह खूप रागावला आहे...आणि लवकरच तो तुम्हाला शिक्षा करेन"...


आणि अल्लाहने समुदच्या लोकांना, एक भयानक त्रासदायक आवाज, मेघ गर्जना आणि कडाक्याची वीज पाठवून, खूप कठोरपणे शिक्षा दिली...

समुदचे लोकं, ज्यांनी सालेह अ. यांचे ऐकले नव्हते, जेव्हा त्यांनी हा भीतीदायक आवाज ऐकला आणि मोठा भूकंप आला, तेव्हा त्यांच्या तोंडावर, जमिनीवर पडले...सकाळी ते सगळे त्यांच्या सुंदर आणि मजबूत घरांत, मृत आढळले होते...जी घरे त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधली होती...
फक्त ते लोक ज्यांनी एका अल्लाहला मानले आणि विश्वास ठेवला आणि ज्यांनी सालेह अ. यांचे ऐकले ते वाचवले गेले होते....

03. हूद अ.

ही कथा 5050 वर्षांपूर्वीची म्हणजेच 3000 BC मधील आहे...
नूह अ.चे अनुयायी जे पूरामध्ये वाचलेले  होते, ते चांगले लोक होते...खूप वर्षांनंतर त्यांची मुले आणि नातवंड, त्यांच्या पूर्वजांनी आणि परदादा यांनी जे सांगून गेले, त्याला विसरून गेले...

हे लोक खूप उंच, गोरे आणि चांगल्या शरीरयष्टीचे होते...आणि त्यांना ' आद लोक ' असे म्हंटले जात होते...त्यांनी सुंदर घरे आणि शहरे बनविली...पुन्हा एकदा त्यांनी दगडाच्या प्रतिमांची आराधना करने सुरू केले...

त्यामुळे अल्लाहने अजून एक संदेशवाहक, ज्यांचे नाव हूद अ. होते, यांना पाठविले. त्या जमातीतील लोकांना अल्लाहच्या संंदेशाची आठवण करून देण्यासाठी हूद अ. ला पाठवण्यात आले होते...

हूद अ. यांनी आदच्या जमातीतील लोकांना सांगितले की, "मी अल्लाहचा संदेशवाहक आहे...त्याने मला, तुम्हाला हे सांगण्यासाठी  पाठविले आहे की, तुम्ही अजिबात योग्य करत नाही....आणि तुम्हाला आठवण करून देण्यासाठी की, अल्लाहने नूह अ. यांच्या वेळच्या लोकांना कशी शिक्षा केली आणि जे फक्त एकाच अल्लाहवर विश्वास करत नाहीत, त्यांचा कसा विनाश केला...

पण आदच्या जमातीतील लोकांनी हूद अ.यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला...ते हूद अ. वर आक्रमक झाले आणि म्हणाले, "तुझी इच्छा आहे का की, आम्ही आमच्या दगडाच्या प्रतिमा फेकून द्याव्या, ज्यांची आमचे पिता,आजोबा आणि परदादा आराधना करत होते...नाही हूद ss, आम्ही जे तू म्हणतो, ते कधीही करणार नाही...अल्लाहच्या शिक्षेविषयी सांगून आम्हाला घाबरवू नको....जर आम्ही अल्लाहची आराधना नाही केली तर त्याला, आम्हाला शिक्षा देऊ दे..."

हूद अ. म्हणाले, "ती शिक्षा खूप दूर नाही...तुम्ही त्यासाठी वाट पाहा...मी पण तुमच्या सोबत वाट पाहीन..."

लवकरच त्यांची जमीन कोरडी आणि पडीक झाली..तेथे पाऊस नव्हता, त्यामुळे खूप कमी पीक आले...

हूद अ. त्यांच्या जमातीतील लोकांना म्हणाले, "लोकहो, अल्लाहची क्षमा मागा...त्याची क्षमा याचना करा आणि तो खूप जास्त देईल...अल्लाह सर्व काही करू शकतो..."

"तुला जे म्हणायचे ते तू म्हणू शकतो, हूद ...पण आम्ही तेच करणार जे आमच्या पित्याने केले..." आदच्या जमातीतील लोकांनी म्हंटले....

हूद अ. यांनी, त्यांना, त्या फक्त एका अल्लाहला घाबरण्यास सांगितले, ज्याने त्यांना त्यांची मुले दिली...असे पाळीव प्राणी दिले (गुरे), ज्यामुळे त्यांना दूध आणि मांस मिळते आणि अजून खूप उपयोगी साधने दिली...

आदच्या जमातीतील लोक म्हणाले, आमच्यापेक्षा कोण जास्त शक्तीशाली आहे? (आम्हीच जास्त शक्तिशाली आहोत)

शेवटी अल्लाह, त्यांनी आज्ञापालन न केल्यामुळे खूप रागावला....त्याने एक खूप जोरदार वादळ (प्रचंड जोऱ्याचा वारा) पाठविले..जो आठ दिवस आणि सात रात्र चालला...त्यामुळे त्यांची शहरे उध्वस्त झाली, पुसली गेली आणि प्रत्येक जण मारला गेला...वादळ इतके शक्तिशाली होते की, त्याच्या रस्त्यातले सर्व धुळीसारखे वाऱ्याने उडून गेले... आदचे लोक आणि त्यांची मोठी आणि सुंदर घरे, उंच खंब्यासहित पृथ्वीवरून गायब झाली...

01.आदम अ. .. जगातील पहिले मानव

स्वर्ग हा खूप सुंदर बगीचा आहे. ज्याचा कुणी स्वप्नातही विचार करू शकत नाही.....तिथे सगळ्या प्रकारची फळझाडे आहेत...त्यात डाळिंब, अंगुर, ऑलिव...सर्व फळे जितका मनुष्य विचार करु शकतो...आणि त्याच्याहून आधिक.....

आणि त्या फळांच्या झाडांच्या मधून थंड आणि गोड पाण्याचे, दुधाचे आणि मधाचे झरे वाहत आहेत....

एक दिवस अल्लाहने स्वर्गात त्याच्या दूतांना म्हटले की, "माझी इच्छा आहे एक मनुष्य बनविण्याची"

दूत म्हटले, "आम्ही तुझ्या आज्ञा पाळत नाही का?"

अल्लाह म्हणाला, "मला चांगले माहीत आहे"

अल्लाहने ओल्या मातीपासून एक मनुष्य बनविला, आदम अ. (अडम)...आणि त्यात आत्मा (जीव) फुंकला...त्या मनुष्याने त्याच्या जीवनाचा पहिला श्वास घेतला...या प्रत्येक गोष्ट त्याला शिकविली. त्याला बोलण्यासाठी काही शब्द शिकविले... अल्लाहने त्याच्या सर्व दूतांना बोलावले आणि म्हटले, "हा आदम आहे...त्याला वाकून प्रणाम करा.."

सगळ्या दूतांनी आज्ञाचे पालन केले...फक्त एकाने केले नाही..तो होता इब्लिस (शैतान)...तो एक जिन्न होता...

तो म्हणाला, "मी का प्रणाम करू?..मी आगीने बनलो आहे आणि हा फक्त मातीने बनला आहे..मी याला प्रणाम करणार नाही"

अल्लाह इब्लीस वर रागावला आणि त्याला स्वर्गातून बाहेर केले... इबलीस (शैतान/लूसिफर/evil) ने तिथून जाताना प्रण केला की, "तो संपूर्ण मनुष्य जातीशी प्रलय (महाविनाश) (कयामत) येईपर्यंत बदला घेईल"

अल्लाहने म्हटले की, "चांगले मनुष्य तुझे ऐकणार नाहीत.."

अल्लाहने आदम अ. यांना  स्वर्गात राहायला परवानगी दिली.

आणि त्यांना सांगितले की, "तुला जे आनंद देईल ते तू कर..कोणतेही फळ खा...आणि जे तुला आवडेल ते तू पी... तू  स्वर्गातले प्रत्येक फळ खावू शकतो, फक्त एका झाडाचे फळ तू खायचे नाही.."

आदम अ. यांनी सर्व मजा केली...आनंद घेतला...पण लवकरच त्यांना एकटेपणा जाणवू लागला..त्यांना मित्र नव्हते...म्हणून त्यांनी अल्लाहला म्हटले, "कृपा करून मला एक सोबती दे". अल्लाहने त्यांच्या बरगडीच्या (rib) हाडापासून, एक स्त्री बनविली आणि त्यांना एक पत्नी दिली... हव्वा अ. (एव्ह).

इबलीस चालाक होता..त्याने विचार करण्यास सुरू केला की, आदम अ. यांना अल्लाहची अवज्ञा करण्यास कसे भाग पाडावे... 

एक दिवस आदम अ. आणि हव्वा अ. (अडम आणि एव्ह) स्वर्गात असताना, तो त्यांच्या कानात फुसफुसला की (बोलला) की, ज्या झाडाचे फळ खाण्यासाठी तुला मना केलेले आहे, ते फळ  छान आहे..तू जर ते खाशील तर तू नेहमीसाठी जिवंत राहशील...त्यांना मोह झाला...दोंघांनी इबलिस चे ऐकून त्या झाडाकडे जावून ते फळ  खाल्ले.... ते फळ खाताच, त्यांना याची जाणीव झाली की, त्यांनी खूप मोठी चूक केली आहे...त्यांना लाज वाटली...कारण त्यांचे काही अंग हे दिसू लागले होते...झाडाच्या पानांमध्ये ते दोघे स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करू लागले...पण अल्लाहला सर्व माहीत होते आणि तो सर्वीकडे असतो... अल्लाह त्यांच्यावर खूप रागावला,..." मी तुला चेतावणी दिली होती...की त्या मना केलेल्या झाडाचे फळ खावू नको...पण तू माझी आज्ञा पाळली नाही.... आता तुझी जागा धरतीवर  आहे...स्वर्गात नाही"...
अल्लाहने दोघांना स्वर्ग सोडून धरतीवर जाण्यास सांगितले.. त्या दोंघांनी ही एक चूक केली होती..पण त्यांना अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती... त्यांना त्याचा खूप पश्र्चाताप  होत होता..त्यांनी अल्लाहकडून काही माफी मागण्याचे शब्द शिकून घेतले... ते खूप रडले आणि त्यांनी अल्लाहकडून माफी मागितली...शेवटी अल्लाहला त्यांच्यावर दया आली...अल्लाहने म्हटले की जर तुम्ही चांगले काम (कर्म) केले आणि माझी आज्ञा पाळली, तर मी तुम्हाला वापस  स्वर्गात, जी एक सुंदर बाग आहे, बोलावेन...पण तुमच्या मृत्यूनंतर...पण जर चांगले काम (कर्म) केले नाही आणि आज्ञा पाळली नाही तर मृत्यूनंतर खूप भयानक नरकात जावे लागेल....

ही घटना साधारणतः 6000 वर्षांपूर्वीची आहे...आदम अ. यांना श्रीलंकेतील एका डोंगरावर उतरविण्यात आले आणि हव्वा अ. यांना अराफात या डोंगरावर उतरविण्यात आले...
( Search Wikipedia)

आदम अ. आणि हव्वा अ. यांनी त्यांचे उरलेले जीवन धरतीवर चांगले काम (कर्म) करण्यात आणि अल्लाहची आज्ञा पाळण्यात घालविले...त्यांना आशा होती की, ते पुन्हा अल्लाहला आनंदी करून त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गात जातील.....

त्यांना खूप मुले आणि नातवंड झाली...सर्व मानवजात त्यांची पिढी आहे...त्यामुळे आदम अ. यांना father of  human race   हव्वा अ. यांना mother of human race म्हंटले जाते....

आदम अ. आणि हव्वा अ. धरतीवर राहायला आले...जग खूप मोठे होते...अल्लाहला वाटत होते की जग माणसांनी भरून जावे...

त्याला प्रत्येक जागी...सर्वात थंड ठिकाणी आणि सर्वात गरम ठिकाणी, वाळवंटात, जंगलात आणि डोंगरावर मनुष्य हवा होता...त्यामुळे अल्लाहनेे आदम अ. आणि हव्वा अ. यांना असा आशीर्वाद दिला, ज्यामुळे त्यांना खूप दिवसांपर्यंत, रोज दोन मुले होत होतीे, एक मुलगा आणि एक मुलगी..त्यांना खूप खूप मुले झाली, मुले आणि मुली...लवकरच मानवजात पूर्ण धरतीवर पसरली...एकच माता आणि पित्याचे, आदम अ. आणि हव्वा अ. यांची सगळी मुले होती...पांढरे, काळे आणि पिवळे (wheatish) त्वचेचे चे लोक झाले...

आदम अ. आणि हव्वा अ. यांची दोन मुले हाबिल (अबेल) आणि काबील (केन) ह्या दोघांना, एकाच मुलीशी लग्न करायची इच्छा होती, जी खूप सुंदर होती...त्यांना माहीत नव्हते की, कसे ठरवावे की दोघांपैकी कोण लग्न करू शकेन?...म्हणून आदम अ. यांनी, त्यापैकी प्रत्येकाला अल्लाहला  मेंढी अर्पण करण्यासाठी सांगितले...ज्याची अर्पण केलेली मेंढी अल्लाह स्वीकार करेल, तो त्या मुलीशी लग्न करेल...

हाबिल ज्याचा हेतू चांगला होता, त्याने एक चांगली मेंढी, अल्लाहला अर्पण करण्यासाठी निवडली.. काबीलने चांगली त्याच्या स्वतःसाठी ठेवली आणि थोडी अशक्त अर्पण केली...
अल्लाहने स्वाभाविकपणे हाबीलची अर्पण केलेली मेंढी स्वीकार केली...एक आग येऊन त्या मेंढीला घेऊन गेली...याचा अर्थ हाबीलला त्या मुलीशी लग्न करण्यासाठी अल्लाहची परवानगी होती...

काबील यावर खूप रागावला आणि बोलला की काहीही झाले तरी, तोच तिच्याशी लग्न करेन... हाबील ने लढण्यास नकार दिला...पण काबील उग्र होता. त्याने त्याच्या भावाला एका दगडाने मारले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला...

ही पहिली वेळ होती, ज्यात कुणी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा वध केला होता...त्यामुळे हाबीलला मारल्यानंतर, काबील अतिशय घाबरला...त्याला मृत शरीराचे काय करावे, ते कळत नव्हते..त्याने ते मृत शरीर खांद्यावर घेतले आणि अवती भोवती असहाय्यतेने भटकू लागला...

अल्लाहने, दोन कावळे पाठविले, जे काबीलच्या समोर लढले आणि एक मारला गेला...दुसऱ्याने जमिनीत एक खड्डा केला आणि ते मेलेल्या  कावळ्याचे शरीर त्या खड्डयात ओढले आणि मातीने झाकले...

हे पाहून काबील ने, इतकेही माहीत नाही, जितके त्या कावळ्यालाही माहीत आहे...म्हणून स्वतःला दोष दिला...मग त्याने जमिनीत खोदून त्याच्या भावाला हाबीलला त्यात गाडले (दफन केले).

आजपर्यंत, जर कोणी त्याच्या भावाला मारतो (कारण आपण सगळे एकाच मातापित्याची मुले आहोत) तर, नेहमी दोष पहिल्या मारेकऱ्याला जातो ज्याने एक वाईट उदाहरण प्रस्तुत केले....



08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...