रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

कुरआन च्या बोधकथा..2 इब्राहीम अ..एक संदेशवाहक..

 🌼🌼🌿🌿इब्राहीम अ...🌿🌿🌼🌼


खूप खूप वर्षांपूर्वी, साधारणतः 2215 BC मध्ये म्हणजेच अंदाजे 4000 वर्षांपूर्वी, इराकमध्ये (बेबीलोन मध्ये जे आता पुरातन शहर आहे), एका माणसाला ज्याचे नाव अझर होते, जो लाकडाच्या प्रतिमा कोरून बनवत होता, त्याला एक मुलगा झाला...इब्राहीम अ....

त्या दिवसात लोक, लाकडाच्या आणि दगडांच्या प्रतिमांची आराधना करत होते...ते असाही विश्वास ठेवत होते की, तारे मनुष्याच्या भाग्यावर नियंत्रण ठेवतात...

जस जसे इब्राहीम अ. मोठे होऊ लागले, त्यांना जाणीव होऊ लागली की, मनुष्याने बनविलेल्या प्रतिमा कुणालाच मदत करत नाहीत...त्यांची आराधना करून काही उपयोग नाही..त्या प्रतिमा एकदुसऱ्यांनाही मदत करू शकत नाहीत...

इब्राहीम हे एक चांगले, हुशार आणि ज्ञानी व्यक्ती होते...ज्यांना अल्लाहने, त्याचा संदेशवाहक म्हणून निवडले...प्रतिमांची आराधना करण्याऐवजी इब्राहीम अ. यांनी, एका आणि फक्त एका अल्लाहवर विश्वास ठेवला...

त्यांनी त्यांच्या वडिलांना आणि सर्व दुसऱ्या लोकांना प्रतिमांची आराधना करण्यास थांबवले..."ज्यांना तुम्ही स्वतः बनविले त्यांची तुम्ही आराधना कशी करू शकता?..." इब्राहीम अ. यांनी त्यांना विचारले," या प्रतिमा तुम्हाला कशी मदत करू शकतात?..." 

पण त्याचे वडील,अझर रागावले आणि म्हणाले, "इब्राहीम मी तुला चेतावणी देतो की, मी तुला मरेपर्यंत दगडांनी मारेन, जर तू हा मूर्खपणा थांबवला नाहीस.."

यामुळे इब्राहिम अ. उदास झाले...पण ते म्हणाले की, अल्लाह तुम्हाला आर्शिवाद देवो...मी अल्लाहला प्रार्थना करेन की, तो तुमच्यासाठी दयाळू राहो..."

इब्राहीम अ. यांची ही सुद्धा इच्छा होती की, लोकांनी ताऱ्यांवर, त्यांच्या ईश्वरासारखा विश्वास ठेवणे थांबवावे...एका रात्री जेव्हा ते आकाशात ताऱ्यांची चमक पाहत होते...

ते लोकांना म्हंटले, "मी सर्वात तेजस्वी ताऱ्याची आराधना करेन..."

ते लोक, हा विचार करून थोडे आनंदी झाले की, शेवटी इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या श्रद्धेवर अनुसरण करण्यास सुरुवात केली...पण जेव्हा, तो तारा मंद झाला आणि चंद्र आला, इब्राहीम अ. म्हणाले,

"ओह...मी त्या ताऱ्याची आराधना करू शकत नाही, जो मंद आहे...मी चंद्राची आराधना करेन..."

पुन्हा जेव्हा चंद्र मावळला आणि तेजस्वी सूर्य उगवला...इब्राहीम अ. म्हणाले, "ओह, हा सूर्य चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे...मी याला ईश्वर बनवतो..." पण जेव्हा सूर्यास्त झाला आणि सूर्य दिसेनासा झाला...इब्राहीम अ. लोकांकडे येऊन बोलले, "लोकहो, जर मला माझ्या अल्लाहने, योग्य रस्ता दाखवला नसता, तर मी भलतीकडेच भटकलो असतो.."

मी अल्लाहला सोडून कुणावरही विश्वास करणार नाही...एक आणि फक्त एक अल्लाह ज्याने ह्या पृथ्वीवरची आणि आकाशातली प्रत्येक गोष्ट बनविली...

इब्राहीम अ. यांच्याशी लोक वाद करत राहिले आणि त्यांच्या प्रतिमांची भीती दाखवत राहिले.

इब्राहीम अ. म्हणाले, "मी तुमच्या प्रतिमांच्या आराध्याला का घाबरु?, जर तुम्ही एक आणि फक्त एक खऱ्या अल्लाहला घाबरत नाही?"

मी तुमच्या पैकी एक नाही...मी एकटा अल्लाहकडे वळेल...जो स्वर्गाचा आणि धरतीचा प्रभु आहे...

तरीही लोकांनी मनुष्याने बनविलेल्या प्रतिमांची आराधना करने चालू ठेवले...

एकदा इब्राहीम अ. यांनी शांतपणेे सांगितले, "मी तुमच्या प्रतिमांबरोबर एक पेच करणार आहे...हे यासाठी, कारण मला माहीत आहे, या प्रतिमा कुणालाच मदत आणि नुकसान करू शकत नाही..."

एक दिवस, जेव्हा शहराचा प्रत्येक जण, एका मोठ्या धार्मिक उत्सवासाठी गेला होता, इब्राहीम अ. यांनी आजारी असल्याचे ढोंग केले आणि मागे राहिला...

ते सर्व लोक गेल्यावर, इब्राहीम अ. त्यांच्या मोठ्या आराधनेच्या ठिकाणी गेले, जेथे शंभर प्रतिमा ठेवल्या होत्या...त्या ठिकाणी सर्व प्रकारची फळे आणि मिठाई लोकांनी त्या प्रतिमांसाठी ठेवली होती...इब्राहीम अ. यांनी प्रतिमांना विचारले, "तुम्ही या हव्या हव्याशा वस्तू, ज्या तुमच्यासाठी ठेवल्या आहेत, का खात नाहीत?...जेव्हा लाकडाच्या आणि दगडाच्या पुतळ्यानी उत्तर दिले नाही, त्याने विचारले, "तुम्ही का बोलत नाही?" मग त्याने एक गज घेतला आणि त्यांना आकारहीन केले...फक्त एका मोठ्या प्रतिमेला तसेच ठेवले...जी सर्व कहाणी लोकांना सांगेल...

जेव्हा लोक उत्सवातून, त्या जागी वापस आले आणि तुटलेले पुतळे पाहिले, ते खूप रागावले...

"हे इब्राहिम शिवाय कोणीच करू शकत नाही.." ते म्हंटले...

लगेच शहरातील सर्व लोक जमा झाले...त्यांनी इब्राहीम अ. यांना बोलावले आणि विचारले की, त्यांनी, त्यांच्या पुतळ्यांच्या प्रतिमांशी काय केले...

इब्राहीम अ.बोलले, "तुमच्या सर्वात मोठ्या पुतळ्याने, बाकी पुतळ्यांना असे केले...तुमच्याच मोठ्या प्रतिमेने हे केले...तुम्ही विचारा...म्हणजे जर ती बोलत असेल तर .."

अर्थात, पुतळे बोलत नाहीत...त्यामुळे ते स्तब्ध राहिले आणि बोलले, "इब्राहीम, तुला चांगले माहीत आहे की, हे पुतळे बोलत नाहीत..."

"मग तुम्ही त्यांची आराधना का करता?" इब्राहीम अ. यांनी विचारले...."ह्या तुम्हाला काहीच कामाच्या नाहीत...तुम्ही का विचार करत नाही आणि समजून घेत नाही...हे पुतळे तुम्ही स्वतः बनविले...तुम्ही अशा मृत लोकांची पुतळा बनवून आराधना का करता?"

पण ते लोक समजून घेण्यास तयारच नव्हते...

नमरुद हा इराकचा म्हणजेच बेबिलोन चा राजा होता, जो स्वतःला ईश्वर समजत होता...त्यानेहीे इब्राहीम अ. विषयी ऐकले. त्याने इब्राहीम अ. यांना, त्याच्या दरबारात बोलावले आणि त्याला विचारले की, तो नमरुदला ईश्वर का मानत नाही?

इब्राहीम अ. एक धैर्यवान तरुण होते, जे अल्लाहशिवाय कुणालाही भीत नव्हते...त्यांनी उत्तर दिले, "कारण तुम्ही एक मनुष्य आहात, जसे आमच्या पैकी प्रत्येक जण आहे...आणि पुतळ्यांविषयी म्हणाल तर ते मुके, बहिरे आणि आंधळे आहेत, तर मग ते ईश्वर कसे असू शकतील?"

नमरूद खूप रागावला आणि विचारले,
"तुझा अल्लाह काय करू शकतो, जे मी करू शकत नाही?"
इब्राहीम अ. बोलले, "अल्लाह जीवन देतो आणि जीव घेतो"

नमरुद म्हणाला, "मीही हे करू शकतो...मी कैद्याला फाशी (मृत्युदंड) देतो आणि ज्याला मृत्यूची शिक्षा दिली आहे त्याला जीवनदान देतो..."

मग इब्राहीम अ. म्हणाले, "अल्लाह सूर्य पूर्वेतून उदय करतो आणि पश्चिमेस अस्त करतो...तुम्ही सूर्य पश्चिमेतून उदय करून दाखवू शकता का?"

नमरुद गोंधळलेला होता...त्याला कळलेच नाही, की काय बोलावे...पण तो एक क्रूर आणि गर्विष्ठ राजा होता, त्याने आज्ञा दिली की, इब्राहीम अ. यांना एका मोठ्या आगीत फेकून देण्यात यावे...राजाच्या लोकांनी एक मोठी आग लावली आणि इब्राहीम अ. यांना त्यात फेकले...

इब्राहीम अ. यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अल्लाहची प्रार्थना केली...अल्लाहने इब्राहीम अ. यांच्यावर खूप प्रेमाने आशीर्वाद दिला आणि आज्ञा केली, "हे आग !...शांत होऊन जा आणि इब्राहीमला वाचवून आशीर्वाद दे." त्याच्या भोवतालची आग शांत झाली...प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आणि इब्राहीम अ. सुखरूप बाहेर आले....


पवित्र कुराणमध्ये खूप ठिकाणी अल्लाह ने, मुहम्मद स. अ. व. यांना इब्राहीम अ. च्या श्रद्धेच्या रस्त्यावर चालण्यास सांगितले, कारण इब्राहीम अ. अल्लाहवर खरा विश्वास ठेवणारे आणि अल्लाहचे मित्र होता...

नमरुदच्या क्रूरपना नंतर,जो इराकचा राजा होता, ज्याने इब्राहीम अ. यांना, जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.. इब्राहीम अ. यांनी, इराक सोडले आणि ते पॅलेस्टाईन (फिलिस्तीन) मध्ये गेले आणि नंतर इजिप्त (मिस्र) मध्ये गेले...त्यांची पत्नी सारा, जी त्याच्या जवळच्या नात्यातली होती आणि त्यांचा पुतण्या, लू अ. त्यांच्यासोबत होते... लूत अ. हे खरी श्रद्धा मानणारे आणि विश्वास ठेवणारे होते...काही दिवसांनी ते ही, अल्लाह चे संदेशवाहक बनले...

जेव्हा ते इजिप्तला गेले, लोकांनी त्यांना इजिप्त (मिस्र) च्या राजा विषयी सांगितले. 
इजिप्त च्या राजाला फिरौंन (pharaoh,फैरो म्हंटले जायचे. 
फिरौंन (pharaoh,फैरो) खूप कपटाचारी आणि दुष्ट राजा होता...जर त्याने एका सुंदर स्त्रीला पाहिले, तर तो त्याच्या माणसांना म्हणायचा, तिला उचला आणि राजवाड्यात घेऊन या...जर ते जबरदस्तीने केले, तरी चालेल...

इब्राहीम अ. यांची पत्नी "सारा" सुंदर स्त्री होती..त्यामुळे फिरौंनच्या लोकांनी तिला राजाकडे घेऊन गेले...एक सद्गुणी आणि निष्ठावंत स्त्री असल्याने, तिने अल्लाहकडे मदत                                   मागितली...अल्लाहने तिच्या प्रार्थनेचे उत्तर दिले... फिरौंन तिला काहीच इजा पोहोचवू शकला नाही, स्पर्श करू शकला नाही..त्याचा हात एकाच जागी कडक, स्थिर झाला....तो हैराण झाला..

तिला राजाच्या वाईट हेतूपासून, अल्लाहने संरक्षण दिले होते...आणि वाचवले होते...फिरौंनने जाणले की, सारा एक सद्गुणी स्त्री आहे आणि कोणत्या तरी अज्ञात शक्ती (अल्लाह) तिला वाचवत आहे...

आता तो इतका भयभीत झाला की, त्याने साराला मोकळे केले आणि तिच्यासोबत आणखी एक सद्गुणी मुलगी जिचे नाव हाजरा होते, पाठविली आणि त्यांना सन्मानाने पाठविले.

नंतर इब्राहीम अ. यांनी हाजराशी लग्न केले... इब्राहीम अ. हे आता वयस्कर झाले होते आणि त्यांना मूल नव्हते...त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांना एक वारस (एक मुलगा) मिळावा...अल्लाहने या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि त्यांना हाजरा पासून एक मुलगा दिला, इस्माईल अ.

जेव्हा हाजरा ने इस्माईल अ. यांना जन्म दिला, इब्राहीम अ. ची पहिली पत्नी, सारा नाराज झाली कारण तिला तिचे स्वतःचे मूल नव्हते...
त्यामुळे अल्लाहने इब्राहीम अ. यांना आज्ञा केली की, 'हाजरा आणि तिचा मुलगा इस्माईल अ. यांना घेऊन, एका वाळवंटाच्या ठिकाणी घेऊन जा आणि तेथे सोडून वापस ये..'

इब्राहीम अ. यांना ही आज्ञा पाळणे, खूप अवघड होते...इतक्या वर्षांनी जो मुलगा जन्माला आला, आणि ज्याच्यासाठी खूप तीव्र इच्छा आणि प्रार्थना करावी लागली, त्याला आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीला हाजराला सोडून येणे, इब्राहीम अ. यांना खूप कठीण होते...

पण ते अल्लाह ची खरी श्रध्दा करणारे होते...त्यांनी कोणताही संकोच न बाळगता, ती आज्ञा पाळली...

अल्लाह च्या हुकुमाप्रमाने ते हाजरा आणि इस्माईल अ. यांना, घेऊन एका वाळवंटाच्या ठिकाणी गेले...रस्त्यात हाजरा ने त्याला विचारले, "तुम्ही आम्हाला कोठे आणि का घेऊन जात आहात?"
इब्राहीम अ. शांत राहिले आणि काहीही उत्तर दिले नाही...
हाजरा समजली आणि तिने विचारले, "ही अल्लाह ची इच्छा आहे का?"

"हो,असेच आहे" इब्राहीम अ. यांनी उत्तर दिले...

"मग मी प्रश्न विचारणार नाही आणि मला कशाचीच भीती नाही..निश्चितपने अल्लाह आमचे संरक्षण करेल", हाजरा म्हणाली...हाजरा एक धैर्यंवान आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होती...

इब्राहीम अ. त्यांना निर्मनुष्य जागी घेऊन गेले...जेथे पाणी नव्हते आणि मैलपर्यन्त झाड नव्हते...आणि त्यांना तेथे सोडले...ही जागा "मक्का" होती...

जेव्हा त्यांनी हाजरा आणि इस्माईल अ. यांना निर्जन ठिकाणी एकटे सोडले, त्यांना खूप वाईट वाटले...तो त्यांच्यासाठी खूप मोठा त्याग होता...पण इब्राहीम अ. लटपटले नाही आणि कमजोर पडले नाही...

ते त्यांना सोडून वापस, थोडे दूर गेले...जेव्हा, ते दोघे  इब्राहीम अ. यांना दिसेनासे झाले, तेव्हा ते थांबले आणि चेहरा तिकडे करून अल्लाहला कळकळीने प्रार्थना केली, " 'ओ अल्लाह', तुझ्या इच्छेप्रमाणे, मी माझ्या वारसाला वाळवंटाच्या ठिकाणी सोडून जात आहे... 'ओ अल्लाह'...मी त्यांना सोडले जेणेकरून, ते तुला इथे प्रार्थना करत राहतील. कृपा करून त्यांचे रक्षण कर... लोकांनी त्यांच्याकडे येऊन, त्यांना तुझ्या धरतीतून अन्न पुरवठा करू दे, जेणेकरून ते नेहमी तुझे आभारी राहतील"

असे म्हणून इब्राहीम अ. वळले आणि त्यांना अल्लाहच्या दयाळूतेवर विश्वास करून, सोडून गेले....

अल्लाह इब्राहीम अ. यांच्या निष्ठेवर इतका प्रसन्न झाला की, अल्लाहने इस्माईल अ. आणि हाजरा चे फक्त संरक्षणच केले नाही, तर वचनही दिले की, त्यांच्या नंतरच्या वंशजांची भरभराट होईल...

इकडे हाजरा दोन शुष्क डोंगराच्या मधील वाळवंटात होती...डोंगराचे नाव "सफा" आणि "मरवा" होते...तिला काय करावे काही कळत नव्हते...जेव्हा बाळ प्रखर उष्णतेने, तहान लागल्यामुळे रडायचे, तेव्हा तिचे हृदय बाळासाठी दुखायचे...पण ती काय करू शकत होती...तेथे पाणी नव्हते, अन्न नव्हते, छत नव्हते आणि कोणीच दिसत नव्हते...ती एक माता होती...ती कसे बसून तिच्या बाळाला मरतांना पाहू शकत होती....

ती सफा डोंगरावर हे पाहण्यासाठी चढली की, त्या दिशेला, कोणी मदतीसाठी दिसते का? पण सगळे वाळवंट होते...मग ती पळत वापस आली तिच्या तहानलेल्या बाळाला पाहण्यासाठी.... 

पुन्हा ती दुसऱ्या डोंगरावर " मरवा " वर पळाली... त्या दिशेला कोणी दिसते का, ज्याला ती मदतीसाठी विचारू शकते....पण तिथे कोणीच नव्हते..

स्वतःला त्रास घेऊन, हाजरा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर मदतीसाठी पळत राहिली...प्रत्येक वेळेस वापस येताना, तिच्या तहानलेल्या आणि भुकेल्या बाळाला पाहत होती...असे वरखाली आणि एका डोंगरावरून, दुसऱ्या डोंगरावर जावून आणि परत परत जावून, सात चकरा झाल्यावर ती, अल्लाहची इच्छा, असे स्वीकार करून, अल्लाहच्या इच्छेला शरण गेली, आणि थकून बसली...

आणि मग...अल्लाहने त्याची दयाळूता दाखविली....चमत्कारिकरित्या..एक पाण्याचा फवारा (झरा), बाळाच्या जवळ वाहू लागला...

त्यालाच आज जमजम म्हणतात..."आब ए जमजम" (जमजम चे पाणी) हे पाणी खूप ताजेतवाने करणारे, उपचार करणारे, जखम भरणारे आणि उत्साहवर्धक म्हणजेच शक्ती देणारे समजले जाते...आजही जे "हज" आणि "उमरा" साठी पूर्ण जगातून "मक्का" येथे जातात,अशा लाखो मनुष्यांसाठी, जमजम चे पाणी उफाळून पुढे येते...

हाजराला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.. तिचे हृदय आनंदाने भरले...दोघांना, तिला आणि तिच्या बाळाला अल्लाहने वाचविले...

अल्लाहला हाजराची श्रद्धा आणि धैर्य इतके आवडले की, अल्लाहने या दिवसापासून "लाखो माणसे, पुरुष, स्त्रिया, मुले, याच धर्मनिष्ठ स्त्रीने, हाजराने चाललेल्या रस्त्यावर पुन्हा पावले टाकतील...जेव्हा ते सफा आणि मरवाच्या दरम्यान, "हज "च्या अवधीत चालतील" असा आशीर्वाद दिला..

काही वेळानंतर, एक उंटाच्या गाड्या असलेला तांडवने (काफिला) या वाळवंटातून जात असताना, ते झऱ्याचे पाणी पाहिले आणि तेथे थांबून,                           हाजराला, तात्पुरता मुक्काम करण्याची परवानगी मागितली...

"हो नक्कीच", तिने उत्तर दिले..."पण या पाण्यावर तुमचा अधिकार करू नका..ते प्रत्येकासाठी मोफत असेल..."ते लोक मानले...आणि ते तिथे काही दिवस पाण्यासाठी राहिले...
(पाणी शोधणे हे सौदी अरेबिया मध्ये खूप कठीण होते. जिथे कुठे पाणी असायचे...लोक आजूबाजूला त्यांची घरे बनवायचे...) 

अशा प्रकारे मक्का एक व्यस्त वस्ती बनले..आणि इब्राहीम अ. यांनी अल्लाहला जी प्रार्थना केली होती की, 'त्याच्या पत्नी आणि त्याच्या वारसाचे रक्षण कर...आणि लोकांना त्यांच्याकडे येऊ दे..' त्या प्रार्थनेचे अल्लाहकडून उत्तर मिळाले...

हाजरा आणि इस्माईल अ. तिथेच राहिले, जेथे इब्राहीम अ. त्यांना सोडून गेले होते..इब्राहीम अ. त्यांच्या या कुटुंबाला, कधी कधी येऊन भेटायचे...

जेव्हा इस्माईल अ. मोठे झाले...इब्राहीम अ. यांनी एक स्वप्न पाहिले...अल्लाह त्याच्या मुलाची, इस्माईल अ. यांची, आहुती देण्याची आज्ञा करत आहे...

इब्राहीम अ. खूप घाबरले आणि जागे झाले...पण त्यांना, तीन रात्री तेच स्वप्न पडले...त्यांना खात्री झाली की, ही अल्लाह ची आज्ञा आहे...आणि त्यांना, त्या आज्ञेसाठी झुकले पाहिजे...

ही इब्राहिम अ. साठी अत्यंत कडक परीक्षा होती...जे आता एक वृद्ध मनुष्य होते...ते त्यांच्या जिवलग मुलाचा आहुती कसा देऊ शकणार होते?...पण त्यांनी, स्वतःच आठवण केली की, ते अल्लाहचे, संदेशवाहक आहे...आणि आज्ञा न पाळण्याचा, ते कधीही विचार करू शकत नाही...

त्यामुळे ते इस्माईल अ. कडे गेला..आणि त्यांना त्यांच्यासोबत चलण्यास सांगितले...

जेव्हा ते, इस्माईल अ. यांना सूनसान जागी घेऊन जात होता, इस्माईल अ. यांनी, त्यांच्या वडिलांना विचारले की, ते कोठे जात आहेत?...

इब्राहीम अ. यांनी त्यांच्या स्वप्नाविषयी, इस्माईल अ. यांना सांगितले...इस्माईल अ. हे, त्यांच्या अल्लाहनिष्ठ, वडिलांचे, एक शूर पुत्र होते...घाबरून न जाता किंवा विचलित न होता ते म्हणाले, "बाबा...जर ही अल्लाहची इच्छा आहे तर करा...मी आहुतीसाठी तयार आहे..तुम्ही मला अल्लाहच्या इच्छेशी शरणागत (नम्र) पाहाल..."

मग इब्राहीम अ. यांनी, स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जेणेकरून, ते जे काही करणार आहे, ते त्यांना पाहता येऊ नये. 
काही वेळानंतर, लगेच अल्लाह त्याच्याशी बोलला, "इब्राहीम खरंच...मी त्यांना पारितोषिक देतो, जे योग्य करतात..ही एक परीक्षा होती...मी तुझी आहुती स्वीकार केली आहे...आणि इस्माईल अ. च्या जागी एक कोकरू आहुती झाले होते...आणि इस्माईल अ. जिवंत होते...

अल्लाहने त्याच्या वचनावर खरे राहून, इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांना आशीर्वाद दिला की, येणाऱ्या पिढ्यां त्यांची आठवण करतील...

या दिवसापासून प्रत्येक मनुष्य जेव्हा "हज" साठी जातो, तेव्हा त्यांच्या आहुतीची आठवण करतो...प्रत्येक वर्षी "ईद उल अजहा" ला म्हणजेच "बकरीद ईद" ला प्रत्येक अनुयायी, त्यांच्या ऐपतीनुसार इब्राहीम अ. च्या आहुतीच्या स्मृतीत एक बकरा बळी देतो...

त्यानंतर अल्लाहची आज्ञा पाळून इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांनी अल्लाहचे घर बनविले..."काबा" जेथे लोक प्रार्थना करू शकतील...

जसे इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. अल्लाहच्या घराचा पाया उंच करत होते...ते प्रार्थना करत होते..."हे अल्लाह...ही सेवा स्वीकार कर...आणि आम्हाला तुझ्या इच्छेसाठी आज्ञाधारक बनव...आणि तुझ्या कृपेवर अवलंबून राहू दे, कारण तू खूप दयाळू आहेस..."

इब्राहीम अ. यांनी अशीही प्रार्थना केली की, ही जागा एक शांतीचे शहर बनू दे...त्यांनी त्यांच्या मुलाला अल्लाहच्या श्रद्धेसमोर झुकण्यास सांगितले...आणि अल्लाहपासून कधीही दूर न जाण्यास सांगितले...

मुहम्मद(स.अ.व.) हे त्यांच्याच पिढीतील वंशज आहेत....

अल्लाह त्याच्या संदेशवाहकाला, इब्राहीम अ. यांना, इतके प्रेम करत होता की, त्याने नंतर मुहम्मद (peace be upon him) यांना, जे शेवटचे संदेशवाहक होते, इब्राहीम अ. यांच्या श्रध्देच्या रस्त्यावर चालण्यास सांगितले....

आज जेव्हा पूर्ण जगातून, लाखो मनुष्य "काबा" ला जातात, ते तिचं प्रार्थना म्हणतात जी, मुहम्मद (peace be upon him) ने शिकविली आहे.. आणि तवाफ ("काबा" ला सात चक्कर मारणे) करतात...अशाप्रकारे "इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांची अल्लाहच्या इच्छेशी अधीनता " याची आठवण करने, लोकांनी चालू ठेवले आहे..

काबा च्या समोर एक स्थान आहे... "मुकाम ए इब्राहीम", जेथे दगडावर इब्राहीम अ. यांच्या पायाचे निशाण दिसतात..हे लोकांकडून शतकांपासून संरक्षित केले गेले आहे...येथे प्रत्येक मनुष्य अल्लाहला एक खास प्रार्थना म्हणतो....आणि या अल्लाहच्या प्रिय संदेशवाहकांना ज्यांनी काबा बांधला, त्यांना सलाम पाठवतात...


इब्राहीम अ. जेव्हा, हाजराला वाळवंटात सोडून सारा कडे आले... सारा नाराज होती..तिला स्वतःचे मूल नव्हते म्हणून...

काही वर्षांनंतर अल्लाहने इब्राहीम अ. यांच्याकडे, फरिश्ते (स्वर्गदूत / angle) पाठविले...त्यांना, हे सांगण्यासाठी की, एक चांगली बातमी आहे की, इब्राहीम अ. यांना, अजून एक मुलगा होईल...हे फरिश्ते मनुष्याच्या रुपात आले होते...इब्राहीम अ. यांना, आशिर्वादासह शुभेच्छा देण्यासाठी आले होते...

इब्राहीम अ. यांनीे त्यांच्या शुभेच्छा वापस केल्या.. फरिश्ते नम्रतेने त्याला म्हणाले, "आम्ही तुझ्यासाठी चांगली बातमी आणली आहे ..एक हुशार आणि बुद्धिमान मुला विषयी..."इसाक" अ. आणि त्यानंतर त्याच्या पुढची पिढी... याकूब अ.(इस्राइल)... ही अल्लाहची इच्छा आहे की तुला सारा पासून एक मुलगा होईल...

इब्राहीम अ. यांची पत्नी सारा तेथे उभी होती...ती खूप आश्चर्यचकित झाली...आणि तिने विचारले, "पण हे कसे शक्य आहे? मी एक वृद्ध स्त्री आहे आणि माझे पती ही खूप वृद्ध आहेत...आम्हाला मूल कसे होऊ शकते?"...

फरिश्ते उत्तरले, "अल्लाह च्या इच्छेवर तुम्ही आश्चर्य करत आहात का?अल्लाह निश्चितच सर्वात मोठा आहे आणि जे काही तो इच्छा करतो, ते तो करू शकतो... तुमच्यावर त्याचे आशीर्वाद असो... आशा सोडू नका..."

"नाही, मी आशा सोडणार नाही..जे लोक श्रद्धा करत नाहीत ते आशा सोडतात..." इब्राहीम अ. म्हंटले...

अशा प्रकारे अल्लाहने वचन दिल्याप्रमाणे सारा ला एक मुलगा झाला...इसाक अ...जो मोठा झाल्यावर एक संदेशवाहक बनला...आणि त्यानंतर त्यांचा मुलगा याकूब अ. आणि मग त्याचा मुलगा युसुफ अ...ही संदेशवाहक बनले...

अशाप्रकारे इब्राहीम अ. यांनी, जी प्रार्थना केली होती की त्यांना चांगले आणि सद्गुणी मुले आणि वंशज होऊ दे...ती अल्लाहने पूर्ण केली...त्यांची दोन्ही मुले इस्माईल अ. आणि इसाक अ. आणि त्यांचे वंशज ही संदेशवाहक बनले...त्यामुळे इब्राहीम अ. यांना "संदेश वाहकांचा पिता" म्हंटले जाते...


एक दिवस उत्सुकतेने इब्राहीम अ. यांनी अल्लाहला विचारून, हे दाखविण्यास सांगितले की, अल्लाह, "न्याय करण्याच्या दिवशी"...मृत झालेल्यांना जिवंत कसे करेल?

अल्लाहने विचारले, "इब्राहीम, तुला विश्वास नाही का?"

"मला खरंच विश्वास आहे", इब्राहीम अ. म्हणाले, "पण मला स्वतःला संतुष्ट करण्यासाठी ते पहायचे आहे"...

अल्लाहने मान्य केले...

अल्लाहने इब्राहीम अ. यांना, चार पक्षी पाळण्यास सांगितले...त्यांचे जिबह करून, तुकडे करण्यास सांगितले...आणि ते तुकडे चार डोंगरावर एकमेकांपासून दूर दूर फेकण्यास सांगितले...

मग इब्राहीम अ. यांना, त्या पक्ष्यांना हाक मारण्यास सांगितले...सगळे पक्षी त्यांच्याकडे...त्यांच्या पूर्ण शरीरात वापस आले...

अल्लाहने हा चमत्कार इब्राहीम अ. यांना, त्यांच्यासाठी आणि सर्व मनुष्यांसाठी दाखविला, जेणेकरून प्रत्येक जण समजू शकेल की, जो एक वेळेस जीवन देऊ शकतो...पुन्हा एकदा "न्याय देण्याच्या दिवशी" जीवन देऊ शकतो...

ही कथा कुरआन मध्ये दुसऱ्या धड्यात, "सुरे बकरा" मध्ये वर्णन केलेली आहे...


🍁🍁लूत अ.🍁🍁

लूत अ. हे इब्राहीम अ. यांच्या, भावाचे पुत्र होते, म्हणजेच त्यांचे पुतणे होते...जेव्हा इब्राहीम अ. यांनी त्यांचा देश सोडला होता, तेव्हा लूत अ. हेही त्यांच्या बरोबर होते.. लूत अ. खूप सद्गुणी आणि अल्लाहचा संदेशवाहक होते...

इब्राहीम अ. त्यांच्या देश सोडल्यानंतर, इब्राहीम अ. जेरुसलेमला (पॅलेस्टाईन) गेले. आणि अल्लाह कडून लूत अ. यांना सदूम या ठिकाणी पाठविण्यात आले...जे जॉर्डन च्या पूर्वेत आहे..तेथे राहणाऱ्या पापी आणि वाईट लोकांना, अल्लाह च्या संदेशाची शिकवण देण्यासाठी..

हे लोक प्रत्येक व्यवसायी, जो त्यांच्या रस्त्यात येत होता, त्याला लुटत होते...त्यांना न्याय काय असतो याचे ज्ञान नव्हते...एक दिवस एक प्रवासी त्याची अमानत म्हणजे त्याची कमावलेली संपत्ती... घेऊन जात होता... एका माणसाने त्याच्या कपाळाला एक दगड मारला...आणि त्याला पकडून म्हंटले, "माझ्या दगडाने तुला लागले आहे...तुला जे घडले याची भरपाई द्यावी लागेल.."

प्रवासी खूप रागावला आणि म्हणाला, "तू मूर्ख आहेस का? तू कशाविषयी बोलत आहे...तू मला मारले..तू मारेकरी आहेस...तुला मला दिले पाहिजे..."

ते दरबारात गेले...पण न्यायाधीशाने मारेकऱ्याच्या कडून निर्णय दिला...ज्याने प्रवाश्याला मारले होते...आणि म्हणाला, "हो, हा बरोबर आहे...याच्या दगडाने तुला मारले... आता तुला याची भरपाई करावी लागेल..."

या अन्यायावर , प्रवासी इतका नाराज झाला की, त्याने एक दगड उचलला आणि न्यायाधीशाच्या डोक्याला मारला...

"बरं.." तो मारल्यानंतर म्हणाला, " आता तुला मला भरपाई द्यावी लागेल...ज्या माणसाला, तू मला भरपाई द्यायला सांगितली होती..त्याला तू भरपाई देऊ शकतो..."

लूत अ. यांनी या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की, ते पाप ने भरलेले जीवन जगत आहेत...पण त्यांनी त्यांची थट्टा उडविली...ते म्हणाले की, "जर तू इतका चांगला आहेस तर तू आमच्यासोबत राहू शकत नाही...येथून चालला जा...आम्ही तुझ्यासारखे का होऊ?"

लूत अ. दुःखी झाले..त्यांनी त्यांच्याकडून अल्लाहचा संदेश देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता...पण लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही...

एक दिवस...तीन फरिश्ते, जे खूप देखणे तरुण दिसत होते.. लूत अ. कडे आणि त्याच्या कुटुंबाकडे आले... लूत अ. म्हणाले, "तुम्ही अनोळखी दिसत आहात...कोण आहात तुम्ही?"

ते त्याला म्हणाले की, ते अल्लाहकडून पाठविण्यात आलेले फरिश्ते आहेत...जे त्या पापी लोकांना, जे ऐकत नाहीत, त्यांना शिक्षा देण्यासाठी आले आहेत...त्यांनी सांगितले की, "पूर्ण शहर नष्ट होणार आहे..." आणि त्यांनी लूत अ. यांना सांगितले की, त्यांच्या कुटुंबाला घेऊन, रात्रीच्या शांततेत, हे शहर सोडून जा..."कोणीच मागे पाहू नका...तुम्हाला सूर्योदय होण्याच्या आधी जो उजेड होतो. म्हणजेच पहाट...त्याआधी ही जागा सोडायची आहे..."

जेव्हा ते बोलत होते, तेव्हा शहरातील सगळे वाईट लोकं आले आणि त्यांनी त्या देखण्या तरुणांना पाहिले, "यांना आम्हाला दे"...ते म्हणाले..."हे तुझे पाहुणे आहेत...नाही का?"

आम्ही तुला म्हटले नव्हते का की, कुणी पाहुणे येऊ देऊ नको... आता त्यांना आमच्या ताब्यात दे...आम्हाला त्यांच्यासोबत हवे ते करण्यासाठी..."

लूत अ. यांनी, त्यांची विनवणी केली..."इतके क्रूर होऊ नका... त्यांच्या पाहुण्यांसमोर इतका वाईट व्यवहार करू नका"...पण त्यांनी ऐकले नाही...आणि जोर देत राहिले...

ते तरुण मुले...निश्चितच अल्लाहचे फरिश्ते होते...आणि त्यांना कुणीच काही करू शकत नव्हते...ते लूत अ. यांना म्हणाले, ' त्यांची काळजी करू नका आणि शांततेने हे शहर सोडून जा...'

त्यामुळे लूत अ. यांनी ते शहर, रात्रीच्या अंधारात, त्याच्या कुटुंबीयासोबत सोडले...पण त्यांच्या पत्नीला सदूमच्या लोकांवर दया आली...तिने अल्लाहची आज्ञा मानली नाही... तिने जातांना मागे वळून पाहिले...आणि ती जे मागे राहीले आणि शिक्षा मिळाली, त्यांच्यामध्ये ती ही होती...ती दगडाची झाली...आजही तो दगड तसाच दिसत आहे.

पहाटे एक खूप भयानक आवाजाने त्या लोकांना पकडले...एक जोरदार कडक आणि भाजलेल्या दगडांचा फवारा होता...

पूर्ण शहर, तेथे राहणाऱ्या लोकांसहित आणि त्याजमिनीत उगवलेल्या प्रत्येकासहित उध्वस्त झाले...

आज इतक्या हजारो वर्षानंतर त्या शहराचा उध्वस्त ढिगारा.. मृत समुद्राच्या जवळ दिसतो...ज्या मृत समुद्रात कुणीही जिवंत राहू शकत नाही...काही लोक विश्वास करतात की, हे ढिगारे आणि समुद्र याची आठवण करून देतात की, अल्लाहचा शाप ज्यामुळे सदूमचे आज्ञा न पाळणारे लोक, नष्ट झाले...तो किती वेदनादायी आहे...

*इब्राहीम अ. आणि लूत अ. हे हिब्रू भाषा बोलत होते व ते अल्लाह ला  यहोवा  (yahweh) या नावाने संबोधित करत होते. मुहम्मद स. अ. व. यांच्यावर कुरआन प्रकट झाल्यानंतरचे अल्लाह हे संबोधन अरबी भाषेत  कुरआनमध्ये आहे.
विश्वाचा निर्माता एकच आहे...भाषा वेगळ्या त्यामुळे संबोधन वेगळे आहे...इस्लाम धर्माचे लोक इब्राहीम अ. आणि मूसा अ. (Moses) यांनाही मानतात आणि ईसा अ.( येशू) यांनाही मानतात, ज्यामुळे अनुक्रमे ज्यू (यहुदी ) आणि ख्रिश्चन धर्म आले. मूसा अ. यांच्यावर तोरात (Torah) आणि ईसा अ. यांच्यावर इंजील (बायबल) हा ग्रंथ प्रकट झाला. तोरात, बायबल आणि कुरआन मध्ये जवळ जवळ सारख्याच पैगंबरांच्या सत्यकथा आणि बोधकथा आहेत...आणि संदेश आहे...पण कुरआन हा मूळ ग्रंथ आहे, ज्यात काहीही बदल झालेला नाही.

कुरआन मध्ये ज्या संदेश वाहकांचे नाव आहे, त्यांच्या कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला दाबा...
www.marathitunislam.wordpress.com

किंवा कुरआन चे मराठी भाषांतर वाचण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा...
https://www.facebook.com/quran2020786/

कुरआन च्या बोधकथा..1 आदम अ. आणि हव्वा, नूह अ., हूद अ. सालेह अ.

 1  आदम अ.  आणि  हव्वा ....


लाखो वर्षाआधी हे जग नव्हते...अल्लाहने म्हंटले...होऊन जा..आणि जग (धरती,पृथ्वी) बनले गेले...पण या जगात मनुष्य नव्हता...स्वर्गात ही मनुष्य नव्हता...

स्वर्ग हा खूप सुंदर बगीचा आहे. ज्याचा कुणी स्वप्नातही विचार करू शकत नाही.....तिथे सगळ्या प्रकारची फळझाडे आहेत...त्यात डाळिंब,अंगुर,ऑलिव...सर्व फळे जितका मनुष्य विचार करु शकतो...आणि त्याच्याहून आधिक.....

आणि त्या फळांच्या झाडांच्या मधून थंड आणि गोड पाण्याचे, दुधाचे आणि मधाचे झरे वाहत आहेत....

एक दिवस अल्लाहने स्वर्गात त्याच्या दूतांना म्हटले की, "माझी इच्छा आहे एक मनुष्य बनविण्याची"

दूत म्हटले, "आम्ही तुझ्या आज्ञा पाळत नाही का?"

अल्लाह म्हणाला, "मला चांगले माहीत आहे"

अल्लाहने ओल्या मातीपासून एक मनुष्य बनविला, आदम अ. (अडम)...आणि त्यात आत्मा (जीव, रुह) फुंकला...आदम अ. यांनी त्यांच्या जीवनाचा, पहिला श्वास घेतला... , अल्लाहने त्यांना प्रत्येक गोष्ट त्याला शिकविली. त्यांना बोलण्यासाठी काही शब्द शिकविले... अल्लाहने त्याच्या सर्व स्वर्गदूतांना बोलावले आणि म्हटले..."हा आदम आहे...त्याला वाकून प्रणाम करा.."

सगळ्या स्वर्गदूतांनी आज्ञाचे पालन केले...फक्त एकाने केले नाही..तो होता इब्लिस (शैतान)...तो एक जिन्न होता...तो म्हणाला, "मी का प्रणाम करू?..मी आगीने बनलो आहे आणि हा फक्त मातीने बनला आहे...मी याला प्रणाम करनार नाही"

अल्लाह इब्लीस वर रागावला आणि त्याला स्वर्गातून बाहेर केले... इबलीस (शैतान) ने तिथून जाताना प्रण केला की, "तो संपूर्ण मनुष्य जातीशी कयामत (महाविनाश) येईपर्यंत बदला घेईल"

अल्लाहने म्हटले की, "चांगले मनुष्य तुझे ऐकणार नाहीत.."

अल्लाहने आदमला  स्वर्गात राहायला परवानगी दिली.

आणि त्याला सांगितले की, "तुला जे आनंद देईल, ते तू कर..कोणतेही फळ खा...आणि जे तुला आवडेल ते तू पी... तू स्वर्गातले प्रत्येक फळ खावू शकतो फक्त एका झाडाचे फळ तू खायचे नाही.."अडम (आदम) यांनी सर्व मजा अनुभवली...आनंद घेतला...पण लवकरच त्यांना एकटेपणा जाणवू लागला..त्यांना मित्र नव्हते...म्हणून त्यांनी अल्लाहला म्हटले, "कृपा करून मला एक सोबती दे".  
अल्लाहने त्याला एक पत्नी दिली... हव्वा (एव्ह). ईबलीस चालाक होता..त्याने विचार करण्यास सुरू केला की, आदम अ. यांना अल्लाहची अवज्ञा करण्यास कसे भाग पाडावे... एक दिवस आदम अ. आणि हव्वा (अडम आणि एव्ह) स्वर्गात असताना तो त्यांच्या कानात फुसफुसला (बोलला) की, "ज्या झाडाचे फळ खाण्यासाठी तुला अडवले आहे, ते फळ  छान आहे...तू जर ते खाशील तर तू नेहमीसाठी जिवंत राहशील..." आदम अ. यांना मोह झाला...दोघांनी ईबलिसचे ऐकून त्या झाडाकडे जावून, ते फळ  खाल्ले.

ते फळ खाताच, त्यांना याची जाणीव झाली की, त्यांनी खूप मोठी चूक केली आहे...त्यांना लाज वाटली...कारण त्यांचे काही अंग हे दिसू लागले होते...झाडाच्या पानांमध्ये ते दोघे स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करू लागले...
पण अल्लाहला सर्व माहीत होते आणि तो सर्वीकडे असतो... अल्लाह त्यांच्यावर खूप रागावला, " मी तुला चेतावणी दिली होती...की त्या मना केलेल्या झाडाचे फळ खावू नको...पण तू माझी आज्ञा पाळली नाही...आता तुझी जागा धर्तीवर आहे...स्वर्गात नाही"...

अल्लाहने दोघांना स्वर्ग सोडून धरतीवर जाण्यास सांगितले.. त्या दोघांनीही एक चूक केली होती...पण त्यांना अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती...त्यांना त्याचा खूप पश्र्चाताप होत होता...त्यांनी अल्लाहकडून काही माफी मागण्याचे शब्द शिकून घेतले...ते खूप रडले आणि त्यांनी अल्लाहकडून माफी मागितली...शेवटी अल्लाहला त्यांच्यावर दया आली...अल्लाहने म्हटले की, जर तुम्ही चांगले काम (कर्म) केले आणि माझी आज्ञा पाळली तर मी तुम्हाला वापस स्वर्गात, जी एक सुंदर बाग आहे, बोलावेन...पण तुमच्या मृत्यू नंतर...पण जर चांगले काम (कर्म) केले नाही आणि आज्ञा पाळली नाही, तर मृत्यूनंतर खूप भयानक नरकात जावे लागेल....

आदम अ.यांना श्रीलंका येथील एका पर्वतावर उतरविण्यात आले...ही 4223BC
मधील घटना आहे....म्हणजे साधारणतः 6000 वर्षांपूर्वीची...

आदम अ. आणि हवा ने त्यांचे उरलेले जीवन धरतीवर चांगले काम (कर्म) करण्यात आणि अल्लाहची आज्ञा पाळण्यात घालविले...त्यांना आशा होती की, ते पुन्हा अल्लाहला खुश करून, त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गात जातील.....

त्यांना खूप मुले आणि नातवंड झाली...सर्व मानवजात त्यांची पिढी आहे...त्यामुळे आदम अ. यांना father of  human race म्हटले जाते....आणि हव्वा यांना mother of human race म्हंटले जाते. पुढे ते पॅलेस्टाईन मध्ये राहिले....आदम अ. हे 930 वर्षे जगले...


आदम अ. जेव्हा धरतीवर आले, तेव्हा त्यांच्या पायाचा ठसा, हा श्रीलंकेतील एका पर्वतावर आहे...


2 .  नूह अ.  आणि  प्रलय (पूर) 

जेव्हा मानवजात या जगात पसरली...काही लोकांनी अल्लाहची शिकवण लक्षात ठेवली, पण जास्त करून लोकांनी लक्षात ठेवली नाही...
ते अल्लाहविषयी विसरून गेले आणि दगडाच्या प्रतिमा बनवून आराधना करू लागले...

त्यांना अल्लाहची शिकवण आठवून देण्यासाठी, अल्लाहने एक संदेशवाहक त्यांच्याकडे पाठविला...त्यांचे नाव होते, नूह अ. (नोआ/Noah).

हा साधारणतः 3167BC मध्ये म्हणजे  अंदाजे 5000 वर्षांपूर्वीचा काळ होता. नूह अ. यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या देशाचे आताचे नाव, अझरबैजान (Azerbaijan) आहे...नूह अ. त्यावेळचे चांगले, सदाचारी व्यक्ती होते...

नूह अ. यांनी लोकांना सांगितले की, चांगले बनण्यासाठी, अल्लाहची आज्ञा पाळा...आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवा की, जर ते चांगले होतील तर ते वापस स्वर्गात जातील...त्याने त्यांना फक्त एका अल्लाहची प्रार्थना करण्यास सांगितले, जो त्यांना बनविणारा आहे आणि दगडाच्या प्रतिमेची आराधना करू नका, असे सांगितले...पण लोक खूप आज्ञा भंग करणारे होते...त्यांनी पुरुषांच्या, स्त्रीच्या, सिंहांच्या, घोड्याच्या आणि खूप काही प्राण्यांच्या पुतळ्यांची आराधना करने चालूच ठेवले...

नूह अ. यांनी त्यांना समजावले की, "हे दगड तुम्हाला काहीही देऊ शकत नाही...जर तुम्हाला काही पाहिजे आहे, तर त्यासाठी अल्लाहला मागा..."

नूह अ. यांनी  कारण दिले, "तुम्ही सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि आकाश पाहत नाही का? यांना कोणी बनविले...अल्लाहने या सर्वांना बनविले...तुम्हाला जाणीव होत नाही का की, अल्लाहने तुम्हालाही बनविले आणि तुम्हाला मृत्यूनंतर अल्लाहकडेच वापस जायचे आहे..."

नूह अ. यांनी विनवणी केली, " मी म्हणत नाही की, मी अल्लाहचा दूत आहे...किंवा मला, जे अज्ञात आहे, त्याचे ज्ञान आहे...मी हेही म्हणत नाही की, माझ्याकडे लपलेला खजिना आहे...मी फक्त एवढेच म्हणत आहे की, एकाच अल्लाहला माना आणि तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी त्याची आज्ञा पाळा...माझा विश्वास करा...मला या बदल्यात काहीही नको आहे..."  नूह अ., एक खूप सहनशील व्यक्ती होते...त्यांनी लोकांना उपदेश करून अल्लाहचा संदेश देणे नऊशे (900) वर्षांपर्यंत चालू ठेवले... त्यांना खूप मोठे आयुष्य होते...पण फक्त काहीच चांगल्या लोकांनी अल्लाहचा संदेश स्वीकार केला...

नूह अ. खूप नाखूष होते...त्यांनी अल्लाहकडे प्रार्थना केली...अल्लाह ने प्रकट केले, " नूह, दुःखी होऊ नकोस...तुझ्याकडून जितके झाले तितके तू खूप चांगले काम केले आहे...हे दुष्ट लोक, भयानक शिक्षा भोगण्याच्या योग्य आहेत...ते नष्ट होतील...त्यांना या शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही..."

अल्लाहने नूह अ. यांना, एका मोठ्या वादळविषयी सांगितले, जे या अविश्वास करणाऱ्या लोकांना जीवे मारेल...अल्लाहने नूह अ. यांना सल्ला दिला की, एक लांब नाव बनव आणि त्यावर स्वतःला आणि तुझ्या अनुयायींना, येणाऱ्या पूरापासून सुरक्षित करण्याची पूर्ण तयारी कर...

जेव्हा लोकांनी पाहिले की, नूह अ.  मोठी नाव बनवीत आहे...ते त्यांच्याकडे पाहून हसले...आणि म्हणाले की, "तर तू पूरासाठी तयारी करत आहे, नाही का? आणि तू त्यात (नावेत) स्वतःला वाचवशील? हss."..

पण नूह अ. यांनी, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि मोठी नाव बनविणे चालू ठेवले...

जेव्हा एक मोठी नाव तयार झाली, तेव्हा अल्लाहने नूह अ. यांना आज्ञा केली की, वादळ येण्याआधी, त्यांच्या कुटुंबाला, अनुयायींना, आणि सगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या, एका जोडीला त्याच्यासोबत, नावेत घेऊन जाण्यास सांग...

नूह अ. यांनी, अल्लाहने जी आज्ञा केली होती, ते सर्व केले...पण नूह अ. यांना, त्यांच्या एका मुलाविषयी, कानान (Yam) विषयी काळजी वाटत होती...ज्याने अल्लाहची आज्ञा पाळली नव्हती...तो विश्वास करणारा नव्हता.... नूह अ. यांनी अल्लाहला विचारले, कानान (Yam) चे काय होईल?...तो माझ्या कुटुंबातला आहे....तो वाचविला जाईल का? आणि अल्लाहने उत्तर दिले, "नाही, नूह, जो माझी आज्ञा पाळत नाही, तो तुझ्या कुटुंबातला नाही...आणि तुला त्याच्यासाठी वाईट नाही वाटले पाहिजे...तुझे कुटुंब त्यांच्यात आहे, ज्यांनी तुझ्या अल्लाहची आज्ञा पाळली आणि तुझीही...

शेवटी जेव्हा सगळी तयारी पूर्ण झाली, तेव्हा एक वादळ आले...कुणीही याआधी एवढे मोठे वादळ पाहिले नव्हते...ती एक शिक्षा होती ज्याचे अल्लाहने वचन दिले होते की, जर लोकांनी त्यांची पद्धत (रस्ता) बदलली नाही, तर अल्लाह वादळ पाठवेल...खूप जोरदार पाऊस आकाशातून खाली आला (ढग फाटले) आणि जमिनीतून पाणी उफाळून वर आले...जसे ते सर्व नावेत बसले, नूह अ. यांनी पुन्हा कानानला आवाज दिला...आणि अल्लाहची आज्ञा पाळायला आणि त्याचा संदेश स्वीकार करायला सांगितला, ज्यामुळे तो वाचेल...

पण कानान खरच फार हट्टी होता...तो म्हणाला, "नाही...मी येणार नाही...मी पर्वत चढेन आणि स्वतःला वाचवेन..." पण त्यानंतर लगेच एक मोठी लाट त्यांच्यामध्ये आली आणि कानान, त्याच्या सोबतच्या दुसऱ्या सर्व विश्वास न करणाऱ्या लोकांसोबत मरण पावला...

नूह अ. यांची नाव जुडी पर्वता जवळ पोहोचली (आताचे अरारात पर्वत जे तुर्कीत आहे) ते सर्व लोक, जे नाव मध्ये होते ते वाचविले गेले...

नूह अ. यांना दुसरा आदम अ. म्हणतात...कारण जवळपास प्रत्येक जण त्या भयंकर प्रलयामध्ये (पुरामध्ये) मरण पावला होता...फक्त नूह अ. आणि त्याचे काही अनुयायी, या जगात पुन्हा नवीन जीवन सुरू होण्यासाठी वाचविले गेले होते...

*ही सत्यकथा आणि बोधकथा कुरआन, बायबल, तोराह, वेद मध्ये ही आहे. वेद मधील ग्रंथात नूह अ. यांचे नाव मनु आहे.

संदेश हाच आहे, ही विश्वाचा निर्माता एक आणि फक्त एकच आहे...आणि त्याचीच उपासना करणे योग्य आहे...

3.   आदची   जमात   आणि   हूद अ.

नूह अ. यांचे अनुयायी, जे प्रलयामध्ये वाचवले गेले होते, ते चांगले लोक होते. नूह अ. हे 950 वर्ष जीवन जगले...खूप वर्षांनंतर त्यांची मुले आणि नातवंड हे, त्यांच्या पूर्वजांनी आणि परदादा यांनी जे सांगून गेले, त्याला विसरून गेले...

हे लोक खूप उंच, गोरे आणि चांगल्या शरीरयष्टीचे होते...आणि त्यांना आद लोक असे म्हंटले जात होते...त्यांनी सुंदर घरे आणि शहरे बनविली...पुन्हा एकदा त्यांनी दगडाच्या प्रतिमांची आराधना करने सुरू केले...त्यामुळे अल्लाहने अजून एक संदेशवाहक ज्यांचे नाव हूद अ. होते,पाठविला...त्या जमातीतील लोकांना अल्लाहच्या संदेशाची आठवण करून देण्यासाठी हूद अ. यांना पाठवण्यात आले होते.( अंदाजे 2500BC म्हणजे साधारणतः 4520वर्षांपूर्वी)

हूद अ. यांनी आदच्या जमातीतील लोकांना सांगितले की, "मी अल्लाहचा संदेशवाहक आहे, त्याने मला, तुम्हाला हे सांगण्यासाठी पाठविले आहे की, तुम्ही अजिबात योग्य करत नाही आणि तुम्हाला आठवण करून देण्यासाठी की, अल्लाहने नूह अ. यांच्या वेळच्या लोकांना कशी शिक्षा केली आणि जे एकाच अल्लाहवर विश्वास करत नाहीत, त्यांचा कसा विनाश केला...

पण आदच्या जमातीतील लोकांनी हूद अ. यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला...ते हूद अ. यांच्यावर आक्रमक झाले आणि म्हणाले, "तुझी इच्छा आहे का की आम्ही आमच्या दगडाच्या प्रतिमा सोडून द्याव्या, ज्यांची आमचे पिता,आजोबा आणि परदादा आराधना करत होते...नाही हूद ss ,आम्ही जे तू म्हणतो, ते कधीही करणार नाही...अल्लाहच्या शिक्षेविषयी सांगून आम्हाला घाबरवू नको....जर आम्ही अल्लाहची आराधना नाही केली तर त्याला, आम्हाला शिक्षा देऊ दे..."

हूद अ. म्हणाले, "ती शिक्षा खूप दूर नाही...तुम्ही त्यासाठी वाट पाहा...मी पण तुमच्या सोबत वाट पाहीन..." 

लवकरच त्यांची जमीन कोरडी आणि पडीक झाली..तेथे पाऊस नव्हता त्यामुळे खूप कमी पीक आले... हूद अ. त्यांच्या जमितीतील लोकांना म्हणाले, "लोकहो, अल्लाहची क्षमा मागा...त्याची क्षमा याचना करा आणि तो खूप जास्त देईल...अल्लाह सर्व काही करू शकतो..."

"तुला जे म्हणायचे ते तू म्हणू शकतो, हूद ...पण आम्ही तेच करणार जे आमच्या पित्याने केले..." आदच्या जमातीतील लोकांनी म्हंटले....

हूद अ. यांनी त्यांना, त्या फक्त एका अल्लाहला घाबरण्यास सांगितले, ज्याने त्यांना त्यांची मुले दिली...असे पाळीव प्राणी दिले (गुरे), ज्यामुळे त्यांना दूध आणि मांस मिळते आणि अजून खूप उपयोगी साधने दिली...

आदच्या जमातीतील लोक म्हणाले, आमच्यापेक्षा कोण जास्त शक्तीशाली आहे? (आम्हीच जास्त शक्तिशाली आहोत)

शेवटी अल्लाह, त्यांनी आज्ञापालन न केल्यामुळे खूप रागावला....त्याने एक खूप जोरदार वादळ (प्रचंड जोऱ्याचा वारा.../ tornado) पाठविले..जो आठ दिवस आणि सात रात्र चालला...त्यामुळे त्यांची शहरे उध्वस्त झाली, पुसली गेली आणि प्रत्येक जण मारला गेला...वादळ इतके शक्तिशाली होते की, त्याच्या रस्त्यातले सर्व धुळीसारखे वाऱ्याने उडून गेले... आदचे लोक आणि त्यांची मोठी आणि सुंदर घरे, उंच खंब्यासहित पृथ्वीवरून गायब झाली...

त्यानंतर हूद अ. अंदाजे 464 वर्षे जगले आणि त्यांच्या अनुयायांना अल्लाह च्या उपासनेचा संदेश देत राहिले...

अल्लाहने, हूद अ. यांचा संदेश ज्यांनी मानला नाही, त्या अादच्या जमातीतील लोकांना शिक्षा दिली...जे जिवंत राहिले ते काही काळासाठी अल्लाहला भयभीत झाले...पण लगेच हूद अ. यांची शिकवण विसरून, पुन्हा दगडांच्या प्रतिमांची आराधना सुरू केली...या लोकांना समुद म्हणले जायचे... 

आदच्या लोकांसारखेच , हे लोक गोरे, उंच आणि देखणे होते...त्यांनी डोंगरापासून कोरून भव्य घरे बनविली...आणि मैदानातील जमिनीवर सुंदर राजवाडे बनविले...पण ते कृतघ्न लोक होते...आणि त्यांनी अल्लाहची आज्ञा पाळली नाही...अल्लाहने त्यांच्या मधलाच एक संदेशवाहक पाठविला...त्याचे नाव सालेह अ. होते...

सालेह अ. यांनी समुदच्या लोकांना चांगले वागून, फक्त एकाच अल्लाहवर विश्वास करायला सांगितले...त्या लोकांत गरीब लोकांनी त्यांचे ऐकले, पण श्रीमंत लोकांनी ऐकले नाही....ते पूर्ण गर्विष्ठ होते आणि गरिबांना कमी लेखत होते...

ते म्हणाले, "सालेह, तू आमच्या सारखाच आहेस...तुला काय झाले आहे? की तू आम्हाला आमच्या आराध्यची, प्रतिमांची आराधना करण्यास थांबवत आहे..."

सालेह अ. म्हणाले, "मी अल्लाहचा संदेशवाहक आहे...अल्लाहने मला तुम्हाला सत्य सांगण्यासाठी पाठविले आहे...अल्लाहने तुम्हाला या धरतीपासून बनविले आहे आणि तुम्हाला धरतीवर जगायची परवानगी दिली आहे...अल्लाहने तुम्हाला बाग, झरे, कुरण (गवतासाठी राखलेले मैदान), स्वादिष्ट आणि मऊ खजूर आणि सुंदर घरे दिली...तुम्ही जी त्याची अवज्ञा करीत आहात त्यासाठी त्याची क्षमा मागा...याबदल्यात मला तुमच्याकडून काही नको आहे...मी तुम्हाला फक्त एकाच अल्लाहवर विश्वास ठेवण्यास सांगत आहे...ज्याने तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली..."

पण समुदच्या श्रीमंत लोकांनी नाराजी दाखविली आणि म्हणाले, "ठीक आहे, तुझ्या अल्लाहला सांग की, एक चमत्कार दाखव...मग आम्ही, त्या अल्लाहवर विश्वास करू...त्याला मानू...त्यांनी सालेह अ. यांना, अल्लाहला विनंती करून, डोंगरातून एक जिवंत उंट, त्यांच्यासमोर बाहेर काढून दाखविण्यास सांगितले...

सालेह अ. यांनी अल्लाहकडे प्रार्थना केली...आणि अल्लाहने त्यांची प्रार्थना, ऐकून समुदच्या लोकांना चमत्कार दाखवला, जो चमत्कार त्यांनी दाखवायला सांगितला होता...

एक मादा उंट डोंगराच्या गुफेतून, बरोबर, त्यांच्या डोळ्यासमोर बाहेर आली....

सालेह अ. म्हणाले, आता तुम्ही चमत्कार पाहीला.  तुम्हाला जे पाहीजे ते मिळाले आहे...ही मादा उंट पवित्र आहे...आणि अल्लाहने तुमच्या विनंतीवरून पाठविली आहे, ज्यामुळे तुम्हाला अल्लाहची उपस्थिती पटावी...ही अल्लाहची इच्छा आहे की, ती शेतात आणि रानात चरावी...आणि तिने एक दिवस ज्या ठिकाणी पाणी पिले...तुम्ही दुसऱ्या दिवशी तेथून पाणी काढावे... आळीपाळीने...तुमच्यापैकी कुणीही त्या मादा उंटची आणि तिच्या बछड्याची पाळी घेणार नाही...सालेह अ. यांनी हे ही सांगितले की, जर त्या मादा उंटीनीला कुणी त्रास दिला तर अल्लाहकडून शिक्षा दिली जाईल...

प्रथम समुदचे लोकं प्रभावित झाले आणि घाबरले...त्यांनी चमत्कार होतांना पहिला होता आणि विश्वास केला की, उंटीनी जी डोंगरातून बाहेर आली आहे, ती खरंच अल्लाहकडून पाठविण्यात आली आहे, जसे त्यांनी अल्लाहला विनंती करण्यास सांगितले होते...

पण लवकरच त्यांनी, त्या उंटीनीचे आणि तिच्या बछड्याचे, चरण्याचे आणि पाणी पिण्याचे (एक दिवसाआडचे) बिना अडथळ्याचे स्वातंत्र्य, याचा द्वेष करण्यास सुरू केला...ते त्यांचे पाणी त्या उंटीनी सोबत वाटण्यास (सहभागी करण्यास) इच्छुक नव्हते...त्यामुळे त्यांनी एक योजना आखलीे..आणि एक दिवस त्यांच्यातील काहींनी, तिला जिवे मारले...

जेव्हा सालेह अ. यांनी हे ऐकले तेव्हा ते खूप दुःखी झाले...त्यांनी समुदच्या लोकांना म्हंटले, "तुम्ही अल्लाहची आज्ञा न पाळून, पाप केले आहे...तुमच्यामुळे अल्लाह खूप रागावला आहे...आणि लवकरच तो तुम्हाला शिक्षा करेन"...आणि अल्लाहने समुदच्या लोकांना एक भयानक त्रासदायक आवाज, मेघ गर्जना आणि कडाक्याची वीज पाठवून, खूप कठोरपणे शिक्षा दिली...समुदचे लोकं, ज्यांनी सालेह अ. यांचे ऐकले नव्हते, जेव्हा त्यांनी हा भीतीदायक आवाज ऐकला तेव्हा त्यांच्या तोंडावर, जमिनीवर पडले. सकाळी ते सगळे त्यांच्या सुंदर आणि मजबूत घरांत, मृत आढळले होते, जी घरे त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधली होती...

फक्त ते लोक ज्यांनी एका अल्लाहला मानले आणि विश्वास ठेवला आणि ज्यांनी सालेह अ. यांचे ऐकले ते वाचवले गेले होते....(सौदी अरब देशात काही सापळे, तेलाच्या विहिरी खोदताना आढळले. सौदीतील लोक, जे हाडांचे सापळे दिसले, ते आद आणि समुदचे लोक होते असे मानतात...त्याचे फोटो गूगल वर आद पीपल स्केलेटन असे search केल्यास दिसतात.)


हे सर्व संदेशवाहक, हिब्रू भाषा बोलत होते व ते अल्लाह ला  यहोवा ( yahweh) या नावाने संबोधित करत होते. मुहम्मद स. अ. व. यांच्यावर कुराण प्रकट झाल्यानंतरचे अल्लाह हे संबोधन अरबी भाषेत कुरआन मध्ये आहे.

विश्वाचा निर्माता एकच आहे...भाषा वेगळ्या त्यामुळे संबोधन वेगळे आहे...इस्लाम धर्माचे लोक इब्राहीम अ. आणि मूसा अ. (Moses) यांनाही मानतात आणि ईसा अ.( येशू) यांनाही मानतात, ज्यामुळे अनुक्रमे ज्यू (यहुदी) आणि ख्रिश्चन धर्म आले. मूसा अ. यांच्यावर तोरात (Torah) आणि ईसा अ. यांच्यावर इंजील (बायबल) हा ग्रंथ प्रकट झाला. तोरात, बायबल आणि कुरआन मध्ये जवळ जवळ सारख्याच पैगंबरांच्या (संदेश वाहकाच्या) सत्यकथा आणि बोधकथा आहेत...आणि संदेश आहे...पण कुरआन हा मूळ ग्रंथ आहे, ज्यात काहीही बदल झालेला नाही.

_____________________________

सोमवार, २९ जून, २०२०

ईसा अ.

🌹🌴ईसा अ.🌴🌹
मरियम एका पवित्र वातावरणात मोठी झाली. सदाचारी लोकांत, ती एक खूप धार्मिक (ईश्वरनिष्ठ) मुलगी बनली. तिने तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीत प्रार्थना करण्यात खर्च केला आणि स्वतःला अल्लाहच्या सेवेसाठी अर्पण केले. तिची धर्म निष्ठा इतकी चांगली होती की, तिच्यापेक्षा मोठे लोकही तिचा सन्मान करायचे आणि तिच्याकडून प्रेरणा घ्यायचे.

तिची ईश्वर निष्ठा आणि पावित्र्य असाधारण होते. जे तिला ओळखत होते, त्या प्रत्येकाकडून तिने, तिची प्रतिष्ठा जिंकली होती.

एक दिवस जेव्हा मरियम तिच्या खोलीतून, एका वेगळ्या जागेत, जिथे पडदे टाकून आच्छादन केले होते, गेली तेव्हा तिने एक  व्यक्ती तिच्यासमोर उभा राहिलेला पाहिले. मरियम घाबरली होती. "कोण आहे तू?" तिने विचारले. "ईश्र्वरासाठी जवळ येऊ नकोस. मी अल्लाहचा आश्रय मागते तुझ्यापासून"

तो व्यक्ती उत्तरला, "घाबरु नको, मी अल्लाहचा दूत (स्वर्गदूत) आहे आणि अल्लाहकडून फक्त संदेश देणारा म्हणून  पाठविण्यात आलो आहे. तुला हे सांगण्यासाठी की, तुला एक पवित्र मुलगा होईल."

"पण जर मला कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नाही (मी विवाहित नाही), तर मला एक पुत्र कसा होईल. मी शील भ्रष्ट (वाईट स्त्री) नाही?", ती म्हणाली.

"ती अल्लाह (ईश्वर) ची इच्छा आहे. ते, त्याच्यासाठी खूप कठीण नाही. जेव्हा तो काही निर्माण करण्याची इच्छा करतो, म्हणतो, होऊन जा आणि ती होते. तुझा पुत्र, एक खूप पवित्र मुलगा असेल." असे म्हणून, स्वर्गदूत दिसेनासा झाला आणि मरियमला विस्मित (स्तंभित) करून गेला.

नंतर काही दिवसांनी, जेव्हा तिचा पुत्र जन्मायची वेळ जवळ आली, मरियम, लोकांपासून बाजूला, एका दूरच्या ठिकाणी गेली. तेथे एकटी, घाबरलेली आणि भुकेने आणि तहानेने अशक्त झालेल्या अवस्थेत, एका   झाडाच्या खाली झोपली आणि वेदनेने ओरडू लागली, "मी इच्छा करते, हे होण्याआधी मी मरून गेलेली असावी आणि सर्वजण मला विसरून गेलेले असावे."

एक सुखद आवाज तिच्याशी बोलला, "दुःखी होऊ नको मरियम. तुझ्या प्रभूने, एक पाण्याचा झरा तुझ्याखालून (जवळून), प्रदान (प्रवाहित) केला आहे आणि जर तू झाडाचे खोड हलवशील, तर पुष्कळ ताज्या आणि पिकलेल्या खजुरी तुझ्यावर पडतील. तू खा आणि पी आणि तुझ्या पुत्राला पाहून आनंद घे."

तिचा पुत्र ईसा (अ.), सर्व लोकांपासून दूर अशा जागी जन्मला. 

मरियम ने जरी, तिच्या लहान बाळाला कुशीत घेतले, तरी तिच्यात, त्या बाळाला घेऊन, तिच्या लोकांकडे जाण्याचे साहस नव्हते. ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकेलं? ते काय म्हणतील? तिच्या बाळाचा जन्म, ती कसे समजावून सांगू शकेल? ती दयनीय अवस्थेत होती आणि काय करावे तिला समजत नव्हते. पण अल्लाहने (ईश्वराने) तिला दिलासा दिला. 

"लोकांना काहीही सांगू नको, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नको, फक्त संकेत करून सांग की, तू उपवास करीत आहे आणि त्या दिवशी, काहीही न बोलण्याची शपथ घेतली आहे." तिला आदेश दिला गेला.

अल्लाह (ईश्वरा) च्या मदतीने बळकट होऊन, निरागस मरियमने तिच्या बाळाला उचलले आणि तिच्या लोकांकडे परत गेली. जेव्हा त्यांनी तिला, तिच्या हातात असलेल्या, एका बाळा सोबत येतांना पाहिले, ते तिच्या भोवती जमा झाले.

"मरियम, किती लाजेची गोष्ट आहे! तुझे मातापिता ईश्र्वरनिष्ठ लोक होते, तू हे काय केले?"  आणि ते त्या मुलाविषयी जाणण्यास इच्छुक होते.

मरियमने त्यांना उत्तर दिले नाही. तिने फक्त त्या मुलाकडे इशारा केला.

"तू वेडी आहे का? आम्ही एका नवजात बाळासोबत कसे बोलू शकतो, मरियम ?"

त्यानंतर लगेच प्रत्येकाला पूर्ण आश्चर्य देऊन, मरियमच्या हातातील बाळाने बोलावयास सुरुवात केली. "मी अल्लाह (ईश्वर) चा संदेश पोहोचविणारा आहे," ते बाळ म्हणाले, "त्याने मला एक ग्रंथ (इंजील, बायबल) दिला आहे आणि मला एक प्रेषित (संदेशकर्ता, पैगंबर) बनविले आहे. त्याने मला आज्ञा दिली की, माझ्या (अल्लाहच्या, ईश्वराच्या) प्रार्थना म्हण आणि दानशूर बन आणि माझ्यावर आशीर्वाद दिला की, जिथे मी असेल, तो मला माझ्या आईशी दयाळू असणारा बनवेल आणि माझ्यावर ज्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या दिवशी मी मृत्यू पावेन, ज्या दिवशी मला पुन्हा वर उचलण्यात येईल, त्या दिवशी शांती देईल."

प्रत्येकाने, डोळे विस्फारून आश्चर्याने लक्ष देऊन ऐकले. त्यांचा या चमत्कारवर विश्वास बसत नव्हता. हे ईसा अ. (येशू, Jesus) होते. अल्लाहचे संदेशकर्ता म्हणजेच प्रोफेट.

जे लोक, मरियमची, जी पवित्र आणि निरागस होती, निंदा करण्यास आले होते,  ते सगळे नवजात बालकाचे बोलणे ऐकून शांत झाले. मरियमच्या विषयी पवित्र क़ुरआन म्हणते, "अल्लाह (ईश्वरा) ने मरियमला, त्या सर्व देशांच्या, सर्व स्त्रियांमधून वरचा दर्जा देऊन निवडले."

ईसा अ., मरियम चे पुत्र, ज्यांना पवित्र कुरआन मध्ये मसीह ही म्हंटले आहे, मोठे होऊन एक खूप सद्गुणी आणि धार्मिक व्यक्ती बनले.

ईसा अ.च्या नात्यातले यहया अ., जकरिया अ. चे पुत्र होते, एक प्रेषित (संदेशकर्ता) होते. ते अल्लाहचा संदेश लोकांमध्ये, उपदेशाद्वारे सांगायचे. प्रवचन द्यायचे. पण यहया अ. यांना, जुदा (Judaea) चा राजा पसंत करत नव्हता. त्याने त्यांची हत्या करविली.

यहया अ. हे , त्यांच्या पित्याच्या, जकरिया अ. च्या, जीवनकाळात उशिरा जन्मले होते. जकारिया अ. यांच्या अल्लाह (ईश्वर) ला केलेल्या प्रार्थनांचे, ते उत्तर होते. अल्लाह (ईश्वर) नेच त्यांच्यासाठी यहया हे नाव निवडले होते.

यहया अ. यांच्या कुटुंबीयांसाठी, जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी ही फार दुःखाची बातमी होती. यहया अ. यांच्या मृत्यू नंतर लोकांना योग्य मार्गावर नेऊन, नेतृत्व करण्याची भारी जबाबदारी, ईसा अ. वर आली.

इस्राइलचे (याकूब चे) वंशज म्हणजेच "बनी इस्राइल" इतके साधे लोक नव्हते की, त्यांचे सहजरीत्या नेतृत्व करून त्यांना सरळ मार्गावर आणावे. ते धीट होते आणि प्रत्येक गोष्टीसाठी टीकात्मक होते आणि फक्त मतभेद दर्शविण्यासाठी वाद घालणारे होते.

त्यांच्यामधील श्रीमंत लोक, गरीब लोकांसाठी क्रूर होते. त्यांच्यामध्ये आपसांमध्ये, कपटकारस्थान आणि भांडणे होती. त्यामुळे ही गोष्ट चकित करणारी नव्हती की, "रोमन" लोकांनी त्यांच्या देशावर नियंत्रण केले होते. आणि ते त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर, फक्त सेवकासारखे राहत होते. त्यांचे राज्यकर्ते म्हणजे राजा आणि इतर प्रधान, फक्त नावापुरते होते, ते फक्त दुसऱ्याच्या हातातील बाहुले होते आणि खरी सत्ता "रोमन गवर्नर" च्या हातात होती.

तेथील सर्व लोक आजारपणात, भयात, गरिबीत आणि दुबळेपणात जीवन जगत होते. ते विटंबना आणि मानहानी आणि दुःखाचे आयुष्य जगत होते. आजूबाजूला सर्वीकडे दारिद्र्य पसरले होते. तेथे त्यांना कोणीही योग्य मार्ग दाखविणारा नव्हता. ते सर्व मेंढ्यांच्या विखुरलेल्या कळपा सारखे होते.

अशा वेळेस ईसा अ. अल्लाहचा संदेश आणि इन्जील ग्रंथ (बायबल) घेऊन, त्यांना मार्गदर्शन करण्यास आले.

ईसा अ. खूप सौम्यपणे संभाषण करणारे आणि विनयशील व्यक्ती होते. त्यांनी त्यांच्या लोकांची अवस्था पाहिली, त्यांचे दुःख जाणले. ते लोकांशी प्रेमाने बोलले. त्यांना दिलासा दिला आणि त्यांना मार्गदर्शन केले.

प्रत्येक वेळेस मार्ग दाखविताना ते असे म्हणत की, एक आणि एकच अल्लाह (यहोवा, yahewe, ईश्वर, God) आहे. ज्याने त्यांना प्रेषित (संदेशकर्ता) म्हणून त्या लोकांकडे पाठविले आहे. ईसा अ. यांनी त्या लोकांची, भविष्याबाबत आणि परलोकाबाबत आशा जागविली. ईसा अ. यांनी आश्वासन दिले की, ते जर सदाचारी, संयमी आणि धैर्य ठेवून राहतील, तर अल्लाह (ईश्वर) त्यांना पारितोषिक देईल.

गरीब लोकांनी ईसा अ. वर विश्वास ठेवला आणि त्यांना मनापासून खूप प्रेम दिले. ते त्यांच्याकडे त्यांचे दुःख घेऊन आले. ईसा अ. त्यांच्यासाठी मसीह (Messiah) होते. अल्लाह (ईश्वरा) ने ईसा अ. यांना आजारातून लोकांना बरे करण्याची शक्ती दिली होती. त्यांनी आजारी लोकांना आणि आंधळ्या लोकांना फक्त स्पर्श करून बरे केले.

त्या काळात सगळ्या आजारांपेक्षा जास्त घातक आणि भयभीत करणारा आजार कुष्ठरोग (महारोग/leprosy) होता. कारण त्यावर काही उपाय नव्हता. त्यावेळी असे मानले जायचे की, हा पसरणारा म्हणजेच संसर्गजन्य आजार आहे आणि ज्या लोकांना कुष्ठरोग व्हायचा, त्यांना सर्वांपासून दूर करून आणि दूर घेऊन जाऊन एका खड्ड्यात किंवा दरीत (जी दरी कुष्ठरोग्यांना फेकण्यासाठी असायची) फेकले जायचे. जेथे त्यांना मरण्यासाठी सोडून देण्यात यायचे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र ही या भीतीने की, त्यांनाही हा आजार पकडेल किंवा त्यांनाही संसर्ग होईल, त्यांना भेटायला जात नव्हते. या हताश लोकांसाठी ईसा अ. एक आशेचा किरण बनून आले होते. कारण अल्लाह (ईश्वर) ने ईसा अ. यांना आजारापासून लोकांना, बरे करण्याची शक्ती दिली होती.

ईसा अ. यांना लोकांकडून प्रेम आणि आदरभाव मिळत होता. प्रत्येक ठिकाणी लोक त्यांच्या मागोमाग जात होते. लोक त्यांचे उपदेश आणि प्रवचन लक्षपूर्वक ऐकत होते आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास करत होते. ईसा अ. यांनी अल्लाहचा संदेश, जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे सर्विकडे पोहोचविला.

ईसा अ. यांनी लोकांना एकमेकांवर प्रेम करण्यास शिकविले आणि शत्रूला क्षमा करण्यास शिकविले. एक आणि फक्त एकच अल्लाहवर (ईश्वर, यहोवा (yahewe), God) विश्वास करण्यास शिकविले. त्यांनी लोकांना सांगितले की, "मूसा अ. (Moses) यांचा धर्म खरा होता आणि ते स्वतः एक संदेशकर्ते म्हणून, ही सत्यता, सिद्ध करण्यासाठी आले आहेत."

"मूसाने तुमच्याकडे जो कायदा आणला आहे, त्याची पुष्टी करण्यासाठी आणि अजून एक संदेशकर्ता "अहमद" (मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम), माझ्यानंतर येणार असल्याची चांगली वार्ता देण्यासाठी, मला यावे लागले आहे," त्यांनी लोकांना म्हंटले.

अहमद (मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम), हे ईसा अ.नंतर साधारणतः पाचशे वर्षांनंतर आले.

ईसा अ. यांनी, त्यांचा संदेश चहूबाजूंना देण्यासाठी, दूरदूर पर्यंत प्रवास केला आणि सर्व लोकांना उपदेश करत राहिले. नाझरेथ (नासरत), जे गलिली (Galilee) मध्ये होते, तेथपासून जेरुसलेम पर्यंत (जे जुदामध्ये होते),  सर्व गरीब लोकांनी त्यांचे ऐकले आणि त्यांच्या उपदेशांमध्ये, एका छान यशस्वी जीवनासाठी आशेचा किरण पाहिला. त्यांनी संयमित आणि नम्र राहून सामर्थ्य (बळ) संपादन केले.

पण श्रीमंत आणि शक्तीशाली लोक, ईसा अ. च्या विरुद्ध झाले. त्यांनी ईसा अ. यांच्या संदेशामध्ये, एका क्रांतीचे बीज पाहिले.

जेरुसलेम आणि जुदाचे श्रीमंत लोक, ईसा अ. ची वाढती लोकप्रियता पाहून भयभीत झाले. त्यामुळे त्यांनी ईसा अ. यांना अपमानित केले. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या अनुयायांसाठी जीवन जगणे अवघड केले. पण ईसा अ. यांनी कुणालाही हानि किंवा इजा पोहोचविली नाही आणि त्यांचे कार्य शांततेने चालू ठेवले. त्यांचे जे विश्वसनीय समर्थक होते, त्यांना "हवारीज" म्हंटले जात होते, ज्यांनी त्यांना प्रत्येक कार्यात मदत केली.

एकदा या समर्थकांनी, म्हणजेच हवारिज (disciples) यांनी, ईसा अ. यांना विनंती केली, की अल्लाह (ईश्वर) ला, स्वर्गातून त्यांच्यासाठी, एक भव्य भोजन (मेजवानी) पाठविण्यास सांगा. ईसा अ. यांनी अशी अवास्तव  मागणी करण्यापासून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आग्रह केला की, यामुळे त्यांची श्रद्धा मजबूत होईल.

अनिच्छिने ईसा अ. यांनी मान्य केले आणि त्यांनी अल्लाह (ईश्वर) ला, त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली. अल्लाह (ईश्वरा) ने, त्याच्या प्रिय प्रेषिताची (संदेशकर्त्याची) प्रार्थना ऐकली आणि त्याच्या हवारिज साठी (disciples साठी), अन्न आकाशातून (स्वर्गातून) खाली पाठविले. याचवेळी अल्लाह (ईश्वर) ने, त्यांना चेतावणी दिली की, जर त्यांच्यापैकी कोणीही, या चमत्कारानंतर अविश्वास दाखविला, तर एक कठोर शिक्षा, त्याची वाट पाहत असेन.

ज्यू लोक (श्रीमंत आणि हट्टी असलेले), ईसा अ. यांना हानि पोहोचविण्यासाठी, एका संधीच्या शोधात होते. त्यांनी ईसा अ. विरुद्ध योजना केली आणि कट रचला.

शेवटी ते  ईसा अ. विरुद्ध, जे त्यांच्या प्रशासनासाठी एक धोकादायक व्यक्ती बनत चालले होते, तक्रार करण्यास "रोमन गवर्नर- पोंटीअस पाइलेट (Pontius pilate)" कडे गेले. त्यांनी ईसा अ. वर, प्रशासनाविरोधात आणि लोकांच्या धर्माविरोधात, लोकांच्या मनात विष कालवत असल्याचा आरोप केला.

रोमन गवर्नर, त्यांनी जो काही आरोप केला, तो पुरावा असल्याशिवाय मानण्यास तयार नव्हते. पण श्रीमंत आणि शक्तीशाली ज्यू लोकांनी, गवर्नरला असे भासविले की, हा एक कट आहे. त्यांनी विनवणी केली की, जर ईसा अ. यांना वेळेत थांबविले नाही, तर त्यांची गरीब लोकांमध्ये वाढती लोकप्रियता सरकारसाठी (प्रशासनासाठी) एक धोक्याची पूर्वसूचना असेल.

शेवटी पाइलेट यांनी ईसा अ. यांना अटक करण्यासाठी आदेश दिला. लोकांचा विरोध, बंड आणि प्रतिक्रिया टाळण्यासाठी, हे लपवून केले जाणार होते. काही अप्रामाणिक लोकांच्या मदतीने एक कट रचण्यात आला. ईसा अ. यांना अटक केली गेली आणि गवर्नर समोर आणण्यात आले.

ईसा अ. वर, देशद्रोहाचा आरोप म्हणजेच लोकांच्या मनात त्यांच्या धर्माविरुद्ध आणि प्रशासनाविरुद्ध विष कालवण्याचा आरोप करण्यात आला. त्यांचे शत्रू त्यांना मृत्यू देण्यास इच्छुक होते. त्या काळात अशा आरोपासाठी शिक्षा "क्रूसावर म्हणजे वध स्तंभावर मरण" अशी होती. क्रूस (वधस्तंभ) म्हणजे सलीब, हा लाकडाचा क्रॉस (+ च्या आकारासारखा) होता, ज्यावर त्या व्यक्तीला खिळे ठोकून बांधले जायचे आणि रक्तस्त्राव होऊन मरण येईपर्यंत तो व्यक्ती तिथेच सोडला जायचा.

त्या जमिनीच्या (देशाच्या) श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांच्या आग्रहातर, ही शिक्षा ईसा अ. यांच्यासाठी सुनावली गेली. पण अल्लाहने, त्यांच्यावर उदारतेने, दया करून ईसा अ. यांना वाचवले. अल्लाह ने ईसा अ. यांना आकाशात वर उचलले.

ईसा अ. हे अल्लाह चे प्रिय प्रेषित होते, ज्यांचे जीवन चमत्कारांनी भरलेले आहे. कधी कधी लोक इतक्या चमत्कारांविषयी ऐकतात, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. "एक मूल त्याच्या पित्याविना कसे जन्मू शकते?", लोक विचारतात.

जरी ईसा अ. अल्लाहचे प्रेषित होते, तरी ते एकटे असे मनुष्य होते, ज्यांचा जन्माचा इतिहास खूप असामान्य आहे. पण हे फक्त, अल्लाहची शक्ती आणि सामर्थ्य सिद्ध करतात, ज्याच्यासाठी काहीही अशक्य नाही.

यासाठी आदम अ. यांचे उदाहरण आहे, ज्यांचा जन्म माता आणि पिता, दोन्ही नसतांना झाला, ते मातीपासून बनविले गेले आणि त्यांच्यात आत्मा फुंकला गेला. कारण अल्लाह(ईश्वर) सामर्थ्यशाली आहे आणि तो सगळ्या विश्वाचा निर्माता आहे. त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही.अल्लाहने दगडांतून झरे प्रवाहित केले, धरतीतून झाडे उगविली, मास्यांना पाण्यात पोहायला शिकविले, पक्ष्यांना हवेत उडण्यास बनविले. त्याने मानवाला सर्व प्राणिमात्रांवर वरचा दर्जा दिला. ज्यामुळे माणूस एक स्पष्ट चिन्ह पाहू शकतो आणि प्रकृती आणि प्राणी व पक्ष्यां विषयी विचार करू शकतो आणि त्यांच्या निर्मात्याचा आभारी, कृतज्ञ बनू शकतो. त्याने मानवाला हे सर्व समजण्यासाठी आणि अल्लाह (ईश्वरा) च्या उदारतेची प्रशंसा करण्यासाठी, अल्लाहच्या आदेशांवर मजबूत श्रद्धा ठेवण्यासाठी बुद्धिमत्ता दिली.

कुणालाही अल्लाहच्या (ईश्वराच्या) बरोबरीने किंवा समकक्ष समजणे, हे खूप मोठे पाप आहे.

ईसा अ. च्या नंतर, काही दशकांनी, ज्यू (यहुदी) लोकांनी रोमन विरुद्ध बंडखोरी केली आणि इ.स. 66 मध्ये जेरूसलेमवर नियंत्रण केले आणि पहिले रोमन-यहुदी युद्ध सुरू केले. इ.स. 70 मध्ये रोमन लोकांनी "जेरुसलेम" वर नियंत्रण केले आणि दुसऱ्या वेळेस बांधल्या गेलेल्या, प्रार्थना स्थळाला (हैकले सुलेमानी/second temple)
नष्ट केले, ज्यामध्ये पश्चिमेच्या भिंतीचा फक्त काही भाग शिल्लक होता. (जरी अलिकडील पुरातत्व शोधांनी भिंतीचा काही भाग नंतरच्या काळात दिलेला आहे). पाश्चात्य भिंत यहूदींसाठी(ज्यू लोकांसाठी) एक पवित्र स्थान आहे.

इस्राइलचे लोक दोन वेळा उपद्रव माजवतील आणि दोन वेळा त्यांचा विनाश होईल, असेच आधीच "तौरात" म्हणजेच "Torah"  या ग्रंथात वर्तविले होते, जो ग्रंथ मूसा अ. यांना देण्यात आला होता. त्यातली ही दुसरी वेळ होती.

पहिली वेळ ती होती, जेव्हा बेबिलोंनच्या राजाने विनाश केला होता. ही सत्य कथा आधी एका भागात होती...

कुरआन मध्ये हा संदर्भ आहे.

#कुरआनचा_काही_अंश

4 आणि आम्ही इस्राईल च्या मुलांना, ग्रंथाद्वारे हे आधीच कळविले होते की, तुम्ही जमिनीवर दोन वेळा उपद्रव माजवाल आणि मोठ्या विद्रोहाचे प्रदर्शन कराल.

( कुरआन 17:4)

[इस्रायली लोकांच्या ग्रंथात ' तोराह ' मध्ये हे भाकीत अल्लाह (यहोवा, ईश्वर)ने वर्तविले आहे, जो अल्लाह चाच ग्रंथ आहे.]

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...