नूह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नूह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

कुरआन च्या बोधकथा..1 आदम अ. आणि हव्वा, नूह अ., हूद अ. सालेह अ.

 1  आदम अ.  आणि  हव्वा ....


लाखो वर्षाआधी हे जग नव्हते...अल्लाहने म्हंटले...होऊन जा..आणि जग (धरती,पृथ्वी) बनले गेले...पण या जगात मनुष्य नव्हता...स्वर्गात ही मनुष्य नव्हता...

स्वर्ग हा खूप सुंदर बगीचा आहे. ज्याचा कुणी स्वप्नातही विचार करू शकत नाही.....तिथे सगळ्या प्रकारची फळझाडे आहेत...त्यात डाळिंब,अंगुर,ऑलिव...सर्व फळे जितका मनुष्य विचार करु शकतो...आणि त्याच्याहून आधिक.....

आणि त्या फळांच्या झाडांच्या मधून थंड आणि गोड पाण्याचे, दुधाचे आणि मधाचे झरे वाहत आहेत....

एक दिवस अल्लाहने स्वर्गात त्याच्या दूतांना म्हटले की, "माझी इच्छा आहे एक मनुष्य बनविण्याची"

दूत म्हटले, "आम्ही तुझ्या आज्ञा पाळत नाही का?"

अल्लाह म्हणाला, "मला चांगले माहीत आहे"

अल्लाहने ओल्या मातीपासून एक मनुष्य बनविला, आदम अ. (अडम)...आणि त्यात आत्मा (जीव, रुह) फुंकला...आदम अ. यांनी त्यांच्या जीवनाचा, पहिला श्वास घेतला... , अल्लाहने त्यांना प्रत्येक गोष्ट त्याला शिकविली. त्यांना बोलण्यासाठी काही शब्द शिकविले... अल्लाहने त्याच्या सर्व स्वर्गदूतांना बोलावले आणि म्हटले..."हा आदम आहे...त्याला वाकून प्रणाम करा.."

सगळ्या स्वर्गदूतांनी आज्ञाचे पालन केले...फक्त एकाने केले नाही..तो होता इब्लिस (शैतान)...तो एक जिन्न होता...तो म्हणाला, "मी का प्रणाम करू?..मी आगीने बनलो आहे आणि हा फक्त मातीने बनला आहे...मी याला प्रणाम करनार नाही"

अल्लाह इब्लीस वर रागावला आणि त्याला स्वर्गातून बाहेर केले... इबलीस (शैतान) ने तिथून जाताना प्रण केला की, "तो संपूर्ण मनुष्य जातीशी कयामत (महाविनाश) येईपर्यंत बदला घेईल"

अल्लाहने म्हटले की, "चांगले मनुष्य तुझे ऐकणार नाहीत.."

अल्लाहने आदमला  स्वर्गात राहायला परवानगी दिली.

आणि त्याला सांगितले की, "तुला जे आनंद देईल, ते तू कर..कोणतेही फळ खा...आणि जे तुला आवडेल ते तू पी... तू स्वर्गातले प्रत्येक फळ खावू शकतो फक्त एका झाडाचे फळ तू खायचे नाही.."अडम (आदम) यांनी सर्व मजा अनुभवली...आनंद घेतला...पण लवकरच त्यांना एकटेपणा जाणवू लागला..त्यांना मित्र नव्हते...म्हणून त्यांनी अल्लाहला म्हटले, "कृपा करून मला एक सोबती दे".  
अल्लाहने त्याला एक पत्नी दिली... हव्वा (एव्ह). ईबलीस चालाक होता..त्याने विचार करण्यास सुरू केला की, आदम अ. यांना अल्लाहची अवज्ञा करण्यास कसे भाग पाडावे... एक दिवस आदम अ. आणि हव्वा (अडम आणि एव्ह) स्वर्गात असताना तो त्यांच्या कानात फुसफुसला (बोलला) की, "ज्या झाडाचे फळ खाण्यासाठी तुला अडवले आहे, ते फळ  छान आहे...तू जर ते खाशील तर तू नेहमीसाठी जिवंत राहशील..." आदम अ. यांना मोह झाला...दोघांनी ईबलिसचे ऐकून त्या झाडाकडे जावून, ते फळ  खाल्ले.

ते फळ खाताच, त्यांना याची जाणीव झाली की, त्यांनी खूप मोठी चूक केली आहे...त्यांना लाज वाटली...कारण त्यांचे काही अंग हे दिसू लागले होते...झाडाच्या पानांमध्ये ते दोघे स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करू लागले...
पण अल्लाहला सर्व माहीत होते आणि तो सर्वीकडे असतो... अल्लाह त्यांच्यावर खूप रागावला, " मी तुला चेतावणी दिली होती...की त्या मना केलेल्या झाडाचे फळ खावू नको...पण तू माझी आज्ञा पाळली नाही...आता तुझी जागा धर्तीवर आहे...स्वर्गात नाही"...

अल्लाहने दोघांना स्वर्ग सोडून धरतीवर जाण्यास सांगितले.. त्या दोघांनीही एक चूक केली होती...पण त्यांना अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती...त्यांना त्याचा खूप पश्र्चाताप होत होता...त्यांनी अल्लाहकडून काही माफी मागण्याचे शब्द शिकून घेतले...ते खूप रडले आणि त्यांनी अल्लाहकडून माफी मागितली...शेवटी अल्लाहला त्यांच्यावर दया आली...अल्लाहने म्हटले की, जर तुम्ही चांगले काम (कर्म) केले आणि माझी आज्ञा पाळली तर मी तुम्हाला वापस स्वर्गात, जी एक सुंदर बाग आहे, बोलावेन...पण तुमच्या मृत्यू नंतर...पण जर चांगले काम (कर्म) केले नाही आणि आज्ञा पाळली नाही, तर मृत्यूनंतर खूप भयानक नरकात जावे लागेल....

आदम अ.यांना श्रीलंका येथील एका पर्वतावर उतरविण्यात आले...ही 4223BC
मधील घटना आहे....म्हणजे साधारणतः 6000 वर्षांपूर्वीची...

आदम अ. आणि हवा ने त्यांचे उरलेले जीवन धरतीवर चांगले काम (कर्म) करण्यात आणि अल्लाहची आज्ञा पाळण्यात घालविले...त्यांना आशा होती की, ते पुन्हा अल्लाहला खुश करून, त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गात जातील.....

त्यांना खूप मुले आणि नातवंड झाली...सर्व मानवजात त्यांची पिढी आहे...त्यामुळे आदम अ. यांना father of  human race म्हटले जाते....आणि हव्वा यांना mother of human race म्हंटले जाते. पुढे ते पॅलेस्टाईन मध्ये राहिले....आदम अ. हे 930 वर्षे जगले...


आदम अ. जेव्हा धरतीवर आले, तेव्हा त्यांच्या पायाचा ठसा, हा श्रीलंकेतील एका पर्वतावर आहे...


2 .  नूह अ.  आणि  प्रलय (पूर) 

जेव्हा मानवजात या जगात पसरली...काही लोकांनी अल्लाहची शिकवण लक्षात ठेवली, पण जास्त करून लोकांनी लक्षात ठेवली नाही...
ते अल्लाहविषयी विसरून गेले आणि दगडाच्या प्रतिमा बनवून आराधना करू लागले...

त्यांना अल्लाहची शिकवण आठवून देण्यासाठी, अल्लाहने एक संदेशवाहक त्यांच्याकडे पाठविला...त्यांचे नाव होते, नूह अ. (नोआ/Noah).

हा साधारणतः 3167BC मध्ये म्हणजे  अंदाजे 5000 वर्षांपूर्वीचा काळ होता. नूह अ. यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या देशाचे आताचे नाव, अझरबैजान (Azerbaijan) आहे...नूह अ. त्यावेळचे चांगले, सदाचारी व्यक्ती होते...

नूह अ. यांनी लोकांना सांगितले की, चांगले बनण्यासाठी, अल्लाहची आज्ञा पाळा...आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवा की, जर ते चांगले होतील तर ते वापस स्वर्गात जातील...त्याने त्यांना फक्त एका अल्लाहची प्रार्थना करण्यास सांगितले, जो त्यांना बनविणारा आहे आणि दगडाच्या प्रतिमेची आराधना करू नका, असे सांगितले...पण लोक खूप आज्ञा भंग करणारे होते...त्यांनी पुरुषांच्या, स्त्रीच्या, सिंहांच्या, घोड्याच्या आणि खूप काही प्राण्यांच्या पुतळ्यांची आराधना करने चालूच ठेवले...

नूह अ. यांनी त्यांना समजावले की, "हे दगड तुम्हाला काहीही देऊ शकत नाही...जर तुम्हाला काही पाहिजे आहे, तर त्यासाठी अल्लाहला मागा..."

नूह अ. यांनी  कारण दिले, "तुम्ही सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि आकाश पाहत नाही का? यांना कोणी बनविले...अल्लाहने या सर्वांना बनविले...तुम्हाला जाणीव होत नाही का की, अल्लाहने तुम्हालाही बनविले आणि तुम्हाला मृत्यूनंतर अल्लाहकडेच वापस जायचे आहे..."

नूह अ. यांनी विनवणी केली, " मी म्हणत नाही की, मी अल्लाहचा दूत आहे...किंवा मला, जे अज्ञात आहे, त्याचे ज्ञान आहे...मी हेही म्हणत नाही की, माझ्याकडे लपलेला खजिना आहे...मी फक्त एवढेच म्हणत आहे की, एकाच अल्लाहला माना आणि तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी त्याची आज्ञा पाळा...माझा विश्वास करा...मला या बदल्यात काहीही नको आहे..."  नूह अ., एक खूप सहनशील व्यक्ती होते...त्यांनी लोकांना उपदेश करून अल्लाहचा संदेश देणे नऊशे (900) वर्षांपर्यंत चालू ठेवले... त्यांना खूप मोठे आयुष्य होते...पण फक्त काहीच चांगल्या लोकांनी अल्लाहचा संदेश स्वीकार केला...

नूह अ. खूप नाखूष होते...त्यांनी अल्लाहकडे प्रार्थना केली...अल्लाह ने प्रकट केले, " नूह, दुःखी होऊ नकोस...तुझ्याकडून जितके झाले तितके तू खूप चांगले काम केले आहे...हे दुष्ट लोक, भयानक शिक्षा भोगण्याच्या योग्य आहेत...ते नष्ट होतील...त्यांना या शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही..."

अल्लाहने नूह अ. यांना, एका मोठ्या वादळविषयी सांगितले, जे या अविश्वास करणाऱ्या लोकांना जीवे मारेल...अल्लाहने नूह अ. यांना सल्ला दिला की, एक लांब नाव बनव आणि त्यावर स्वतःला आणि तुझ्या अनुयायींना, येणाऱ्या पूरापासून सुरक्षित करण्याची पूर्ण तयारी कर...

जेव्हा लोकांनी पाहिले की, नूह अ.  मोठी नाव बनवीत आहे...ते त्यांच्याकडे पाहून हसले...आणि म्हणाले की, "तर तू पूरासाठी तयारी करत आहे, नाही का? आणि तू त्यात (नावेत) स्वतःला वाचवशील? हss."..

पण नूह अ. यांनी, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि मोठी नाव बनविणे चालू ठेवले...

जेव्हा एक मोठी नाव तयार झाली, तेव्हा अल्लाहने नूह अ. यांना आज्ञा केली की, वादळ येण्याआधी, त्यांच्या कुटुंबाला, अनुयायींना, आणि सगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या, एका जोडीला त्याच्यासोबत, नावेत घेऊन जाण्यास सांग...

नूह अ. यांनी, अल्लाहने जी आज्ञा केली होती, ते सर्व केले...पण नूह अ. यांना, त्यांच्या एका मुलाविषयी, कानान (Yam) विषयी काळजी वाटत होती...ज्याने अल्लाहची आज्ञा पाळली नव्हती...तो विश्वास करणारा नव्हता.... नूह अ. यांनी अल्लाहला विचारले, कानान (Yam) चे काय होईल?...तो माझ्या कुटुंबातला आहे....तो वाचविला जाईल का? आणि अल्लाहने उत्तर दिले, "नाही, नूह, जो माझी आज्ञा पाळत नाही, तो तुझ्या कुटुंबातला नाही...आणि तुला त्याच्यासाठी वाईट नाही वाटले पाहिजे...तुझे कुटुंब त्यांच्यात आहे, ज्यांनी तुझ्या अल्लाहची आज्ञा पाळली आणि तुझीही...

शेवटी जेव्हा सगळी तयारी पूर्ण झाली, तेव्हा एक वादळ आले...कुणीही याआधी एवढे मोठे वादळ पाहिले नव्हते...ती एक शिक्षा होती ज्याचे अल्लाहने वचन दिले होते की, जर लोकांनी त्यांची पद्धत (रस्ता) बदलली नाही, तर अल्लाह वादळ पाठवेल...खूप जोरदार पाऊस आकाशातून खाली आला (ढग फाटले) आणि जमिनीतून पाणी उफाळून वर आले...जसे ते सर्व नावेत बसले, नूह अ. यांनी पुन्हा कानानला आवाज दिला...आणि अल्लाहची आज्ञा पाळायला आणि त्याचा संदेश स्वीकार करायला सांगितला, ज्यामुळे तो वाचेल...

पण कानान खरच फार हट्टी होता...तो म्हणाला, "नाही...मी येणार नाही...मी पर्वत चढेन आणि स्वतःला वाचवेन..." पण त्यानंतर लगेच एक मोठी लाट त्यांच्यामध्ये आली आणि कानान, त्याच्या सोबतच्या दुसऱ्या सर्व विश्वास न करणाऱ्या लोकांसोबत मरण पावला...

नूह अ. यांची नाव जुडी पर्वता जवळ पोहोचली (आताचे अरारात पर्वत जे तुर्कीत आहे) ते सर्व लोक, जे नाव मध्ये होते ते वाचविले गेले...

नूह अ. यांना दुसरा आदम अ. म्हणतात...कारण जवळपास प्रत्येक जण त्या भयंकर प्रलयामध्ये (पुरामध्ये) मरण पावला होता...फक्त नूह अ. आणि त्याचे काही अनुयायी, या जगात पुन्हा नवीन जीवन सुरू होण्यासाठी वाचविले गेले होते...

*ही सत्यकथा आणि बोधकथा कुरआन, बायबल, तोराह, वेद मध्ये ही आहे. वेद मधील ग्रंथात नूह अ. यांचे नाव मनु आहे.

संदेश हाच आहे, ही विश्वाचा निर्माता एक आणि फक्त एकच आहे...आणि त्याचीच उपासना करणे योग्य आहे...

3.   आदची   जमात   आणि   हूद अ.

नूह अ. यांचे अनुयायी, जे प्रलयामध्ये वाचवले गेले होते, ते चांगले लोक होते. नूह अ. हे 950 वर्ष जीवन जगले...खूप वर्षांनंतर त्यांची मुले आणि नातवंड हे, त्यांच्या पूर्वजांनी आणि परदादा यांनी जे सांगून गेले, त्याला विसरून गेले...

हे लोक खूप उंच, गोरे आणि चांगल्या शरीरयष्टीचे होते...आणि त्यांना आद लोक असे म्हंटले जात होते...त्यांनी सुंदर घरे आणि शहरे बनविली...पुन्हा एकदा त्यांनी दगडाच्या प्रतिमांची आराधना करने सुरू केले...त्यामुळे अल्लाहने अजून एक संदेशवाहक ज्यांचे नाव हूद अ. होते,पाठविला...त्या जमातीतील लोकांना अल्लाहच्या संदेशाची आठवण करून देण्यासाठी हूद अ. यांना पाठवण्यात आले होते.( अंदाजे 2500BC म्हणजे साधारणतः 4520वर्षांपूर्वी)

हूद अ. यांनी आदच्या जमातीतील लोकांना सांगितले की, "मी अल्लाहचा संदेशवाहक आहे, त्याने मला, तुम्हाला हे सांगण्यासाठी पाठविले आहे की, तुम्ही अजिबात योग्य करत नाही आणि तुम्हाला आठवण करून देण्यासाठी की, अल्लाहने नूह अ. यांच्या वेळच्या लोकांना कशी शिक्षा केली आणि जे एकाच अल्लाहवर विश्वास करत नाहीत, त्यांचा कसा विनाश केला...

पण आदच्या जमातीतील लोकांनी हूद अ. यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला...ते हूद अ. यांच्यावर आक्रमक झाले आणि म्हणाले, "तुझी इच्छा आहे का की आम्ही आमच्या दगडाच्या प्रतिमा सोडून द्याव्या, ज्यांची आमचे पिता,आजोबा आणि परदादा आराधना करत होते...नाही हूद ss ,आम्ही जे तू म्हणतो, ते कधीही करणार नाही...अल्लाहच्या शिक्षेविषयी सांगून आम्हाला घाबरवू नको....जर आम्ही अल्लाहची आराधना नाही केली तर त्याला, आम्हाला शिक्षा देऊ दे..."

हूद अ. म्हणाले, "ती शिक्षा खूप दूर नाही...तुम्ही त्यासाठी वाट पाहा...मी पण तुमच्या सोबत वाट पाहीन..." 

लवकरच त्यांची जमीन कोरडी आणि पडीक झाली..तेथे पाऊस नव्हता त्यामुळे खूप कमी पीक आले... हूद अ. त्यांच्या जमितीतील लोकांना म्हणाले, "लोकहो, अल्लाहची क्षमा मागा...त्याची क्षमा याचना करा आणि तो खूप जास्त देईल...अल्लाह सर्व काही करू शकतो..."

"तुला जे म्हणायचे ते तू म्हणू शकतो, हूद ...पण आम्ही तेच करणार जे आमच्या पित्याने केले..." आदच्या जमातीतील लोकांनी म्हंटले....

हूद अ. यांनी त्यांना, त्या फक्त एका अल्लाहला घाबरण्यास सांगितले, ज्याने त्यांना त्यांची मुले दिली...असे पाळीव प्राणी दिले (गुरे), ज्यामुळे त्यांना दूध आणि मांस मिळते आणि अजून खूप उपयोगी साधने दिली...

आदच्या जमातीतील लोक म्हणाले, आमच्यापेक्षा कोण जास्त शक्तीशाली आहे? (आम्हीच जास्त शक्तिशाली आहोत)

शेवटी अल्लाह, त्यांनी आज्ञापालन न केल्यामुळे खूप रागावला....त्याने एक खूप जोरदार वादळ (प्रचंड जोऱ्याचा वारा.../ tornado) पाठविले..जो आठ दिवस आणि सात रात्र चालला...त्यामुळे त्यांची शहरे उध्वस्त झाली, पुसली गेली आणि प्रत्येक जण मारला गेला...वादळ इतके शक्तिशाली होते की, त्याच्या रस्त्यातले सर्व धुळीसारखे वाऱ्याने उडून गेले... आदचे लोक आणि त्यांची मोठी आणि सुंदर घरे, उंच खंब्यासहित पृथ्वीवरून गायब झाली...

त्यानंतर हूद अ. अंदाजे 464 वर्षे जगले आणि त्यांच्या अनुयायांना अल्लाह च्या उपासनेचा संदेश देत राहिले...

अल्लाहने, हूद अ. यांचा संदेश ज्यांनी मानला नाही, त्या अादच्या जमातीतील लोकांना शिक्षा दिली...जे जिवंत राहिले ते काही काळासाठी अल्लाहला भयभीत झाले...पण लगेच हूद अ. यांची शिकवण विसरून, पुन्हा दगडांच्या प्रतिमांची आराधना सुरू केली...या लोकांना समुद म्हणले जायचे... 

आदच्या लोकांसारखेच , हे लोक गोरे, उंच आणि देखणे होते...त्यांनी डोंगरापासून कोरून भव्य घरे बनविली...आणि मैदानातील जमिनीवर सुंदर राजवाडे बनविले...पण ते कृतघ्न लोक होते...आणि त्यांनी अल्लाहची आज्ञा पाळली नाही...अल्लाहने त्यांच्या मधलाच एक संदेशवाहक पाठविला...त्याचे नाव सालेह अ. होते...

सालेह अ. यांनी समुदच्या लोकांना चांगले वागून, फक्त एकाच अल्लाहवर विश्वास करायला सांगितले...त्या लोकांत गरीब लोकांनी त्यांचे ऐकले, पण श्रीमंत लोकांनी ऐकले नाही....ते पूर्ण गर्विष्ठ होते आणि गरिबांना कमी लेखत होते...

ते म्हणाले, "सालेह, तू आमच्या सारखाच आहेस...तुला काय झाले आहे? की तू आम्हाला आमच्या आराध्यची, प्रतिमांची आराधना करण्यास थांबवत आहे..."

सालेह अ. म्हणाले, "मी अल्लाहचा संदेशवाहक आहे...अल्लाहने मला तुम्हाला सत्य सांगण्यासाठी पाठविले आहे...अल्लाहने तुम्हाला या धरतीपासून बनविले आहे आणि तुम्हाला धरतीवर जगायची परवानगी दिली आहे...अल्लाहने तुम्हाला बाग, झरे, कुरण (गवतासाठी राखलेले मैदान), स्वादिष्ट आणि मऊ खजूर आणि सुंदर घरे दिली...तुम्ही जी त्याची अवज्ञा करीत आहात त्यासाठी त्याची क्षमा मागा...याबदल्यात मला तुमच्याकडून काही नको आहे...मी तुम्हाला फक्त एकाच अल्लाहवर विश्वास ठेवण्यास सांगत आहे...ज्याने तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली..."

पण समुदच्या श्रीमंत लोकांनी नाराजी दाखविली आणि म्हणाले, "ठीक आहे, तुझ्या अल्लाहला सांग की, एक चमत्कार दाखव...मग आम्ही, त्या अल्लाहवर विश्वास करू...त्याला मानू...त्यांनी सालेह अ. यांना, अल्लाहला विनंती करून, डोंगरातून एक जिवंत उंट, त्यांच्यासमोर बाहेर काढून दाखविण्यास सांगितले...

सालेह अ. यांनी अल्लाहकडे प्रार्थना केली...आणि अल्लाहने त्यांची प्रार्थना, ऐकून समुदच्या लोकांना चमत्कार दाखवला, जो चमत्कार त्यांनी दाखवायला सांगितला होता...

एक मादा उंट डोंगराच्या गुफेतून, बरोबर, त्यांच्या डोळ्यासमोर बाहेर आली....

सालेह अ. म्हणाले, आता तुम्ही चमत्कार पाहीला.  तुम्हाला जे पाहीजे ते मिळाले आहे...ही मादा उंट पवित्र आहे...आणि अल्लाहने तुमच्या विनंतीवरून पाठविली आहे, ज्यामुळे तुम्हाला अल्लाहची उपस्थिती पटावी...ही अल्लाहची इच्छा आहे की, ती शेतात आणि रानात चरावी...आणि तिने एक दिवस ज्या ठिकाणी पाणी पिले...तुम्ही दुसऱ्या दिवशी तेथून पाणी काढावे... आळीपाळीने...तुमच्यापैकी कुणीही त्या मादा उंटची आणि तिच्या बछड्याची पाळी घेणार नाही...सालेह अ. यांनी हे ही सांगितले की, जर त्या मादा उंटीनीला कुणी त्रास दिला तर अल्लाहकडून शिक्षा दिली जाईल...

प्रथम समुदचे लोकं प्रभावित झाले आणि घाबरले...त्यांनी चमत्कार होतांना पहिला होता आणि विश्वास केला की, उंटीनी जी डोंगरातून बाहेर आली आहे, ती खरंच अल्लाहकडून पाठविण्यात आली आहे, जसे त्यांनी अल्लाहला विनंती करण्यास सांगितले होते...

पण लवकरच त्यांनी, त्या उंटीनीचे आणि तिच्या बछड्याचे, चरण्याचे आणि पाणी पिण्याचे (एक दिवसाआडचे) बिना अडथळ्याचे स्वातंत्र्य, याचा द्वेष करण्यास सुरू केला...ते त्यांचे पाणी त्या उंटीनी सोबत वाटण्यास (सहभागी करण्यास) इच्छुक नव्हते...त्यामुळे त्यांनी एक योजना आखलीे..आणि एक दिवस त्यांच्यातील काहींनी, तिला जिवे मारले...

जेव्हा सालेह अ. यांनी हे ऐकले तेव्हा ते खूप दुःखी झाले...त्यांनी समुदच्या लोकांना म्हंटले, "तुम्ही अल्लाहची आज्ञा न पाळून, पाप केले आहे...तुमच्यामुळे अल्लाह खूप रागावला आहे...आणि लवकरच तो तुम्हाला शिक्षा करेन"...आणि अल्लाहने समुदच्या लोकांना एक भयानक त्रासदायक आवाज, मेघ गर्जना आणि कडाक्याची वीज पाठवून, खूप कठोरपणे शिक्षा दिली...समुदचे लोकं, ज्यांनी सालेह अ. यांचे ऐकले नव्हते, जेव्हा त्यांनी हा भीतीदायक आवाज ऐकला तेव्हा त्यांच्या तोंडावर, जमिनीवर पडले. सकाळी ते सगळे त्यांच्या सुंदर आणि मजबूत घरांत, मृत आढळले होते, जी घरे त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधली होती...

फक्त ते लोक ज्यांनी एका अल्लाहला मानले आणि विश्वास ठेवला आणि ज्यांनी सालेह अ. यांचे ऐकले ते वाचवले गेले होते....(सौदी अरब देशात काही सापळे, तेलाच्या विहिरी खोदताना आढळले. सौदीतील लोक, जे हाडांचे सापळे दिसले, ते आद आणि समुदचे लोक होते असे मानतात...त्याचे फोटो गूगल वर आद पीपल स्केलेटन असे search केल्यास दिसतात.)


हे सर्व संदेशवाहक, हिब्रू भाषा बोलत होते व ते अल्लाह ला  यहोवा ( yahweh) या नावाने संबोधित करत होते. मुहम्मद स. अ. व. यांच्यावर कुराण प्रकट झाल्यानंतरचे अल्लाह हे संबोधन अरबी भाषेत कुरआन मध्ये आहे.

विश्वाचा निर्माता एकच आहे...भाषा वेगळ्या त्यामुळे संबोधन वेगळे आहे...इस्लाम धर्माचे लोक इब्राहीम अ. आणि मूसा अ. (Moses) यांनाही मानतात आणि ईसा अ.( येशू) यांनाही मानतात, ज्यामुळे अनुक्रमे ज्यू (यहुदी) आणि ख्रिश्चन धर्म आले. मूसा अ. यांच्यावर तोरात (Torah) आणि ईसा अ. यांच्यावर इंजील (बायबल) हा ग्रंथ प्रकट झाला. तोरात, बायबल आणि कुरआन मध्ये जवळ जवळ सारख्याच पैगंबरांच्या (संदेश वाहकाच्या) सत्यकथा आणि बोधकथा आहेत...आणि संदेश आहे...पण कुरआन हा मूळ ग्रंथ आहे, ज्यात काहीही बदल झालेला नाही.

_____________________________

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...