🌷युसूफ अ. आणि त्यांची इमानदारी, श्रद्धा, संयम🌷
साधारणतः 2000 BC म्हणजे 4000 वर्षांपूर्वी ची ही एक सत्यकथा आहे. जी कुरआन मध्ये वर्णन केलेली आहे.
प्रोफेट याकूब अ.(Jacob), ज्यांना इस्राईल ही म्हंटले जाते, हे खूप अल्लाह निष्ठ (ईश्वर निष्ठ) आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती होते आणि एक अल्लाह (परमेश्वर)चा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणारे होते..
त्यांना वेगवेगळ्या पत्नींपासून बारा मुले होती...सगळ्यात लहान पुत्र होते, युसुफ अ.(Joseph) आणि बनी अमीन...
याकूब अ. सर्व मुलांमध्ये, त्याच्या सगळ्यात लहान मुलावर युसुफ अ. यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करायचे...
एक दिवस युसुफ अ. यांना स्वप्न पडले की सूर्य, चंद्र आणि अकरा तारे त्यांना वाकून प्रणाम करीत आहेत..त्यांनी हे स्वप्न त्यांच्या पित्याला वर्णन केले..त्यांचे पिता त्यांना म्हणाले की, "तू ह्या स्वप्नाबद्दल तुझ्या मोठ्या भावंडांना काहीही सांगू नकोस..कारण त्यांना ईर्ष्या होऊन ते तुला नुकसान करण्याचा प्रयत्न करतील."...त्यांच्या पित्याने हे ही सांगितले की, युसुफ अ. यांच्यावर अल्लाह (ईश्वर) चे आशीर्वाद असतील..आणि ते ही अल्लाहचे संदेश सर्वांना पोहोचवतील...
युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ, युसुफ अ. यांच्यावर खूप ईर्ष्या...कारण त्यांचे वडील याकूब अ. त्यांच्यावर खूप प्रेम करायचे..एक दिवस ते सर्व भाऊ त्यांच्या वडिलांजवळ गेले आणि म्हणाले, "आम्ही बाहेर जात आहोत...तुम्ही आमच्यासोबत युसुफला पाठवाल का?..आम्ही त्याची चांगली काळजी घेऊ..तो आमच्यासोबत प्रवास करेल, खाईल, पियील आणि खेळेल...तुम्ही त्याला आमच्यासोबत ठेवण्यासाठी विश्वास करत नाही का?..."
याकुब अ. यांना त्यांच्या वाईट हेतू ची भनक लागली...ते म्हणाले, मला भीती वाटते की लांडगा युसुफ वर आक्रमण करेल"...
पण त्या सगळ्या भावांनी त्यांना पटवून दिले आणि हमी दिली की, ते त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतील..त्यामुळे भरलेल्या अंतःकरणाने याकूब अ. यांनी युसुफ अ. यांना, त्यांच्या सोबत जाऊ दिले...
जेव्हा ते सर्व जण जंगलात होते, तेव्हा मोठ्या भावांनी युसुफ अ. यांना एका कोरड्या, जुन्या विहिरीत फेकले...
ते सर्व जण रडत घरी आले आणि त्यांच्या वडिलांना म्हणाले की, "लांडग्याने खरेच युसुफ वर आक्रमण करून, त्याला मारले."...त्यांनी युसुफ अ. यांचा रक्ताळलेला सदरा, त्यांची मन गढंत कहाणी सिद्ध करण्यासाठी व दाखविण्यासाठी, वापस आणला होता..
याकूब अ. यांनी पाहिले की, तो सदरा अजिबात फाटला नव्हता..त्यांना त्याच वेळी सगळे समजले की, नक्की काय घडले असावे ..आणि ते खूप दुःखी झाले...
ते म्हणाले, मला माहित आहे, हे खरे नाही..पण मी काही तक्रार करणार नाही आणि धीर सोडणार नाही..मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागेल.. लवकरच एक तांडा (काफिला, राहण्याची सामान असलेल्या गाड्या), ज्या इजिप्त (मिस्र) कडे जात होत्या, त्या विहिरीजवळून जात असतांना पाणीसाठी थांबल्या, ज्यात युसुफ अ. यांना फेकले गेले होते. त्यांना युसुफ अ. विहिरीत दिसले...
ते त्यांना पाहून खूप आनंदी झाले, त्या दिवसांत सेवकांची खरेदी आणि विक्री करणे, एक साधारण प्रथा होती..आणि ते ही, एक चांगला तरुण युसुफ अ. सारखा मुलगा इजिप्त मध्ये विकून, त्यांना एक चांगली रक्कम मिळाली असती...
इजिप्त (मिस्र) च्या सेवकांच्या बाजारातून, अजीज नावाच्या एका माणसाने , जो इजिप्त च्या एका शाही कुटुंबाचा सदस्य होता आणि इजिप्तच्या सेनेचा, सैन्य अधिकारी होता, युसुफ अ. यांना विकत घेतले..आणि त्याला घरी आणले..आणि त्याच्या बायकोला जुलेखाला म्हटले की, "युसुफ ला सन्मानाने वागव..तो आपल्यासाठी चांगले नशीब घेऊन येईल..आणि आपण त्याला एका मुलाप्रमाणे दत्तक घेऊ शकू."...
ते म्हणाले, मला माहित आहे, हे खरे नाही..पण मी काही तक्रार करणार नाही आणि धीर सोडणार नाही..मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागेल.. लवकरच एक तांडा (काफिला, राहण्याची सामान असलेल्या गाड्या), ज्या इजिप्त (मिस्र) कडे जात होत्या, त्या विहिरीजवळून जात असतांना पाणीसाठी थांबल्या, ज्यात युसुफ अ. यांना फेकले गेले होते. त्यांना युसुफ अ. विहिरीत दिसले...
ते त्यांना पाहून खूप आनंदी झाले, त्या दिवसांत सेवकांची खरेदी आणि विक्री करणे, एक साधारण प्रथा होती..आणि ते ही, एक चांगला तरुण युसुफ अ. सारखा मुलगा इजिप्त मध्ये विकून, त्यांना एक चांगली रक्कम मिळाली असती...
इजिप्त (मिस्र) च्या सेवकांच्या बाजारातून, अजीज नावाच्या एका माणसाने , जो इजिप्त च्या एका शाही कुटुंबाचा सदस्य होता आणि इजिप्तच्या सेनेचा, सैन्य अधिकारी होता, युसुफ अ. यांना विकत घेतले..आणि त्याला घरी आणले..आणि त्याच्या बायकोला जुलेखाला म्हटले की, "युसुफ ला सन्मानाने वागव..तो आपल्यासाठी चांगले नशीब घेऊन येईल..आणि आपण त्याला एका मुलाप्रमाणे दत्तक घेऊ शकू."...
युसुफ अ. मोठे होऊन, खूपच देखणे तरुण झाले... अजीज त्यांच्यावर खूप दया करायचा.. त्यांच्यावर प्रेम करायचा.
घराच्या सर्व आर्थिक कारभाराची जबाबदारी त्याला दिली होती..अजीजची सुंदर बायको युसुफ अ. यांच्याकडे आकर्षित झाली.. एक दिवस युसुफ अ. खोलीत एकटे असताना, जुलेखा त्यांना पटवू लागली...युसुफ अ. मानले नाही..ते एक विनम्र आणि अल्लाहला घाबरणारे तरुण होते...त्यांना त्यांच्या मालकाला अजीजला अपमानित करायचे नव्हते आणि अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती..त्यांनी अल्लाहची प्रार्थना केली..आणि अल्लाहने त्यांना मदत केली...आणि तेथून सुटून जाणे त्यांना जमले..
त्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला.. जुलेखा त्याच्या मागे पळाली आणि तिने त्यांचा सदरा ओढून मागे खेचले.. सदरा फाटला.. जुलेखाचा पती अजीज आणि जुलेखाचा चुलत भाऊ, जे दाराच्या बाहेर येवून उभे होते, त्यांनी दोघांना बाहेर येताना पाहिले...
आता तिने जे केले त्याची लाज वाटण्याऐवजी, तिने युसुफ अ. यांना दोष दिला.."या माणसाला तुरुंगात पाठविले पाहिजे, मला नुकसान पोहोचविल्याबद्दल" असे तिने तिच्या पतीला सांगितले..
युसुफ अ. यांनी, हे अमान्य केले आणि त्यांनी, जे काही खरे घडले ते अजीजला सांगितले...दोन वेगवेगळे कथन होते...अजीजला कुणावर विश्वास ठेवावा, युसुफ अ. वर की जुलेखा वर कळत नव्हते..
जुलेखाचा चुलत भाऊ खूप हुशार होता..तो म्हणाला, "जर युसुफचा सदरा पुढून फाटला असेल, तर जुलेखा खरी आहे आणि जर सदरा मागच्या बाजूने फाटला, तर जुलेखा खोटे बोलत आहे आणि युसुफ निरागस आहे.."
युसुफ अ. चा सदरा मागून फाटला होता (कारण जुलेखाने त्यांना थांबवण्यासाठी मागून ओढले होते)..यामुळे युसुफ अ. यांची निरागसता सिद्ध झाली होती...
अजीजला क्षणात कळाले की काय घडले..त्याने युसुफ अ. यांच्यावर विश्वास केला आणि त्याच्या बायकोला युसुफ अ. यांची क्षमा मागायला सांगितली..अजीजने युसुफ अ. ची माफी मागितली आणि जे झाले ते, विसरून जायला सांगितले...
पण जुलेखा विसरली नाही...तिला अपमानित झाल्यासारखे वाटले आणि तिची हार झाल्यामुळे तिला राग आला..
हळू हळू बातमी महिलांमध्ये पसरली..आणि त्या गप्पा करू लागल्या की, जुलेखा एका सेवकावर आकर्षित झाली... जेव्हा जुलेखाने ऐकले, तेव्हा तिने सर्व महिलांना एका मोठ्या आणि छान मेजवानीसाठी तिच्या घरी आमंत्रित केले..तिला त्यांना दाखवायचे होते युसुफ अ. ज्यांच्याकडे ती आकर्षित झाली होती, हा कुणी साधारण व्यक्ती नव्हता...तो विलक्षण देखणा तरुण होता..इतका देखणा की, कोणीही त्याच्याकडे आकर्षित होण्यापासून, स्वतःला रोखू शकत नव्हते ...
त्या सगळ्या महिला जेवणासाठी बसल्या आणि त्यांच्या हातात फळे कापन्यासाठी चाकू दिलेला होता.. जुलेखाने युसुफ अ. यांना बोलावले..जसे युसुफ अ. त्या खोलीत आले...महिला त्यांच्या चकाकत्या रूपाकडे पाहतच राहिल्या..आणि त्यांनी फळे कापण्याऐवजी स्वतःची बोटे कापून घेतली...
त्यानंतर त्यांनी जुलेखाकडे पाहून म्हटले की, तू खरी आहेस..तो साधारण मनुष्य नाही..तो इतका चांगला दिसतो की जसा एक स्वर्गदूत...
जुलेखा त्यांना म्हणाली, जर तो, मी जे सांगितले ते करण्यास मानला नाही, तर माझ्या आज्ञेनुसार त्याला तुरुंगात जावे लागेल, कारण तो एक सेवक आहे आणि मालकिणीची आज्ञा न मानणे हा त्याच्यासाठी अपराध आहे. (मालकाची आज्ञा न पाळणे, हा त्याकाळी अपराध समजला जायचा, कारण सेवकाला, काही नाणी, देऊन विकत घेतलेले असायचे.)
युसुफ अ. यांनी जुलेखाचे ऐकून काही चुकीचे करण्याऐवजी, तुरुंगात जाणे पत्करले आणि महिलांच्या सांगण्यावरून, ते निरपराधी असताना देखील, त्यांना तुरुंगात टाकले गेले.
युसुफ अ. जेव्हा तुरुंगात होते, त्याच तुरुंगात एक आचारी आणि शाही दरबाराचा एक साकी (मद्य देणारा) त्याचे सहकारी कैदी होते...
एक दिवस ते युसुफ अ. जवळ आले आणि त्यांना पडलेले स्वप्न त्यांनी वर्णन केले..आचारीला स्वप्न पडले होते की तो एक नान (मोठा गोल ब्रेड, भाकरी किंवा पोळी) त्याच्या डोक्यावर घेऊन जात आहे..आणि पक्षी त्यातून ते खात आहेत...साकी ला स्वप्न पडले होते की, तो अंगुर पासून वाईन (मद्य) बनवत आहे...
अल्लाहने युसुफ अ. यांना आशीर्वादासह प्रतिभा दिली होती, त्यामुळे ते स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होता...त्यांच्या सहकारी कैद्यांना ते म्हणाले, "मी तुमच्या स्वप्नांचे अर्थ सांगेन... जे मला अल्लाहने शिकविले आहे, त्यातलाच हा एक भाग आहे..."
मग युसुफ अ. यांनी दोघांना सांगितले की, आचारीला फाशी दिली जाईल आणि पक्षी त्याचे डोके खातील..आणि साकी सोडून दिला जाईल...आणि राजाला दरबारात वाईन म्हणजे मद्य देण्यासाठी नियुक्त केला जाईल..युसुफ अ. यांनी साकी ला, जेव्हा तो दरबारात जाईल तेव्हा, त्याच्या विषयी (युसुफ अ. विषयी) राजाशी बोलण्यास सांगितले...
पण साकी तुरुंगातून सुटल्यानंतर युसुफ अ. बद्दल सर्व विसरून गेला..आणि युसुफ अ. तुरुंगात काही अजून वर्ष तसेच राहिले..
एक दिवस राजाला एक स्वप्न पडले...राजाने पाहिले की, सात अशक्त गायी, सात जाड (धष्ट पुष्ट) गायींना खात आहेत...त्याने सात कोरडे आणि सात हिरवे मक्याचे कणीस पाहिले...
राजाने दरबारातील लोकांना विचारले की कुणी स्वप्नांचा अर्थ सांगू शकेल का?..
घराच्या सर्व आर्थिक कारभाराची जबाबदारी त्याला दिली होती..अजीजची सुंदर बायको युसुफ अ. यांच्याकडे आकर्षित झाली.. एक दिवस युसुफ अ. खोलीत एकटे असताना, जुलेखा त्यांना पटवू लागली...युसुफ अ. मानले नाही..ते एक विनम्र आणि अल्लाहला घाबरणारे तरुण होते...त्यांना त्यांच्या मालकाला अजीजला अपमानित करायचे नव्हते आणि अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती..त्यांनी अल्लाहची प्रार्थना केली..आणि अल्लाहने त्यांना मदत केली...आणि तेथून सुटून जाणे त्यांना जमले..
त्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला.. जुलेखा त्याच्या मागे पळाली आणि तिने त्यांचा सदरा ओढून मागे खेचले.. सदरा फाटला.. जुलेखाचा पती अजीज आणि जुलेखाचा चुलत भाऊ, जे दाराच्या बाहेर येवून उभे होते, त्यांनी दोघांना बाहेर येताना पाहिले...
आता तिने जे केले त्याची लाज वाटण्याऐवजी, तिने युसुफ अ. यांना दोष दिला.."या माणसाला तुरुंगात पाठविले पाहिजे, मला नुकसान पोहोचविल्याबद्दल" असे तिने तिच्या पतीला सांगितले..
युसुफ अ. यांनी, हे अमान्य केले आणि त्यांनी, जे काही खरे घडले ते अजीजला सांगितले...दोन वेगवेगळे कथन होते...अजीजला कुणावर विश्वास ठेवावा, युसुफ अ. वर की जुलेखा वर कळत नव्हते..
जुलेखाचा चुलत भाऊ खूप हुशार होता..तो म्हणाला, "जर युसुफचा सदरा पुढून फाटला असेल, तर जुलेखा खरी आहे आणि जर सदरा मागच्या बाजूने फाटला, तर जुलेखा खोटे बोलत आहे आणि युसुफ निरागस आहे.."
युसुफ अ. चा सदरा मागून फाटला होता (कारण जुलेखाने त्यांना थांबवण्यासाठी मागून ओढले होते)..यामुळे युसुफ अ. यांची निरागसता सिद्ध झाली होती...
अजीजला क्षणात कळाले की काय घडले..त्याने युसुफ अ. यांच्यावर विश्वास केला आणि त्याच्या बायकोला युसुफ अ. यांची क्षमा मागायला सांगितली..अजीजने युसुफ अ. ची माफी मागितली आणि जे झाले ते, विसरून जायला सांगितले...
पण जुलेखा विसरली नाही...तिला अपमानित झाल्यासारखे वाटले आणि तिची हार झाल्यामुळे तिला राग आला..
हळू हळू बातमी महिलांमध्ये पसरली..आणि त्या गप्पा करू लागल्या की, जुलेखा एका सेवकावर आकर्षित झाली... जेव्हा जुलेखाने ऐकले, तेव्हा तिने सर्व महिलांना एका मोठ्या आणि छान मेजवानीसाठी तिच्या घरी आमंत्रित केले..तिला त्यांना दाखवायचे होते युसुफ अ. ज्यांच्याकडे ती आकर्षित झाली होती, हा कुणी साधारण व्यक्ती नव्हता...तो विलक्षण देखणा तरुण होता..इतका देखणा की, कोणीही त्याच्याकडे आकर्षित होण्यापासून, स्वतःला रोखू शकत नव्हते ...
त्या सगळ्या महिला जेवणासाठी बसल्या आणि त्यांच्या हातात फळे कापन्यासाठी चाकू दिलेला होता.. जुलेखाने युसुफ अ. यांना बोलावले..जसे युसुफ अ. त्या खोलीत आले...महिला त्यांच्या चकाकत्या रूपाकडे पाहतच राहिल्या..आणि त्यांनी फळे कापण्याऐवजी स्वतःची बोटे कापून घेतली...
त्यानंतर त्यांनी जुलेखाकडे पाहून म्हटले की, तू खरी आहेस..तो साधारण मनुष्य नाही..तो इतका चांगला दिसतो की जसा एक स्वर्गदूत...
जुलेखा त्यांना म्हणाली, जर तो, मी जे सांगितले ते करण्यास मानला नाही, तर माझ्या आज्ञेनुसार त्याला तुरुंगात जावे लागेल, कारण तो एक सेवक आहे आणि मालकिणीची आज्ञा न मानणे हा त्याच्यासाठी अपराध आहे. (मालकाची आज्ञा न पाळणे, हा त्याकाळी अपराध समजला जायचा, कारण सेवकाला, काही नाणी, देऊन विकत घेतलेले असायचे.)
युसुफ अ. यांनी जुलेखाचे ऐकून काही चुकीचे करण्याऐवजी, तुरुंगात जाणे पत्करले आणि महिलांच्या सांगण्यावरून, ते निरपराधी असताना देखील, त्यांना तुरुंगात टाकले गेले.
युसुफ अ. जेव्हा तुरुंगात होते, त्याच तुरुंगात एक आचारी आणि शाही दरबाराचा एक साकी (मद्य देणारा) त्याचे सहकारी कैदी होते...
एक दिवस ते युसुफ अ. जवळ आले आणि त्यांना पडलेले स्वप्न त्यांनी वर्णन केले..आचारीला स्वप्न पडले होते की तो एक नान (मोठा गोल ब्रेड, भाकरी किंवा पोळी) त्याच्या डोक्यावर घेऊन जात आहे..आणि पक्षी त्यातून ते खात आहेत...साकी ला स्वप्न पडले होते की, तो अंगुर पासून वाईन (मद्य) बनवत आहे...
अल्लाहने युसुफ अ. यांना आशीर्वादासह प्रतिभा दिली होती, त्यामुळे ते स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होता...त्यांच्या सहकारी कैद्यांना ते म्हणाले, "मी तुमच्या स्वप्नांचे अर्थ सांगेन... जे मला अल्लाहने शिकविले आहे, त्यातलाच हा एक भाग आहे..."
मग युसुफ अ. यांनी दोघांना सांगितले की, आचारीला फाशी दिली जाईल आणि पक्षी त्याचे डोके खातील..आणि साकी सोडून दिला जाईल...आणि राजाला दरबारात वाईन म्हणजे मद्य देण्यासाठी नियुक्त केला जाईल..युसुफ अ. यांनी साकी ला, जेव्हा तो दरबारात जाईल तेव्हा, त्याच्या विषयी (युसुफ अ. विषयी) राजाशी बोलण्यास सांगितले...
पण साकी तुरुंगातून सुटल्यानंतर युसुफ अ. बद्दल सर्व विसरून गेला..आणि युसुफ अ. तुरुंगात काही अजून वर्ष तसेच राहिले..
एक दिवस राजाला एक स्वप्न पडले...राजाने पाहिले की, सात अशक्त गायी, सात जाड (धष्ट पुष्ट) गायींना खात आहेत...त्याने सात कोरडे आणि सात हिरवे मक्याचे कणीस पाहिले...
राजाने दरबारातील लोकांना विचारले की कुणी स्वप्नांचा अर्थ सांगू शकेल का?..
त्यानंतर साकीला युसुफ अ. आठवले...जे अजूनही तुरुंगात होते..त्याने राजाची आज्ञा घेतली आणि युसुफ अ. यांना भेटण्यासाठी गेला... त्याने राजाचे स्वप्न युसुफ अ. यांना सांगितले..
त्याच्यावर राग न करता आणि त्याच्याविषयी राजाशी लवकरच बोलण्यास सांगून, युसुफ अ. यांनी, त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला..."जमिनीत सात वर्ष मकाचे पीक खूप जास्त होईल...त्यामुळे तुम्हाला जेवढे आवश्यक आहे, तेवढे खा आणि बाकीचा मका सुरक्षित स्थळी ठेवा..त्यानंतर सात वर्ष खूप भयानक दुष्काळ येईल..त्या वर्षांत पाऊस होणार नाही आणि मका येणार नाही...जे तुम्ही जमा करून ठेवलेले मक्याचे दाणे आहेत त्यातून खा..त्यानंतर त्यापुढचे वर्ष खूप पाऊस होईल आणि त्यानंतर पिकाची कापणी...."
जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि राजा त्या व्यक्तीला भेटण्यासाठी इच्छुक झाला, ज्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता...युसुफ अ. यांच्याकडे सैनिकांना पाठविण्यात आले...पण युसुफ अ. यांनी तुरुंग सोडण्यास नकार दिला, कारण त्यांना राजाला जाणीव करून द्यायची होती की, त्याला अन्यायपूर्वक बंद केले गेले होते...
त्यामुळे राजाने, त्या महिलांशी, ज्यांनी स्वीकार केले की, "युसुफ हा निरागस आणि सदाचारी आहे", योग्य चौकशी करवून घेतली...आणि न्याय केला.
त्यानंतरच युसुफ अ. तुरुंगातून बाहेर येण्यास तयार झाले.. आता युसुफ अ. यांना सन्मानाने राजाच्या दरबारात नेण्यात आले. राजा आधीच युसुफ अ. यांच्या ज्ञान, हुशारी, निष्ठा, इमानदारी आणि पुण्य यांनी प्रभावित होता...राजाने इच्छा केली की, "युसुफ त्याचा प्रमुख सल्लागार बनावा."...युसुफ अ. यांनी सुचविले की, त्यांना धान्याचा साठा करने आणि धान्याचे व्यवस्थापन करणे, याची जबाबदारी द्यावी...
राजा मानला आणि युसुफ अ. यांना, याचा पूर्ण अधिकार दिला.. अशा प्रकारे अल्लाहने युसुफ अ. यांना, त्यांच्यातील सदगुणामुळे, दरबारात
त्याच्यावर राग न करता आणि त्याच्याविषयी राजाशी लवकरच बोलण्यास सांगून, युसुफ अ. यांनी, त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला..."जमिनीत सात वर्ष मकाचे पीक खूप जास्त होईल...त्यामुळे तुम्हाला जेवढे आवश्यक आहे, तेवढे खा आणि बाकीचा मका सुरक्षित स्थळी ठेवा..त्यानंतर सात वर्ष खूप भयानक दुष्काळ येईल..त्या वर्षांत पाऊस होणार नाही आणि मका येणार नाही...जे तुम्ही जमा करून ठेवलेले मक्याचे दाणे आहेत त्यातून खा..त्यानंतर त्यापुढचे वर्ष खूप पाऊस होईल आणि त्यानंतर पिकाची कापणी...."
जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि राजा त्या व्यक्तीला भेटण्यासाठी इच्छुक झाला, ज्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता...युसुफ अ. यांच्याकडे सैनिकांना पाठविण्यात आले...पण युसुफ अ. यांनी तुरुंग सोडण्यास नकार दिला, कारण त्यांना राजाला जाणीव करून द्यायची होती की, त्याला अन्यायपूर्वक बंद केले गेले होते...
त्यामुळे राजाने, त्या महिलांशी, ज्यांनी स्वीकार केले की, "युसुफ हा निरागस आणि सदाचारी आहे", योग्य चौकशी करवून घेतली...आणि न्याय केला.
त्यानंतरच युसुफ अ. तुरुंगातून बाहेर येण्यास तयार झाले.. आता युसुफ अ. यांना सन्मानाने राजाच्या दरबारात नेण्यात आले. राजा आधीच युसुफ अ. यांच्या ज्ञान, हुशारी, निष्ठा, इमानदारी आणि पुण्य यांनी प्रभावित होता...राजाने इच्छा केली की, "युसुफ त्याचा प्रमुख सल्लागार बनावा."...युसुफ अ. यांनी सुचविले की, त्यांना धान्याचा साठा करने आणि धान्याचे व्यवस्थापन करणे, याची जबाबदारी द्यावी...
राजा मानला आणि युसुफ अ. यांना, याचा पूर्ण अधिकार दिला.. अशा प्रकारे अल्लाहने युसुफ अ. यांना, त्यांच्यातील सदगुणामुळे, दरबारात
एक पद आणि स्थान देऊन, बक्षीस दिले ज्यासाठी ते योग्य होते... पुढे, जेव्हा आजूबाजूच्या जमिनीत दुष्काळ (धान्याची कमी) होती, इजिप्तमधील जनतेला खाण्यासाठी अजूनही पुष्कळ अन्न होते..हे सगळे युसुफ अ.च्या, देशाच्या, खाद्य राखीव संग्रहातील, चांगल्या व्यवस्थापनामुळे होते..शेजारील देशातून लोक अन्नासाठी इजिप्त मध्ये येत होते..
सगळीकडे खूप वाईट दुष्काळ पसरला आणि इजिप्तच्या, जवळचे आणि दूरचे लोक इजिप्तमध्ये आले...त्यामध्ये युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ ही कानान (सध्याचे पॅलेस्टाईन) वरून आले होते..
युसुफ अ. यांनी जरी त्यांच्या भावांना पाहता क्षणी ओळखले होते, तरी भावांनी त्यांना ओळखले नव्हते...युसुफ अ. यांनी, त्यांना पुढच्या वेळेस येताना त्यांच्या सर्वात लहान भावाला (बनी अमीन जो युसुफ अ. यांचा सख्खा भाऊ होता) घेऊन येण्यास सांगितले..नाहीतर पुढच्या वेळी धान्य मिळणार नाही...
भाऊ घरी त्यांच्या वडीलांजवळ, याकूब अ. यांच्याजवळ गेले आणि जे काही झाले ते सांगितले..आणि म्हंटले की, आमच्यासोबत बनी अमीन ला पाठवा...आम्ही वाचन देतो की, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि येताना जास्त धान्य आणू..
पण याकूब अ., युसुफ अ. यांच्या भावांनी, जे युसुफ अ. सोबत केले होते ते विसरला नव्हते आणि त्यांची बनी अमीन ला त्यांच्यासोबत पाठवायची इच्छा नव्हती..
त्यांच्यावर दुसऱ्या वेळेस विश्वास ठेवण्यासाठी ते अजिबात इच्छुक नव्हते...तरीसुद्धा जेव्हा भावांनी जोर दिला आणि अल्लाहची शपथ घेतली की, ते बनी अमीन ची पूर्ण जबाबदारी घेतील...याकूब अ. यांनी, बनी अमीन ला जावू दिले...
जेव्हा ते सर्व भाऊ जात होते, तेव्हा याकूब अ. यांनी त्यांना, इजिप्त मध्ये प्रवेश करताना शहराच्या वेगवेगळ्या दरवाजाने प्रवेश करायचा सल्ला दिला..
सर्व भाऊ, बनी अमीन सोबत इजिप्तसाठी निघाले..पूर्ण रस्ता मोठ्या भावांनी बनी अमीन ला टोमणे मारले आणि चिडविले..जेव्हा ते इजिप्तला पोहोचले आणि युसुफ अ. जवळ गेले, युसुफ अ. यांनी त्यांच्या सख्ख्या भावाला लगेच ओळखले आणि त्याला एकांतात, स्वतः विषयी सांगितले..
त्यांनी हे ही सांगितले की, मोठे भाऊ ज्या पद्धतीने वागवीत आहेत, त्याची यापुढे काळजी करायची आवश्यकता नाही...
जे अन्न धान्य ते विकत घेण्यासाठी आले होते ते त्यांनी दिले , पण जाण्याआधी एक चांदीची वाटी युसुफ अ. यांनी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत ठेवली..
भाऊ जसे निघणार, तेव्हा राजाच्या सेवकांना राजाची चांदीची वाटी हरवल्याचे आढळले...त्यांनी तांडा (काफिला, उंटाच्या गाड्या) थांबवला आणि त्यांच्या समानांत शोधले.. वाटी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत सापडली...
हा इजिप्त चा कायदा होता की, कोणताही चोर, जिथे त्याने गुन्हा केला, ते शहर सोडून जाऊ शकत नव्हता...त्यामुळे बनी अमीन ला जाण्याची आज्ञा नव्हती...
सगळीकडे खूप वाईट दुष्काळ पसरला आणि इजिप्तच्या, जवळचे आणि दूरचे लोक इजिप्तमध्ये आले...त्यामध्ये युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ ही कानान (सध्याचे पॅलेस्टाईन) वरून आले होते..
युसुफ अ. यांनी जरी त्यांच्या भावांना पाहता क्षणी ओळखले होते, तरी भावांनी त्यांना ओळखले नव्हते...युसुफ अ. यांनी, त्यांना पुढच्या वेळेस येताना त्यांच्या सर्वात लहान भावाला (बनी अमीन जो युसुफ अ. यांचा सख्खा भाऊ होता) घेऊन येण्यास सांगितले..नाहीतर पुढच्या वेळी धान्य मिळणार नाही...
भाऊ घरी त्यांच्या वडीलांजवळ, याकूब अ. यांच्याजवळ गेले आणि जे काही झाले ते सांगितले..आणि म्हंटले की, आमच्यासोबत बनी अमीन ला पाठवा...आम्ही वाचन देतो की, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि येताना जास्त धान्य आणू..
पण याकूब अ., युसुफ अ. यांच्या भावांनी, जे युसुफ अ. सोबत केले होते ते विसरला नव्हते आणि त्यांची बनी अमीन ला त्यांच्यासोबत पाठवायची इच्छा नव्हती..
त्यांच्यावर दुसऱ्या वेळेस विश्वास ठेवण्यासाठी ते अजिबात इच्छुक नव्हते...तरीसुद्धा जेव्हा भावांनी जोर दिला आणि अल्लाहची शपथ घेतली की, ते बनी अमीन ची पूर्ण जबाबदारी घेतील...याकूब अ. यांनी, बनी अमीन ला जावू दिले...
जेव्हा ते सर्व भाऊ जात होते, तेव्हा याकूब अ. यांनी त्यांना, इजिप्त मध्ये प्रवेश करताना शहराच्या वेगवेगळ्या दरवाजाने प्रवेश करायचा सल्ला दिला..
सर्व भाऊ, बनी अमीन सोबत इजिप्तसाठी निघाले..पूर्ण रस्ता मोठ्या भावांनी बनी अमीन ला टोमणे मारले आणि चिडविले..जेव्हा ते इजिप्तला पोहोचले आणि युसुफ अ. जवळ गेले, युसुफ अ. यांनी त्यांच्या सख्ख्या भावाला लगेच ओळखले आणि त्याला एकांतात, स्वतः विषयी सांगितले..
त्यांनी हे ही सांगितले की, मोठे भाऊ ज्या पद्धतीने वागवीत आहेत, त्याची यापुढे काळजी करायची आवश्यकता नाही...
जे अन्न धान्य ते विकत घेण्यासाठी आले होते ते त्यांनी दिले , पण जाण्याआधी एक चांदीची वाटी युसुफ अ. यांनी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत ठेवली..
भाऊ जसे निघणार, तेव्हा राजाच्या सेवकांना राजाची चांदीची वाटी हरवल्याचे आढळले...त्यांनी तांडा (काफिला, उंटाच्या गाड्या) थांबवला आणि त्यांच्या समानांत शोधले.. वाटी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत सापडली...
हा इजिप्त चा कायदा होता की, कोणताही चोर, जिथे त्याने गुन्हा केला, ते शहर सोडून जाऊ शकत नव्हता...त्यामुळे बनी अमीन ला जाण्याची आज्ञा नव्हती...
हेच युसुफ अ. यांना पाहीजे होते...यामुळे युसुफ अ. यांना, त्यांच्या लहान भावाला, त्यांच्या जवळ ठेवण्यासाठी निमित्त मिळाले होते...बनी अमीन ला ही हे कळले होते...
पण त्याचे मोठे भाऊ अत्यंत चिंता करू लागले..कारण त्यांनी त्यांच्या पित्याला याकूब अ. यांना, बनी अमीन ला सुरक्षित वापस आणण्याचे वचन दिले होते...त्यांनी युसुफ अ. यांच्याकडे विनवणी केली की, "बनी अमीन ला जावू द्यावे आणि आमच्या पैकी एकाला त्याच्या जागी ठेवून घ्यावे"....
पण युसुफ अ. मानले नाही. "हे चूक आहे की ज्याने गुन्हा केला, त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणाला ठेवून घ्यावे...". भाऊ यावर खूप उदास झाले होते...
सर्वात मोठा भाऊ म्हणाला, "मी माझ्या वडिलांना बनी अमीन बद्दल शब्द दिला आहे..मी त्याच्या विना जाणार नाही..जोपर्यंत अल्लाह याविषयी काही ठरवत नाही.."
बाकीचे सर्व भाऊ घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना सगळी कहाणी सांगितली, "तुमचा मुलगा चोर आहे, हे सगळे त्याच्यामुळे घडले..."
याकूब अ. हे विश्वास करण्यासाठी तयार नव्हते. "हे अशक्य आहे..बनी अमीन कधीही चोरी करणार नाही...पण जरी मी, त्याच्यासाठी काही करू शकत नसलो, तरी मी धीर धरेन आणि तक्रार करणार नाही..."
याकूब अ. यांनी, त्यांचे दिवस आणि रात्र दुःखात आणि प्रार्थना करण्यात घालविले...ते इतके रडले की, त्यांची दृष्टी गेली..पण त्यांनी धीर सोडला नाही...
त्यांची मुले त्यांच्यावर नाराज झाली आणि ते सर्व म्हणाले, "जर तुम्ही रडणे थांबवले नाही, तर तुम्ही असेच मरून जाल..."
"मी तुम्हाला काहीच म्हणत नाही...मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागत आहे...आणि त्यांच्यातर्फेच मदत मिळेल, तुमच्याकडून नाही" याकुब अ. बोलले...
मग याकूब अ. यांनी, त्यांच्या मुलांना वापस इजिप्तला जावून युसुफ अ. आणि बनी अमीन ला बघून येण्यास सांगितले आणि आशा सोडली नाही...
भाऊ युसुफ अ. जवळ तिसऱ्या वेळेस गेले आणि म्हणाले, "आम्ही वापस आलो कारण आमची गरज आहे...आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, तरी कृपा करून आम्हाला आमच्या कुटुंबासाठी धान्य द्या.आमच्यावर दया दाखवा..आम्ही तुमचे खरेच खूप आभारी राहू.." युसुफ अ. यांना, त्यांच्या कुटुंबाची दशा ऐकून खूप वाईट वाटले..
पण युसुफ अ. यांना, त्यांच्याशी केलेल्या त्यांच्या निर्दयीपणाची आठवण करून द्यायची होती. "आठवा, तुम्हाला एक भाऊ होता का...युसुफ?..त्याच्याशी तुम्ही काय केले?"
तेव्हा त्यांना जाणीव झाली की, हा चांगला माणूस खरंच त्यांचा भाऊ, युसुफ आहे...ज्याला त्यांनी विहिरीत फेकून दिले होते....
"तू खरच युसुफ आहे का?" त्यांना विश्वास बसत नव्हता आणि स्वतःची लाज ही वाटत होती...
"हो" युसुफ अ. यांनी उत्तर दिले...
"खरंच आम्ही चुकलो...आम्हाला माफ कर." भाऊ म्हणाले...
युसुफ अ. यांनी, त्यांना माफ केले..आणि अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांच्यावर कृपा दृष्टी व्हावी...
मग युसुफ अ. यांनी, त्यांच्या पूर्ण कुटुंबाला इजिप्तमध्ये आणण्यास सांगितले...युसुफ अ. यांनी, त्याच्या वडिलांसाठी, त्यांचा सदरा दिला आणि म्हटले की, "हा सदरा त्यांच्या डोळ्यावर लावा...आणि त्यांची दृष्टी परत येईल.."
कानानला, तांडा (उंटाच्या गाड्या) वापस येण्याआधीच याकूब अ. म्हणाले की, "हवेत युसुफ अ. च्या असण्याचा आभास होत आहे..". लोक बोलत होते की, "खरंच तुमचे डोके काम करीत नाही...हे कसे शक्य आहे, जर युसुफचे काहीच शिल्लक राहिले नाही?"
पण याकूब अ. यांना खात्री होती की, त्यांचा मुलगा जिवंत आहे...
लवकरच त्यांची मुले युसुफ अ. बद्दल चांगली बातमी घेऊन घरी पोहोचले...आणि त्यांचा सदरा, त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर ठेवला...याकूब अ. यांना लगेच दृष्टी वापस मिळाली आणि ते म्हणाले, "मी म्हणालो नव्हतो का की, जे अल्लाहकडून मला कळले, ते तुम्हाला कळले नाहीे..मी अल्लाहला तुम्हाला माफ करण्यासाठी प्रार्थना करेल..."
नंतर पूर्ण कुटुंब इजिप्त ला गेले...युसुफ अ. आता इजिप्त चे राजा बनले होते...ते त्यांना घेण्यासाठी शहराच्या दरवाजा पाशी आला..त्यांनी त्यांच्या पित्याला खूप आदराने आणि सन्मानाने, त्याच्या दरबारात संरक्षण दिले. जेव्हा युसुफ अ. त्यांच्या सिंहासन वर चढले, तेव्हा त्यांच्या कुटुंबासह सर्वांनी त्यांना वाकून प्रणाम केला...
आणि अशा प्रकारे त्याचे बालपणाचे स्वप्न खरे झाले की, त्याचे आईवडिल आणि अकरा भाऊ, जे स्वप्नात सूर्य,चंद्र आणि तारे होते, ते त्याला वाकून प्रणाम करीत होते...
================================
*याकूब अ.,युसुफ अ.,इब्राहीम अ. आणि लूत अ. हे हिब्रू भाषा बोलत होते व ते अल्लाहला यहोवा (yahweh) या नावाने संबोधित करत होते. मुहम्मद स. अ. व. यांच्यावर कुरआन प्रकट झाल्यानंतरचे अल्लाह हे संबोधन अरबी भाषेत कुरआनमध्ये आहे.
विश्वाचा निर्माता एकच आहे...भाषा वेगळ्या त्यामुळे संबोधन वेगळे आहे...इस्लाम धर्माचे लोक इब्राहीम अ. आणि मूसा अ. (Moses) यांनाही मानतात आणि ईसा अ.( येशू) यांनाही मानतात, ज्यामुळे अनुक्रमे ज्यू (यहुदी) आणि ख्रिश्चन धर्म आले. मूसा अ. यांच्यावर तौरात (Torah) आणि ईसा अ. यांच्यावर इंजील (बायबल) हा ग्रंथ प्रकट झाला. तौरात, बायबल आणि कुरआन मध्ये जवळ जवळ सारख्याच प्रोफेट्स च्या सत्यकथा आणि बोधकथा आहेत...आणि संदेश आहे...पण कुरआन हा मूळ ग्रंथ आहे, ज्यात काहीही बदल झालेला नाही.
पण त्याचे मोठे भाऊ अत्यंत चिंता करू लागले..कारण त्यांनी त्यांच्या पित्याला याकूब अ. यांना, बनी अमीन ला सुरक्षित वापस आणण्याचे वचन दिले होते...त्यांनी युसुफ अ. यांच्याकडे विनवणी केली की, "बनी अमीन ला जावू द्यावे आणि आमच्या पैकी एकाला त्याच्या जागी ठेवून घ्यावे"....
पण युसुफ अ. मानले नाही. "हे चूक आहे की ज्याने गुन्हा केला, त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणाला ठेवून घ्यावे...". भाऊ यावर खूप उदास झाले होते...
सर्वात मोठा भाऊ म्हणाला, "मी माझ्या वडिलांना बनी अमीन बद्दल शब्द दिला आहे..मी त्याच्या विना जाणार नाही..जोपर्यंत अल्लाह याविषयी काही ठरवत नाही.."
बाकीचे सर्व भाऊ घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना सगळी कहाणी सांगितली, "तुमचा मुलगा चोर आहे, हे सगळे त्याच्यामुळे घडले..."
याकूब अ. हे विश्वास करण्यासाठी तयार नव्हते. "हे अशक्य आहे..बनी अमीन कधीही चोरी करणार नाही...पण जरी मी, त्याच्यासाठी काही करू शकत नसलो, तरी मी धीर धरेन आणि तक्रार करणार नाही..."
याकूब अ. यांनी, त्यांचे दिवस आणि रात्र दुःखात आणि प्रार्थना करण्यात घालविले...ते इतके रडले की, त्यांची दृष्टी गेली..पण त्यांनी धीर सोडला नाही...
त्यांची मुले त्यांच्यावर नाराज झाली आणि ते सर्व म्हणाले, "जर तुम्ही रडणे थांबवले नाही, तर तुम्ही असेच मरून जाल..."
"मी तुम्हाला काहीच म्हणत नाही...मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागत आहे...आणि त्यांच्यातर्फेच मदत मिळेल, तुमच्याकडून नाही" याकुब अ. बोलले...
मग याकूब अ. यांनी, त्यांच्या मुलांना वापस इजिप्तला जावून युसुफ अ. आणि बनी अमीन ला बघून येण्यास सांगितले आणि आशा सोडली नाही...
भाऊ युसुफ अ. जवळ तिसऱ्या वेळेस गेले आणि म्हणाले, "आम्ही वापस आलो कारण आमची गरज आहे...आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, तरी कृपा करून आम्हाला आमच्या कुटुंबासाठी धान्य द्या.आमच्यावर दया दाखवा..आम्ही तुमचे खरेच खूप आभारी राहू.." युसुफ अ. यांना, त्यांच्या कुटुंबाची दशा ऐकून खूप वाईट वाटले..
पण युसुफ अ. यांना, त्यांच्याशी केलेल्या त्यांच्या निर्दयीपणाची आठवण करून द्यायची होती. "आठवा, तुम्हाला एक भाऊ होता का...युसुफ?..त्याच्याशी तुम्ही काय केले?"
तेव्हा त्यांना जाणीव झाली की, हा चांगला माणूस खरंच त्यांचा भाऊ, युसुफ आहे...ज्याला त्यांनी विहिरीत फेकून दिले होते....
"तू खरच युसुफ आहे का?" त्यांना विश्वास बसत नव्हता आणि स्वतःची लाज ही वाटत होती...
"हो" युसुफ अ. यांनी उत्तर दिले...
"खरंच आम्ही चुकलो...आम्हाला माफ कर." भाऊ म्हणाले...
युसुफ अ. यांनी, त्यांना माफ केले..आणि अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांच्यावर कृपा दृष्टी व्हावी...
मग युसुफ अ. यांनी, त्यांच्या पूर्ण कुटुंबाला इजिप्तमध्ये आणण्यास सांगितले...युसुफ अ. यांनी, त्याच्या वडिलांसाठी, त्यांचा सदरा दिला आणि म्हटले की, "हा सदरा त्यांच्या डोळ्यावर लावा...आणि त्यांची दृष्टी परत येईल.."
कानानला, तांडा (उंटाच्या गाड्या) वापस येण्याआधीच याकूब अ. म्हणाले की, "हवेत युसुफ अ. च्या असण्याचा आभास होत आहे..". लोक बोलत होते की, "खरंच तुमचे डोके काम करीत नाही...हे कसे शक्य आहे, जर युसुफचे काहीच शिल्लक राहिले नाही?"
पण याकूब अ. यांना खात्री होती की, त्यांचा मुलगा जिवंत आहे...
लवकरच त्यांची मुले युसुफ अ. बद्दल चांगली बातमी घेऊन घरी पोहोचले...आणि त्यांचा सदरा, त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर ठेवला...याकूब अ. यांना लगेच दृष्टी वापस मिळाली आणि ते म्हणाले, "मी म्हणालो नव्हतो का की, जे अल्लाहकडून मला कळले, ते तुम्हाला कळले नाहीे..मी अल्लाहला तुम्हाला माफ करण्यासाठी प्रार्थना करेल..."
नंतर पूर्ण कुटुंब इजिप्त ला गेले...युसुफ अ. आता इजिप्त चे राजा बनले होते...ते त्यांना घेण्यासाठी शहराच्या दरवाजा पाशी आला..त्यांनी त्यांच्या पित्याला खूप आदराने आणि सन्मानाने, त्याच्या दरबारात संरक्षण दिले. जेव्हा युसुफ अ. त्यांच्या सिंहासन वर चढले, तेव्हा त्यांच्या कुटुंबासह सर्वांनी त्यांना वाकून प्रणाम केला...
आणि अशा प्रकारे त्याचे बालपणाचे स्वप्न खरे झाले की, त्याचे आईवडिल आणि अकरा भाऊ, जे स्वप्नात सूर्य,चंद्र आणि तारे होते, ते त्याला वाकून प्रणाम करीत होते...
================================
*याकूब अ.,युसुफ अ.,इब्राहीम अ. आणि लूत अ. हे हिब्रू भाषा बोलत होते व ते अल्लाहला यहोवा (yahweh) या नावाने संबोधित करत होते. मुहम्मद स. अ. व. यांच्यावर कुरआन प्रकट झाल्यानंतरचे अल्लाह हे संबोधन अरबी भाषेत कुरआनमध्ये आहे.
विश्वाचा निर्माता एकच आहे...भाषा वेगळ्या त्यामुळे संबोधन वेगळे आहे...इस्लाम धर्माचे लोक इब्राहीम अ. आणि मूसा अ. (Moses) यांनाही मानतात आणि ईसा अ.( येशू) यांनाही मानतात, ज्यामुळे अनुक्रमे ज्यू (यहुदी) आणि ख्रिश्चन धर्म आले. मूसा अ. यांच्यावर तौरात (Torah) आणि ईसा अ. यांच्यावर इंजील (बायबल) हा ग्रंथ प्रकट झाला. तौरात, बायबल आणि कुरआन मध्ये जवळ जवळ सारख्याच प्रोफेट्स च्या सत्यकथा आणि बोधकथा आहेत...आणि संदेश आहे...पण कुरआन हा मूळ ग्रंथ आहे, ज्यात काहीही बदल झालेला नाही.